‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ : तुमच्या हाती दिली जात आहेत, ती सवंग गाणी नाहीत, ही आहे एक हेलावत्या हृदयातील आरोही!
ग्रंथनामा - झलक
मेधा पाटकर 
  • ‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 06 January 2023
  • ग्रंथनामा झलक अस्वस्थ क्षणांच्या नोंदी Aswastha Kshananchya Nondi हेरंब कुलकर्णी Heramb kulkarni मेधा पाटकर Medha Patkar

शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा ‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ हा सामाजिक कवितांचा कवितासंग्रह नुकताच पुस्तक मार्केट प्रकाशनाच्या वतीने  प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…  

............................................................................................................................................

प्रिय वाचकहो, 

तुमच्या हाती दिली जात आहेत, ती सवंग गाणी नाहीत... नाही केवळ समीक्षक टिपण्णी, ही आहे एक हेलावत्या हृदयातील आरोही! आपल्याच अवतीभोवती देशभरातल्या दडलेल्या की, गाडलेल्या वस्तीत घडणाऱ्या घटना, सारेच पाहत असताना, कधी मन भरून येते, कधी आक्रोशाने सुन्न होते. मात्र या घडामोडींच्या बातम्यांना वर्तमानपत्रांत मिळालेला अवकाशही रद्दी बनून नजरेआड होतो. खबर एक बखर बनते. इतिहासातील अत्याचार, अन्याय भोगणाऱ्या लेकरांचे गिरणगावातील श्रमिकांचे, बेड्यावरच्या लेकुरवाळ्या पारधीबाईचे काय झाले? याची दखल न घेता काळ पुढे सरकतो. अशा वास्तवाची नोंदच नव्हे तर पोलखोल करणारे साहित्य मात्र भविष्याशी इतिहासाला जोडत राहते. वाचकांना हाती घेता देत राहते आठवण, करत राहते आवाहन परिवर्तनाचे!

अनेक वर्षांपासून मी अनुभवते आहे हेरंब कुलकर्णींच्या मनातला दर्द! त्यांची एकेका घडामोडीवरची कविता ही मनावर पडलेली छायाच नव्हे, तर त्यांची आभाळमायाही प्रकटत असते. एक शिक्षक बालकांच्या भवितव्याबाबत सतत चिंतीत हेरंबभाऊ प्रबोधक बनले आहेत. हेच त्यांच्या कवितेतील गर्द शब्दांकनातून कळू शकते. त्यांची भ्रमंती दारिद्र्याच्या शोधायात्रेतून सुरू झाली. नंतर जी फार पुढे जाऊन, खोलात उतरून आता शोध घेत निघाली आहे, लोकशाहीवरील आक्रमणाच्या, देशातील जन जनांना भोगाव्या लागणाऱ्या विषमतेचा! हेरंबभाऊंचा अभ्यास हा त्यांच्या काव्याचा पाया आहेच, पण त्यांची संवेदना ही त्याचा गाभा आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आज संवाद झाले आहेत अधिकतर भ्रामक. त्यातून काय पुढे येईल, ते सत्य असेल का, हे कोणी सांगू शकेल का! अशा परिस्थितीत युवांच्या हातीच काय, बुद्धीतही whatsapp असते, whats down नसते. म्हणूनच तर हेरंबभाऊंच्या या कवितांचे मोल आहे. एक एक घटनेला धरून त्यांनी उघडीनागडी विषमता ही कोट्यवधी जनतेला नागवते. बेघर बेरोजगार करते आणि नेतागिरीही त्यावरच पोसली जाते. हे आपल्या नेमक्या शब्दसंभारातून पुढे आणले आहे. ही सामाजिकच नव्हे, तर मानवीय बांधीलकी  वाचकांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत आहे! 

‘इंडिया’ आणि ‘भारत’ यामधील अंतर जेव्हा बीभत्स स्वरूपात आकडेवारीने अनेक अर्थाशास्त्रीही आपल्यासमोर मांडत आहेत. तेव्हाच त्यामध्ये भिंतीत उभे चिरडून टाकावे, तसे बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर, सारे कष्टकरी कसे विन्धले जात आहेत, हे समजणे गरजेचे नाही का? त्यांच्यावर आलेल्या वंचना, शोषण व व्यवस्थेनेच घडवलेल्या आत्महत्या नव्हे, हत्यांबाबत आपले मन द्रवते का? त्यांच्या वाहत्या अश्रूंमध्ये आपणास संविधानही वाहून जाताना दिसते का? 

