‘हाऊ टू एन्जॉय युवर लाइफ अ‍ॅण्ड युवर जॉब’ : व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वितेची गुरूकिल्ली
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अनिल कुलकर्णी
  • ‘हाऊ टू एन्जॉय युवर लाइफ अ‍ॅण्ड युवर जॉब’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 16 September 2022
  • ग्रंथनामा शिफारस हाऊ टू एन्जॉय युवर लाइफ अ‍ॅण्ड युवर जॉब How To Enjoy Your Life And Your Job Book डेल कार्नेगी Dale Carnegie

डेल कार्नेगी हे लोकप्रिय अमेरिकन लेखक व व्याख्याते. त्यांनी आत्मविकास, विक्री कौशल्य, कॉर्पोरेट प्रशिक्षण, वक्तृत्व कला आणि संभाषण कला हे अभ्यासक्रम विकसित केले. आणि या विषयावर पुस्तकंही लिहिली. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा जगभरातल्या अनेक भाषांत अनुवाद झाला आहे आणि त्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाली, होत आहे. ‘आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर लेखकां’मध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला जातो तो त्यामुळेच.

मराठीतही त्यांच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ‘हाऊ टू एन्जॉय युवर लाइफ अ‍ॅण्ड युवर जॉब’ या पुस्तकाचा प्रा.आराधना कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. मानवी वर्तनाचा अभ्यास करून अनेक उपयुक्त व वैश्विक निष्कर्षाप्रत येणं, हे त्यांच्या पुस्तकांचं वैशिष्ट्य आहे. आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील परिपूर्णतेचा आनंद मिळवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. आपल्या कामात\व्यवसायात संतुष्ट कसं राहावं, स्वतःची बलस्थानं कशी वृद्धिंगत करावीत, कंटाळा व नैराश्यावर कशी मात करावी, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल कसा साधावा, या बाबतीत हे पुस्तक मार्गदर्शन करतं. थोडक्यात, हे पुस्तक व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वितेची गुरूकिल्ली आहे.

अर्थात केवळ पुस्तकं वाचून आयुष्य सुधारतंच असं नाही, मात्र काही पुस्तकं वाचून आपल्याला दिशा नक्की मिळू शकते. जीवनातल्या असंख्य प्रश्नांवर, छोट्या-मोठ्या अडी-अडचणींवर काही पद्धती वापरून आयुष्य कसं समृद्ध करता येतं, हे डेल कार्नगी यांनी उदाहरणांसह स्पष्ट केलं आहे. स्वत:च्या व इतरांच्या अनुभवांवरून आपण जीवनविषयक एक विचार मांडतो आणि तो अनुभव सर्वांचाच असेल तर एका निश्चित निष्कर्षाप्रत येतो. एखाद्या व्यक्तीचा विचार जेव्हा वैश्विक होतो, तेव्हा तत्त्वज्ञानाचा जन्म होतो. डेल कार्नेगी यांनी निरीक्षणांतून व अनुभवांतून मांडलेलं जीवनविषयक तत्त्वज्ञान सर्वांनाच आपलंसं वाटतं. कारण ते त्यांच्या अनुभवांतून आणि अभ्यासातून आलेलं आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

डेल कार्नगी यांनी सभोवतालच्या परिस्थितीतून काढलेले निष्कर्ष आपल्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात आणि त्यातून प्रेरणा कशी मिळवायची याचे धडे देतात. ते म्हणतात, ‘मित्र मिळवा आणि लोकांना प्रभावित करा’. लोकांना तुम्ही आवडावं म्हणून काय करावं, हे सांगताना निष्क्रियतेतून भीती व शंका निर्माण होतात. कृतिशीलता आत्मविश्वास व धैर्य वाढवते. जर तुम्हाला भीतीवर विजय मिळवायचा असेल, तर घरात बसून राहू नका, बाहेर पडा आणि स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवा.

