तुकोबा अभंगांतून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे हे पुस्तक उदाहरण म्हणून पाहावे
ग्रंथनामा - झलक
भास्कर हांडे
  • ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 18 May 2018
  • ग्रंथनामा झलक रंगरूप अभंगाचे भास्कर हांडे तुकोबा

चित्रकार भास्कर हांडे यांनी तुकोबाच्या अभंगांना चित्र-शिल्पाच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न गेली पंचवीसेक वर्षं सातत्यानं केला आहे. त्याविषयीच्या त्यांच्या ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज संध्याकाळी पुण्यात होत आहे. त्यानिमित्तानं त्यांनी या पुस्तकाला लिहिलेलं मनोगत...

.............................................................................................................................................

तुकाराम महाराजांच्या अभंगांतून स्फुरलेल्या चित्र-शिल्प प्रकल्पातील चित्रांविषयी काही टिपणी लिहून ठेवावी, अशी इच्छा अनेक रसिकप्रेक्षकांनी गतकाळात प्रदर्शित केली. चित्र आणि शिल्प साकार करताना तुकोबांचे अभंग हे शब्दश: चित्रात रूपांतरित केलेले काही चित्रांमध्ये दिसतात. त्या चित्रांची संकल्पना अभंगातील एका कडव्यामधून आलेली म्हणजे भावलेली असते. चित्र साकारण्याची प्रक्रिया २५ वर्षांपूर्वी घडलेली आहे. त्या काळात माझ्या अभिव्यक्तीची स्पंदने अन् आता मी लिहीत असलेली त्या संवेदनांची विश्लेषणे व विवेचन खरे तर तंतोतंत जमायला हवे. तोच प्रयत्न मी या प्रस्तुत अभंगांतून स्फुरलेल्या चित्रांच्या लेखनातून करणार आहे. मागील २५ वर्षांत अभंगांतून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने वारंवार चर्चा करण्याची पद्धत कशी असू शकते, याचे ‘रंगरूप अभंगाचे’ हे पुस्तक उदाहरण म्हणून पाहावे, ही रसिक वाचकांना विनंती.

तुकोबांचे काव्य व त्यावरून स्फुरलेल्या चित्र-शिल्पांचे विश्लेषण व विवेचन, तसेच तुकोबांच्या अभंगातील आशयाचा परामर्ष घेणे, हे दुहेरी पैलू ‘रंगरूप अभंगाचे’ या पुस्तकात आले आहे. आधुनिक चित्रकलेत हे आव्हानात्मक आहे, हे चित्र-शिल्प तयार करताना जाणवत होते. समकालीन आधुनिक कलाविश्वात काम करताना त्याची जाणीव होती.

तुकोबांच्या गाथेतील चित्र-शिल्प संकल्पनेची सुरुवात फारच उत्साही वातावरणात झाली. माझा उमेदीचा काळ. त्यात मला कविता लिहिण्याची फार ओढ. मी भाषेत रमत जायचो, त्यामुळे अनेक भाषांत मला बोलणे शक्य झाले. मात्र, मी व्यक्त होताना मराठी मायबोली नकळत जिभेवर प्रकट व्हायची. हिंदीचे एके काळी आकर्षण होते; परंतु परदेशात इंग्रजीने जास्त व्यापले आणि ज्या देशात राहतो तेथील भाषा ‘डच’ हिचाही तेवढाच हक्क. ती भाषा बोलणे, समजणे, लिहिणे यांतून मित्रांसोबत संवाद व आपल्या भाषेची महती सांगताना तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वरी, नामदेवांची अभंगवाणी यांची चर्चा सहज होत असे. त्यामुळेच तुकोबांचे अभंग डच भाषेत भाषांतरित होण्यास मित्रांनी पुढाकार घेतला. अॅकॅडमिक पद्धतीने काहींनी कार्य पुढे नेले, तर लवचीक पद्धतीने ही भाषांतरे झाली. मी माझ्या पद्धतीने तुकोबांच्या गाथेभोवती सतत व्यग्र राहिलो.

पोलंड या देशातील मित्रांनी तुकोबांचे अभंग ‘पोलीश’ भाषेत भाषांतरित केले आहेत. मात्र ते अभंग अद्याप प्रकाशित झाले नाहीत. डच भाषेतील अभंग ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर आहेत. तुकोबांच्या अभंगांची चित्रांत रूपांतरे करताना माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण मावळप्रांत उभा होता. तुकोबांनी शब्दांमधून सर्व पद्धतींनी वर्णने करून ठेवली आहेत. शेती, व्यापार, मनुष्यस्वभावातील बारकावे, वैश्विक जाणीव, वन्यजीवन, निसर्ग या सर्वांची मांडणी अभंगांत होताना शब्दांची पारख व मांडणी इतकी अचूक की, ते ओलांडण्याचे धाडस अद्याप कोणत्याही अभिव्यक्तीमध्ये नाही. तुकोबा नामदेवांची विठ्ठलासोबत येऊन शिल्लक राहिलेली सेवा पूर्ण करण्याची आज्ञा शिरसावंद्य मानून पुढे अभंगरचना करत राहिले. त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की, निसर्गाने पश्चिम घाटावर एक वेगळी बैठक मारली आहे व त्या बैठकीच्या अवतीभवती आपल्याला गवसणी घालणारे शब्दही पेरून ठेवले आहेत. पंचमहाभूतांच्या सान्निध्यात ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे निसर्गनियम व मानवता यांची सांगड घालून मानवाचे जीवन सोपे करून गेले. अभंगचित्र साकारताना या विचारांनी सतत आठवण करून दिली.

