मुरलीधर शिंगोटे : ‘मुंबई नावाच्या विद्यापीठा’त शिकलेला मातब्बर संपादक-मालक
पडघम - माध्यमनामा
रवि आमले
  • मुरलीधर शिंगोटे
  • Thu , 06 August 2020
  • पडघम माध्यमनामा मुरलीधर शिंगोटे Muralidhar Shingote मुंबई चौफेर Mumbai Choufer पुण्यनगरी Punyanagari आपला वार्ताहर Aapla Vartahar

‘मुंबई चौफेर’, ‘पुण्यनगरी’, ‘आपला वार्ताहर’, ‘हिंदमाता’, ‘कर्नाटक मल्ला’ या वर्तमानपत्रांचे मालक-संपाक मुरलीधर शिंगोटे (वय ८४) यांचे आज दुपारी एक वाजता जुन्नर तालुक्यातील उंब्रज या त्यांच्या गावी वृद्धापकाळाने निधन झाले. एका चार पानी सायंदैनिकातून माध्यमसंस्थेचा मोठा वटवृक्ष उभा करणे ही साधी कामगिरी नाही. शिंगोटे यांनी ती करून दाखवली. एका मराठी माणसाने तीन मराठी, एक हिंदी आणि दोन दाक्षिणात्य भाषेतील वृत्तपत्रे काढून ती लोकप्रिय करून दाखवणे, हे यश जितके देदीप्यमान, तितकेच प्रेरणादायीही आहे.

..................................................................................................................................................................

वृत्तपत्राचा संपादक या पदाची एक प्रतिमा असते वाचकांच्या मनात. संपादक म्हणजे बुद्धीचे सागर, विविध विषयांचे माहितगार, धीमंत, अभ्यासू विश्लेषक वगैरे वगैरे… अलीकडे हे असे संपादक दुर्मीळच. अर्थात प्रत्येक काळात ते तसेच होते. तो वेगळा विषय. पण या सगळ्या प्रतिमांना छेद देणारे एक संपादक होते ते म्हणजे मुरलीधर शिंगोटे.

उंच तगडी अंगकाठी, पांढरी खुरटी दाढी, बुशकोट आणि साधी पँट. बोलणे साध्या रांगड्या जुंदरी भाषेतले. वावरणेही तसेच साधे. असे हे संपादकाच्या नेहमीच्या प्रतिमेहून वेगळे असे व्यक्तिमत्त्व. ते फार शिकलेले नव्हते. चौथीतून शाळा सोडली होती त्यांनी. त्यामुळे पुढची पत्रकारितेतील पदवी वगैरे तर खूपच दूरच्या गोष्टी. पण शिक्षण हे नेहमीच शाळा-महाविद्यालयांच्या चार भिंतींत मिळते असे नाही. अनुभव नावाची एक मोठी शाळा असतेच जगात. मुरलीधरबाबा तेथे शिकले होते. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘मुंबई हे त्यांचे विद्यापीठ’ होते. त्या अनुभवजन्य ज्ञानाच्या जोरावरच त्यांनी या मुंबईतून माध्यमांचे एक विश्व निर्माण केले. 

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

ओतूरजवळच्या उंब्रज गावातला त्यांचा जन्म. ते साल होते १९३८. तेव्हा उंब्रज म्हणजे अगदीच आडगाव. त्याच गावातून मुंबईत आलेल्या बुवाशेठ दांगट यांनी साठच्या दशकात मुंबईतील वृत्तपत्र वितरण व्यवसायात चांगलाच जम बसवला होता. चौथीतून शाळा सोडलेल्या मुरलीधरबाबांनी बुवाशेठ यांचे बोट धरले. त्यांच्याकडे ते वृत्तपत्र टाकण्याचे काम करू लागले. शिक्षण कमी असले, तरी अभ्यासाची ओढ दांडगी होती त्यांच्यात. अंगात धाडस होते आणि मनगटात रगही. त्या जोरावर पुढे त्यांनी स्वतःचा वृत्तपत्र वितरण व्यवसाय सुरू केला. तो आजही सुरू आहे. ते त्यांचे पहिले प्रेम. त्यामुळे ते कदाचित पुढेही त्याच विश्वात रमले असते. पण या व्यवसायात त्यांना एक मोठा फटका बसला आणि त्यांचे सगळे आयुष्यच पालटले.

विसाव्या शतकातील ते शेवटचे दशक. तेव्हाच्या एका मोठ्या बहुखपाच्या मराठी दैनिकाचे वितरण शिंगोटे यांच्याकडे होते. ते त्या दैनिकाच्या संपादक-मालकाने अचानक काढून घेतले. शिंगोटे यांच्यावर अक्षरशः आभाळच कोसळले. पदरी अनेक विक्रेती मुले होती. काम कमी झाल्यामुळे त्यांना काढून टाकण्याचा एकच पर्याय आता शिंगोटे यांच्यासमोर होता. तो व्यावहारिकही ठरला असता. पण शिंगोटे हे वारकरी संस्कारातले. आपला तोटा भरून काढण्यासाठी पदरच्या कामगारांच्या घरातली चूल विझवावी, हा व्यवहारवाद काही त्यांना पटेना. त्यांना त्या मुलांना बसून पगार दिला. पण ते किती काळ चालणार? अखेरीस त्यांनी एक निर्णय घेतला. आपणच एक वृत्तपत्र काढायचे आणि त्याचे वितरण करायचे. संकटे सगळ्यांवरच येतात. संकटांना संधी समजणारे थोडेच असतात. शिंगोटे हे त्यातले होते.

