तिथं वैनतेय होता. ते आवाज तिथूनच येत होते. कारण वैनतेयच ते काढत होता.
ग्रंथनामा - झलक
प्रतिक पुरी
  • ‘वैनतेय : एक गरुड योद्धा’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 12 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक वैनतेय : एक गरुड योद्धा Vaintey - Ek Garud Yoddha प्रतिक पुरी Pratik Puri

‘वैनतेय : एक गरुड योद्धा’ ही प्रतिक पुरी या तरुण कादंबरीकाराची नवी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. वैनतेय! अलौकिक शक्ती लाभलेला एक चिमुरडा अनाथ मुलगा! एक गरुड योद्धा! मनुष्य आणि सुवर्ण-गरुडांचे गुणधर्म असणाऱ्या वैनतेयच्या आयुष्यात पावलोपावली संकटं येतात. सर्पविश्वातील सर्प आणि कापालिक गुरू शतचंडी तर त्याच्या जीवावर उठतात. एका लहान मुलाचा अतिमानव होईपर्यंतचा हा प्रवास विलक्षण आहे, थक्क करणारा आहे. सर्प आणि गरुड-मानवांमधील प्राचीन संघर्षाची ही अदभुत कथा आहे. डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालेल्या या कादंबरीतला हा संपादित अंश...

............................................................................................................................................................

त्या रात्री अनेक लोक चिंताग्रस्त होते. त्याची वरवरची कारणं वेगवेगळी असली तरी आतील कारण मात्र एकच होतं, वैनतेय. आपल्या लाडक्या बोक्याची रक्तबंबाळ अवस्था पाहून ताईजी एकीकडे रडत होती, तर दुसरीकडे तिच्या रागाचा पाराही सारखा वाढतच होता. पण त्यांचा सारा राग मुलांवर होता. वैनतेयवर नाही. त्यांना वाटत होतं की, या मुलांनीच जाणुनबुजून आपल्या बोक्याला वाचवलं नाही कुत्र्यांच्या तावडीतून. हेच कारण सांगितलं होतं डीमरू आणि बंटीनं त्यांना. ताईजीलाही ते पटलं होतं. या मागे वैनतेय असेल अशी शंकाही त्यांच्या मनात फिरकली नाही.

डीमरूच्या हातावरची सूज अजूनही उतरली नव्हती. त्यामुळे चंदू आणखीनच काळजीत पडला होता. या लहानशा पोरामध्ये एवढी ताकद आली तरी कुठून? डीमरू तर आश्रमातला सर्वांत धट्टाकट्टा पोरगा होता. मारामारीत त्याच्यापुढे कोणी टिकायचा नाही. तोच आता वेदनेनं कळवळत होता. कोणामुळे तर या चार वर्षाच्या कारट्यामुळे. चंदूचा विश्वासच बसत नव्हता. आपल्या खोलीत अदिती आणि पीया एकमेकींचा हात धरून घाबरल्या नजरेनं वैनतेयकडे बघत होत्या. तो त्याच्या गरुडासोबत जेवत होता. समोर मांसाचे कच्चे तुकडे पसरले होते. दोघींनाही त्याचं हे खाणं पाहून कमालीची किळस येत होती.

वैनतेयचं पोट भरताच त्यानं मस्तपैकी एक ढेकर दिली. गरुडाकडे बघून खुदकन हसला. त्याचं ते हसणं पाहिल्यावर तो गरुड समाधानानं उडून गेला. वैनतेयला आता झोप येत होती. खोलीत एका बाजूला तो जमिनीवरच झोपी गेला. मागील काही रात्रींपासून त्यानं बिछान्यावर झोपणं बंद केलं होतं. थंडीची त्याला तशीही कधी परवा नव्हतीच. तो मजेत झोपला होता.

त्यानंतर पीयादेखील झोपी गेली. पण अदिती मात्र अद्याप जागीच होती. तिला अपेक्षा होती की, आजतरी ते नक्कीच घडणार आहे. गेल्या काही रात्री ती त्याच प्रतीक्षेत वैनतेयच्या खोलीत जागी राहायची. शिवाय तिच्या मनात एक कुतूहलही होतं. ती जात्याच हुशार मुलगी होती. वैनतेयबाबत ज्या गोष्टी घडल्या, त्या तिनं जवळून पाहिल्या होत्या. आपल्या मनात त्यावर तिचा सारखा विचार सुरू होता. काही गोष्टी तिला कळल्या होत्या पण काही नाही. पण ज्या समजल्या होत्या त्यांचाही अर्थ किंवा कारण तिला कळत नव्हतं. पण ती धाडशी मुलगी होती. काहीही करून वैनतेयचं रहस्य जाणून घ्यायचंच असा निश्चय तिनं कधीचाच केला होता. आज रात्रीही ती त्यासाठीच जागणार होती. पण तिनं ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही, चंदूलाही नाही.

..जमीन दूर-दूर जात होती... आणि त्यावरील प्रत्येक गोष्ट आता आपला आकार बदलत लहान होत होती... डोंगर छोटे होत होते... झाडा-झुडूपांचीही तीच स्थिती होती... बर्फानं झाकल्या गेलेली पर्वतांची शिखरं मात्र आता मोठी होत होती... हवेचे जबरदस्त तडाखे बसत होते... पोटात विलक्षण गुदगूल्या होत होत्या..त्यानं ओरडायचा प्रयत्न केला... तो ओरडलाही पण त्याचा आवाजच ऐकू आला नाही... त्याला स्वतःलाही... कारण हवेच्या रोंगाटात त्याचा आवाज कुठल्याकुठे नाहीसा झाला होता... त्याच्या पाठीवरचा आणि पोटावरचा दबाव आता वाढत होता... अचानक त्याचा वर जाण्याचा वेग भयानक गतीनं वाढला... आतापर्यंत दिसलेल्या सर्व गोष्टी आता मागे पडल्या... हवेत विरघळून नाहीशा होऊ लागल्या... डोळ्यांना आता हवेच्या थापडा सहन होत नव्हत्या... त्यानं डोळे बंद केले... आणि त्याच वेळी त्याला जाणवलं की तो तरंगतोय... खरंच तरंगतोय... पण कसं... त्याला तर तरंगता येत नव्हतं... मग हे कसं काय घडतंय... की मी खाली पडतोय... क्राँ...क्राँ....

अदिती कितीतरी वेळ जागी होती. ती प्रेमानं वैनतेयकडे बघत होती. त्याच्या ओठांवर हसू होतं. तीही हसली. विशाल राज आणि मेघाची तिला अस्पष्ट अशी आठवण होती. ती चांगली आठवण होती. तिचे डोळे अचानक भरून आले. वैनतेयसाठी... तिच्यासाठी... सर्वच मुलांसाठी... लहान असूनही या सर्वांवर अकालीच मोठं होण्याची वेळ आली होती... आणि आयुष्याच्या सर्व काळ्या, अवघड गोष्टींना सामोरं जाण्याचीही. तिनं आपले डोळे बंद केले.

निद्रा देवीनं ही संधी हातची घालवली नाही. आतापर्यंत अदितीनं कसोशीनं झोपेला आपल्यापासून दूर ठेवलं होतं. पण आता ती आपसूकच तिच्या तावडीत सापडली. तिचे मिटलेले डोळे पुन्हा कितीतरी वेळ उघडलेच नाही. आणि मग काहीतरी घडलं. एक आवाज तिच्या कानात जाऊन आदळला. आणि मग तिच्या मेंदूवर. क्राँ... क्राँ...

गरुडाचा आवाज... इथं खोलीत... तो परत आलाय बहुतेक... तिनं डोळे उघडले. पण खोलीत कोणीच नव्हतं. आवाज तर अजूनही येत होता. पण कुठून? तिनं आपली नजर फिरवली आणि एका जागी ती थांबली... नव्हे अडकून पडली. तिथं वैनतेय होता. ते आवाज तिथूनच येत होते. कारण वैनतेयच ते काढत होता. त्याच वेळी तडफडतही होता.

वैनतेय... अदिती धावतच त्याच्याकडे गेली आणि अचानक थांबली. पुढे जायला तिचे पाय तयार होत नव्हते आणि तिचं मनही. तिच्या तोंडातून किंचाळण्याचा आवाजही बाहेर पडायला तयार नव्हता. तिचे डोळे समोरचं दृष्य पाहून पापण्या फडकावण्याचं विसरून गेले होते. काय पाहिलं तिनं...

वैनतेय पालीच्या तुटलेल्या शेपटासारखा जमिनीवर तडफडत होता. ओरडत होता. वेडावाकडा होत होता. त्याचे हात-पाय हवेत इकडे-तिकडे उसळत होते. आणि मग अदितीला ते दिसलं... वैनतेयच्या हातांवर छोटे-छोटे सोनेरी पिसं उगू लागले... पूर्ण हात त्या पिसांनी आच्छादला गेला. मग पाठीमागून काही तरी बाहेर येऊ लागलं. ते पंख होते. त्यांचा आकार वाढू लागला. दोन मोठे सोनेरी पंख. एखाद्या गरुडासारखे.

अदितीला विश्वास होत नव्हता. पण अजून बरंच काही पाहायचं बाकी होतं. वैनतेयचे पाय आता दुमडले जात होते. त्यावरही आता सोनेरी पिसांची लव वाढत होती. त्याच्या पायाची बोटं वाकडी होऊ लागली होती. नखांचा आकार वाढत होता आणि त्यांना टोकं येतं होती. थोड्याच वेळात त्याचे पाय गरुडाच्या पायांसारखे बनले.

वैनतेयचा चेहरा आता सामान्य झाला होता. पण त्याच्या डोळ्यांतून अजून पाणी येत होतं. त्याचा श्वास वेगात सुरू होता. आणि मग तो हळूहळू शांत झाला. त्याचं शरीर पुन्हा मानवी होऊ लागलं. अदिती स्तब्धपणे सारं काही बघत होती. तिच्या मनात आणि ओठांत एकच गोष्ट होती.

....हे खरं आहे... हे खरं आहे...

आणि ती धाडकन खाली कोसळली.

............................................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4909/Vaintey---Ek-Garud-Yoddha

............................................................................................................................................................

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......