प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईकांना आर्थिक मदतीची गरज
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
निवेदन
  • प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक
  • Fri , 22 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो गुरुनाथ नाईक Gurunath Naik

‘कॅप्टन दीप’, ‘गोलंदाज’, ‘धुरंधर’, ‘शिलेदार’, ‘गरूड’, ‘शब्दवेधी’, ‘रातराणी’ ही व्यक्तिरेखांची नावं उच्चारताच मराठी वाचकांच्या एका पिढीला ज्यांची आठवण होते, ते हजाराहून अधिक रहस्यमय कादंबऱ्या लिहिणारे विक्रमवीर लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ नाईक सध्या गोव्यात विपन्नावस्थेशी आणि आजारांशी झुंज देत आहेत. 

७९ वर्षांचे नाईक गेली बारा वर्षं ब्रेन स्ट्रोकच्या आजारानं ग्रस्त आहेत. आता त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाल्यानं त्यांच्यावर गोव्यातील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मूळ गोव्याचे असलेल्या नाईक यांना काही पत्रकारांच्या पुढाकारानं गोवा सरकारकडून निवासासाठी भाड्यानं फ्लॅट मिळाला आहे आणि गोवा सरकारची दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शनही त्यांना मिळते. मात्र, त्यांच्या आणि पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी आणि औषधोपचारांसाठी अन्य कोणतंही उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडे नाही. त्यांच्या निवडक पुस्तकांचे नव्यानं संच काढून त्यातून त्यांना काही घसघशीत आर्थिक तरतूद करून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रकल्प वास्तवात यायला काही काळ जाईल. सध्याची निकड त्यातून भागणार नाही. त्यांचा मुलगा लातूरमध्ये एमएस्सीचं शिक्षण घेत आहे आणि तो कॉलेजखर्चही अर्धवेळ नोकरी करून भागवतो. नाईक यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ती करण्याची क्षमता आणि इच्छा असलेल्यांनी कृपया पुढील बँक खात्यात रक्कम जमा करावी, ही विनंती.

स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा - पणजी

गुरुनाथ नाईक

खाते क्र. : 31180667793

आयएफएससी : SBIN0005554

.............................................................................................................................................

रहस्यकथांच्या या शहेनशहाला किंवा बादशहाला जाणून घ्या. ‘इन गोवा न्यूज’ या वृत्तवाहिनीने २२ डिसेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध रहस्याकथाकार गुरुनाथ नाईक यांची मुलाखत तीन भागांत घेतली. ती पुढील लिंकवर पाहता, ऐकता येईल.

गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग एक

गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग दोन

गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग तीन

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......