‘कविता ह्या हिणवलेल्या’ : काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या गिरणगावाचे उरले-सुरले अवशेष मांडणारी अस्सल कविता        
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नानासाहेब गव्हाणे
  • ‘कविता ह्या हिणवलेल्या’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 28 February 2022
  • ग्रंथनामा शिफारस कविता ह्या हिणवलेल्या Kavita ya Hinavlelya अविनाश उषा वसंत Avinash Usha Vasant

‘पटेली’ या बहुचर्चित कादंबरीचे लेखक अविनाश उषा वसंत यांचा ‘कविता ह्या हिणवलेल्या’ हा कवितासंग्रह साहित्यविश्वात दाखल होतो आहे. प्रस्तुत संग्रहाच्या शीर्षकापासूनच ही वेगळी कविता असली पाहिजे, असे वाटते. आणि कविता वाचल्यानंतर ते खरेही ठरते. कवी स्वतःच्या कवितांना हिणकस ठरवल्या गेल्याचा एक पुरावाच कवितासंग्रहाच्या शीर्षकातून देतो आहे.

मलपृष्ठावर कवीने स्वत:चा पत्ता गिरणगाव, मुंबई असा दिलेला आहे. त्याचे वास्तव्य गिरणगावात असल्याचा हा आणखी एक धागा कविता वाचण्यासाठी वाचकाला उद्युक्त करतो. कारण, गिरणगाव म्हटले की, मराठी कवितेत सर्वप्रथम आठवतात ते नारायण सुर्वे! मुंबई या मायावी नगरीतले कष्टकरी, कामगार वर्गाचे हलाखीतले जगणे सुर्वे यांनी मराठी कवितेत प्रभावीपणे चित्रित केले. त्यांच्यानंतर नामदेव ढसाळ यांच्या कवितेनेही मुंबईतील विविध स्तरांतील माणसांच्या जगण्याचा उभा-आडवा छेद अत्यंत सूक्ष्मपणे आणि वेधकरित्या घेतला आहे. असो.

तर मुंबईच्या गिरणगावात वास्तव्य करणाऱ्या या तरुण कवीच्या कविता जेव्हा आपण वाचायला लागतो, तेव्हा साहजिकच मनात कुतूहल निर्माण होते. मुखपृष्ठावरील गिरणीचे चित्र, पोस्टाचे तिकीट, त्यावर असलेला नायगाव पोस्ट ऑफिसचा शिक्का या सगळ्या गोष्टी आपल्याला या कवितेला असलेली पार्श्वभूमी अधोरेखित करताना दिसतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या कविता चार भागांत विभागलेल्या आहेत. पहिला भाग ‘दिवसाची उठचळ’, दुसरा भाग ‘गिरणगावातून मुंबईतली उठबस’, तिसरा भाग ‘कोयना एक्स्प्रेस’ ही एक स्वतंत्र दीर्घकविता, तर चौथा भाग ‘उत्तररात्रीचं किडुक मिडुक’... अशा एकंदर ४६ कविता आपल्याला भेटतात. कवितेचे पीक भरघोस असण्याच्या काळात गिरणगावातला एक तरुण आपली जगण्याच्या असोशीतून आलेली निरीक्षणे प्रामाणिकपणे मांडतो आहे, हे चित्र निश्चितच सुखद आहे.

या कवितेला विचारांची डूब आहे. कवितेतून व्यक्त होत असताना कवी भाषेचे कसलेही अवडंबर माजवताना दिसत नाही. जे पोटातून आले आहे, तेच ओठांवर आहे, या भूमिकेतून झरणारी सहज, ओघवत्या बोलीभाषेतली ही कविता मुंबई आणि गिरणगावातल्या बोलीभाषेचा सहज उत्कट आविष्कार करताना कुठेच ढळत नाही.

‘सम्यक’ ही पहिलीच कविता कवीची दिशा आणि भूमिका स्पष्ट करते. सध्याच्या जात आणि धर्माच्या विखारी प्रचाराच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असताना कवीला अशा माणसाला भेटायचं आहे, जो कसलाही भेद करणार नाही, ज्याला तुच्छता माहिती नसेल, ज्याला कसलीच नाती नसतील. या कवितेतून कवी वर्तमानातील सम्यकतेच्या गरजेला आवाहन करू पाहतो आहे.

समकालाचे नेमके भान कवीला आहे. ते प्रकट करताना तो म्हणतो, ‘ठरवतात हे लोक माणसाचं चरित्र एक दोन शब्दांत.’ सद्यस्थितीत माणसाला लगेचच तात्काळ निकालात काढण्याची वृत्ती बळावते आहे. त्याला ‘प्रतिगामी’ किंवा ‘पुरोगामी’ अशा गटात विभागले जात आहे. म्हणूनच कवी आठवण करून देतो की, आपला जो पूर्वज होता त्याला कसलेही चरित्र नव्हते. माणसानेच सारे भेद, गट-तट आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेले आहेत. शेवटी कवी असा आशावाद प्रकट करतो की, ‘चरित्र असल ना मानवाचेय मानवतावादी!’

कविता अस्वस्थतेतून निर्माण होते. समाजात जगत असताना मानवी जगण्याला भेडसावणारे प्रश्न, जाणवणारे ताण-तणाव, उपस्थित केले जाणारे सवाल कवी आपल्या कवितेतून अधोरेखित करत असतो. कवीच्या शब्दांना चिंतनाचे अस्तर लाभल्यामुळे कविता समाजाभिमुख होत असते. या संग्रहातल्या कवितेत या शक्यता ठळकपणे जाणवतात.

