‘वाचा-जाणा-करा’ ही पुस्तक-मालिका प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी घ्यायलाच हवी!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • ‘वाचा-जाणा-करा’ या पुस्तक-मालिकेतील नऊ पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Fri , 27 September 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस कविता महाजन Kavita Mahajan वाचा-जाणा-करा Vacha Jana Kara

मराठीतील प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार कविता महाजन यांचा आज पहिला स्मृतिदिन. गेल्या वर्षी याच दिवशी त्यांचं काहीसं धक्कादायक म्हणता येईल अशा पद्धतीनं निधन झालं. त्यांच्या या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त रोहन प्रकाशनानं त्यांची ‘वाचा, जाणा, करा’ ही नऊ पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे.

‘नकटीचं नाक’, ‘पाणीदार डोळे’, ‘न ऐकणारे कान’, ‘केसांची करामत’, ‘डोकं आहे का खोकं’, ‘घड्याळाचे हात आणि टेबलाचे पाय’, ‘बोंबलणारा घसा’, ‘दातांमागची भुतं’ आणि ‘पोटाचं कपाट’, असा हा एकंदर नऊ पुस्तकांचा संच आहे.

मुलांसाठी मराठीमध्ये बरंच लिहिलं जातं. पण त्यातलं बरंचसं भाषांतरीत, रूपांतरीत किंवा आधारित असतं. स्वतंत्रपणे, कल्पकतेनं आणि मुख्य म्हणजे मुलांचा विचार करून जाणीवपूर्वक बालसाहित्याची निर्मिती फार कमी प्रमाणात होताना दिसते. माधुरी पुरंदरे हे कल्पकता, नावीन्य आणि प्रयोगशीलता यांबाबतीतलं मराठी साहित्यातलं प्रधान नाव. त्यांच्यानंतर अलीकडच्या काळात कविता महाजन यांनी कल्पकता, नावीन्य आणि प्रयोगशीलता हे उद्देश समोर ठेवून मुलांसाठी लेखन केलं आहे. प्रस्तुत पुस्तक-मालिका हे त्याचंच एक उदाहरण आहे.

मुलांची मराठी भाषेची जाण वृद्धिंगत व्हावी, त्यांची शब्दसंपदा वाढावी, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही पुस्तक-मालिका कविता महाजन यांनी लिहिली आहे. या मालिकेतील नऊ पुस्तकांमध्ये मुलांना आपल्या शरीरातील विविध अवयवांची अतिशय रंजक पद्धतीनं ओळख करून दिली आहे. मुलांना कुठलाही उपदेश न करता किंवा त्यांना बौद्धिक न ऐकवता मैत्रेयी या पात्राच्या माध्यमातून कविता महाजन यांनी प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला एक रंजक गोष्ट सांगत एका अवयवाची माहिती करून देतात.

पण केवळ अवयवाची माहिती गोष्टीतून करून देऊन त्या थांबत नाहीत. कारण गोष्टीत ऐकून-वाचून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा स्तुत्य प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रत्येक पुस्तकातील गोष्टीनंतर दोन रंजक, गमतीशीर आणि मुलांच्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं दिली आहेत.

आता गोष्ट झाली, ती वाचून-ऐकून पडलेल्या प्रश्नांची उत्तरंही मिळाली. पण मुलांसाठी हे इथंच थांबत नाही किंवा थांबू नये. जी गोष्ट माहीत झाली, तिच्याशी संबंधित अजून थोडी रंजक माहिती मुलांना दिली तर ती गोष्टीइतकीच ती माहिती जाणून घेण्यातही रमतील, या हेतूनं पुढे रंजक माहितीचा विभाग आहे. त्यात त्या त्या पुस्तकाच्या विषयानुसार काही रंजक, वैज्ञानिक आणि मुलांच्या सामान्य ज्ञानात भर घालेल अशी माहिती दिली आहे.

ही माहिती देताना कल्पकता, रंजकता आणि मुलांचं कुतूहल शमेल हा विचार करून आवश्यक तेवढीच माहिती नेमकेपणानं दिली आहे.

पुस्तकातल्या या तीन पायऱ्या पूर्ण झाल्यानंतरची चौथी पायरीही तितकीच रंजक आहे. कारण त्यात पुस्तकाच्या विषयानुसार संबंधित मराठी म्हणी दिल्या आहेत. या म्हणी निवडतानाही मुलांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यांना त्या सहज समजतील यांचा विचार केला आहे. शिवाय सुभाषितवजा, ठसकेदार, नेमका अर्थबोध सांगणाऱ्या म्हणी, वाचताना मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही मजा येईल. कारण यातल्या अनेक म्हणी आपल्या दैनंदिन व्यवहारातून, संभाषणातून जवळपास नाहीशा झाल्या आहेत किंवा त्यांचा वापर थांबला आहे. दैनंदिन संभाषणाची खुमारी या म्हणींमुळे वाढू शकते आणि मराठी भाषेतील गमतीजमतीही मुलांना सहजपणे समजू शकतात. भाषेचा वापर रंजक पद्धतीनं करून दिला तर भाषा चांगल्या प्रकारे आणि लवकर आत्मसात करायला मुलं शिकतात, शिकू शकतात, हा विचार कविता महाजन यांनी केला आहे.

म्हणींच्या गमतीजमतीनंतर त्या म्हणींचा वाक्यांत उपयोग करून दाखवण्याचा स्वाध्याय दिलेला आहे. गोष्ट, प्रश्न, रंजक माहिती आणि म्हणी अशी मुलं जेव्हा क्रमाक्रमानं इथपर्यंत येतील तेव्हा त्यांच्यासाठी हा स्वाध्यायही तितकाच रंजक होईल, याचा विचार करून तो दिलेला आहे.

थोडक्यात ‘वाचा, जाणा, करा’ या पुस्तक-मालिकेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील -

१) आपल्या शरीरातील अवयांची गोष्टीरूप पद्धतीनं दिलेली रंजक माहिती

२) मराठीतील भाषिक गमती-जमती

३) अवयवांच्या अनुषंगाने असलेल्या म्हणी, वाक्प्रयोग आणि त्यांच्या उपयोगासाठी स्वाध्याय

४) त्या त्या अवयवाच्या अनुषंगाने इतर सर्वसामान्य माहिती

५) मुलांना आवडतील अशी गिरीश सहस्त्रबुद्धे यांची चित्रं

६) आणि रोहन प्रकाशनाची सुंदर निर्मिती

.............................................................................................................................................

‘वाचा-जाणा-करा’ या पुस्तक-मालिकेतील नऊ पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5125/Bombalnara-Ghasa

https://www.booksnama.com/book/5118/datanmagachi-Bhuta

https://www.booksnama.com/book/5123/Doka-ahe-ka-Khoka

https://www.booksnama.com/book/5124/ghadyalache-haat-aani-tablache-paay

https://www.booksnama.com/book/5122/Kesanchi-Karamat

https://www.booksnama.com/book/5121/Na-eknare-kaan

https://www.booksnama.com/book/5117/Nakaticha-Naak

https://www.booksnama.com/book/5120/Panidar-Dole

https://www.booksnama.com/book/5119/Potacha-Kapat

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......