प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेल्या या कविता असल्याने त्यात कल्पनेपेक्षा वास्तवाचे चित्रण अधिक टोकदार रीतीने आले आहे
ग्रंथनामा - झलक
हेरंब कुलकर्णी
  • ‘शिक्षणाच्या कविता’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Wed , 24 August 2022
  • ग्रंथनामा झलक शिक्षणाच्या कविता Shikshanachya Kavita उमेश घेवरीकर Umesh Ghevrikar हेरंब कुलकर्णी Heramb Kulkarni

‘शिक्षणाच्या कविता’ हा उमेश घेवरीकर यांचा कवितासंग्रह नुकताच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

कोणत्याही विषयावर चर्चा व्हायची असेल, त्यातील प्रश्न सुटायचे असतील, तर त्या विषयाचे साहित्य निर्माण व्हावे लागते; अन्यथा ते प्रश्न, त्यातील भावभावना फक्त त्या क्षेत्राशी संबंधित लोकांभोवतीच फिरत राहतात, समाजातील विचारी लोकांपर्यंत किंवा निर्णय प्रक्रियेतील लोकांपर्यंत ते पोचत नाहीत. दलित साहित्य हे त्याचे सर्वांत प्रभावी उदाहरण आहे. ते निर्माण झाल्यानंतर दलितांच्या प्रत्यक्ष संघर्षाला बळ मिळाले. विचारी वर्गात दलितांच्या प्रश्नाबद्दल जागृती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत निर्माण झालेल्या साहित्यामुळे त्या संवेदना विचारी वर्गापर्यंत पोचल्या व सरकारला निर्णय घेणे भाग पडले.

शिक्षणक्षेत्राबद्दलही असेच आहे. मागील पिढीतील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर लेखन केले, पण आता हे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. जुन्या पिढीच्या शिक्षकांनी आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या. तो त्या पिढीचा इतिहास ठरला. त्यातून त्या पिढीची बांधीलकी अधोरेखित होऊन आजच्या पिढीपर्यंत संक्रमित झाली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

परदेशातील शिक्षकांनी लिहिलेली पुस्तके आज मराठीतील सर्वांत लोकप्रिय साहित्य ठरले आहे. ‘तोत्तोचान’, ‘नीलची शाळा’, ‘टीचर’, ‘टू सर विथ लव्ह’, ‘सडबरी स्कूल’ अशी कितीतरी पुस्तके सांगता येतील. ती कुणी तज्ज्ञांनी लिहिलेली नाहीत, तर प्रत्यक्ष शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांनी त्यांचे अनुभव संकलित केले आहेत आणि त्या आधारे ही पुस्तके लिहिली आहेत. त्यातील अनेक पुस्तकांवर चित्रपट निघाले. त्यातून शिक्षणाचे चित्र समाजापर्यंत नेमकेपणाने पोचण्यास मदत झाली.

महाराष्ट्रात मात्र अलीकडच्या काळात शिक्षकांनी निर्माण केलेले साहित्य तुलनेने खूप कमी झाले आहे. शिक्षकांकडून कथा, कादंबऱ्या लिहिल्या जात असताना कविता मात्र तुटक-तुटकपणे लिहिल्या जात आहेत. शिक्षक असणारे कवी त्यांच्या कवितेतील एखादी कविता शिक्षणावरही लिहितात.

या पार्श्वभूमीवर शिक्षक असलेले उमेश घेवरीकर यांनी फक्त शिक्षणाविषयी ३६ कविता लिहिल्या आहेत. हे खूप महत्त्वाचे काम झाले आहे. यातून शिक्षकांच्या मनाच्या स्पंदनांचा, विद्यार्थ्यांच्या मनातील भावकल्लोळाचा व शिक्षणप्रक्रियेतील जिवंतपणा प्रत्यय वाचकांना येत राहतो. शिक्षणावर कविता येत राहतात, याचे एक कारण घुसमट हेही असते.