‘आई’ या कवितेतून कवी गिरणगावातील प्रत्येकाची आई आपल्या डोळ्यांसमोर उभी करत असतानाच समष्टीचे प्रखर भानदेखील अधोरेखित करतो. ‘धारवाला’ या कवितेतून धार लावणाऱ्या व्यक्तीचे चित्र रेखाटत हिंदू-मुस्लीम दंगलीचे संदर्भ नोंदवताना ‘ठिणग्या उडतात पत्तर का चलता चकार धार लागते पण कुणीच धारधार व्हवू नये धार लगतालगता जिंदगी का पत्तर व्हतो काला’ असे सूचक विधान करून दंगल ही कुणाच्याच हिताची नसते, हे परखड सत्य  प्रत्येकाला निक्षून सांगण्याचा प्रयत्न करतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कवीचे निरीक्षण सूक्ष्म आणि तरल आहे. समाजमाध्यमांवरील त्याने टिपलेली छायाचित्रे, विविध घटना-प्रसंग, घडामोडींना दिलेली प्रतिक्रिया याची साक्ष देतात. ‘रि-डेव्हलपमेंट’ या कवितेतून गिरणागावाचे रि-डेव्हलपमेंटच्या गोंडस नावाखाली होणारे वस्त्रहरण कवी

‘तुझ्याच फुकटच्या पाण्यावर जगणारे ते बांडगुळ कधी कळणार बे

गणपतीच्या स्टेजसाठी खो - खो कबड्डीचे मैदान तू विकलेस कवडीमोलात

आता तू ‘इको टाइम्स’ वाचतो ना’

अशा ओळींतून गडद करतो.

तर ‘कविता ह्या हिणवलेल्या’ शीर्षक कवितेत कवी आपल्या कवितांचा प्रवास उलगडतो. आपल्या कविता या रात्री जागर करणाऱ्या, धोक्याचे सूचन करणाऱ्या, आणि कुणीही वाली नसलेल्या असल्यानेच त्यांचा हा हिणवलेला पसारा सहजासहजी कुणाच्याच पचनी पडला नाही, प्रकाशकांची हेटाळणी कवी आणि कवितेच्या वाट्याला आली.

‘पावसाळा’ या कवितेत अब्दुलचाचा हे प्रातिनिधिक पात्र उभे करत बदाबदा कोसळणारा पाऊस आणि खवीस पावसाळा सगळ्यांसाठीच चांगला नसतो, कारण, ‘घरात घुसणारा पाऊस करतो घरघुशी,

उचलतो माणसं,

पन्हाळ्याच पाणी तिथं नेहमी बाद बाद पडत,

पावसाची सर थांबत नाय,

कोणी भेटत नाय सर,

कण्या खाऊन कणा उभारतो

कोळंबी करून केळ विकतो पथारीवर

बाद बाद पावसात’

ही भीषण परिस्थिती सर्वसामान्य माणसाला हतबल करते. तशाही परिस्थितीत प्रत्येक प्रसंगाशी दोन हात करण्याचे बळ एकवटून झगडणारा हा अब्दुलचाचा कवितेतून आपल्याला भेटतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘मुंबई १’ आणि ‘मुंबई २’ या दोन कविता एकप्रकारे मुंबानगरीचे आत्मचरित्रच आहेत आणि त्याचबरोबर ‘अंतर्बाह्य करतोय स्पर्धाच स्वत:च्या शरीरातल्या पेशींशी’ असे म्हणत या मायावी नगरीशी एकरूप आणि तादात्म्य पावल्याची ग्वाही कवी आपल्याला देतो. ‘एक कोटच घर’ या कवितेतून कवी स्वप्नाची राखरांगोळीच मांडतो, कारण स्वप्नांचा पाठलाग करण्यातच आयुष्य कधी शेवटाकडे येते, हेच कळत नाही. ‘सर्वसामान्यांच्या जगण्यातली अभाववग्रस्तता’ या कवितेतून ‘स्वप्न हे स्वप्नच असते एक कोट घराचे साबणपाण्यातले बुडबुडे फोडतात शहरातले वॉचमन त्याच पोट त्यावर’ हे वास्तव प्रकट करतो.

प्रस्तुत संग्रहातील कविता, तिची भाषा वाचकाला गुंतवून ठेवते, कारण ही कविता अनुभवांशी प्रामाणिक तर आहेच, पण ती तितकीच सहज आणि सोपी आहे. ती कुठेही बोजड वाटत नाही. या कविता वाचत असताना नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, प्रकाश जाधव यांच्या कवितांची आठवण होते. कुठलाही आव न आणता, कसलाही पवित्रा न घेता ही कविता सरळपणे वाचकाला भिडते. शीर्षक ‘कविता ह्या हिणववलेल्या’ असे असले तरी प्रत्यक्षात या कवितांमध्ये यत्किंचितही हिणकसपणा जाणवत नाही. उलट काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या गिरणगावाचे उरले-सुरले अवशेष मांडणारी ही अस्सल कविता आहे.

..................................................................................................................................................................

लेखक नानासाहेब गव्हाणे साहित्याचे अभ्यासक आहेत.

gavhanenanasahebcritics@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......