हे पुस्तक पूर्ण वाचणारा वाचक, माझ्या निष्कर्षाशी सहमत असो वा नसो, पण तो या पुस्तकाला ‘छद्मविज्ञान’ मात्र नक्कीच म्हणणार नाही!
ग्रंथनामा - झलक
डॉ. अरुण गद्रे
  • ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 14 January 2022
  • ग्रंथनामा झलक उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा Utkranti Ek Vaidnyanik Andhashraddha अरुण गद्रे Arun Gadre उत्क्रांती Evolution डार्विन Darwin

ज्येष्ठ लेखक डॉ. अरुण गद्रे यांचं ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ हे नवीन पुस्तक नुकतंच सुनिधी पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. मानवी उत्क्रांतीबद्दलचे आपले अपसमज दूर करणारे, आपली समजूत व्यापक करणारे हे पुस्तक आहे. बौद्धिक खाद्य पुरवणारे आणि बौद्धिक आव्हान देणारे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले हे मनोगत...

..................................................................................................................................................................

‘उत्क्रांती’ हा विषय डोळ्यांसमोर येताच हे पुस्तक बंद करून कपाटात ठेवणं, ही सामान्य माणसाची पहिली प्रतिक्रिया असेल तर, मला अजिबात धक्का बसणार नाही. आपण शाळेत उत्क्रांती शिकलो, तेव्हा निर्माण झालेल्या काही प्रतिमा डोळ्यांसमोरून झरझर जाणं अत्यंत स्वाभाविक आहे. या प्रतिमा म्हणजे काय? तर काही माकडं आणि आपल्यातला दुवा म्हणून आपल्याला दाखवण्यात आलेले दाढीवाले पुरुष आणि स्त्रिया! त्यांच्या हातात काही जुनी अवजारं! जवळ गुहा! क्वचित शेकोटी आणि ते परीक्षेसाठी पाठ करायला अवघड असं लांबलचक निओएथेन्ड्रेल असं काहीसं नाव! बापरे! असेल काहीतरी उत्क्रांती वगैरे! त्याची माहिती असो-नसो, आज काय फरक पडतो?

एका दृष्टीनं हे म्हणणं खरंच आहे! जगण्याची लढाई इतकी दमवणारी झाली आहे, आयुष्य इतकं सुपरफास्ट झालंय, रोजचं जगणंच मुळी कठीण झालं आहे. अशात हे असे विषय वाचायचे कशाला, असा प्रश्न ज्यांना पडतो, असे अनेक लोक हे पुस्तक हातात घेणार नाहीत, हेही खरं आहे. पण प्रश्न वेगळाच आहे. मुळात माणसं अशी पुस्तकं का वाचतात? कुतूहल हे त्यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण असतं. मी कोण आहे? आणि मी कुठून आलो? हा सनातन प्रश्न माणसाच्या  जिव्हाळ्याचा आहे, होता आणि राहील यात शंका नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या सनातन प्रश्नाचा एक विलक्षण नवीन उलगडा प्रस्तुत पुस्तक करतं, याची मी खात्री देतो. १० वर्षांपूर्वी गुगल नावाच्या अल्लाउद्दीननं मला काही वेगळंच भन्नाट जग दाखवलं. गेल्या ३० वर्षांत सूक्ष्मजीवशास्त्र, जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी यात जी थक्क करणारी प्रगती झाली आहे, विज्ञानानं आजवर अदृश्य असं जे विस्मयजनक विश्व आपल्यासमोर आणलं आहे, ते मी प्रस्तुत पुस्तकात तुमच्या समोर आणत आहे. तो या पुस्तकाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.

