जगन्मित्र सुनील कर्णिक यांच्या पायांवर चक्र असावं. ते आता भ्रमंतीला निघाले असतील.
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
अनंत देशमुख
  • सुनील कर्णिक आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 18 May 2018
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो सुनील कर्णिक Sunil Karnik अनंत देशमुख डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

अमेरिकेला आल्यापासून सातत्यानं व्हॉटसअॅपवर माझा संपर्क जवळपास ७०-७५ मित्रांशी आहे. त्यातही विशेषत्वानं सुनील कर्णिक यांच्याशी आहे. ते हाडाचे साहित्यिक आहेत. त्यांच्या घरातच लहापणापासून रवींद्र दुर्वे या मामांना त्यांनी लिहिता वाचताना पाहिलं. ते लेखक होते. त्यामुळे घरात पुस्तकं येत होती. ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘ललित’चे अंक येत. ते ते वाचत. तिथं साहित्याची गोडी निर्माण झाली. एम.ए.ला असताना ‘आलोचना’मध्ये त्यांची परीक्षणं प्रसिद्ध होऊ लागली. एके दिवशी त्यांना मामांनी श्री. पु. भागवत यांच्या ‘मौज’ कचेरीत नेलं. श्रीपुंच्या व्यक्तित्वाचा दाट संस्कार त्यांच्यावर झाला. ‘मौज’मध्ये त्यांच्यातला संपादक घडत गेला. मग ‘ललित’, ‘महानगर’, ‘नवशक्ति’, ‘आज दिनांक’, ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ’ वगैरे ठिकाणी त्यांनी संपादक म्हणून काम केलं. त्यात विशेषत्वानं त्यांची छाप पडली ती वाड्मयीन स्वरूपाच्या संपादनावर. ‘मौज’मध्ये असताना त्यांच्यातील हे गुण श्रीपुंनी हेरले होते.

याच काळात त्यांचा मोठ्या साहित्यिकांशी संपर्क झाला. विजय तेंडुलकर, अशोक शहाणे, अरुण कोल्हटकर, दिलीप चित्रे, सु. रा. चुनेकर. मराठीतील सहित्यिकांमध्ये असलेल्या त्यांच्या संचारामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. यातूनच पुढे ते अनेक प्रकाशकांचे सल्लागार झाले. त्यांनी अनेक संहितांची संपादनं केली. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या टोपणनावांनीही त्यांनी विपुल लेखन केलं. अलीकडेच विविध नियतकालिकांच्या फायलींमधून विखुरलेल्या स्वरूपात असलेलं त्यांचं लेखन सहा पुस्तकांच्या संचाच्या रूपानं प्रकाशित झालं. आणखीही काही प्रकाशनच्या मार्गावर असेल.

मराठी साहित्यव्यवहार हा त्याचा सततचा ध्यासाचा विषय आहे. त्यांना एक वेळ कांद्याचे भाव माहिती नसणार. (कारण ते काम चोखपणे वहिनी करतात.)  पण साहित्यातील बारीकसारीक घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्या संबंधीची त्यांची जाणकारी कौतुकास्पद आहे.

ते आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनासंबंधी वा प्रश्नासंबंधी चुकूनही बोलणार नाहीत, ना ते तुमच्या या संबंधीच्या प्रश्नाविषयी कुतूहल दाखवणार. त्यांचे देणंघेणं कोणाशी असेल तर ते फक्त साहित्याशी. त्यामुळे यासंदर्भात माझ्याशी त्यांचा जो संवाद होत राहिला आहे, तो प्रतिनिधिक स्वरूपाचा समजता येईल.

त्यांचं मन नेहमीच सजग असतं आणि त्यांना पडणाऱ्या प्रश्नांना कसलंच बंधन नसतं. कधी ते एखाद्या पाश्चात्य कलावंताबद्दल, वैज्ञानिकाविषयी कुतूहलानं प्रश्न विचारतील, कधी एखाद्या साहित्यिकाच्या जन्मशताब्दीविषयी, कधी लेखकाच्या ग्रंथांच्या संपादनाविषयी, कधी एखाद्या नियतकालिकाच्या सूचीविषयी चौकशी करतील. ते एवढ्याच करता की, त्यांना नेहमी कोणाकडून आपली मतं पडताळून घ्यायची असतात. उदाहरणार्थ,

१. ‘ठणठणपाळ’वर कोण काम करील?

२. नोव्हेंबर २०१९ मध्ये पुलंची जन्मशताब्दी येत आहे. ती कशी साजरी करावी?

३. शांताबाई शेळक्यांवर रसग्रहणात्मक पुस्तक यायला हवं. कोण करेल?

४. ‘वादातले पुल’ कोण करेल?

५. ‘ललित’ची सूची झालेली नाही? ताबोडतोब झाली पाहिजे. कोण करेल?

६. ‘ते शंभर ठाणेकर’मध्ये तुम्ही आजच्या कोणत्या ठाणेकरांचा समावेश कराल?

