आपापल्या क्षेत्रात स्वतःला गाडून घेऊन काम करणारी अशी माणसं अजूनही संपलेली नाहीत...
ग्रंथनामा - झलक
गौरी कानेटकर
  • ‘खरेखुरे आयडॉल्स – ३’ या पुस्काचं मुखपृष्ठ
  • Fri , 25 June 2021
  • ग्रंथनामा झलक खरेखुरे आयडॉल्स Kharekhure Idols समकालीन प्रकाशन Samkalin Peakashan

समाजाकडून कोणत्याही दखलपावतीची अपेक्षा न करता समाजपरिवर्तनाचं काम करणार्‍या ‘खरेखुरे आयडॉल्स’ या पुस्तकमालिकेतला तिसरा भाग नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाला संपादक गौरी कानेटकर यांनी लिहिलेलं हे मनोगत…

..................................................................................................................................................................

आपला समाज वर्षानुवर्षं अनेक समस्यांशी झुंजतो आहे. या समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी अनेक व्यक्ती आपापल्या परीने काम करत आहेत. अशा व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देण्याचं काम ‘युनिक फीचर्स’चे पत्रकार गेली अनेक वर्षं करत आले आहेत. त्या कामाचं पुस्तकरूप म्हणजे ‘खरेखुरे आयडॉल्स’ ही पुस्तकमालिका. या मालिकेतील पहिले दोन भाग यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. त्यातलाच हा तिसरा भाग. पहिल्या दोन भागांचं संपादन सुहास कुलकर्णी यांनी केलं होतं. आता तिसर्‍या भागाची जबाबदारी ‘युनिक फीचर्स’च्या वतीने मी निभवत आहे.

‘खरेखुरे आयडॉल्स’ या संकल्पनेची जन्मकथा थोडक्यात सांगायला हवी. २००४पासून टीव्हीवर ‘इंडियन आयडॉल्स’ नावाची मालिका सुरू झाली होती आणि तुफान लोकप्रियही झाली होती. हिंदी सिनेमातल्या गाण्यांची सही सही नक्कल करणार्‍या गायकांना तेव्हा (आणि नंतरही) देशाने डोक्यावर घेतलं होतं. चांगलं गाणारी तरुण मंडळी गायक होऊ इच्छिणार्‍यांसाठी आयडॉल्स असू शकतात, पण त्यांनाच ‘इंडियन आयडॉल्स’ अशी पदवी देणं योग्य आहे का, मग बाकीच्या क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणार्‍या मंडळींची दखल कोण घेणार असे प्रश्न ‘युनिक फीचर्स’च्या पत्रकारांना पडले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून समाजातले खरे आयडॉल्स कोण, हे शोधण्याचा प्रयत्न हाती घेतला गेला आणि त्यातूनच ‘खरेखुरे आयडॉल्स’ हे पुस्तक प्रत्यक्षात आलं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

समाजाकडून कोणत्याही दखलपावतीची अपेक्षा न करता समाजपरिवर्तनाचं काम करणार्‍या पंचवीस कार्यरतांची ओळख या पुस्तकाने महाराष्ट्राला करून दिली. महाराष्ट्रातील तमाम वाचकांनी त्या पुस्तकाला आणि पुस्तकातून मांडलेल्या संकल्पनेला जोरदार उचलून धरलं. वर्षांमागून वर्षं हे पुस्तक ‘बेस्टसेलर’ ठरलं. आजवर या पुस्तकाच्या ३०हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. यावरून या पुस्तकाला मिळालेला वाचकाश्रय लक्षात यावा. या प्रतिसादामुळेच २०१०मध्ये ‘खरेखुरे आयडॉल्स’चा दुसरा भागही काढला गेला. त्यात आणखी पंचवीस आयडॉल्सचा समावेश होता. हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरलं. याही पुस्तकाच्या पंधराएक आवृत्त्या आजवर प्रकाशित झाल्या आहेत.

आता ‘खरेखुरे आयडॉल्स’ या मालिकेतलं हे तिसरं पुस्तक प्रकाशित होत आहे. ज्यांच्या कामामधून कुठे प्रश्न सोडवले जात आहेत, कुठे न्याय मिळवून दिला जात आहे, कुठे संशोधनामुळे जीवन सुकर होत आहे, कुठे नवे पायंडे पाडले जात आहेत, कुठे स्थानिक बुद्धी-शक्तीचा मिलाफ करून नवनिर्माण घडत आहे, कुठे त्यांच्या कामामुळे व्यवस्थेत सकारात्मक हस्तक्षेप होऊन व्यवस्था सुधारण्यास मदत होत आहे, ते खरे समाजाचे आयडॉल्स. त्यांची नोंद घेण्याचं काम आम्ही करत आलो आहोत. महाराष्ट्राच्या सर्व भौगोलिक विभागांतील व जास्तीत जास्त सामाजिक गटांतील मंडळींचा यात समावेश असावा, असा आमचा प्रयत्न राहिला आहे.

