नास्तिक म्हणजे कोणी अनैतिक, पापी, दुर्जन व्यक्ती, या गैरसमजाला कमी करण्याचा हा प्रयत्न आहे...
ग्रंथनामा - झलक
डावकिनाचा रिच्या
  • पुण्यात झालेल्या आठव्या नास्तिक मेळाव्याचे बोधचिन्ह आणि ‘होय, आम्ही नास्तिक आहोत!’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 27 March 2023
  • ग्रंथनामा झलक नास्तिक मेळावा होय- आम्ही नास्तिक आहोत शहीद भगतसिंग विचारमंच

शहीद भगतसिंग विचारमंच, पुणेतर्फे पुण्यात १९ मार्च २०२३ रोजी ‘आठवा नास्तिक मेळावा’ झाला. या मेळाव्याला यंदा प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी, स्तंभलेखक संग्राम खोपडे यांच्या उपस्थिती लाभली. दोघांचाही भाषणांनी हा मेळावा रंगतदार आणि तर्कनिष्ठ केला. या मेळाव्यात ‘होय, आम्ही नास्तिक आहोत!’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याची ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

व्यक्तीचे नास्तिक्य हे जर त्याच्या विवेकाच्या मार्गाचे फलित असेल, तर मग नास्तिकता ही नक्कीच भूषणाची बाब असली पाहिजे. मात्र, आजही अनेक व्यक्ती समाजामध्ये उघडपणे नास्तिक असल्याचे सांगताना कचरतात. कळपामध्ये एकटे पडण्याची त्यांना भीती वाटते. आपण इतरांपेक्षा वेगळा विचार करतोय, याची त्यांना धास्ती वाटते. समाजामध्ये प्रतिगामी शक्ती प्रबळ होताना दिसत असताना आणि देशभरात असहिष्णुतेचे वातावरण वाढत चाललेले दिसत असताना, त्यांच्या मनावर प्रचंड तणाव येतोय. अशा वेळेस जर समविचारी मित्र लाभले, तर त्यांना दिलासा मिळतो. आपण एकटे नाही आहोत, आपण चुकीचे नाही आहोत, आपल्याप्रमाणेच अनेक लोक देवाधर्माच्या कालबाह्य कल्पनांचा त्याग करून आनंदी आयुष्य जगत आहेत, याचा त्यांना आनंद होतो. ‘नास्तिक मेळावा’ घेण्यामागे हाच हेतू असतो.

‘शहीद भगत सिंग विचारमंचा’मार्फत घेण्यात येणाऱ्या मेळाव्यात आम्ही आस्तिकांपेक्षा खूप शहाणे, असा कोणताही अभिनिवेष नसतो. व्यक्ती नास्तिक असणे म्हणजे ती कोणी अनैतिक, पापी, दुर्जन व्यक्ती असेल, या गैरसमजाला कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. व्यक्ती नास्तिक आहे म्हणजे नक्की काय? या जगावर आणि या जगातला एक घटक म्हणून तिच्यावर कोण्या दैवी शक्तीचे नियंत्रण आहे, आणि ती दैवी शक्ती व्यक्तीच्या आयुष्यात चांगले-वाईट बदल घडवू शकते, हे ती व्यक्ती नाकारते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

व्यक्तीला उपलब्ध सामाजिक संधी आणि त्या संधीचा फायदा करून घेण्याची व्यक्तीची क्षमता, या दोन घटकांमुळे कोणतीही व्यक्ती आयुष्यात घडते किंवा बिघडते. व्यक्तीच्या कर्तृत्वामध्ये कोणताही देव आणि दैव या घटकांचा यत्किंचित संबंध नसतो. म्हणजेच हे नास्तिक्य अपयशाच्या, निराशेच्या पराभवाच्या भावनेपोटी आलेले नसून विवेकाच्या वाटेवर चालताना विचारांच्या घुसळणीतून उजळलेला मार्ग आहे. मानवाच्या प्रगत बुद्धीचे ते फलित आहे.