७. चिं. त्र्यं. खानोलकरांना न्याय कोण देईल?

आणखी एक प्रकार म्हणजे आपल्याला जे माहीत आहे, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची धडपड. उदाहरणार्थ,

१) आंबेडकरांनी पाली भाषेचा शब्दकोश तयार केला होता, हे फारसं कोणाला ठाऊक नाही.

२) ‘पुलंचं असंग्रहित लेखन’ या शीर्षकाखाली त्यांनी पुलंच्या असंग्रहित लेखांची नोंद करून ती संबंधितांना पाठवून दिली.

मी अमेरिकेत मुलांकडे आलो आहे, हे त्यांना माहीत असल्यानं इथून मी कोणकोणत्या विषयांवर टिपणं लिहून पाठवावीत म्हणून त्यांनी केलेल्या सूचना पाहा-

१) पाश्चिमात्य वाड्मयीन आणि सांस्कृतिक घडामोडी, व्यामिश्र संस्कृती, भारतीय व मराठी माणसं यांची रंगतदार माहितीही अधूनमधून लिहावी.

इतर समानशील व्यक्तींसाठी सतत काहीतरी करण्याची ऊर्मी त्यांच्यापाशी आहे. अलीकडेच ते बदलापूरला श्याम जोशी यांच्या ‘ग्रंथसखा’ या वाचनालयाला भेट देऊन आले. त्यासंबंधी त्यांनी लिहिलं आहे-

“बदलापूर येथील श्याम जोशी यांचा अफाट दुर्मीळ ग्रंथसंग्रह पाहून आज तृप्त झालो. तिथं पुन्हा पुन्हा जाण्याची तीव्र इच्छा आहे... त्यांच्यासाठी काही उपक्रम सुरू करावेसे वाटतात.. पाहू कसं जमतं ते...”

काही इंग्रजी पुस्तकांविषयी किंवा लेखक, साहित्यिक, वैज्ञानिकांविषयी त्यांना विलक्षण कुतूहल असतं. टेसला या एडीसनच्या समकालीन वैज्ञानिकाचं मराठीत चरित्र लिहिलं गेलं पाहिजे, असं त्यांना आवर्जून वाटतं. त्यासंबंधात त्यांनी लिहिलं आहे-

“त्याच्या आत्मचरित्राची / चरित्राची प्रत येताना अवश्य आणावी... आपण दोघं मिळून त्याचं चरित्र लिहू या...”

इतकंच नव्हे तर अलीकडे मी एडीथ फिफ या जगप्रसिद्ध गायिकेविषयी लिहिलं, ते वाचल्यावर त्यांनी आपल्या एका पत्रकार विद्यार्थिनीला तिचं चरित्र लिहिण्याची सूचना केली आहे. त्याच बरोबर त्यांना कोशवाड्मय आणि कॅटलॉगमध्ये रूची असल्यानं मला प्रश्न विचारला आहे-

“Chicago University Pressचं ‘Mannual of style’ हे पुस्तक मला विकत हवं आहे. कुठं मिळेल? किंमत किती असेल?”

त्यांना अध्यापनात रस असल्यानं मुंबई पत्रकार संघातर्फे जे वर्ग घेतले जातात, तिथं ते गेली अनेक वर्षं तळमळीनं शिकवत आले आहेत. आणि आज मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत. त्यांना सामाजिक कामाची आच असल्यानं सारा महाराष्ट्र त्यांनी पायाखाली घातला आहे. नुकतंच वारली चित्रकार जीव्या सोमा म्हसे यांचं निधन झालं. ती बातमी त्यांनी ताबोडतोब व्हॉटसअॅपद्वारे संबंधितांपर्यंत पोहोचवली.

आपल्या मराठी साहित्याचं जागतिक साहित्य विश्वात कसं स्वागत होईल, हा माझा कुतूहलाचा प्रश्न. त्याला उत्तर देताना त्या़ंनी लिहिले-

“ ‘कोसला’चा अनुवाद पूर्वीच झालेला आहे. त्याचं खास स्वागत झालं नाही.”

मराठी साहित्याच्या थिटेपणाविषयी मी त्यांना छेडलं तर त्यांनी पुढील उत्तर दिलं-

“बाकीचे मौनी बाबा असतात. Ours is a sick society.”

त्यांनी दिलेली उत्तरं आपल्याला अंतर्मुख करायला लावतात.

जगन्मित्र सुनील कर्णिक यांच्या पायांवर चक्र असावं. मनात नवनवीन कल्पना रचत ते आता भ्रमंतीला निघालेही असतील.

.............................................................................................................................................

कर्णिकांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

‘महानगर’चे दिवस ​- सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये.

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4348

न छापण्याजोग्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २२० रुपये. 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4349

महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २०० रुपये.

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4350

म्हाताऱ्या बायका काय कामाच्या? - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये. 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4351

मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4352

सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4353

.............................................................................................................................................

लेखक अनंत देशमुख समीक्षक, संपादक आहेत.

dranantdeshmukh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......