‘द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट’ : तीन भिन्न महिलांच्या ऐतिहासिक शोकांतिकेच्या एकत्रित अनुभवाचा लेखाजोखा
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
सतीश बेंडीगिरी
  • ‘द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Wed , 30 June 2021
  • ग्रंथनामा इंग्रजी पुस्तक द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट The Granddaughter Project शाहीन चिश्ती Shaheen Chishti

जागतिक शांततेबद्दल आपली ठोस मते मांडणारे भारतीय-ब्रिटिश लेखक शाहीन चिश्ती यांची पहिली कादंबरी, ‘द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट’ (The Grand Daughter Project) नुकतीच प्रकाशित झाली आहे. तीन भिन्न महिलांच्या ऐतिहासिक शोकांतिकेच्या एकत्रित अनुभवाचा लेखाजोखा, या स्त्रियांच्या वाट्याला आलेले कष्ट, त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा, त्यांच्या नातींसाठी त्यांनी सामाजिक पूर्वग्रह बदलावेत म्हणून पुकारलेला आवाज, असा आवाका असणारी ही कादंबरी अंतर्मुख करते.  

भारतीय-ब्रिटिश परंपरेतल्या अनेक लेखकांपैकी एक असणारे शाहीन चिश्ती अजमेरमधील प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्याचे आदरणीय सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे वंशज आहेत. चिश्ती व्यवसायाने लेखापाल असून लंडनमधील साहित्यिक संस्था आणि मुस्लीम-ज्यू फोरमचे सदस्य आहेत. वयाच्या १५व्या वर्षी आपल्या आई-वडिलांसमवेत लंडनला जाण्यापूर्वी शाहीन अजमेरच्या मयूर स्कूलमध्ये शिक्षण घेत होते.

या कादंबरीत ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासोबत असणाऱ्या पुरुषांनी त्यांना वाईट परिस्थितीत ठेवले. तरुण आणि एकटे असणाऱ्या या स्त्रियांनी अशा हलाखीच्या परिस्थितीवर काबू मिळवण्यासाठी बराच संघर्ष केला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या कादंबरीतील एक पात्र हेल्गा ही लाडात वाढलेली मुलगी दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरने केलेल्या विनाशात (होलोकॉस्ट) सापडते. औशविट्झमधल्या छळछावण्यांत ती तिच्या कुटुंबापासून वेगळी पडते. मरण केव्हाही येणार, अशा भयानक परिस्थितीतून ती वाचते आणि इस्राएलमध्ये नव्या जीवनाची सुरुवात करते.

याउलट, कमला एक अत्यंत गरीब शेतकऱ्यांची मुलगी बंगालमधल्या भयानक दुष्काळात वाढते. दारुडा बाप आईला मारहाण करत असतो. घरात अठराविश्वे दारिद्र्य. अखेरीस दुष्काळात आई-वडील मरतात, पण कमला जिवंत राहते आणि एका महिलाश्रममध्ये कामाला लागते. राजीव नावाच्या मुलाशी लग्न  करते, पण तोही तिला सोडून निघून जातो.

लीनेट आणि तिची आई पाम या दोघी कॅरेबियन किनारा सोडून १९५०च्या दशकातल्या लंडनमध्ये येतात. भयानक परिस्थितीत राहून आई-मुलगी सतत भेदभाव करणाऱ्या समाजाशी संघर्ष करत जगतात. एके दिवशी पाम मरते आणि लीनेट एकाकी होते. भोवतालचा समाज तिची अवहेलना करू लागतो. त्याच वेळी नॉटिंग हिलला पेटलेल्या दंगलीत तिला जबरदस्त मारहाण केली जाते आणि ती मेली असे समजून सोडले जाते, परंतु ती जिवंत राहते.

मनावर घाव करून सोडणाऱ्या या कादंबरीत चिश्ती लैंगिक असमानता, वांशिक दडपशाही, युद्धकाळातील आघात आणि स्त्री-मुक्ती यांसारख्या कालातीत विषयांवर समर्पक भाष्य करतात. दुसर्‍या महायुद्धातील होलोकॉस्टसह छळछावण्या, १९५८ सालात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडमधील नॉटिंग हिलमध्ये झालेल्या जातीय दंगली, १९४३चा बंगालचा विनाशकारी दुष्काळ, ज्यात भूक आणि उपासमार, मलेरिया आणि इतर प्राणघातक आजारांमुळे अंदाजे दहा लाख लोकांचा बळी गेला, अशा इतिहासातल्या काही महान शोकांतिकांचा चिश्ती यांनी या कादंबरीत सविस्तर आढावा घेतला आहे.

तावूनसुलाखून निघालेल्या या महिला पहिल्यांदाच त्यांच्या नातींना त्यांच्या कथा सांगतात. आपण ज्या वळणावर अयशस्वी झालो, त्यावरून धडा घेऊन त्या यशस्वी होऊ शकतील आणि स्वत:साठी जे योग्य आहे, ते करण्यास सक्षम होतील, त्यांना प्रेरणा मिळेल, आपण लढायला समर्थ आहोत, असे वाटेल, या आशेने या स्त्रिया हे कथन करतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

शाहीन चिश्ती म्हणतात, “ ‘द ग्रँडडॉटर प्रोजेक्ट’ प्रकाशित करताना मला आनंद  होतो आहे. आशा आहे की, या पुस्तकांमुळे महिला सशक्तीकरण आणि वांशिक समानतेचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण होईल. माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच प्रेरणादायक स्त्रिया माझे संगोपन करत असत, जे मी माझे भाग्य समजतो. या सर्वांनीच माझ्या आजच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला  आहे.  

ज्या स्त्रियांनी कठीण परिस्थितीशी मुकाबला करताना आणि सर्वसाधारणपणे जगभरातील अशा स्त्रिया, ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांच्यासाठी ही कांदबरी एक प्रकारची श्रद्धांजली ठरावी, अशी माझी इच्छा आहे. आताही जगातील बऱ्याच समुदायांमध्ये बऱ्याच स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हे जाणून फार वाईट वाटते. हे बदलणे आवश्यक आहे. माझे पुस्तक त्या बदलांसाठी योगदान देईल, अशी मी मनापासून आशा करतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

महिलांचे सबलीकरण ही माझी धार्मिक श्रद्धा आहे. पुरुषांना जेवढे महत्त्व आहे, तेवढेच माझ्या मुलींनाही आहे. मला एक असे काम करायचे होते, जे लोकांच्या त्वचेचे रंग, त्यांचे राष्ट्रीयत्व, त्यांचा धर्म किंवा त्यांच्या पंथाची पर्वा न करता एकत्र जोडेल. हेल्गा, कमला आणि लीनेट या पूर्णतः वेगळ्या जगातील महिला आहेत, तरीही त्यांच्या अनुभवांचा एक समान धागा आहे. तो म्हणजे त्यांच्या आयुष्यात पुरुषांनी त्यांना दिलेले दुःख. माझा विश्वास आहे की, ही कादंबरी जगातल्या अशा कहाण्यांमध्ये किती साम्य आहे, जे सहसा कसे गृहित धरले जाते, त्यावर प्रकाश टाकेल.”

‘द ग्रँड डॉटर प्रोजेक्ट’ ही कादंबरी निंबल बुक्स एलएलसी, अमेरिका या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......