‘शिक्षणकोंडी’ : ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाला वाचा फोडणारं आणि सामाजिक भान देणारं पुस्तक
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
ज्ञानेश्वर जाधवर
  • ‘शिक्षणकोंडी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 13 June 2022
  • ग्रंथनामा शिफारस शिक्षणकोंडी Shikshan Kondi ऊसतोड मजूर Ustod Majur ज्ञानेश्वर जाधवर Dnyaneshwar Jadhavar

स्थलांतरित मुलांना शिक्षणहक्क मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांची ‘शिक्षणकोंडी’ ही डायरी नुकतीच वाचली. यात अनेक कार्यकर्त्यांची रोजनिशी आहे, तर काही विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत. त्यांचं संकलन-संपादन परेश जयश्री मनोहर आणि संतोष शेंडकर यांनी केलं आहे.      

“आकाश आणि महादेव शाळा सोडून मंगल कार्यालयात वाढपी म्हणून कामाला जात असल्याची बातमी लागली. आज त्यांना कोपीवर गाठायचं ठरवून गेलो आणि दोघे सापडले. ‘काल शाळेत का नै आला?’ असं लेखकानं विचारलं, तर आकाश आणि महादेव म्हणाले, ‘पाहुण्यांकडे गेल्तो बारामतीला’. त्यावर लेखकानं परत विचारलं, “पाहुण्यांकडे गेलात, की लग्नात वाढायला गेलात? सांगा कुठल्या कार्यालयात गेल्ता’. असं लेखकानं जोरात विचारलं, तेव्हा त्यांनी एकमेकाकडं बघायला सुरू केलं.”

‘सुसंवादाची दमदाटी’ या प्रसंगापासून सुरुवात होते. मुलांना शाळेत जाता येत नाही, त्याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे कंत्राटदार त्यांच्या सोयीसाठी मुलांना वाटेल ते काम लावतात. ते कधीच मुलांच्या शाळेचा किंवा त्यांच्या आरोग्याचा विचार करत नाहीत. अशा कंत्राटदारांना समजावून सांगताना ‘आशा’ प्रकल्प चालवणाऱ्यांची पंचाईत होते, पण त्यांना कायद्याच्या भाषेत सांगितलं, तर त्यांच्यात बदल होतो. हेच या अनुभवातून लक्षात येतं. पण प्रत्येक ठिकाणीच असं करणं शक्य होत नाही, म्हणून याबाबत शासनानं धोरणं ठरवली पाहिजेत. 

काही ऊसतोड मजुरांचे आयुष्य डोळ्यानं पाहिल्यामुळे असं लक्षात आलं की, जे गेल्या तीन पिढ्यांपासून ऊसतोडणीचं व वाहतुकीचं काम करतात, त्यांच्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. उलट ते व्यसनाच्या आहारी जाऊन दु:खी व कष्टी आयुष्य जगत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या मुलांचीही वाताहत झाली आहे. परिणामी एका कष्टकरी समूहाच्या पिढ्या बरबाद होत आहेत. ज्यांनी धाडसानं हे काम सोडून देऊन पर्यायी मार्ग स्वीकारला आणि त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होताना दिसत आहे. हे कटू वास्तव ‘शिक्षणकोंडी’ हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्यासमोर येतं.

मजुरांचं वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य व अपघात विमा, निवासाची सुविधा, कौशल्य विकास, मुलांचं शिक्षण व प्रसूती रजा यासाठी शासनानं ठोस काम करायला पाहिजे. त्या संदर्भात काही ठोस तरतुदी करणं आवश्यक आहे. जेणेकरून ऊसतोड मजूर कुटुंबांना फायदा होईल. 

‘सुसंवादाची दमदाटी’, ‘घुमतोय अंगात भिलारबाबा’, ‘रेश्माचं दप्तर’, ‘आगळा वेगळा प्रवेशोत्सव’, ‘तळावरच झालं आशाचं बारसं’, ‘कोयता’, ‘आणि चहा करपला’, ‘अर्धा कोयता’, ‘ती वाढं बांधायला जाते’, ‘आग लावा त्या कोयत्याला’, ‘कोंबड्या गेल्या फडात’, ‘राधिकाची पाळी’, ‘सावधान! हार्वेस्टर येतोय’, ‘या महिलांना गर्भाशय का नाही?’, ‘गुरुजींच्या दोन बाजू’, ‘बळी’, ‘फडातल्या वेणा’, ‘शिक्षणप्रेमी मुकादम’, ‘नशिबाची गाडी’, आणि ‘मॅडम, मोठं काम करताय’, अशा ४० वास्तव प्रसंगाचं कथास्वरूपातील एकत्रीकरण करून हे पुस्तक आकाराला आलं आहे. यातील  प्रसंग ऊसतोड मजुरांचं जगणं, त्यांच्या मुलांचं शिक्षण आणि आरोग्य या संदर्भात बोलतात. लिहिणाऱ्यांची तळमळ प्रत्येक पानावर दिसून येते. हे पुस्तक वाचल्यावर असं वाटतं की, असं जगणं कोणाच्याच वाट्याला येऊ नये.