मानवाचा मेंदू जेव्हा विकसित होऊ लागला आणि त्याला सृष्टी, अंतरीक्ष ऋतुचक्र यांचे कुतूहल निर्माण होऊ लागले, तेव्हा त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले. पृथ्वीवरील आणि अंतरिक्षातील नवलाई पाहून केवळ मानवालाच प्रश्न पडतात बरं का... इतर प्राण्यांना नाही. या साऱ्या नवलाईचा निर्माता कोण असेल, याची कल्पना प्रत्येक संस्कृतीतील मानवाने त्याच्या परीने केली आहे.

जशी ब्रह्म हा निर्माता, विष्णू हा पालनकर्ता आणि शिव हा अंतकर्ता अशी समजूत वैदिकांत निर्माण झाली, तशीच जगातील सर्वच आदिम संस्कृतीमध्ये दिसून येते. प्रत्येक प्राचीन संस्कृतीने विश्वाच्या निर्मितीचे कोडे त्यांच्या त्यांच्या बुद्धीने सोडवायचा प्रयत्न केला आहे. पुढच्या काळात धर्मांचे स्वरूप बदलत गेले, नवीन मिथके जोडली गेली. अब्राहमी तिन्ही धर्म (इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू) यांच्यात विश्व निर्माण होण्याची अलमायटी अल्ला कल्पना एकच आहे. अनेक देवांवरून एक देव असा हा प्रवास झाला आहे, या विश्वाचा किमान एक तरी निर्माता असावा, अशी भाबडी आशा त्यात असावी.

धर्माच्या ठेकेदारांचे एक वाक्य ठरलेले असते ‘विज्ञान जेथे संपते, तेथे अध्यात्म सुरू होते’. मग त्यांची मांडणी अशी- ‘आम्ही म्हणतो सृष्टी देवाने निर्माण केली. तुम्ही म्हणता बिग बँगने.... मग सांगा बिग बँग आधी काय होते?’ त्यांना वाटते आपण समोरच्याला निरुत्तर केले आहे. आता यांचे विज्ञान संपले, आता आपले अध्यात्म यांना पटेलच. बिग बँगच्या आधी काय होते, याचा शोध विज्ञान घेत आहे.

आजवरचे वैज्ञानिक पद्धतीचे यश पाहता त्यामागे आपण जाऊ शकू. पण त्याआधीदेखील काय असेल, हा प्रश्न तेव्हा असेल. जे एंडलेस आहे. मात्र, याच एका कारणासाठी कुणी देव संकल्पना मानायची काही गरज नाही. कारण त्या देवाच्या जन्माआधी काय होते, हा प्रश्न तेव्हा पण राहतोच! जर कोणी निर्मिक असेल, तर तो पण कुणाची तरी निर्मिती असेल ना? हे साधे तत्त्व आहे राव... त्यापेक्षा हे विश्व स्वकार्यकारणभावाने बद्ध आहे. कोणी निर्मिक नाही, असे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे. लवकरच विश्वाच्या निर्मितीचे कोडे सोडवण्यात आपल्याला यश येईल आणि मग कदाचित देव ही संकल्पना बाद होईल.

डब्ल्यू जी ग्रेस यांना इंग्लंडमध्ये ‘क्रिकेटचे पितामह’ म्हटले जाते. इंग्लंडमध्ये क्रिकेट रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची बॅटिंग बघायला गर्दी जमायची. ते खेळायचे पण धमाल. अनेक किस्से मशहूर आहेत त्यांचे. पण त्यांची एक खोड होती. आपण आऊट झालो, हे मान्य करायला ते तयार नसत. एकदा पहिल्या बॉलवर पायचित आऊट दिल्यावर हा भाऊ अंपायरला जाऊन बोलला, “हे जे लोक आले आहेत, ते माझी बॅटिंग पाहायला आले आहेत. तुझी पंचगिरी बघायला नाही.” तर थोडक्यात अंपायर मंडळींवर पण दडपण असायचे, त्याला आऊट देताना चूक व्हायला नको, असे त्यांना वाटायचे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

एकदा हा बॅटिंगला आला. पहिल्या बॉललाच चेंडू याच्या बॅटचे पुसटसे चुंबन घेऊन कीपरच्या हातात... जोरदार अपील. मात्र, याचे हावभाव असे की, कट लागलाच नाही....

