अजूनकाही
प्राचीन विदर्भाच्या इतिहासात वाकाटकांचा काळ हा सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल, असा हा कालखंड आहे. त्याविषयीचं ‘वाकाटककालीन विदर्भ : प्राचीन विदर्भाच्या इतिहासातील सुवर्णकाळ’ हे डॉ. मिनल खेरडे (गिते) यांचं पुस्तक नुकतंच डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखिकेनं लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
प्राचीन भारताच्या ऐतिहासिक कालखंडाचा विचार केल्यास उत्तरेत इसवी सन पूर्व ३००च्या दरम्यान चंद्रगुप्त मौर्याने प्रथमत: केंद्रशासित राज्यव्यवस्था निर्माण केली. सम्राट अशोकाच्या सोपारा स्तंभलेखावरून दक्षिणेत मौर्य साम्राज्याच्या सीमा म्हैसूरपर्यंत विस्तारलेल्या असल्याचे स्पष्ट होते. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर धर्म प्रचारार्थ पाठवलेल्या स्ववीरांच्या नोंदी पाचव्या व तेराव्या शिलासनात आहेत. त्यात असलेले भोज, पेतनिक, रठिक, अपरांत इत्यादी उल्लेख; दक्षिण पंथाशी संबंधीत आहेत. त्यातील भोज राज्य म्हणजे ‘विदर्भ’ होय. अर्थात इसवी सन पूर्व तिसर्या शतकात विदर्भ हा मौर्य अधिपत्त्याखाली असावा, असे दिसते. पवनीस्तूप व सम्राट अशोकाचा देवटेक शिलालेख, याची साक्ष देतात.
मौर्यांच्या पतनानंतर शुंगाचे अधिपत्त्याखाली विदर्भ गेला असावा. कारण पुष्यमित्रशुंग, शुगांनभर गादीवर आलेला त्याचा मुलगा अग्निमित्र याने अवंती केंद्र करून विदर्भावर स्वारी करून विदर्भ जिंकून माधवसेन व यज्ञसेन या राजस्पर्धांमध्ये वाटून दिला, असा उल्लेख कालिदासने ‘मालविकाग्निमित्र’मध्ये केला आहे. वरदा (वर्धा) नदीमुळे विदर्भाचे दोन भाग झाले, असाही उल्लेख येतो. परंतु शुंग शासनानंतर विदर्भात शुककुशान या परकीय सत्तांनी काही काळ पाय रोवला होता, असे रूपीअम्मनच्या पवनी स्तंभलेखावरून कळते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
दक्षिणेत सातवाहन सत्तेची राजधानी पैठण नावारूपाला आली. सातवाहन राजांनी विदर्भावरही राज्य प्रस्थापित केले. शक क्षत्रपांच्या परकीय आक्रमणांना पायाबंद घालून संपूर्ण महाराष्ट्रावर सातवाहनांनी साधारणत: इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० असे ४०० वर्षे राज्य केले.
प्राचीन विदर्भाच्या इतिहासात वाकाटकांचा काळ हा सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल, असा हा कालखंड आहे. ‘वाकाटक’ घराण्याचा शासनकाळ साधारणत: इसवी सन २५० ते ५५० मानला जातो. या तीनशे वर्षांच्या काळात विदर्भाला वाकाटकांनी समृद्धी आणली. वाकाटक राजे पराक्रमी व ऐश्वर्यसंपन्न होते. तसेच ते प्रजाहितदक्ष, धर्मसहिष्णू, कला व स्थापत्याचे भोक्ते होते. हा कालखंड; राजकीयदृष्ट्या समृद्ध व आपला ठसा उमटवणारा कालखंड होता. विदर्भाला वाकाटक घराण्याच्या विविध राजांनी वैभव प्राप्त करून दिले. वाकाटकांच्या प्रबळ सत्तेने उत्तर आणि दक्षिण भारतावरही प्रभाव टाकला.
या पुस्तकाच्या लिखाणाचा हेतू हा की, काही वर्षांपूर्वी मी वाकाटक राजघराण्याविषयी संशोधनपर लेख लिहिले. वाचकांना ते फार आवडले, तर काहींनी या संशोधनाचे पुस्तक का करत नाही, असे विचारले. पण मला माझ्या इतर जबाबदार्यांमुळे पुस्तकाचे काम करता आले नाही, पण आता हे पुस्तक प्रकाशित होण्याचा योग आला आहे. वाकाटकांनी विदर्भात ‘सुवर्णयुग’ निर्माण केले, परंतु त्यांच्याबद्दल अतिशय त्रोटक माहिती असल्याने हे पुस्तक निश्चितच संशोधक/अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल.
वाकाटक काळाचा परिचय तसा सर्वांनाच आहे; पण त्यावर इतके मोठे संशोधन करण्याजोगे दस्तऐवज मिळतील, हे अनपेक्षितच होते. यासाठी अतिशय दुर्लक्षित असे दस्तऐवज वाचण्याचा योग आला. आता या संशोधनाचा उपयोग संशोधकांना व वाचकांना व्हावा, हा मानस आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या पुस्तकात वाकाटकांविषयीच्या बहुतेक दानपत्रातील श्लोकांचे मराठी भाषांतर दिले आहे. त्यामुळे वाचकांना एकंदर विवेचन समजण्यास अडचण येणार नाही, अशी आशा आहे. जिज्ञासू वाचकांस परीक्षणांची सत्यासत्यता स्वत: पडताळून पहाता यावी, म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत.
या पुस्तकाची निर्मिती करत असताना अनेक ग्रंथांचा व लेखांचा मी उपयोग केला. त्यात डॉ. वा. वी. मिराशी, डॉ. अजय मित्र शास्त्री, डॉ. एम. के. ढवळीकर, डॉ. रा. श्री. मोरवंचीकर, डॉ. चंद्रशेखर गुप्ता यांच्या ग्रंथ व लेखांचा प्रामुख्याने समावेश होतो. या सर्वांची मी ऋणी आहे.
अशा या प्राचीन भारतीय इतिहासातील या काहीशा दुर्लक्षित परंतु महत्वाच्या कालखंडाची ओळख करून देणारे हे पुस्तक जिज्ञासू वाचकांबरोबर इतिहास अभ्यासकही अवश्य पसंत करतील असा विश्वास वाटतो.
‘वाकाटककालीन विदर्भ : प्राचीन विदर्भाच्या इतिहासातील सुवर्णकाळ’ – डॉ. मिनल खेरडे (गिते)
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
मूल्य – ३५० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/products/vakatakkalin-vidarbh
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment