‘माझी स्मरणचित्रे’ : एका अस्सल वऱ्हाडी ख्रिस्ती माणसाची साधी, सरळ, पण तरीही एक वेगळी गोडी असलेली स्मरणयात्रा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
हर्षवर्धन निमखेडकर
  • ‘माझी स्मरणचित्रे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 22 December 2021
  • ग्रंथनामा शिफारस माझी स्मरणचित्रे Mazi Smaranchitre सुभाष पाटील Subhash Patil मराठी-ख्रिस्ती Marathi Khristi

प्रा. सुभाष पाटील यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली तीन पुस्तकं वाचून मला ‘Tres faciunt collegium’ (‘तिघांचा समूह बनतो’) या लॅटिन वचनाची आठवण आली. यापूर्वी त्यांची बारा पुस्तकं निघाली आहेत, पण या वेळी त्यांनी एकदम तीन रन काढले. २२ डिसेंबर हा पाटलांचा जन्मदिवस असतो आणि २५ तारखेला येशू ख्रिस्ताचा. पण येशूचे निस्सीम अनुयायी असलेल्या पाटलांना निव्वळ ‘ख्रिस्ती लेखक’ म्हणून एका विशिष्ट कप्प्यात बसवून चालणार नाही.

त्यांच्या आजवरच्या सर्वच लेखनातून त्यांची व्यापक दृष्टी, त्यांचा समतोल आणि सर्वसमावेशक बाणा, तसंच कुठलाही अभिनिवेश नसलेली त्यांची साधी, सरळ, पण थेट हृदयाला भिडणारी भाषा प्रकर्षानं जाणवते. ते विद्वान आहेत, पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि लेखनात कुठेही अहंकार डोकावत नाही. कठीण शब्द वापरून आणि अलंकारिक शैलीत ते एखाद्या समीक्षकाच्या भूमिकेतून सहज लिहू शकले असते. पण त्यांच्या लेखणीतून उतरतात ते रसाळ आणि प्रासादिक, वाचकांशी हसतखेळत संवाद साधणारे शब्द. त्यांच्या लेखनात थोडासा पसारा असेल, पण त्यांची पुस्तकं वाचताना कंटाळा कधीच येत नाही. नुकतीच प्रसिद्ध झालेली त्यांची ही तीन पुस्तकं याची साक्ष देतात. त्यामुळे हे ग्रांथिक collegium निव्वळ ख्रिस्तीच नव्हे, तर अन्य मराठी वाचकांनीही अवश्य वाचायला पाहिजे. त्याची जागा फक्त चर्चच्या चार भिंतींच्या आत नसून मराठी साहित्याच्या मुख्य धारेचाही तो एक भाग आहे, हे आवर्जून सांगावंसं वाटतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

सुभाष पाटलांची ही तीन पुस्तकं आहेत- ‘माझी स्मरणचित्रे’ नावाचं त्यांचं आत्मवृत्त, ‘चर्च भोवतालच्या कथा’ हा लघुकथा संग्रह, आणि ‘ख्रिस्ती कीर्तन मार्गदर्शिका’ हा एक माहितीपर संग्रह. त्यापैकी ‘माझी स्मरणचित्रे’ या पुस्तकाचा हा अल्पपरिचय.

हे आठवणींच्या अंगानं जाणारं आत्मचरित्र आहे. त्याला ‘मेमॉयर्स’ (memoirs) म्हणणं अधिक उचित ठरेल. त्यातून त्यांनी त्यांचा आजवरचा जीवनप्रवास मोठ्या खुबीनं आणि प्रामाणिकपणे वाचकांसमोर ठेवला आहे. उपेक्षित अशा एका समाजातल्या एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि काहीशा गरीब परिस्थितीतच वाढलेल्या या माणसानं केवळ स्वकष्टानं आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर कशी भरारी मारली आणि प्रगती केली, याचा हा छोटेखानी आलेख आहे.

