‘माझा समुद्र प्रवास’ : ‘केसरी’च्या फायलींमध्ये धूळ खात पडलेले, कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेले एक महत्त्वाचे प्रवासवर्णन
ग्रंथनामा - झलक
प्रदीप कर्णिक | नीतीन रिंढे
  • ‘माझा समुद्र प्रवास’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 12 May 2023
  • ग्रंथनामा झलक माझा समुद्र प्रवास Maza Samudra Pravas आनंदीबाई जोशी Anandibai Joshi गोपाळ विनायक जोशी Gopal Vinayak Joshi

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळ विनायक जोशी यांचे ‘माझा समुद्र प्रवास’ हे पुस्तक नुकतेच मराठी संशोधन मंडळ, मुंबईतर्फे प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक शोधून, त्याचे संपादन करण्याचे आणि त्याला सविस्तर प्रस्तावना लिहिण्याचे काम डॉ. अनंत देशमुख यांनी केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे हा ऐतिहासिक दस्ताऐवज महाराष्ट्राला पुस्तकरूपाने उपलब्ध झाला आहे. या पुस्तकाला मराठी संशोधन मंडळाचे माजी संचालक प्रदीप कर्णिक यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा आणि विद्यमान संचालक नीतीन रिंढे यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

प्रदीप कर्णिक, माजी संचालक मराठी संशोधन मंडळ, मुंबई

‘माझा समुद्र प्रवास’ ही गोपाळराव जोशी, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या यजमानांनी ‘केसरी’ वृत्तपत्रात लिहिलेली त्यांच्या प्रवासाची हकीकत. विलायतला समुद्रमार्गे केलेला हा प्रवास, म्हणजेच प्रवासवर्णन! डॉ. अनंत देशमुख यांच्या शोधक नजरेने टिपलेली ही लेखमाला! ‘केसरी’च्या जुन्या अंकांत धूळ खात पडली होती, ती डॉ. देशमुखांनी मिळवली. त्याचे धागेदोरे जुळवले, त्याला प्रस्तावनावजा टिपणे जोडली आणि माझ्या हाती सुपूर्द केली.

लोकमान्य टिळकांच्या १००व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘मराठी संशोधन पत्रिके’चा ‘टिळक-आगरकर विशेषांक’ प्रसिद्ध करताना त्या अंकात टिळक-आगरकरांचे समकालीन आणि लोकमान्य टिळक यांच्या वृत्तपत्राचे स्तंभलेखक/लेखक म्हणून ती लेखमाला, जी दुर्मीळ होती, तिचे पुनर्मुद्रण आम्ही केले. त्याच वेळी या प्रवासवर्णनाची पुस्तिका प्रकाशित करण्याचे योजिले होते, त्यास विलंब झाला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्यापैकी एक प्रमुख कारण, डॉ. अनंत देशमुख यांना डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या मृत्यूपश्चात गोपाळरावांच्या आयुष्याचा व कार्याचा शोध घेऊन, त्यांच्या प्रस्तावनेत नवी भर घालायची होती, परंतु गोपाळरावांच्या नाशिक वास्तव्याबद्दलची माहिती जमा करणे, ती गोळा करणे, त्यांच्या संशोधनपर कार्यबाहुल्यामुळे पुढे पुढे जात गेले. शेवटी ही पुस्तिका प्रकाशित करावी आणि नंतर सवडीने ‘डॉ. आनंदीबाईंच्या मृत्यूपश्चातील गोपाळराव’ ही पुस्तिका प्रकाशित करावी, असे ठरले.

गोपाळराव जोशी विक्षिप्त तर होतेच, परंतु त्यांनी आपल्या पत्नीला खूप खस्ता खाऊन डॉक्टर केले. या त्यांच्या सर्वोत्तम कार्यामुळे त्यांच्या विक्षिप्तपणाकडे समाजाने डोळेझांक केली, परंतु त्यांच्या विक्षिप्तपणामुळे त्यांच्या आणखी काही गुणांकडेही दुर्लक्ष झाले, असे म्हणावेसे वाटते. उदा. त्यांची निरीक्षण अवलोकन शक्ती, त्यांच्यापाशी असणारे लेखनाचे गुण, त्यांची भाषा, बेधडक वृत्ती, दाखले देण्याची पद्धती, जिवंत रसभरित वर्णन करण्याची हातोटी, अशा अनेक गुणांचे कौतुक होणे तर सोडाच, पण साधी दखलही नंतर महाराष्ट्राने घेतली नाही.