प्रत्यक्ष काम करताना आपण या यंत्रातील एक स्क्रू असतो, हे नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येते. त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व खुरटले जाते व संपूर्ण व्यवस्थेत आपण नगण्य आहोत, ही भावना आत्मसन्मानाला धक्का मारते. मनाला लागणाऱ्या टोचणीतून शिक्षकाची चिडचिड व्हायला लागते. त्यातून उमेशसारखा एखादा शिक्षक शब्दांचे रूप देऊन आपली अस्वस्थता मांडत राहतो आणि वास्तव आपल्यासमोर उलगडतो. म्हणून या कविता शिक्षक-प्रक्रियेचा आरसा आहेत. प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेल्या या कविता असल्याने त्यात कल्पनेपेक्षा वास्तवाचे चित्रण अधिक टोकदार रीतीने आले आहे.

घेवरीकर यांच्या कवितेचा पट विस्तृत आहे. शिक्षणविषयक समज-गैरसमज, शाळेतील व शालाबाह्य मुलांचे भावविश्व, महापुरुषांचे विचार व आजचे वास्तव, गळती झालेली, कष्टकरी झालेली मुले भेटल्यावर होणारी घुसमट, शासकीय योजना व त्यांची तपासणी, बाहेरच्या जगाचे वास्तव व शाळेच्या आतले सुरक्षित जग, झाड आणि शाळा यातील समानता, आपली सारी बडबड निरर्थक वाटणारी हताशा, प्रत्यक्ष वर्गातील विविधांगी अनुभव, शिक्षकांचे पसायदान, शिक्षकांच्या जगण्यातील कृतार्थता, सुंदर क्षण अशा विविध रचना या कवितांमध्ये आहेत.

त्याचबरोबर कवितेची शैली कवितेच्या आशयानुसार बदलत जाते. आजच्या फुगलेल्या निकालासंदर्भात कवी लिहितो-

‘असा निकाल निकाल

नेटवर पसरला

गुणवत्तेचा महापूर

ब्रेकिंग बनून बरसला’

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींनी आता लिहिते व्हायला हवे. नवीन नोकरीला लागलेले शिक्षक मला ‘आम्ही काय करावे?’ असे विचारतात, तेव्हा मी त्यांना ‘डायरी लिहा’ असे सांगतो. रोज मनात  येणारी स्पंदने, येणारे अनुभव, अधिकारी वर्गाकडून होणारी उपेक्षा, पालकांची उदासीनता व त्यांचा जीवनसंघर्ष, हे सारे लिहून काढणे आणि वेळ  येईल तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा बाज आहे, त्याप्रमाणे वैचारिक किंवा ललित लेखनातून ते उतरवणे, असे करायला हवे.

शिक्षणक्षेत्रातील आज लिहिलेले साहित्य हा उद्याचा इतिहास म्हणून वाचला जाणार आहे व शिक्षणतज्ज्ञांना, मानसोपचारतज्ज्ञांना प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रियेचे चित्रण समजून घ्यायला व उपाययोजना सुचवायला नक्कीच मदत होणार आहे.

त्या अर्थाने या कविता स्वागत कराव्यात; अशाच आहेत. शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींनी त्या वाचायलाच हव्यात; पण शिक्षण क्षेत्राबाहेरील व्यक्तींनीही आपल्या बालपणाचे चित्रण पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी या कवितांच्या मांडवाखालून जायला हवे.

शिक्षक समुदायाला आत्मसन्मानाची, कृतार्थतेची भावना अनुभवायला देत, त्यांच्याच अनुभवाला शब्दरूप देत आहे, असे  वाटताना या कविता अंतर्मुखही करतात. कवी साने गुरुजींना उद्देशून लिहितो-

‘या धडपडणाऱ्या मुलांना  सावरणारे, घडवणारे

तुमच्या विचारांचे मातृहृदयी, सेवाभावी, हाडाचे शिक्षक

नेमक्या कितव्या वेतन आयोगानंतर

लाभणार आहेत या निरागस लेकरांना?

प्लिssज  सांगा ना गुरुजी...’ 

‘शिक्षणाच्या कविता’ - उमेश घेवरीकर

ग्रंथाली, मुंबई

मूल्य - ८० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......