ते लहानाचे मोठे होतानाचे ग्रामिण भागातले दिवस, शैक्षणिक प्रगती करताना त्यांना आलेल्या अडचणी त्यांनी बखुबी रंगवल्या आहेत. त्यांचा मूळ विषय गणित असूनही नंतर ते मराठी अध्यापनाकडे वळले. पीएच.डी. ही डिग्री मिळवली, एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झाले. याचसोबत त्यांनी मराठीत विपुल लेखन केलं. ते ज्या ख्रिस्ती पंथाचे उपासक आहेत, त्यांच्या चर्चसाठीही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर कार्य केलं. अनेक प्रकारच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अंगावर असतानासुद्धा त्या नीट पार पाडून त्यांनी स्वतःचा संसारही नेटकेपणानं केला. ख्रिस्ती समाजातले एक ज्येष्ठ, प्रतिष्ठित नागरिक म्हणून आज त्यांना ओळखलं जातं. त्यांना आर्थिक आणि अन्य प्रकारच्या समस्यांनाही सामोरं जावं लागलं. यातून मार्ग काढत आज ते वयाच्या सत्तरीनंतरचं सुखी जीवन जगत आहेत. ही झाली या आत्मवृत्ताची बाह्य चौकट.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

या आत्मकथनातली रंजकता यात नाही. ती आहे त्यांनी हे सारं लेखन कमालीच्या तटस्थतेनं आणि मनमोकळ्या पद्धतीनं केलं आहे, यात. हे सारं लिहिताना त्यांनी काहीही लपवलेलं नाही, बढाया मारलेल्या नाहीत, जे लिहिलं ते स्पष्ट आणि सौम्य शब्दांत लिहिलं आहे, याची जाणीव हे पुस्तक वाचताना प्रकर्षानं होते. त्यांना जे काही कटू अनुभव आले, ज्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागलं, त्याविषयी लिहिताना ते कुठेही मनाचा समतोल ढळू देत नाहीत.

या लिखाणात ना कुठे कटुता आहे, ना विखार. जे मिळालं त्याला देवाचा प्रसाद म्हणून ते स्वीकारतात. जे नाही मिळालं, जे हुकलं, किंवा जे खूप काळानं मिळालं, त्यालाही ते ईश्वराची मर्जी म्हणून ग्राह्य मानतात. त्यामुळे हे साधं, सरळ, पण तरीही एक वेगळी गोडी असलेलं लिखाण वाचायला छान वाटतं.

लक्ष्मीबाई टिळकांसह अनेक मान्यवर ख्रिस्ती लेखकांनी आजवर आपापली आत्मवृत्तं लिहिली आहेत. यातली बहुतेक सारी मंडळी पश्चिम महाराष्ट्रातली आहेत. पण सुभाष पाटील हे हाडाचे वऱ्हाडी आहेत. नाशिक, अहमदनगर, मुंबई, पुणे यांच्या तुलनेत विदर्भात ख्रिस्ती समाज काहीसा कमी प्रमाणात आढळतो. त्यामुळे एका अस्सल वऱ्हाडी ख्रिस्ती माणसाची ही स्मरणयात्रा जरा वेगळी म्हणून नक्कीच उल्लेखनीय ठरते.

सुभाष पाटलांचे आई-वडील हे दोघेही हिंदू धर्मात जन्मले. वडील यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव जवळच्या मिटनापूर या खेड्यातले. पुढे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या संपर्कात आल्यानं वडिलांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. फ्री मेथडिस्ट हा त्यांचा पंथ. त्यानंतर त्यांनी आसपासच्या परिसरात ख्रिस्ती धर्मप्रचार केला. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातल्या गावोगावी जावं लागायचं. आमदनी बेताचीच. या ठिकाणी त्यांना ‘बाटलेला’ म्हणून सापत्न वागणूक मिळत असे. त्यांच्या अपत्यांनाही अशीच सामाजिक दुर्भावना सहन करावी लागली. हे टक्केटोणपे खात खात सुभाष पाटील मोठे झाले. त्यानंतर त्यांनी स्वकर्तृत्वावर शिक्षण घेतलं आणि गणित शिक्षक म्हणून ते नोकरीसाठी नागपुरला आले.