जी काही घेतली गेली, ती डॉ. आनंदीबाई यांच्या अल्पायुष्यातला एक खलनायक, अशीच घेतली गेली. अर्थात त्याला त्यांचा स्वभावही कारणीभूत होता, यात शंकाच नाही. शिवाय आपल्या पत्नीला शिकवले, या गुणाच्या तुलनेत त्यांचे दुर्गुण कमालीचे जाचक व एका कोवळ्या वयाच्या स्त्रीला त्रासदायक ठरले होते. वस्तुतः गोपाळराव जोशी यांच्या वर्तन-संवाद-वृत्तीचे मनोविश्लेषण जाणकाराने करणे उपयुक्त ठरेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

इथे मांडायचा मुद्दा असा की, हे गोपाळरावांच्या प्रस्तुत प्रवासवर्णनावरून असे दिसते की, त्यांच्याकडे लेखनशैलीचे उत्तम गुण होते. त्यांनी जरा गंभीरपणे आपली लेखणी चालवली असती, तर काळाचा पट/चित्रपट ते नक्की उभा करू शकले असते, परंतु स्पष्ट बोलणे, फजिती करणे, टर उडवणे, लोकांना अडचणीत आणणे, अशा अनेक छोट्यामोठ्या गमतीजमती करण्यात त्यांनी आपला वेळ व्यतीत केला आणि महाराष्ट्र एका चांगल्या लेखकाला मुकला. हे प्रवासवर्णन त्यांच्या लेखनशैलीतला दुर्मीळ दस्तऐवज म्हणून महत्त्वाचा ठरतो.

विलायतेचा प्रवास, बोटीवरचे आयुष्य, येणारी विविध बंदरे, खाणे-पिणे, ती व्यवस्था इंग्रजांचा टापटीपपणा, प्रवाश्यांची वर्णने, मालांचे चढणे-उतरवणे, पोशाख, थंडी, आंघोळ, स्नानगृहे, शौचालये, झोपायची व्यवस्था रूढी, परंपरा, अशा अनेकाने वर्णनमालेने प्रवास जिवंत झाला. रूढी, परंपरा धार्मिक दाखले आणि त्यावरचे रोखठोक मतप्रदर्शन याने वर्णनात रोचकता आली आहे. इंग्लंडमधले वास्तव्य, तिथली घरे, माणसे, खाणेपिणे, पोशाख, रस्ते, दुकाने, फुटपाथ, अशा अनेक मासलेवाईक प्रसंगांनी प्रवासवर्णन रंगतदार झालंय.

डॉ. अनंत देशमुख यांनी त्यांच्या प्रस्तावनेत घेतलेला शोध प्रवासवर्णन आणि गोपाळराव जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.

हे पुस्तक १३ एप्रिल २०२३, कै. प्रा. अ. का. प्रियोळकर यांच्या ५०व्या स्मृतिदिनी प्रकाशित करताना मंडळाला आनंद होतोय.

.................................................................................................................................................................

नीतीन रिंढे, संचालक मराठी संशोधन मंडळ, मुंबई

इंग्रजांच्या अमदानीतील एक ‘चळवळे व्यक्तिमत्त्व’ गोपाळराव जोशी यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात लिहिलेले ‘माझा समुद्र प्रवास’ हे प्रवासवर्णन आज प्रथमच पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहे. याचे श्रेय सर्वस्वी महाराष्ट्रातील चिकित्सक दृष्टीचे जाणकार संशोधक डॉ. अनंत देशमुख यांना जाते. डॉ. देशमुख यांची शोधक दृष्टी जर या प्रवासवर्णनावर पडली नसती, तर गेल्या सुमारे सव्वाशेहून अधिक वर्षे ‘केसरी’च्या फायलींमध्ये धूळ खात पडलेले हे प्रवासवर्णन कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिले असते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

१८९२मध्ये गोपाळराव देशमुख इंग्लंडला गेले होते. या त्यांच्या प्रवासाविषयी त्यांनी १८९२-९३ या काळात ‘केसरी’तून वृत्तांतपर टिपणे लिहिली. त्यांनी प्रवासासाठी केलेल्या तयारीपासून प्रवासातले अनुभव, त्यांच्या नजरेने टिपलेले इंग्लंड, त्यांच्या तेथील उद्योगाविषयीच्या हकिगती, असे अनेक विषय हाताळलेले दिसतात. लेखकाची सूक्ष्म, पण विक्षिप्त निरीक्षणशक्ती या प्रवास वर्णनात जागोजागी दिसते.

