आरतीची एकेक कविता ही शब्दांमधलं ‘पेंटिंग’ आहे. चित्राकडं जसं पाहत राहिलं पाहिजे, तशी आरतीची कविता वाचली पाहिजे!
ग्रंथनामा - झलक
अविनाश धर्माधिकारी
  • ‘समुद्राचं गाव’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 13 March 2020
  • ग्रंथनामा झलक समुद्राचं गाव आरती कुलकर्णी

निसर्ग-पर्यावरण पत्रकार आरती कुलकर्णी यांचा ‘समुद्राचं गाव’ हा कवितासंग्रह नुकताच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ‘चाणक्य मंडल’चे संचालक, वक्ते व लेखक अविनाश धर्माधिकारी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

............................................................................................................................................................

बहुधा नुकतीच बारावी झालेली आरती १९९६ मध्ये म्हणजे स्थापनेच्या वर्षीच चाणक्य मंडल परिवारामध्ये आली. आमचा ‘फाउंडेशन’ नावाचा कोर्स करण्यासाठी. नावाप्रमाणेच ते जीवनाचं ‘फाऊंडेशन’ आहे. स्वतःला ओळख, त्यानुसार तुझं कामाचं-जगण्याचं क्षेत्र निवड आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा साध्य कर, हे त्या ‘फाऊंडेशन कोर्स’चं सूत्र आहे.

आरतीच्या मनात बहुधा स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करण्याचा विचार होता. पण यथावकाश तिला स्वतःची ओळख पटली आणि तिनं पत्रकारितेत करिअर करायचं ठरवलं. निसर्गाशी जशी आरतीची घनिष्ठ मैत्री बनत गेली, तशी तिची पत्रकारितासुद्धा पर्यावरण आणि निसर्गाशी एकरूप होत गेली. पर्यावरण पत्रकारितेबद्दल तिला रामनाथ गोएंका हा पत्रकारितेतला सर्वोच्च पुरस्कार दोनदा मिळाला आहे.

आरतीनं निसर्गाशी निगडित असलेलेच तीन अतिशय प्रतिभावंत असे माहितीपट बनवले. कोकणचा किनारा आणि त्याची कानात सतत घुमणारी गाज, महाराष्ट्रापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला पश्चिम घाट, असं करत करत आरतीचा निसर्ग आणि पर्यावरणाचा शोध थेट नाईलपर्यंत पोचला. कलाकृती म्हणूनसुद्धा हा प्रत्येक माहितीपट उत्तम आहे. तितकीच उत्तम, आता आरती घेऊन येत असलेली ही कलाकृती आहे - तिचा कवितासंग्रह... ‘समु्द्राचं गाव’.

१९९६ पासून तिच्याशी जुळलेले ऋणानुबंध पुढं जास्त घनदाट होत गेले. वेळोवेळी संपर्क चालू राहिला. आरती तिच्या कविता सांगत-दाखवत राहिली. तंत्रज्ञानाच्या कृपेनं आलेल्या फेसबुक, व्हॉट्सॲप, ई-मेल यांनीसुद्धा संपर्काची नवनवी साधनं दिली आणि आमचा कवितारूपी संवाद निसर्गामध्ये खेळत खेळतच चालू राहिला.

आरतीची कविता ही निसर्गाची ‘आरती’ आहे. आरती आणि कविता निसर्गाशी एकरूप झाल्या आहेत, असं विलक्षण अद्वैत तिच्या कवितांमधून व्यक्त होतं. आरतीच्या कवितांमध्ये आहे सह्याद्री आणि हिमालय, इतकंच काय, आल्प्ससुद्धा आहे. तिच्या कवितांत समुद्र भेटतो, कोकणची किनारपट्टी भेटते; झाडं, ऋतू, फ्लेमिंगो, पाऊस, फुलपाखरं, चांदणं, अरण्यातली हरणं - इतकंच काय आरतीच्या कवितेत राधा-कृष्णसुद्धा निसर्गातच प्रकट होतात आणि आपलं नृत्य करतात.