आता या नव्या शास्त्रीय ज्ञानानं अज्ञानाची बरीच जळमटं उडून गेली, यात उत्क्रांतीचा डार्विनला अपेक्षित असलेल्या सिद्धान्ताचा समावेश होतो, जो या पुस्तकाचा अपरिहार्य भाग आहे. डार्विनसारख्या अत्यंत प्रतिभावान शास्त्रज्ञाला खोटं ठरवणं, ही प्रस्तुत पुस्तकाची मूळ प्रेरणा नाही. म्हणून तर प्रस्तुत पुस्तकात तिसरं प्रकरण आहे ‘डार्विनचा विजय’ आणि पाठोपाठचं प्रकरण आहे ‘विजयातला पराभव’.

प्रस्तुत पुस्तक तुम्हाला जीवपेशीची एक भन्नाट सफर घडवेल. खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवरसायनशास्त्राला स्पर्श करेल. अजिबात दचकू नका. या सर्व शास्त्रांबाबत मीही तुमच्याइतकाच अनभिज्ञ आहे आणि होतो. हेही खरं आहे की, थोडेच वाचक विज्ञानाचे विद्यार्थी आहेत आणि अगदी जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांनादेखील थोडं कठीण वाटेल, एवढं हे शास्त्र विकसित झालं आहे.

आपण इथं खूप विस्तारानं न पाहता विषयाला फक्त स्पर्श करणार आहोत. ज्यांना रस असेल त्या वाचकांनी संदर्भसूचीचा वापर करावा. मूळ शास्त्रीय पुस्तकं वाचावीत. त्यांची सूचीसुद्धा दिली आहे. आणि हो! यात एकही वाक्य माझं पदरचं नाही. प्रत्येक दाव्याला, प्रतिपादनाला पुरावा आहे. शास्त्रीय पुरावा आहे. दिगंत शास्त्रज्ञांची अवतरणं संदर्भासह आहेत (शंभरपेक्षा अधिक संदर्भ आहेत!)

या पुस्तकासाठी फक्त एक गोष्ट हवी. वाचकाकडे फक्त कुतूहल हवं! बस! खात्रीनं सांगतो की, पुस्तक खाली ठेवताना तुमचं एकूणच आपल्या अवकाशाचं, जगण्याच्या रहस्याचं भान आमूलाग्र बदललेलं असेल. माझं बदललं. माझा प्रयत्न आहे की, ज्यांचा विज्ञान हा विषय नाही आणि असेच बहुसंख्य वाचक आहेत; त्यांना विषय कळावा. त्यामुळे मी जणू तुमच्याशी गप्पा मारत आहे, अशी शैली या पुस्तकात जाणीवपूर्वक वापरली आहे. मजा म्हणजे यामुळे प्रस्तुत पुस्तकाचं बाड वाचून ‘या पुस्तकाची शैली ही शास्त्रीय मांडणीसारखी नाही!’ असा अभिप्राय आला. हे यशच म्हणायचं.

काहींना आणखी काही गंभीर आणि महत्त्वाचे प्रश्न पण पडले असतील. प्रस्तुत पुस्तकाचं शीर्षक जरा ज्यादाच वाटू शकेल, उर्मट वाटू शकेल. उत्क्रांतीविरुद्ध हे पुस्तक म्हणजे छद्मविज्ञान असणार, वाचण्यात काही अर्थ नाही, असा समज होऊ शकेल. सध्या सोशल मीडियामुळे छद्मविज्ञानाला बहर आला आहे. त्यामुळे ही शंका चुकीची नाही.

इथे मी दोन मुद्दे समोर ठेवीन.

एक, गुरुत्वाकर्षण आणि उत्क्रांतीचा सिद्धान्त हे दोन्ही वैज्ञानिक सिद्धान्त असले तरी दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक आहे. गुरुत्वाकर्षण हे ‘ऑपरेशन सायन्स’ आहे आणि उत्क्रांती हे ‘ओरिजीन सायन्स’ आहे. न्यूटननं केलेले प्रयोग आपण आजही प्रत्यक्ष करू शकतो. उत्क्रांती ही जशी घडून गेलेल्या खुनाचा आरोपी शोधून काढते, तसं प्रयोगानं नव्हे तर अनुमानानं सिद्ध होतं किंवा फेटाळलं जातं. त्यामुळे गुरुत्वाकर्षण आणि उत्क्रांतीची तुलना होऊ शकत नाही. ओरिजीन सायन्सला ऑपरेशन सायन्सचे नियम लागू पडत नाहीत.