महिलांवर, अल्पसंख्याकांवर जात्यंधतेची विविध रूपे भोगणाऱ्या दलितांवर आजही चोरीच्या फासात अडकवल्या जाणाऱ्या फासेपारध्यांवर शेकडो किलोमीटर पायी फोड घेऊन चालण्यास मजबूर अशा प्रवाशी मजुरांवर जे काही हिंसक हल्ले होत आहेत, त्यांच्या मुलाशी असलेली राजकीय असंवेदना जाणवते का? विस्थापितांनी प्रस्थापितांना आव्हान देऊन हक्क मागितला तर त्यांच्यावरच उलटणाऱ्या, त्यांना जायबंदी करू पाहणाऱ्या हुकूमशहांसमोर हिंमतीने आपण लिहितो का? बोलतो तरी का? या प्रश्नांची उत्तरे द्यायला भाग पाडणाऱ्या या कविता, केवळ आविष्कार नव्हेत, आव्हान देत आहेत. आपल्या वेदना संवेदनेला!!! ‘रस्त्यावर सैतान फिरताना मित्रांनो आपण सारे कुठे होतो? हा प्रश्न निश्चितच घेरणारा आहे, प्रत्येकाच्या निष्क्रियतेला!

आज अभिव्यक्तीवर ‘हल्लाबोल’ होतो आहे. माध्यमांची खरेदी-विक्री सुरूच आहे! राजकीय सत्ता अमृतमहोत्सवी ‘आझादी’वर तुटून पडत आहे. अशा काळात, अशा वातावरणात राजकारण्यांवर प्रश्नांच्या फैरी हिंमतीने डागणारे हेरंबभाऊ शिंदेसाहेबांपासून राहुल गांधींपर्यंत, सगळ्यांना सभ्य शब्दांतून दाखवून देत आहेत गरज राजनीतीत परिवर्तनाची!

लोकशाही त्यांच्या काव्यातून बोलते आहे. कर्जमाफीसाठी लढणाऱ्या बळीराजाचा हमीभाव न मिळाल्याने जाणारा बळी उद्योगपतींच्या अब्जावधी लुटीपुढे आक्रोशतो आहे. दिवाळीच्या दिवशीही रोजीरोटीची झालेली होळी करोडोंना अंधारात ठेवते, हे भयाण वास्तव या कविता मोजकेपणेच मापते आहे! 

नर्मदा ते मणिपूरच्या आंदोलनकारी संघर्षाने हृदय द्रवणारे असे कवीसुद्धा ‘आंदोलनजीवी’च मानायला हवेत. हेरंबभाऊ कवितांच्या पलीकडे करोनाग्रस्त विधवांपासून आजही हल्ले भोगणाऱ्या हुतात्मा गांधींपर्यंत, सर्वांची लेखनाद्वारे साथ देत आहेत. अनेक सामाजिक कार्य व कार्यकर्त्यांची जगाला लेखनाद्वारा ओळख करून देणारे हेरंब कुलकर्णी स्वत:चीही बिरादारी, विचारांची मांदियाळी आपणासमोर मांडत आहेत. 

वाचकहो, त्यांनी उघडून ठेवलेली ही कवितेची विराणी केवळ सोबत घेऊन समीक्षा नको, आपल्याला मिळावी दीक्षा व शिक्षा. या साऱ्या मानववादी मानवधर्मी कवितांमधून – सक्रिय होऊन कलमच नव्हे, तन‘man’ उभारण्याची!

हीच तर आहे आव्हानात्मक अपेक्षा, आपणा सर्वांकडून हेरंब कुलकर्णींची व माझीही...

‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ - हेरंब कुलकर्णी 

पुस्तक मार्केट प्रकाशन 

पाने – ७२ | मूल्य - १२५ रुपये.    

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......