‘सिनेमा पाहणारा माणूस’ : हे पुस्तक चित्रपट जगतातील असंख्य आणि विलक्षण गोष्टींचा खजिना आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अमरेन्द्र धनेश्वर
  • ‘सिनेमा पाहणारा माणूस’चं मुखपृष्ठ
  • Fri , 17 April 2020
  • ग्रंथनामा Granthnama आगामी अशोक राणे Ashok Rane सिनेमा पाहणारा माणूस Cinema Pahnara Manus ऑल्फ्रेड हिचकॉक Alfred Hitchcoc फ्रान्स्वा त्रुफाँ François Truffaut

अशोक राणे हे नाव चित्रपट शौकिनांच्या चांगल्या परिचयाचं आहे. गेली चार दशके ते सातत्याने लेखन करत आले आहेत. विविध दैनिकांतून त्यांनी चित्रपट समीक्षा लिहिली आहे. याच काळात त्यांनी चित्रपट माध्यम केंद्रस्थानी ठेवून ग्रंथलेखनही केलं आहे. त्यांच्या ग्रंथांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभले आहेत.

चित्रपट जगतातला त्यांचा संचार हा केवळ लेखनापुरता मर्यादित नाही. फिल्म सोसायटी चळवळीत एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यातून त्यांची कारकीर्द घडत गेली. विविध देशांतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत परीक्षक (ज्युरी) म्हणून जाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक व्यापक आणि विशाल असं परिमाण प्राप्त झालं. अनेक दूरचित्रवाणी मालिकांचे पटकथा-संवादलेखक म्हणून तर त्यांनी नाव मिळवलंच, परंतु दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांनी मुलुखगिरी केली आहे. त्यांच्या नावावर ‘मस्तीभरा है समा’, ‘माय नेम इज अ‍ॅन्थनी गोन्साल्विस’ अशा जवळपास सातआठ डॉक्युमेंटरीज आणि ‘कथा तिच्या लग्नाची’सारखा चाकोरीबाहेरचा चित्रपटही जमा आहे.

अशोक राणेंचा हा प्रवास घडला कसा? एका अतिसामान्य मालवणी कुटुंबात जन्मलेला, परंतु बुद्धी तल्लख असलेला अशोक राणे हा माणूस जन्मजात स्ट्रगलर आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये उपजिविकेसाठी नोकरी करता करता त्यांनी चित्रपट माध्यमाविषयीची आपली पॅशन पोटतिडिकेने सांभाळली, जपली आणि उत्तरोत्तर वाढवत नेली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

चित्रपटमाध्यमाविषयी एक प्रकारचं ग्लॅमरयुक्त आकर्षण असतं आणि पांढरपेशा व अतीव नैतिक अहंकारापोटी घालूनपाडून बोलण्याची आणि दुसरीकडे आंबटशौकिन कुतूहल बाळगण्याची वृत्तीही असते. चित्रपटाच्या दुनियेत वावरणारा किंवा त्याच्या नादी लागलेला म्हणजे ‘वाया गेलेला’ असं समीकरण बनवलं गेलं आणि ते वाढत्या वयाच्या तरुण-तरुणींच्या माथी मारलं गेलं. हे समीकरण कसं चुकीचं आहे आणि पोकळ आहे, हे ‘सिनेमा पाहणारा माणूस’ हे अशोक राणे यांचं आत्मकथन वाचून लख्खपणे लक्षात येतं.

चित्रपट माध्यम हे विसाव्या शतकाला व्यापून राहिलं आणि एकविसाव्या शतकातही त्याचा समाजमाध्यमावर पगडा राहिला आहे. १९९०च्या आसपास आपल्याकडे चित्रपटांची पिछेहाट होत आहे की काय, अशी शंका येऊ लागली होती. परंतु या माध्यमाचं त्याचं म्हणून एक आंतरिक बळ असल्यामुळे त्याने पुन्हा उसळी घेतली. अशोक राणे यांनी चित्रपटांचा मनसोक्त आस्वाद घेण्याची भूमिका स्वाभाविकपणे प्रथमपासून ठेवली आहे.

१९५०च्या दशकात चित्रपट सुरू होण्यापूर्वी ‘फिल्म प्रभाग’ निर्मित माहितीपट प्रत्येक चित्रगृहातून दाखवणं सक्तीचं असे. खऱ्या चित्रपटशौकिनाला या माहितीपटापासून चित्रपट पाहायचा असे. राणे म्हणतात त्याप्रमाणे पालम विमानतळावर उतरणारं किंवा तिथून आकाशात झेपावणारं विमान त्या माहितीपटातून दिसे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे जवाहरलाल नेहरू दिसत आणि अगदी काही क्षण का होईना, पण क्रिकेट कसोटी सामन्याची क्षणचित्रं दिसत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

राणेंनी आपलं हे पुस्तक आंद्रे बाझां, फ्रान्स्वा त्रूफो आणि पॅरिसचे ‘सिनेमाथेक फ्रॉन्से’ हे पहिलं चित्रपट संग्रहालय जिद्दीनं स्थापन करणारे आणि त्याचं प्राणपणानं जतन करणारे ऑनरी लाँगलुवा यांना अर्पण केलं आहे. ही नावं सामान्य चित्रपट शौकिनांच्या परिचयाची नसतील. एकीकडे जागतिक चित्रपटातील अशा महानुभवांविषयी आणि दुसरीकडे राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, हृषिकेश मुखर्जी आणि राजेश खन्ना यांच्यासंबंधी लिहिताना त्यांना न्यूनगंड वाटत नाही. चित्रपट पाहत पाहत क्रमाक्रमाने या माध्यमाविषयी आणि एकूणच साहित्य, समाज व संस्कृती याविषयी प्रगल्भ, परिपक्व समज आणि जाण कशी घडत जाते, ते अशोक राणे यांच्या उदाहरणांवरून आणि लेखनावरून दिसून येतं.