भामगिरी पर्वतावरून देहू या इंद्रायणीकाठी वसलेल्या गावाचे दृश्य हिवाळ्यात किती मनोहर, रम्य दिसते. भंडारा डोंगराकडे उन्हाळ्यात पाहिल्यावर सूर्यास्ताचे दर्शनही असेच मनोरम्य होत असते. हा रम्यपणाचा त्रिकोण आहे. देहू इंद्रायणीकाठी पश्चिमेला, भंडारा डोंगर किंचित मध्य उंचीवर तर उत्तरेला भामगिरी डोंगर परिसरातील सर्वांत उंच भाग. ज्या परिसरातून नदी वाहते, तो सखल भाग असतो. भामगिरी डोंगरासारखे उंच डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बरेच आहेत. तुकोबा त्यांच्या काळात अशाच मार्गाने उत्तरेला बाबाजी चैतन्य यांच्या मठात जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे जायचे. तसेच कागदाच्या खरेदीसाठी जुन्नर या ठिकाणी आल्याची नोंद सापडते. देहू ते जुन्नर मार्गे ओतूर हा माग सह्याद्रीच्या पूर्वेकडील उत्तरणीच्या भागातून जातो. साधारण १०० किलोमीटर अंतर आहे. आळंदी ते त्र्यंबकेश्वर हा मार्ग याच मार्गाचा एक भाग आहे. भामगिरीच्या उत्तरेला भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक रमणीय ठिकाण आहे. तसेच पुढे उत्तरेकडे घोडेगाव हे जुने गाव आहे, तर अतिप्राचीन शहरांपैकी ‘जुने नेर’ म्हणून जुन्नर हे प्राचीन शहर आजही सह्याद्रीच्या कुशीत आपली ओळख ठेवून आहे. तोच मार्ग उत्तरेकडे हरिश्चंद्रगडावरून त्र्यंबकेश्वर व ब्रह्मगिरीला जातो, जिथे गोदावरी नदीचा उगम झाला आहे.

जुन्नर ते हरिश्चंद्रगड या दोन्हींच्या मध्यावर बाबाजी चैतन्य यांचा मठ आहे. याच मठात तुकोबा बाबाजी चैतन्य यांच्या भेटीसाठी गेले होते. तुकोबांचे वास्तव्य ज्या ठिकाणी होते, तिथे तुकोबांचे एक छोटेखानी मंदिर बांधले आहे. या खाणाखुणा मी प्रत्यक्ष पाहिल्यामुळे चित्रात जे चैतन्य आले आहे, त्याचे ते प्रमाण आहे. अशा दंडकारण्यातील ठिकाणांची निसर्गसंपदा किती उच्च कोटीची आहे, हे सह्याद्रीच्या कडेकपारी, भरघोष वन व वनचरे पाहिल्यावर लक्षात येते. त्यासोबत तुकोबांचा हा निसर्गभ्रमणाचा अनुभव ते अभंगात सामावतात. चित्र तयार करताना माझा भामगिरीचा अनुभव आणि त्या सर्व परिसराचा प्रभाव मी चित्रात रंगवला आहे. पक्ष्याच्या डोळ्याने कसे पाहावे हे दृश्य मला भामगिरी डोंगरावरून देहूकडे पाहताना उमगले. तेच दृश्य चितारले आहे, असेच वाटत राहते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4422

.............................................................................................................................................

माझ्या डोळ्यांपुढे लहानपणीची पंढरपूर-वारीला जाणार्‍या लोकांची दृश्यं डोळ्यांसमोर आली. ही चित्रं मी हजारो मैल दूर बसून रेखाटली आहेत. १९९० मध्ये मी भारतात मुंबईत प्रदर्शन करून हॉलंडला परतलो होतो. माझ्याच १० वर्षांच्या कवितांचे ‘दशक’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्या कवितासंग्रहात ‘अस्तित्व’ ही १९८५ साली लिहिलेली कविता व त्यावरील विठोबाचे चित्र रेखाटले होते, कारण त्या कवितेत नकळत विठोबाचा संदर्भ आला होता.

बावरलेल्या परिस्थितीच्या कानात कळवळलो

बघ तुझ्या चटक्याने पोळून

मी काळा विठोबा झालो

देह चंद्रभागेत बुडवून आलो

सर्व इच्छा संपविल्या आहेत

म्हणते कशी

बस या विटेवर

ठेवून हात कटेवर

भोग या जागी

आरतीच्या या आगी

त्या संदर्भाच्या अनुषंगाने तुकोबांच्या गाथेतील अभंग झरझर/झटपट डोळ्यांपुढे सरकू लागले. यात दिलीप चित्रे यांचे ‘पुन्हा तुकाराम’ आणि ‘Says Tuka’ (इंग्लिश भाषांतर) व अरुण कोलटकर यांनी इंग्लिशमध्ये केलेले काही अभंग यांचे वाचन झाले होते. अभंगांचे वेगळे रूप मला जाणवले. त्याचे चित्र व शिल्प-रूप माझ्या दृक्पटलासमोर फेर धरू लागले होते. माझा चित्रकलेतील प्रवास मार्गी लागला होता.

‘तुझे रूप माझे देणे’ हे शीर्षक नामदेवांच्या अभंगावरून आले आहे. ‘तुझे रूप माझे नयनी’ असा तो शब्दप्रपंच आहे. विठोबाचे रूप नेहमी नयनी ठेवणार्‍या नामयाची वाणी मला भावली आणि प्रकल्पाचे शीर्षक ‘तुझे रूप माझे देणे’ असे ठरले.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......