प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेल्या या कविता असल्याने त्यात कल्पनेपेक्षा वास्तवाचे चित्रण अधिक टोकदार रीतीने आले आहे
ग्रंथनामा - झलक
हेरंब कुलकर्णी
  • ‘शिक्षणाच्या कविता’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Wed , 24 August 2022
  • ग्रंथनामा झलक शिक्षणाच्या कविता Shikshanachya Kavita उमेश घेवरीकर Umesh Ghevrikar हेरंब कुलकर्णी Heramb Kulkarni

‘शिक्षणाच्या कविता’ हा उमेश घेवरीकर यांचा कवितासंग्रह नुकताच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

कोणत्याही विषयावर चर्चा व्हायची असेल, त्यातील प्रश्न सुटायचे असतील, तर त्या विषयाचे साहित्य निर्माण व्हावे लागते; अन्यथा ते प्रश्न, त्यातील भावभावना फक्त त्या क्षेत्राशी संबंधित लोकांभोवतीच फिरत राहतात, समाजातील विचारी लोकांपर्यंत किंवा निर्णय प्रक्रियेतील लोकांपर्यंत ते पोचत नाहीत. दलित साहित्य हे त्याचे सर्वांत प्रभावी उदाहरण आहे. ते निर्माण झाल्यानंतर दलितांच्या प्रत्यक्ष संघर्षाला बळ मिळाले. विचारी वर्गात दलितांच्या प्रश्नाबद्दल जागृती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत निर्माण झालेल्या साहित्यामुळे त्या संवेदना विचारी वर्गापर्यंत पोचल्या व सरकारला निर्णय घेणे भाग पडले.

शिक्षणक्षेत्राबद्दलही असेच आहे. मागील पिढीतील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर लेखन केले, पण आता हे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. जुन्या पिढीच्या शिक्षकांनी आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या. तो त्या पिढीचा इतिहास ठरला. त्यातून त्या पिढीची बांधीलकी अधोरेखित होऊन आजच्या पिढीपर्यंत संक्रमित झाली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

परदेशातील शिक्षकांनी लिहिलेली पुस्तके आज मराठीतील सर्वांत लोकप्रिय साहित्य ठरले आहे. ‘तोत्तोचान’, ‘नीलची शाळा’, ‘टीचर’, ‘टू सर विथ लव्ह’, ‘सडबरी स्कूल’ अशी कितीतरी पुस्तके सांगता येतील. ती कुणी तज्ज्ञांनी लिहिलेली नाहीत, तर प्रत्यक्ष शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांनी त्यांचे अनुभव संकलित केले आहेत आणि त्या आधारे ही पुस्तके लिहिली आहेत. त्यातील अनेक पुस्तकांवर चित्रपट निघाले. त्यातून शिक्षणाचे चित्र समाजापर्यंत नेमकेपणाने पोचण्यास मदत झाली.

महाराष्ट्रात मात्र अलीकडच्या काळात शिक्षकांनी निर्माण केलेले साहित्य तुलनेने खूप कमी झाले आहे. शिक्षकांकडून कथा, कादंबऱ्या लिहिल्या जात असताना कविता मात्र तुटक-तुटकपणे लिहिल्या जात आहेत. शिक्षक असणारे कवी त्यांच्या कवितेतील एखादी कविता शिक्षणावरही लिहितात.

या पार्श्वभूमीवर शिक्षक असलेले उमेश घेवरीकर यांनी फक्त शिक्षणाविषयी ३६ कविता लिहिल्या आहेत. हे खूप महत्त्वाचे काम झाले आहे. यातून शिक्षकांच्या मनाच्या स्पंदनांचा, विद्यार्थ्यांच्या मनातील भावकल्लोळाचा व शिक्षणप्रक्रियेतील जिवंतपणा प्रत्यय वाचकांना येत राहतो. शिक्षणावर कविता येत राहतात, याचे एक कारण घुसमट हेही असते.