आपापल्या क्षेत्रात स्वतःला गाडून घेऊन काम करणारी अशी माणसं अजूनही संपलेली नाहीत. त्यातली काही नावं लोकांना ऐकून माहिती आहेत, पण त्यांच्या कामाच्या तपशीलाची कल्पना नाही; तर काहींच्या कामाची पुरेशी दखल घेतली गेलेली नाही. अशा २० व्यक्तींचा या पुस्तकात समावेश आहे. यातील काही व्यक्ती संघर्षात्मक कामात गुंतलेल्या आहेत, काहींनी रचनात्मक कामं उभारली आहेत; तर काही जण समाजाच्या गरजेनुसार दोन्ही मार्ग अवलंबून प्रवास करत आहेत. कोण आहेत हे खरेखुरे आयडॉल्स?  

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मेळघाटातल्या दुर्गम भागात ठाण मांडून आदिवासींच्या आरोग्याचे प्रश्न सोडवणारे डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे, कोरडवाहू शेतकर्‍यांच्या समस्यांवर शाश्वत उपाय योजण्यासाठी धडपडणारे सांगली जिल्ह्यातले संपतराव पवार, गडचिरोलीतल्या मेंढा(लेखा) या छोट्याशा गावातून ग्रामीण स्वराज्याचा अन् वनहक्काचा नारा देणारे देवाजी तोफा आणि मोहन हिराबाई हिरालाल, विस्थापितांच्या हक्कांसाठी लढणार्‍या सुनीती सु. र., दलितांच्या आर्थिक भरभराटीसाठी उद्योजकतेचा वसा घेणारे मिलिंद कांबळे, आदिवासींच्या हक्कांसाठी अन् दारूबंदीसाठी संघर्ष करणार्‍या चंद्रपूरच्या पारोमिता गोस्वामी, शेतकर्‍यांच्या संघटनांना एका छत्रीखाली आणून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नगर जिल्ह्यातल्या अकोले गावचे डॉ. अजित नवले, सरकारच्या महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यात बचतगटांचं जाळ विस्तारणार्‍या कुसुम बाळसराफ, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हाती विज्ञानाची दोरी देणारे नंदुरबारचे डॉ. गजानन डांगे, मराठवाड्यातल्या दलितांचं आणि ऊसतोड महिलांच्या मानवी हक्कांसाठी झगडणार्‍या मनीषा तोकले, माणदेशातल्या दुष्काळी भागात अशिक्षित महिलांसाठी बँक उभारणार्‍या चेतना सिन्हा, मेळघाटात बांबू केंद्र उभारून आदिवासींना आर्थिक स्वयंपूर्णतेचा मार्ग दाखवणारे सुनील व निरुपमा देशपांडे, वंचित मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणार्‍या ‘प्रथम’ संस्थेच्या फरिदा लाम्बे आणि कोकणातल्या ग्रामविकासाचं ‘भगीरथ’ मॉडेल साकारणारे हर्षदा आणि प्रसाद देवधर अशी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये, विविध क्षेत्रांत काम करणारी ही मंडळी आहेत.

त्यांच्यासोबत राजकारणात राहूनही सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका निभावणारे बुलडाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचा, तसंच काही संपूर्ण वेगळ्या क्षेत्रांमध्ये मूलभूत काम करणार्‍या काही कार्यरतांचाही या पुस्तकात समावेश केला आहे. गोव्यातले पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर, ‘माणसांमधले सापांचे प्रतिनिधी’ असं बिरुद मिळवलेले प्राणिमित्र नीलिमकुमार खैरे, लहान-थोरांमध्ये गिर्यारोहण आणि इतर साहसी खेळांची आवड रुजवण्यासाठी धडपडणारे ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे या मंडळींवरचे लेख वाचकांना वेगळ्या कामांची ओळख करून देतील.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या सर्व कार्यरतांचं वर्णन ‘खरेखुरे आयडॉल्स’ असं केलं असलं तरी माणूसपणाच्या मर्यादा त्यांनाही लागू आहेत, याची जाणीव ठेवायला हवी. त्यांच्यातही आपल्या सर्वांप्रमाणे काही ना काही कमी-जास्त असणारच; पण त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जावी आणि समाजातील प्रश्नांची उत्तरं शोधण्यात त्यांची मदत व्हावी, एवढीच इच्छा.

हे पुस्तक महाराष्ट्र दिनानिमित्त मे महिन्यात प्रकाशित करण्याचं नियोजन होतं. परंतु एप्रिलमध्ये महाराष्ट्राला करोनाच्या दुसर्‍या लाटेचा तडाखा बसला आणि सर्वत्र लॉकडाऊन लागला. त्यामुळे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही. दरम्यान, या पुस्तकातील एक आयडॉल, मेळघाटच्या ‘संपूर्ण बांबू केंद्रा’चे सुनील देशपांडे यांचं करोनामुळे निधन झालं. हे पुस्तक छपाईला जात असतानाच ही दुःखद बातमी कळली. पण तरीही त्यांच्यावरील लेख कोणताही बदल न करता प्रकाशित करत आहोत.

‘खरेखुरे आयडॉल्स – ३’ : संपादक गौरी कानेटकर

समकालीन प्रकाशन, पुणे

मूल्य – २५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......