अंपायरने नाबाद दिले. दुसऱ्याच बॉलच्या वेळी याचा पाय स्टंपसमोर.... पायचितचे जोरदार अपील. मात्र, याने बॅट दाखवून सूचित केले की, बॅटलादेखील चेंडू लागला होता. अंपायरचा निर्णय अर्थात ‘नाबाद’. बॉलर तर इरेला पेटला... तिसरा बॉल असा टाकला की, याचा ऑफ आणि मिडल स्टंप गुल.... नाराज ग्रेस त्या उडालेल्या स्टंपकडे बघत असताना बॉलर जवळ आला आणि म्हणाला की, दोन स्टंप उडाले आहेत. कदाचित लेग स्टंप जागेवर आहे, हे पाहून तुम्हाला वाटत असेल, तुम्ही आऊट नाही.

देव संकल्पना पण अशीच हड्डी आहे. किती वेळा सपशेल आऊट झाली, तरी भक्त मानायला तयार होत नाहीत राव. याच मानसिकतेतून ‘बुद्धिमान अभिकल्प’ अर्थात ‘इंटेलिजंट डिझाईन’ यांसारख्या संकल्पना पुन्हा पुन्हा डोके वर काढत असतात. मात्र, पालकाच्या आधारावर या संकल्पना पुन्हा त्यांच्यासाठीच्या योग्य जागी, म्हणजेच कचऱ्याच्या पेटीमध्ये जातात.

जसे देव या संकल्पनेचे तसेच धर्म आणि धर्मग्रंथांबाबत आपल्याला म्हणता येईल. बंद घड्याळसुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर आहे असं वाटतं, तसे धर्मग्रंथांचे पण असते. चुकून कधी तरी त्यात समतेचे तत्त्व असल्याचं भासू शकतं, त्याचा दाखला देत ‘आमचा धर्म किती समतेचे तत्व मांडतो’ हे त्या धर्माचे ठेकेदार गर्जून सांगत असतात. अनेकदा त्यांचा प्रतिवाद करायला कोणी सरसावत नाही. बर्ट्रांड रसेल म्हणतो, ‘तरुण पिढीतील फारच थोड्यांना ‘धर्म’ पटत असतो आणि ज्यांना पटत असतो, ते बहुतेक वेळा सामान्य बुद्धिमत्तेचे आणि अत्यंत संभ्रमितच असतात. मात्र ज्यांना धर्म पटत नाही, ते पुढे येऊन बोलायची हिंमत करू शकत नाहीत. चिकिस्ता करायची सोय नसते.”

“स्त्रियांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांना सर्वात मोठा विरोध धर्माचा असतो. जगातील सर्वच समाजात धर्माचा आधार घेऊन खियांचे शोषण होत असते,” असे प्रसिद्ध साहित्यिका तस्लिमा नसरीन म्हणतात. उत्क्रांतीनंतर जगभरात मातृसत्ताक पद्धती असल्याचे सांगण्यात येते, मग असा पूर्णतः उलट बदल कसा झाला? कारण नंतरच्या काळात धर्म निर्माण होत गेले. सर्वच धर्म स्त्रियांना दुय्यम स्थान देणारे आहेत. कारण सर्वच धर्मसंस्थापक पुरुष होते. धर्मग्रंथांची रचना त्यांनी केली आणि स्वतःला सोयीस्कर अशी व्यवस्था तयार केली आहे. धर्मरक्षण करण्यासाठी, खरतर धर्म बंदिस्त करण्यासाठी योनीशुचिता हेच माध्यम निवडले गेले. त्यास अनुसरून स्त्रियांच्या हक्क आणि स्वातंत्र्यावर मर्यादा आणणाऱ्या भाकडकथा रचल्या गेल्या.