प्रत्यक्ष काम करताना आपण या यंत्रातील एक स्क्रू असतो, हे नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येते. त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व खुरटले जाते व संपूर्ण व्यवस्थेत आपण नगण्य आहोत, ही भावना आत्मसन्मानाला धक्का मारते. मनाला लागणाऱ्या टोचणीतून शिक्षकाची चिडचिड व्हायला लागते. त्यातून उमेशसारखा एखादा शिक्षक शब्दांचे रूप देऊन आपली अस्वस्थता मांडत राहतो आणि वास्तव आपल्यासमोर उलगडतो. म्हणून या कविता शिक्षक-प्रक्रियेचा आरसा आहेत. प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेल्या या कविता असल्याने त्यात कल्पनेपेक्षा वास्तवाचे चित्रण अधिक टोकदार रीतीने आले आहे.

घेवरीकर यांच्या कवितेचा पट विस्तृत आहे. शिक्षणविषयक समज-गैरसमज, शाळेतील व शालाबाह्य मुलांचे भावविश्व, महापुरुषांचे विचार व आजचे वास्तव, गळती झालेली, कष्टकरी झालेली मुले भेटल्यावर होणारी घुसमट, शासकीय योजना व त्यांची तपासणी, बाहेरच्या जगाचे वास्तव व शाळेच्या आतले सुरक्षित जग, झाड आणि शाळा यातील समानता, आपली सारी बडबड निरर्थक वाटणारी हताशा, प्रत्यक्ष वर्गातील विविधांगी अनुभव, शिक्षकांचे पसायदान, शिक्षकांच्या जगण्यातील कृतार्थता, सुंदर क्षण अशा विविध रचना या कवितांमध्ये आहेत.

त्याचबरोबर कवितेची शैली कवितेच्या आशयानुसार बदलत जाते. आजच्या फुगलेल्या निकालासंदर्भात कवी लिहितो-

‘असा निकाल निकाल

नेटवर पसरला

गुणवत्तेचा महापूर

ब्रेकिंग बनून बरसला’

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींनी आता लिहिते व्हायला हवे. नवीन नोकरीला लागलेले शिक्षक मला ‘आम्ही काय करावे?’ असे विचारतात, तेव्हा मी त्यांना ‘डायरी लिहा’ असे सांगतो. रोज मनात  येणारी स्पंदने, येणारे अनुभव, अधिकारी वर्गाकडून होणारी उपेक्षा, पालकांची उदासीनता व त्यांचा जीवनसंघर्ष, हे सारे लिहून काढणे आणि वेळ  येईल तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा बाज आहे, त्याप्रमाणे वैचारिक किंवा ललित लेखनातून ते उतरवणे, असे करायला हवे.

शिक्षणक्षेत्रातील आज लिहिलेले साहित्य हा उद्याचा इतिहास म्हणून वाचला जाणार आहे व शिक्षणतज्ज्ञांना, मानसोपचारतज्ज्ञांना प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रियेचे चित्रण समजून घ्यायला व उपाययोजना सुचवायला नक्कीच मदत होणार आहे.

त्या अर्थाने या कविता स्वागत कराव्यात; अशाच आहेत. शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींनी त्या वाचायलाच हव्यात; पण शिक्षण क्षेत्राबाहेरील व्यक्तींनीही आपल्या बालपणाचे चित्रण पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी या कवितांच्या मांडवाखालून जायला हवे.

शिक्षक समुदायाला आत्मसन्मानाची, कृतार्थतेची भावना अनुभवायला देत, त्यांच्याच अनुभवाला शब्दरूप देत आहे, असे  वाटताना या कविता अंतर्मुखही करतात. कवी साने गुरुजींना उद्देशून लिहितो-

‘या धडपडणाऱ्या मुलांना  सावरणारे, घडवणारे

तुमच्या विचारांचे मातृहृदयी, सेवाभावी, हाडाचे शिक्षक

नेमक्या कितव्या वेतन आयोगानंतर

लाभणार आहेत या निरागस लेकरांना?

प्लिssज  सांगा ना गुरुजी...’ 

‘शिक्षणाच्या कविता’ - उमेश घेवरीकर

ग्रंथाली, मुंबई

मूल्य - ८० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......