समाजातील कष्टकरी कुटुंबांना अस्थिर ठेवून या घटकांची कुचंबणा शासन आणि कारखान्यांकडून होत आहे. कारण यांच्या वतीनं प्रश्न उभे करणाऱ्यांची संख्य़ा कमी आहे. किंबहुना नाहीच. हे प्रश्न नक्कीच सोडवता येऊ शकतात, मात्र त्यासाठी तयारी दाखवली जात नाही. त्यामुळे या प्रश्नांचा गांभीर्यानं अभ्यास झालेला नाही. परिणामी ऊसतोड मजूर सुधारणेपासून वंचित राहिला आहे. गेल्या ७० वर्षांत कारखान्यांच्या इतर सर्व घटकांचा विचार केला, पण फक्त मजुरांचा विचार केला गेलेला नाही, हे वास्तव आहे.

साखर कारखान्याच्या उद्योगात तीन स्तरावर वेगवेगळे मजूर काम करतात. एक ऊस पिकवण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतात, दुसरे कारखाना चालवण्यासाठी आणि तिसरं हे ऊसतोड करून वाहतूक करणारे. पहिल्या दोन मजुरांची सोय त्यांचे त्यांचे मालक करतात. पण ऊसतोड मजूर हा ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचाही नाही आणि कारखान्याच्या मालकांचाही नाही. म्हणून त्यांचा ‘चेंडू’ केला जातो. मध्यस्थी करणाऱ्या मुकादमांना तर फक्त त्यांच्या कमिशनशी देणंघेणं असतं, पण त्यांचीही काही ठिकाणी फसवणूक होते. मुकादम हा कारखाना व्यवस्थापन आणि मजूर यांच्यामधील दुवा आहे. त्यामुळे काही मुकादमांकडून मजुरांचंही शोषण होतं.

कारखान्यांकडूनही या मजुरांना पुरेशी मदत दिली जात नाही. वाहतुकीसाठी टायर, कोपीसाठी चटाया आणि बांबू दिले जातात. पिण्याच्या पाण्याची आणि लाईटची व्यवस्था काही कारखाने करतात, तर काही नाही. तरीही असंख्य़ अडचणीला तोंड देत महाराष्ट्रात जवळपास १२ ते १५ लाख ऊसतोड मजूर राबत आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातून पाच-सहा लाख मजूर दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातमध्ये ऊस तोडायला जातात.

पश्चिम महाराष्ट्राची स्थिती बरी आहे. कारण या पट्ट्यात पाऊस भरपूर पडतो आणि जमीनही सुपीक आहे. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या भागात शेती मोठ्या प्रमाणात पिकते. त्यात विविध पिकांची लागवड केली जाते. त्यात काम करण्यासाठी मराठवाड्यातून मजूर येतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

महाराष्ट्रातील बीड, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर व सोलापूर जिल्हातील काही तालुके दुष्काळी आहेत. या भागात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इथं शेती पिकत नाही. परिणामी लोकांना पुरेसा रोजगार मिळत नाही. पर्यायी काही काम शोधावं, तर तेही मिळत नाही. त्यामुळे या भागातील अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी आणि भूमिहीन मजूर ऊसतोड करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात.

१९७०-८०मध्ये ऊसतोड मजुरांचं प्रमाण कमी होतं. कारण कारखानेही कमी होते. पण ज्या वेळी कारखान्यांची संख्या वाढत गेली, तशी मजुरांची संख्याही वाढली. मग उत्तर महाराष्ट्र व विदर्भातीलही मजुरांची संख्या वाढली. सध्या हे मजूर कर्नाटकातही ऊस तोडण्यासाठी जातात.

या मजुरांच्या गावसोडण्यापासून ते गावाकडे परत येईपर्यंत असंख्य अडचणी आहेत. त्यात प्रामुख्यानं आरोग्य आणि मुलांचं शिक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ऊसतोड मजुरांना फक्त असंघटित किंवा वंचित घटकातील मजूर म्हणून बघू नये. त्यांना आर्थिकदृष्ट्या गरीब, शोषित असंही पाहून जमणार नाही. लिंग, जात, धर्म, मानवता, वर्ग आणि समाजमूल्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या कसोट्यांमधून पाहून, त्यांचं विश्लेषण करून, विकासाच्या नजरेतून या कष्टकरी वर्गांच्या श्रम आणि मूल्यांकडे पाहावं लागेल. या वर्गाचं खरं स्वरूप खूप जटिल आहे. आणि त्याची खरी मेख सामाजिक रचनेत आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये दडलेली आहे.

मजुरांना सहन कराव्या लागणाऱ्या यातना, त्यांची दडपलेली मानसिकता, त्यांचा दबलेला आवाज, हे त्यांच्या समूहात जाऊन समजावून घेणं गरजेचं आहे. या मजुरांना काही कौशल्यं दिली आणि त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, तर नक्कीच बदल होऊ शकतो.

या पुस्तकानं ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. त्यामुळे हे पुस्तक सामाजिक भान देणारं आहे.

‘शिक्षणकोंडी’ - संकलन-संपादन : परेश जयश्री मनोहर व संतोष शेंडकर

रोहन प्रकाशन, पुणे

पाने - १०८

मूल्य - १२५ रुपये

.................................................................................................................................................................

लेखक ज्ञानेश्वर जाधवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात पीएचडी स्कॉलर आहेत.

j.dnyan@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......