“मुक्तपणे बोलणं, मुक्त विचार करणं आणि बंधनमुक्त महिला असणं, या तीन बाबींची धर्माला भीती वाटत असते... तिन्ही बाबी आपण एकत्र आल्या तर तुम्हाला अशी सॉलिड महिला दिसेल, जी बिनधास्त तिचे म्हणणे मांडू शकेल,” असं अयान हिरसी अली सांगते.

युरोप, अमेरिकेमध्ये काहीसं खुलं वातावरण आहे. मात्र, खिया स्वतःच स्वतःला पापपुण्याच्या संकल्पनेत अडकवून घेत आहेत. अशा वेळी अमांडा डोनोही सारखी कलाकार जेव्हा सिनेमामध्ये येशूवर थुंकण्याचा सीन देते, तेव्हा तिच्यावर महिलांकडूनच प्रचंड टीका केली जाते. मात्र, यावर नास्तिक विचारसरणीची अमांडा म्हणते, “हजारो वर्षांपासून स्त्रियांची लैंगिकता ताब्यात ठेवणारे, त्यांचा छळ करणारे पुरुषदेव मी मानत नाही... त्यामुळे येशूवर थुंकायचा सीन शूट करताना मला भीती वाटली नाही... उलट मी त्याचा आनंद घेतला.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अमांडाप्रमाणे कृती करायची गरज नाही, गरज आहे आपल्या धर्मात आपले स्थान शोधण्याची, आपल्याला आपला धर्म किती स्वातंत्र्य देतो हे तपासण्याची. हे खरे आहे की जोवर महिलांमधून एखादी धर्म संस्थापक येत नाही किंवा धर्मग्रंथांचे लेखन एखादी महिला करत नाही, तोवर तिला धर्माधारीत स्वातंत्र्य मिळणार नाही. अशा वेळी तिच्यासाठी एकच पर्याय सर्वोत्तम आहे. धर्म नाकारून, केवळ "माणूस" म्हणून जगणे. ना कोणी धर्मसंस्थापक, ना कोणता धर्मग्रंथ... जातीधर्माच्या भिंती पाडून, वंश आणि लिंगाचे बंधन मोडून, माणूस बनून मोकळेपणाने जगायचे. कोणतेही कर्मकांड करायचे नाही. मुक्त... मस्त... बिनधास्त जगायचे. माणूस म्हणून जगण्यास सुरुवात करायची.

नास्तिक मेळाव्याला येणाऱ्या साथींना “आपणदेखील देव आणि दैव या संकल्पना नाकारता का? आपलाही आपल्या मन, मेंदू आणि मनगट यावर विश्वास आहे? देवा-धर्माचा अहंकार बाळगण्यापेक्षा मानवता हे मूल्य जोपासणे आपणास महत्वाचे वाटते, तर मग आपले नास्तिकत्व बिनधास्त व्यक्त करा”, असे आवाहन करत या विषयावर त्यांचे अनुभव व्यक्त करण्यास सांगितले.

त्याला प्रतिसाद देत काही साथींनी आपले अनुभव, आपली भूमिका, आपले मनोगत मांडले, ज्यांचे संकलन करून आज ही पुस्तिका आपल्या हातात पडते आहे. मला येथे प्रस्तावना करायची संधी मिळाली, यासाठी या पुस्तिकेसाठी मेहनत घेणाऱ्या विवेक आणि मुस्तफा सरांचे आभार. आपण सर्व या विषयावर बिनधास्त बोलत राहू, एकमेकाशी संवाद साधत राहू.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......