‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे सुनील देशमुख : महाराष्ट्रातल्या धडपडणाऱ्या माणसांना ‘एम्पॉवर’ करणारा माणूस
ग्रंथनामा - झलक
कुमार केतकर
  • ‘सावध ऐका पुढल्या हाका’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि सुनील देशमुख
  • Fri , 03 February 2023
  • ग्रंथनामा झलक सुनील देशमुख Sunil Deshmukh सावध ऐका पुढल्या हाका Savadh Yeka Pudhalya Haka महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

१९९४ पासून महाराष्ट्र फाउंडेशनमार्फत मराठी साहित्य आणि महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रितीने राबवणारे सुनील देशमुख यांचे ४ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या काही निवडक लेखांचं ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे पुस्तकं नुकतेच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

..................................................................................................................................................................

सुनील देशमुख कवी नव्हता वा कथा-कादंबरीकार नव्हता, लौकिक अर्थाने तो (प्राध्यापकी) साहित्य-समीक्षकही नव्हता. पण त्याची साहित्याची जाण विलक्षण होती. विशेषतः त्यातील पुरोगामी-प्रतिगामी आशयाची, प्रगतिशील संकल्पनांची आणि सनातनी वृत्ती-विचारांची त्याची साहित्यदृष्टी इतकी तीक्ष्ण होती की, तो त्या साहित्यकृतीचे विश्लेषणच नव्हे, तर त्या लेखक-कवी वा नाटककाराची वैचारिक कुंडली अचूक मांडत असे.

कवितेचाच नव्हे तर त्या कविमनाचाही नेमका वेध तो घेऊ शकत असे. केवळ एखादे पुस्तक गाजले आहे वा गाजावाजा - चर्चेत आले आहे; त्यामुळे तो प्रभावीत होत नसे. तो त्या लोकप्रियतेच्या पलीकडच्या परिघावर नजर ठेवत असे. वृत्तपत्रांतील परीक्षणे तो पाहत असे, पण त्यामुळे तो प्रभावीत होत नसे. एखादा लेखक वा कवी प्रचंड खपाची पुस्तके लिहितो आहे वा तो सभा-संमेलने गाजवणारा सेलिब्रेटी आहे, या बाबी सुनीलच्या दृष्टीकोनातून फारशा महत्त्वाच्या नसत. त्याच्या साहित्याचा बाज समाज परिवर्तनीय आहे की, पारंपरिक व स्थितिशीलतेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करणारा आहे, हे तो बारकाईने पाहत असे. केवळ तो साहित्यिक वा समीक्षक दलित वा ओबीसी वा आदिवासी आहे, म्हणजे तो आपसूकपणे ‘पुरोगामी’च असेल अशी ‘अंधश्रद्धा’ तो बाळगत नसे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सनातनी वा संघप्रवृत्तीच्या विचारांना गोंजारणारे दलित वा ‘पुरोगामी’ लेखक त्याने पाहिले होते. त्यांचे राजकारणही तो निरखत असे. संघ-भाजप व मोदी विचारांशी सत्तेसाठी वा पद-प्रतिष्ठेसाठी जुळवून घेणारे साहित्यिक तो ओळखून होता. कदाचित त्याच्या या अस्सल बुद्धीवादी आणि नि:पक्षपाती, परखड आणि विचक्षक जाणतेपणामुळे प्रस्थापित-प्रथितयश सेलेब्रिटी वर्तुळांमध्ये तो दिसत नसे. त्याने काही मोजक्या व विश्वासू मित्रांशी सल्लामसलत करून स्वतःची विजेत्यांची यादी तयार ठेवलेली असे. पण ती तो इतरांवर लादत नसे. आग्रह अर्थातच असे, पण त्याचे मन खुले असे.

त्याची विचारसरणी वैज्ञानिक, वृत्ती उदारमतवादी, स्वभाव दिलखुलास आणि बिनधास्तसुद्धा; दृष्टीकोन पुरोगामी, पाय वर्तमानात पण डोळे भविष्याकडे, कृतिशीलता आजची पण परिणाम दूरगामी ठरणारी, कुटुंबवत्सलता असूनही कौटुंबिक थोंबाळणेपणा नाही, बायको-मुलांची काळजी आणि त्यांच्यावर नितांत प्रेम पण त्याचे अवाजवी प्रदर्शन नाही, घरी पाळलेल्या कुत्र्यांवर तेवढाच जीव मित्रमैत्रिणींवर!

असा हा माणूस पन्नासहून अधिक वर्षे अमेरिकेत राहून जेवढा महाराष्ट्राला न विसरणारा, भारतीय असूनही ग्लोबल! आणि वैश्विकसुद्धा!