व्यवहार कसा असावा, हे सांगताना ते म्हणतात, हे लक्षात ठेवा की, तुमचा आनंद तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय मिळवलं, यावर अवलंबून नसतो, तो फक्त तुमच्या विचारावर अवलंबून असतो. थकवा व चिंतेला दूर ठेवण्यासाठी ते म्हणतात, आपल्या थकव्याचं कारण काम नसून त्यातून निर्माण होणाऱ्या चिंता, नैराश्य व उद्वेग असतं. आनंद न घेणारे लोक क्वचित यशस्वी होतात. त्यामुळे कंटाळा हद्दपार करायला हवा.

हवं ते मिळवणं म्हणजे यश, पण मिळालेलं हवंसं वाटणं म्हणजे आनंद. स्वतःचा शोध घ्या आणि स्व:स्वरूपात राहा, असेही सांगतात. टीकेचा विचार न करता चांगलं काम करत रहा, तसंच आनंद देण्यातून आनंद घेणं हेच कलाविष्काराचं सार आहे. जे नाही त्याचं दुःख न करता, जे आहे त्यात आनंद मानायला शिका.

डेल कार्नगी यांच्या या आणि अशा अनेक विचारांतून केवळ उपदेश नाही, तर जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. पुस्तकं व माणसं वाचण्यानं आणि त्यांच्यातल्या गोष्टी आत्मसात करण्यानं माणसं बदलतात, बदलली आहेत. संस्कार ही माणसं, पुस्तकं व निरीक्षण यातून झिरपणारी गोष्ट आहे. ‘श्यामची आई’ या पुस्तकानं एका पिढीवर निश्चित संस्कार केला आहे. तरुण पिढीसमोर अशी चांगली पुस्तकं जर आली, तर निश्चित वर्तन बदल होऊ शकतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जीवन जगण्याचं काही निश्चित असं सूत्र नसतं. योग्य रस्ता सापडला तर भरकटणं टळतं आणि वेळेत ध्येय गाठता येतं. योग्य रस्ता सापडण्यासाठी मोठ्यांच्या अनुभवाचे बोल, चांगली पुस्तकं आवश्यक असतात. त्यापैकीच हे एक पुस्तक. आयुष्य म्हणजे नक्की काय, हे जसं व्याख्येत सांगता येत नाही, तसंच आयुष्य आनंदी कसं जगायचं, हेही व्यक्तीसापेक्ष असतं. तरीही काहीतरी मार्गदर्शनासाठी आवश्यक असतं. फक्त नियम किंवा संकल्पना यांच्या जोरावर आयुष्य जगता येत नाही.

डेल कार्नेगी यांच्या विचारातील सुलभता आणि स्पष्टता अनेक वर्षांपासून जगभरच्या कितीतरी वाचकांना मार्गदर्शक ठरत आली आहे. मानवी वर्तनाचं अचूक आकलन त्यांना असल्यानं त्यांच्या लेखनातून सम्यक निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळतं. आपल्यातील उपजत क्षमतांचा विकास करून त्यांचा परिपूर्ण उपयोग कसा करावा, याविषयी ते नेटकेपणाने सांगतात… मग ते विक्री कौशल्य असो वा संप्रेषण असो वा विपणन असो की सुख-समाधान असो.

प्रा.आराधना कुलकर्णी यांनी अनुवाद इतका सहज आणि ओघवता केला आहे की, जणू डेल कार्नेगीच आपल्याशी संवाद साधत आहेत, असं वाटतं.

‘हाऊ टू एन्जॉय युवर लाईफ अँड युवर जॉब’ - डेल कार्नेगी

अनुवाद - प्रा.आराधना कुलकर्णी

साकेत प्रकाशन, औरंगाबाद

पाने - १८२

मूल्य - २०० रुपये.

.................................................................................................................................................................

अनिल कुलकर्णी

anilkulkarni666@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......