लाँगलुवांनी आपलं संग्रहालय कसं उभं केलं याविषयीची कहाणी राणेंनी लिहिली आहे. हिटलरच्या काळात पोलंडमधल्या एका ज्यू इसमापाशी काही दुर्मीळ चित्रपट असल्याचा सुगावा लाँगलुवांना लागला. त्या संग्रहाकडे गेस्टापोंचं लक्ष जाण्याआधी तो हस्तगत करणं महत्त्वाचं होतं. लाँगलुवाने आपल्या धाकट्या भावाकडे हे काम सोपवलं. तो अर्थातच घाबरला. “हे पिस्तुल जवळ ठेव आणि तशीच वेळ आली तर स्वत:वर गोळी झाडून घे,’’ असं सांगत त्याने भावाच्या हाती पिस्तुल ठेवलं. भावाने कामगिरी पार पाडली आणि लाख मोलाचा ऐवज घेऊन तो पॅरिसला परतला.

गुरुदत्त यांचे सिनेमॅटोग्राफर व्ही.के. मूर्ती यांच्याबरोबरचा राणेंचा संवाद, ‘कागझ के फ़ूल’मधला ‘वक्त ने किया क्या हंसी सितम’ या गाण्याच्या चित्रीकरणाची, त्यातील छाया-प्रकाशाच्या लपंडावाची उद्बोधक गोष्ट सांगून जातो. ‘साहिब, बिबी और गुलाम’मध्ये मीनाकुमारीचे पडद्यावरचं पहिलं दर्शन अत्यंत विलक्षण आहे. ते पाहून खुद्द मीनाकुमारी म्हणते की, मी दिसायला इतकी सुंदर आहे? ही तर व्ही. के. मूर्तींची कमाल आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तरुण हृषिकेश मुखर्जी मृणाल सेन यांच्या घरी जातात. ते घरी नसतात. त्यांचे वडील हृषिदांवर प्रश्नांचा भडीमार करतात आणि प्रत्येक उत्तरावर ‘मूर्ख’, ‘नालायक’ अशी शेलकी विशेषणं हृषिदांच्या अंगावर भिरकावतात. नंतर हृषिदांच्या लक्षात येतं की, आपण नोकरी करतो, पगार आईच्या हातावर ठेवतो, हे ऐकल्यावर ते अपशब्द मृणालदांना उद्देशून होते!

ऋत्विक घटक हा प्रतिभावान दिग्दर्शक दारूच्या विळख्यात सापडला होता. माधवी मुखर्जी ही त्यांच्या ‘सुवर्णरेखा’ या गाजलेल्या चित्रपटाची नायिका होती. एकदा ऋत्विकदा तिच्याकडे पैसे मागायला जातात. दारूसाठी पैसे द्यायला ती नकार देते. ऋत्विकदा आल्यापावली परततात. नंतर माधवीला अपराधी वाटू लागतं. ती त्यांच्या घरी जाते आणि ऋत्विकदांच्या पत्नीकडे पैसे देते. अशोक राणे यांना यावरून कलंदरपणे जगणारा कवी मनोहर ओक याची आठवण होते.

राणेंची कारकीर्द माझ्यासारख्यांच्या समोर घडलेली आहे. आम्ही त्यांचे समकालीन आहोत. त्यामुळे त्यांच्या अनुभवांचे आणि संवेदनांचे आम्ही केवळ साक्षीदारच आहोत, अशातला भाग नाही, आम्ही त्यात सहभागीही आहोत. त्यामुळे साहजिकच त्यात अधिक रस वाटतो आणि त्यांच्याविषयी अधिक जवळीकही वाटते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आजकाल जवाहरलाल नेहरूंना लाखोली वाहणाऱ्यांची आणि त्यांचं चारित्र्यहनन करणाऱ्यांची चलती आहे. परंतु राणेंच्या कथनात नेहरूंचे जे चित्र आलं आहे, त्यातून नेहरू हे किती विशाल दृष्टीचे, प्रागतिक विचारांचे होते हे लक्षात येतं. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमधले प्रा. सतीश बहादूर हे विद्वान आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. ते मूळचे अलाहाबाद विद्यापीठातले. तिथं ते १९६०च्या दरम्यान फिल्म सोसायटी चालवत. मारिया सितोन ही परदेशी विदुषी त्यांचं काम आणि ज्ञान पाहून प्रभावित झाली. तिने बहादूर यांची नेहरूंकडे प्रशंसा केली. नेहरूंनी त्यांची ताबडतोब नव्यानं सुरू झालेल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये नेमणूक केली. यावरून नेहरूंची पारख किती योग्य होती, हे लक्षात येतं.

अशोक राणे यांचं ‘सिनेमा पाहणारा माणूस’ हे पुस्तक म्हणजे चित्रपट जगतातील अशा असंख्य आणि विलक्षण गोष्टींचा खजिना आहे. तो लुटताना चित्रपट माध्यमाचं अवघं अंतरंग उलगडतं आणि समृद्ध व्हायला होतं.

जाता जाता असंही म्हणायला हरकत नाही की, सिनेमाकडे पाहण्याची एक निर्मम दृष्टी हे पुस्तक देऊन जातं.

.............................................................................................................................................

‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5157/Cinema-Pahnara-Manus

............................................................................................................................................................

लेखक अमरेन्द्र धनेश्वर ग्वाल्हेर घराण्याचे गायक/संगीत अभ्यासक आहेत.

amardhan@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......