खरे म्हणजे, ही सुनीलच्या व्यक्तिमत्त्वाची लक्षणे मला १९६९-७०च्या आसपास तशी जाणवली नव्हती. लक्षातही आली नव्हती. आमची पहिली भेट त्या वेळची. मला नक्की आठवत नाही, मी कुणामुळे व कुणाबरोबर त्याच्या वर्तुळात आलो. दादरला पोर्तुगीज चर्चजवळ एका फ्लॅटमध्ये चर्चा-गप्पांचे सत्र होते. सगळे जण पंचवीस-तिशीतले. उत्साही आणि काहीतरी केले पाहिजे, अशी उमेद आणि रग अंगात असणारे! साने गुरुजींनी ‘धडपडणारी मुले’ लिहिले, तेव्हा त्यांना १९३०-४०च्या दशकात अशीच मुले भेटलेली असणार. तो काळ वेगळा, परिसर वेगळा, माणसे वेगळी, समाज वेगळा!

आम्ही स्वातंत्र्यानंतर वा त्या सुमारास जन्माला आलेलो. साने गुरुजींची ‘धडपडणारी मुले’ स्वातंत्र्य चळवळ सुरू असतानाची. ही तुलना आहे फक्त ती उमेद, उत्साह, जिज्ञासा आणि जिद्दीची - बाकी संदर्भ अर्थातच वेगळे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सुनील कायम अशा धडपडणाऱ्या मुलांच्या, मुलींच्या, माणसांच्या, संस्थांच्या, चळवळींच्या, कलाकार- साहित्यिकांच्या शोधात असे. त्यांना अधिक (आणि लढाऊसुद्धा) कृतिशील करणे, हल्लीच्या भाषेत त्यांना ‘एम्पॉवर’ करणे, हे त्याला त्याचे कर्तव्य वाटत असे.

तसे पाहिले तर सुनीलने आदिवासी चळवळीत वा कामगार चळवळीत वा दलित चळवळीत प्रत्यक्ष सक्रिय भाग घेतला नसला, तरी त्या, तसेच अंधश्रद्धाविरोधी चळवळ आणि पर्यावरणविषयक जागृती आंदोलन, यालाही त्याचे सक्रिय (आर्थिक) प्रोत्साहन असे. त्याचे विशेष प्रयत्न स्त्री-पुरुष समानता, स्त्री-मुक्ती चळवळ, त्यांची प्रकाशने आणि संघटना यांसाठी असत. अशा सर्व स्त्री (व स्त्रीवादी) संघटनांना सुनील एक मोठा आधार होता.

सुनील स्वत: विचार व वृत्तीने कट्टर नास्तिक होता. फक्त भारतातल्या नव्हे तर जगातील अनेक नास्तिकवादी संस्थांशी त्याचा संपर्क होता. नास्तिकवादावरचे परिसंवाद व चर्चासत्रेही तो आयोजित करत असे. त्याच्या अंधश्रद्धाविरोधी विचाराला नास्तिकवादाचे परिमाण होते, तसेच विज्ञानवादाचे. अनेक विज्ञानप्रसार, लोकविज्ञान व इहवादी विचार मांडणाऱ्या व प्रचारणाऱ्या व्यक्तींबरोबर व संस्थांबरोबर तो प्रबोधनाचे काम करत असे.

या सर्व वैचारिक व सक्रिय चळवळींमुळे त्याचा संबंध वैज्ञानिकांशी आणि सामाजिक विचारवंतांशी, पत्रकारांशी आणि अॅकॅडमिक वर्तुळाशी कायमचा असे. अशी अनेक वर्तुळे तो एखाद्या बहुआयामी माणसाप्रमाणे (अगदी रिंगमास्टरप्रमाणेसुद्धा) सहज पेलत असे.

एका वेगळ्या अर्थाने सुनीलचा नैतिक व वैचारिक दबदबा (दरारा!!) या सर्व वर्तुळातील माणसांनी अनुभवला आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे काटेकोर वेळापत्रकानुसार आणि व्यवस्थित आयोजन करण्याबाबत तो आग्रही असे. (कदाचित त्यामुळेच त्याचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व विनोद शिरसाठ यांच्याशी समीकरण जुळत असे.)

वर म्हटल्याप्रमाणे साहित्यिक वा मान्यवर समीक्षक नसूनही तो उत्तम समीक्षक होता, तसेच प्रत्यक्ष आदिवासींबरोबर जंगलांमध्ये व कामगारांबरोबर कामगार वस्तीत वा दलितांबरोबर कुठल्या सिद्धार्थनगर वा बीडीडी चाळीत नसतानाही त्याला त्या सर्व चळवळींची, समस्यांची आणि संबंधित व्यक्तींची इत्यंभूत माहिती (आणि अंतर्ज्ञानही) असे.

काही लोकांचा (त्याला न भेटलेल्या अर्थातच) असा समज होता (वा आहे) की, सुनील अशा विचारविश्वात व चळवळीअभिमुख वातावरणात वावरत असल्यामुळे तसा बराचसा ‘रूक्ष’ होता. पण त्याला प्रत्यक्ष ओळखणाऱ्या व त्याच्या सोबत काम करणाऱ्या (असंख्य) लोकांना त्याची स्नेहभावना, जिव्हाळा, जबाबदारीची भावना जाणवत असे. ज्यांनी सुनीलला त्याच्या कुत्र्यांबरोबर खेळताना पाहिले आहे, त्यांना त्याच्या त्या आगळ्या प्रेमाचीही ओळख आहे. एकदा त्याचा एक कुत्रा आजारी होता. मी त्यांच्या स्टॅमफोर्डच्या घरी होतो. त्या कुत्र्याची सेवा करताना व चौकशी (आणि शुश्रूषा) करताना त्याच्या मनाच्या हळवेपणाची जाणीव मला झाली होती.