डार्विननं ज्या पद्धतीनं उत्क्रांतीचा निष्कर्ष काढला होता, त्याच पद्धतीनं आज विज्ञानात बुद्धिमान अभिकल्प हा निष्कर्ष काढला जात आहे. डार्विनसमोर फिंच पक्ष्याच्या चोचीचा पुरावा होता. आज उपलब्ध पुरावा आहे ‘जनुकीय रेग्युलेटरचा.’ डार्विनने फिंच पक्ष्याच्या बदलत्या लांबीच्या चोचीचा कार्यकारणभाव अनुमानानं ठरवला ‘जगण्यासाठी बाह्य दबावाला प्रतिसाद’.

आज रेग्युलेटर जनुकाचा पुरावा समोर आला आहे आणि त्याचा कार्यकारणभाव ठरवला मात्र अनुमानानं जात आहे - ‘बुद्धिमान अभिकल्प’. अगदी अशाच प्रकारची कॉम्युटरची चीप आणि कॉम्युटरचे कोडसुद्धा आपल्यासमोर आज आहे आणि हे निर्विवाद आहे की, कॉम्पुटर चीप किंवा कोडमागे आहे- ‘बुद्धिमान प्रतिभा’ (इंटेलिजंट माईंड).

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लक्षावधी वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेचं स्पष्टीकरण देण्यासाठी डार्विन त्याला त्याच्या काळात पुराव्यानं आढळलेला कार्यकारणभाव वापरतो आणि अनुमानरूपानं उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडतो. आज पुराव्यानं आढळलेला कार्यकारणभाव वापरून बुद्धिमान अभिकल्प सिद्धान्त समोर ठेवला जातो आहे. दोन्ही पद्धती सारख्याच आहेत. डार्विनचं प्रतिपादन हे विज्ञान असेल, तर बुद्धिमान अभिकल्पसुद्धा विज्ञानच आहे. आणि जर बुद्धिमान अभिकल्प हे छद्मविज्ञान असेल, तर डार्विनसुद्धा छद्मविज्ञान ठरतो.

या आक्षेपाला आणखी एक उत्तर याच पुस्तकात ‘विज्ञान म्हणजे काय रे भाऊ?’ या प्रकरणात दीर्घ स्वरूपात दिलं आहे. इथं एवढंच नमूद करतो की, हे एक चक्र आहे. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे निर्मिक आणि बुद्धिमान अभिकल्प (इंटेलिजंट डिझाईन) अमान्य! समजा, ज्यामुळे बुद्धिमान अभिकल्प (इंटेलिजंट डिझाईन) सूचित होत आहे, असे शास्त्रीय पुरावे आणि तार्किक मांडणी पुढे येऊ लागली तर, ते वैज्ञानिक पुरावे आणि तार्किक मांडणी हे छद्मविज्ञान (स्यूडोसायन्स)!

मला खात्री आहे, हे पुस्तक पूर्ण वाचणारा वाचक, माझ्या निष्कर्षाशी सहमत असो वा नसो, पण तो या पुस्तकाला ‘छद्मविज्ञान’ मात्र नक्कीच म्हणणार नाही.

तेव्हा मित्रमैत्रिणींनो खुल्या मनाने आणि अपार कुतुहलाने चला तर या विस्मयकारक आणि धक्कादायक वैज्ञानिक सफरीवर!

उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा – अरुण गद्रे,

सुनिधी पब्लिशर्स, पुणे

पाने – २६०

मूल्य – ४०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......