पुढे कधी तरी त्यांनी हा रस्ता बदलून मराठीत एम.ए. केलं आणि नंतर डॉक्टरेटदेखील. पुढे ते नागपूरच्या सुप्रसिद्ध हिस्लप महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक (पुढे विभागप्रमुख) म्हणून रुजू झाले. विवाह झाला, तीन मुलींना जन्म दिला. निवृत्तीनंतर दुसऱ्या एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. वेगवेगळ्या नियतकालिकांतून (विशेषतः ख्रिस्ती) त्यांचं लेखन याच काळात प्रकाशित होऊ लागलं होतं. काही ख्रिस्ती नियतकालिकांचं त्यांनी संपादनही केलं. ग्रंथ लिहिले. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. २००७ मध्ये जालना येथे झालेल्या २१व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘History Of Free Methodist Church In India’, ‘संत तुकाराम आणि रेव्ह. टिळकः एक भावानुबंध’ आणि ‘मराठी ख्रिस्ती साहित्य : उगम आणि विकास’ ही त्यांची पुस्तकं बरीच गाजली. त्यांना परदेश दौरा करण्याचीही प्राप्त झाली.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

तसं पाहिलं तर यात काही फार अद्भुत असं काही नाही. मग या आत्मकथनाचं वैशिष्ट्य काय? माझ्या मते, हे वैशिष्ट्य त्यांच्या प्रामाणिकपणात आहे. जे घडलं, जसं घडलं ते सांगताना ते कचरत नाहीत. पण या प्रांजल कथनात कुठेही कडवटपणा नाही. ‘बाडग्याचा पोर’ म्हणून लहानपणी त्यांना जे काही वाईट अनुभव आले, त्याबद्दल ते अगदी सहजतेनं लिहितात. त्यात कुठलाही अभिनिवेश नाही.

दुसरं म्हणजे, (मराठी) ख्रिस्ती व्यक्ती ही एका विशिष्ट मानसिकतेच्या कुंपणाच्या आत राहणारी असते, अशी जी एक (चुकीची) प्रतिमा बहुसंख्य लोकांच्या मनात असते, तिला हे लिखाण तडा देतं. पाटील open minded आहेत. ख्रिस्ती असण्याचा त्यांना अभिमान आहेच, पण त्याच वेळी ते इतर कोणाचाही, कशाचाही अवमान करत नाहीत. जुन्या जखमा कुरवाळत बसत नाहीत. उलट खुल्या मनानं आणि खुल्या दिलानं ते बाहेरच्या जगाचा आत्मीयतेनं स्वीकार करतात, उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघतात. ते खऱ्या अर्थानं ख्रिस्ताची शिकवण जगतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

या पुस्तकाची तिसरी जमेची बाजू म्हणजे हा एक ऐतिहासिक दस्तवेज आहे. साधारणपणे १९२० ते १९५० या काळातल्या वऱ्हाडातल्या सवर्ण नसलेल्या ग्रामीण लोकांचं जीवन कसं होतं, याचा एक पट त्यांनी उलगडवून दाखवला आहे. आपल्या वडिलांचं चित्रण तर त्यांनी फार मनोहारी शैलीत केलं आहे. स्वतःतल्या उणिवा दाखवायला ते मागेपुढे बघत नाहीत. रेव्ह. टिळकांचे नातू आणि प्रसिद्ध लेखक अशोक टिळक, बहुप्रसवा लेखणीचे धनी असलेले ख्यातनाम ख्रिस्ती लेखक आणि कीर्तनकार आचार्य स. ना. सूर्यवंशी, तसंच त्यांची पत्नी चंदन यांनी त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांना दिलेल्या बहुमूल्य साथीचा ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. पाटलांची शैली काहीशी मिस्कील आहे. त्यामुळे हे आत्मकथन अधिकच वाचनीय झालं आहे. पुस्तकाला जोडलेली परिशिष्टं देखील उपयुक्त आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आपल्या नेहमीच्या, परिचित विश्वातच आपल्याला माहीत नसलेलं आणखी एक जग असतं. याही जगाची ओळख करून घ्यायची इच्छा असलेल्या सुजाण आणि सर्वसमन्वयक दृष्टीकोन असलेल्या वाचकांनी हे आत्मनिवेदनपर पुस्तक आवर्जून वाचायला पाहिजे.

‘माझी स्मरणचित्रे’ – प्रा. सुभाष पाटील

चेतक बुक्स, पुणे

मूल्य - ५०० पाचशे रुपये

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......