इब्राहिम अल्काझी यांच्याविषयी निस्सिम इझिकेल यांनी लिहिलेली कविता
संकीर्ण - श्रद्धांजली
निस्सिम इझिकेल
  • इब्राहिम अल्काझी यांचं सेल्फ पोर्ट्रेट (१८ ऑक्टोबर १९२५ - ४ ऑगस्ट २०२०)
  • Thu , 06 August 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली इब्राहिम अल्काझी Ebrahim Alkazi निस्सिम इझिकेल Nissim Ezekiel

आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक’, केंद्रीय नाट्य विद्यालयाचे दुसरे संचालक इब्राहिम अल्काझी यांचं परवा दिल्लीत वयाच्या ९५व्या वर्षी निधन झालं.  अल्काझी १९६२ ते ७७ अशी सलग १५ वर्षं केंद्रीय नाट्य विद्यालये संचालक होते. अल्काझी १९४८ ते ५१ या काळात लंडनमध्यील ‘रॉयल अ‍ॅकडमी ऑफ आर्टस’मध्ये शिकत असताना इंग्रजीत नंतर ख्यातनाम कवी झालेले निस्सिम इझिकेल हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी ‘The Exact Name’ (१९६५) या कवितासंग्रहामध्ये अल्काझींविषयी एक कविता लिहिली आहे. इझिकेल यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद साहित्य अकादमीनं ‘आधुनिक स्तोत्रं’ (१९९४) या नावाने प्रकाशित केला आहे. प्रदीप गोपाळ देशपांडे यांनी हा संग्रह मराठीमध्ये अनुवादित केला आहे. त्यातील ही एक कविता...

..................................................................................................................................................................

आर्ट लेक्चर ईब्राहिम अल्काझीसाठी

 

तो करतो सुरुवात तारखांनी अन शेवट स्तुतीनं,

करतो वर्णन एखाद्या तरल प्रसंगाचं, वेधतो लक्ष

एखाद्या तात्पर्याकडं, किंवा हुशारीनं बोलतो

कुठल्या तरी ऐतिहासिक, औपचारिक संकेतकोशावर.

 

दिवे विझतात. पडद्यावर

त्या उत्कृष्ट कलाकृती पसरतात दूरवर.

कुठल्या नग्नावस्थेतल्या स्त्रिया दिसतात!

कुठले देवदूत कपडे परिधान केलेले

 

चालतात किंवा तरंगतात कुठल्या गूढ डोंगरांवर किंवा आभाळांवर!

तो सांगतो आम्हाला की रेषा थरथरतात,

रंग खटकतात नाहीतर जुळून येतात –

आमच्या शिक्षणाला खूपच उशीर झालाय.

 

इथली ही बोधकथा बायबलमध्ये आहे.

ती आख्यायिका ग्रीक साहित्यातली आहे.

आम्ही ऐकतो, ताणतो आमचे डोळे बघण्यासाठी,

ग्रहण करण्यासाठी ती प्राचीन नटवी भाषा.

 

शेवटची प्रतिमा चांगली समजावून झाल्यानंतर

सरकते झर्रकन. आम्ही टाळ्या वाजवतो अन निघून जातो.

डोळ्याच्या अशिक्षित सवयींना मिळते इथं

एक उसंत छोटीशी

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......