आरतीच्या कविता एकामागून एक, भरभर वाचता येणं शक्य नाही. शांतपणे एकावेळी एक कविता वाचली पाहिजे. तिच्या निसर्गामध्ये भेटणाऱ्या विलक्षण स्तब्धतेमध्ये आपणही काही काळ दिला पाहिजे. आरतीची एकेक कविता ही शब्दांमधलं ‘पेंटिंग’ आहे. चित्रासमोरून जसं भर्रकन पुढं सरकायचं नसतं, तसं या कविताही पानं उलटत वाचायच्या नाहीत. चित्राकडं जसं पाहत राहिलं पाहिजे, चित्रातली एकेक रेष, त्यात चित्रकारानं भरलेला एकेक रंग आपण आपल्यामध्ये भरून घेतला पाहिजे; तशी आरतीची कविता वाचली पाहिजे.

आरतीच्या कवितांमध्ये तसा सार्वजनिक जीवनात आता दुर्मीळ असणारा निरागस भाव, एखाद्या बालकाची सततची उत्सुकता आपल्याला भेटत राहते. निसर्गाशी असलेल्या एकरूपतेमुळेच आरतीच्या कवितांना काळाचं बंधन नाही. ती कविता वाचतावाचता कवितेप्रमाणेच आपणही कालातीत होतो. काही ‘स्पेस-टाईम’चे संबंध आलेच तर ते ‘स्पेस-टाईम’च्या पलीकडं जाण्यासाठीच येतात. म्हणजेच रेहकुरीच्या अरण्यापासून, मालदीव, आल्प्स आणि पॅरिस नावाची नितांत सुंदर नगरीसुद्धा निसर्गरूपातच प्रकट होते.

या सर्व कविता वाचताना जंगलामधली विलक्षण शांतता अनुभवायला येते. निसर्गाच्या सान्निध्यात ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो, म्हणून आपला मेंदू आणि सर्व अस्तित्व तरतरीत बनतं, तशा आरतीच्या कविता आहेत. विशेष गोष्ट ही की, सिमेंटच्या जंगलांनी बनलेल्या शहरांतसुद्धा आरतीला निसर्गच भेटतो. कवितांच्या क्षेत्रात एक ‘स्कूल’ अशी होऊन गेली की, जिनं शहरं ही मानवतेच्या अधोगतीचं प्रतीक मानलं; अस्तित्ववादासोबत दाटून आलेली निराशा आणि नकारात्मकता मांडायला ‘शहर’ या प्रतीकाचा वापर केला. आरतीच्या शहरामध्ये चंद्र, आकाश, समुद्र आहे. शहरसुद्धा स्वतःचं सौंदर्य घेऊन प्रकट होतं. कवितांच्या एका ‘स्कूल’मध्ये शहर म्हणजे विरोधाभास आणि विद्रुपता अशी दाखवली गेली. पण आरतीला तिच्या गावासारखाच शहरामध्येही समुद्र भेटत राहतो.

आज मात्र ते लालगडद प्रतिबिंब
मी माझ्यासकट
समुद्राच्या अंतरंगात बुडवलं आहे...
पुन्हा एकदा मी मुंबईच्या समुद्राची
अन मुंबईचा समुद्र माझा झाला आहे!

अशा रीतीनं जीवनाच्या सर्व यश-अपयश, सुख-दुःखं या उंचसखलतांना सामोरं जातानाही आरतीशी शहरही निसर्गसंवाद करतं आणि सांगतं –

म्हणूनच दूर कुठेतरी खाडीच्या टोकावरून
या शहरात रात्र बिचकत येते
आणि चंद्रानंही शोधलीय
फ्लायओव्हरच्या बाजूची
कोपऱ्यातली एक छोटी जागा...


शहर आपल्याच मस्तीत जगतं आहे
उशिरा आलेल्या रात्रीकडे
सकाळ उधार मागतं आहे!


कवितांच्या रूपातून आरतीनं केलेली ही निसर्गाची ‘आरती’ सर्वांनाच विलक्षण आणि प्रतिभाशाली शांतता देईल!

............................................................................................................................................................

‘समुद्राचं गाव’ या कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5175/Samudrach-Gao

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......