वर्तमानपत्र हे सुशिक्षितांचे क्षेत्र. शिंगोटे यांना ते काढण्याचा, चालवण्याचा अणुमात्र अनुभव नव्हता. पण त्यांच्याकडे विकण्याची कला होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला ग्राहक कोण आणि त्याला काय हवे हे ते चांगलेच जाणून होते. यालाच वाचकांची नाडी ओळखणे म्हणतात. यासाठी आज मोठमोठ्या माध्यम समूहांकडे मोठमोठी माणसे असतात. त्यासाठी संगणक आणि त्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी सॉफ्टवेअर असतात. मुरलीधर शिंगोटे यांच्याकडे लोकलमध्ये, फलाटांवर वृत्तपत्रे विकण्यातून आलेली शहाणीव होती. त्यातून त्यांनी १९९४ साली ‘मुंबई चौफेर’ हे चार पानी सायंदैनिक सुरू केले. त्यास ‘लंगोटीपत्र’ म्हणून तेव्हाच्या बड्यांनी हिणवले खरे. पण त्याच चार पानांतून त्यांनी आपल्या माध्यमसंस्थेचा वटवृक्ष उभा केला. तीन मराठी दैनिके, एक हिंदी आणि दोन दाक्षिणात्य भाषेतील वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली आणि वाढवली. माध्यमक्षेत्रातील एका मराठी माणसाचे हे यश देदीप्यमानच म्हणावयास हवे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : इब्राहिम अल्काझी यांच्याविषयी निस्सिम इझिकेल यांनी लिहिलेली कविता

..................................................................................................................................................................

एक संपादक म्हणून त्यांचे योगदान काय, हा प्रश्न आपले मराठी सारस्वत येथे विचारू शकतील. त्यांनी कधीच काही लिहिले नाही. पण आपला वाचक नेमका कोण आणि त्याला काय लिहिलेले भावते हे त्यांना चांगलेच माहीत होते. ते सांगत, की माझा वाचक हा गरीब, मजूर, कामगार, रिक्षावाला, कमी शिक्षित गृहिणी या वर्गातला आहे. जगात काय चाललेय हे त्यालाही समजून घ्यायचे असते. पण ते साध्या भाषेत. राजकारण आणि गुन्हेगारी हे विषय चघळायला त्याला आवडते.

‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांनी सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाचकांचे एक सर्वेक्षण केले होते, की त्यांना काय आवडते? त्यातूनही नेमके हेच दोन विषय आघाडीवर आले होते. शिंगोटे यांचा कल मात्र या विषयांतील थरारकता, सनसनाटी याकडे होता. छोट्या, अतिस्थानिक बातम्या यांवर त्यांचा भर होताच, पण त्यांनी फार पूर्वीच्या ‘लोकसत्ता’ने यशस्वी करून दाखवलेले शब्दकोड्यांचे मॉडेलही स्वीकारले होते. मोठमोठी शब्दकोडी आणि त्याबरोबर राशीभविष्य ही आपल्या दैनिकाची बलस्थाने आहेत हे शिंगोटे यांना स्वअभ्यासातून उमगले होते. समाजाच्या खालच्या स्तरातील माणसांची खरी गरज ही रंजन हीच असते. हिंसा आणि भय या आदिम भावनांचे असंस्कारित रूप त्याला मोहवत असते. हे शिंगोटे यांनी जाणले होते. त्यांच्या वृत्तपत्रांच्या यशस्वीतेचे हे गमक होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पण हे एवढेच असून चालत नसते. वितरण हा वृत्तपत्र व्यवसायातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आणि त्यात वेळेला अतिशय महत्त्व हे सर्वांनाच माहीत असते. पण त्याबाबतीत शिंगोटे यांच्याइतका कटाक्ष अभावानेच आढळतो. अंक बाजारात यायला एका मिनिटाचाही विलंब त्यांना खपत नसे. अशा वेळी मग त्यांच्यातला ‘विक्रेता’ शब्दांचा हंटर घेऊन उभा राही. एरवी आपल्या पत्रकारांवर, कामगारांवर प्रेम करणारा त्यांच्यासारखा मालक-संपादक विरळाच. गेल्या काही वर्षांपासून एकूणच वृत्तपत्रसृष्टी अडचणीत आलेली आहे. करोनाकहराने त्याची गती वाढवली आहे. अशा काळात हा वितरणातील बादशहा आणि एक मातब्बर संस्थापक-संपादक काळाच्या पडद्याआड जाणे हा मराठी वृत्तपत्रविश्वास मोठाच धक्का आहे. त्यांस आदरांजली.

..................................................................................................................................................................

लेखक रवि आमले दै. ‘सकाळ’ (मुंबई)चे निवासी संपादक आहेत.

ravi.amale@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......