जरी अमेरिकेत राहून महाराष्ट्रावर सर्वंकष लक्ष सुनील ठेवत असला, तरी अमेरिकेतील राजकारण, कृष्णवर्णीयांच्या चळवळी, समतावादी आंदोलन यांतही त्याचा तेवढाच उत्साह, रस आणि सहभाग असे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी गेल्या तीस वर्षांत साधारणपणे वीस वेळा अमेरिकेला गेलो आहे आणि माझी एकही अमेरिका व्हिजिट त्याच्याबरोबर दोन-तीन दिवस काढल्याशिवाय गेलेली नाही. त्या काळातही तो त्याला सुचलेले ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे नवे प्रोजेक्ट्स, नव्या संकल्पना, त्याला ‘सापडलेले’ नवे कार्यकर्ते, नवे लेखक यांबद्दल चर्चा वा चौकशा करत असे.

इतक्या दूर, इतकी वर्षे राहूनही त्याला महाराष्ट्रातील व्यक्ती (आणि वल्ली), वाद-विवाद, गोंधळ, भानगडी यांबद्दल सर्व माहिती नेमकेपणाने असे. (कित्येकदा मलाच महाराष्ट्रातल्या काही बाबी त्याच्याकडून कळत मी संपादक असूनही!) इतकेच नव्हे तर, इकडे परत आलो असतानाही तो मला तिकडून इकडे घडणाऱ्या घटनांबद्दल ‘अॅलर्ट’ करत असे. (त्याला नेटवर इथल्यापेक्षा अगोदर वृत्तपत्रे मिळत असत.)

अमेरिकेत माजी उपाध्यक्ष अल गोर यांच्यापासून ते राजीव गांधींचे सल्लागार ख्यातनाम सॅम पित्रोदा यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ, प्रसिद्ध, नामवंत मंडळी त्याच्या वर्तुळात होती - पण त्याचा त्याने कधी ‘शो ऑफ’ किंवा ‘नेम ड्रॉपिंग’चा वापर केला नाही. अमेरिकेतील कित्येक अनिवासी भारतीय उर्फ एनआरआय ज्याप्रमाणे आपण परग्रहावरील विशेष कुणी आहोत, असा आविर्भाव आणतात, तसा तर त्याने कधीही आणला नाही.

आपण मुख्यतः स्टॉक मार्केटच्या माध्यमातून बरेच कोटी रुपये मिळवले, ते आपल्या व्यक्तिगत कर्तबगारीतून आलेले नाहीत, तर लाखो अदृश्य कामगार-कर्मचाऱ्यांच्या श्रमातून जी संपत्ती निर्माण होते, त्यातून ते आले आहेत आणि म्हणून ते अशा लोकांच्या चळवळींसाठी त्यांना ‘एम्पॉवर’ करण्यासाठी गेले पाहिजेत, ही त्याची भूमिका होती, म्हणून त्याने त्याचा विनियोग त्यासाठी केला.

‘महाराष्ट्र फाउंडेशन’ ही संस्था अमेरिकेतील मराठी लोकांनी स्थापन केलेली होती. ती कार्यरतही होती. त्या सर्वांशी सुनीलचे सौहार्दाचे संबंध होते. त्या माध्यमातून व स्वतंत्रपणे सुनीलचे मराठी मित्रमंडळही प्रचंड होते. दिलीप व शोभा चित्रे, शिरीष गुप्ते, राजन गडकरी, अशोक व शैला विद्वांस, रामानंद व शकून पानसे, विक्रम राजाध्यक्ष, जीवा जगताप, श्री. व श्रीमती हेरेकर, अनिल व मीना नेरूरकर अशी ती प्रचंड मोठी मांदियाळी आहे - जशी महाराष्ट्रातही आहे.

महाराष्ट्रात ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’मधली अनेक मंडळी, षांताराम पवार, मोहन देशमुख, १९६५पासून त्याच्या संपर्कात असलेले क्रांती शहा, ज्येष्ठ कॉर्पोरेट कायदातज्ज्ञ नितीन पोतदार, जगदीश गाडगीळ कुटुंबीय मोठीच्या मोठी यादी होईल. ‘साधना’ परिवार तर त्याच्या सामाजिक कुटुंबाचाच भाग होता. हा सर्व वैचारिक - सामाजिक - सांस्कृतिक परिवार मागे ठेवून तो आता चिरंतनात विलीन झाला आहे.

‘सावध ऐका पुढल्या हाका’ – सुनील देशमुख

साधना प्रकाशन, पुणे | मूल्य – ७५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......