गोपाळराव जोशींचे हे प्रवासवर्णन वाङ्मयीन इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ‘प्रवासवर्णन’ हा आधुनिक साहित्यप्रकार एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत रुजला. त्यापूर्वीच्या प्राचीन काळापासूनच्या भारतीय कथासाहित्यात प्रवासाच्या अनेक कथा-कहाण्या आहेत. परंतु एक स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून या प्रकारच्या कथनाकडे पाहण्याची दृष्टी मात्र इंग्रजी शिक्षणातून, इंग्रजी साहित्याच्या परिशीलनातून एतद्देशीय लेखकांना एकोणिसाव्या शतकात प्राप्त झाली.

एकोणिसाव्या शतकात अर्वाचीन मराठी साहित्याचा प्रारंभ भाषांतराने झाला. या भाषांतरयुगात इंग्रजीतील प्रवासवर्णनपर पुस्तकांचीही मराठीत भाषांतरे झाली. नंतर काही मंडळींनी भारतीय तीर्थस्थानांच्या यात्रा केल्या, त्याविषयीची प्रवासवर्णने लिहिली. इंग्रज राजवटीत एतद्देशीय लोक वेगवेगळ्या उद्देशाने पाश्चात्त्य देशात प्रवास करू लागले. त्यातील काही आपल्या प्रवासाविषयीचे अनुभव लिहू लागले. पाश्चात्य संस्कृतिसंपर्काचा हा एक पदर होता. भारतीय शिक्षित समाजाने पाश्चात्त्य समाजाकडे कोणत्या दृष्टीने पाहिले, ते आपल्याला या देशी प्रवाशांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांवरून कळते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

गोपाळराव जोशींच्या आधी एतद्देशीय प्रवाशाने विलायतेच्या प्रवासाविषयी लिहिलेली केवळ दोन प्रवासवर्णने मराठीत पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली होती, अशी माहिती वसंत सावंत यांच्या ‘प्रवासवर्णन : एक वाङ्मयप्रकार’ या अभ्यासग्रंथावरून मिळते. त्यापैकी पहिले करसनदास मुळजी यांचे ‘इंग्लंडांतील प्रवास’ हे मूळ गुजरातीवरून भास्कर हरि भागवत यांनी भाषांतरित केलेले प्रवासवर्णन १८६७ साली प्रसिद्ध झाले; तर पंडिता रमाबाई यांचा ‘इंग्लंडचा प्रवास, भाग पहिला’ १८८३मध्ये प्रसिद्ध झाला. ही प्रवासवर्णने कदाचित गोपाळराव जोशींनी वाचली असावीत. गोपाळरावांनी आपल्या प्रवासाची हकिकत लिहिली, तेव्हा या साहित्यप्रकारात मराठीत मोजकेच लेखन झाले होते, एवढे लक्षात ठेवले पाहिजे.

एखादा लेखक त्याला व त्याच्या समाजाला सर्वस्वी अपरिचित अशा अन्य समाजातील प्रवासाविषयी लिहितो, तेव्हा त्या अपरिचित समाजाच्या संस्कृतीविषयीची त्याची निरीक्षणे त्याच्या स्वतःच्या मूल्यदृष्टीने प्रभावित झालेली असतात. गोपाळराव मुळात विक्षिप्त स्वभावाचे, त्याचीही यात भर पडली आहे. डॉ. अनंत देशमुख यांनी आपल्या प्रस्तावनेत गोपाळरावांच्या या प्रवासाची चरित्रात्मक पार्श्वभूमी, गोपाळरावांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची निरीक्षणदृष्टी आणि भाषाशैली याबाबत ऊहापोह केला आहेच.

डॉ. प्रदीप कर्णिक यांनी मराठी संशोधन मंडळाच्या संचालक पदाच्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम पुस्तके धडाक्याने प्रसिद्ध केली. त्यांच्या विचक्षण दृष्टीने अनंत देशमुख संपादित करत असलेले हे पुस्तक टिपले, म्हणून ते मंडळाकडून प्रसिद्ध होऊ शकले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या पुस्तकात विषयांची विविधता आहे. साध्या विषयापासून ते ‘खाद्यसंस्कृती’तील ‘वादग्रस्त’, तसेच ‘त्याज्य’ विषयही आढळतात. लेखांचा ग्राफ साधेसुधे पदार्थ ते अनोखा, विलक्षण असा आहे…

खाद्यपदार्थ हे निव्वळ खाद्यपदार्थ नसतात, त्यांचे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असते, हे बिर्याणी आणि संसार यातून ते स्पष्ट करतात. इब्राहीम अफगाण यांच्यासोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा. त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.......

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......