नेहरूंनी कोरियाचे नाव घेत महागाईबाबत हात झटकले, हा अपप्रचाराचाच नमुना...
पडघम - देशकारण
रवि आमले
  • माजी पंतप्रधान पं. नेहरू आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Tue , 08 February 2022
  • पडघम देशकारण पं. नेहरू Nehru काँग्रेस Congress नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

शब्दांशब्दांत तिरस्कार, सूर हेटाळणीचा, समोरच्याला चिडवण्याचा… मोदी संसदेत बोलत होते महागाईवर आणि टीका करत होते नेहरूंवर, की - नेहरूंनी… लालकिल्ल्यावरून… भाषण केले… म्हणाले कोरियातील लढाईसुद्धा आम्हांला प्रभावित करते. तिच्यामुळे वस्तूंचे भाव वाढतात. आणि हे आमच्या नियंत्रणाच्याही बाहेर जातात… देश के सामने देश का पहला प्रधानमंत्री हात उपर कर देता हैं.

तर हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी. ते त्यांच्या नेहमीच्या शैलीत नेहरूंवर टीका करत होते. त्यांचे म्हणणे असे की, ‘वैश्विक परिस्थिती की दुहाई देकर पल्ला झाड लेते थे’ हे काँग्रेसवाले, हे नेहरू.

परंतु यात मोदी चुकीचे काही सांगत होते का? ते अनेकदा तथ्यांची मोडतोड करतात. खोटा इतिहास रेटून सांगतात. त्यांचे हे रेटणे मात्र फारच प्रामाणिक असते. याचे कारण त्यांचा त्यावर मनःपूर्वक विश्वास असतो. विन्स्टन चर्चिल यांचा १८९७ सालातला एक वक्तृत्वकलेविषयीचा एक निबंध आहे. त्याचे शीर्षक - ‘स्कॅफोल्डिंग ऑफ ऱ्हेटरिक’. त्यात ते चांगल्या वक्त्याबद्दल म्हणतात - ‘त्याची मते बदलू शकतात… पण (हा) वक्ता जेव्हा बोलत असतो, तेव्हा त्याचा स्वतःचा त्या बोलण्यावर विश्वास असतो. तो अनेकदा विसंगत असू शकेल. पण तो कधीही जाणीवपूर्वक अप्रामाणिक नसतो.’

तर याच प्रामाणिकपणाने मोदी नेहरूंविषयी बोलत होते. मात्र या वेळी ते खरेच बोलत होते. नेहरू खरोखरच तसे म्हणाले होते. ‘अगर वहां कोरिया में लडाई हो. तो उसका असर यहां पड जाता हैं. चिजों के भाव बढते हैं. हमारे काबू के बाहर जाते हैं. अगर अमरिका में कोई बात हो, तो उसका असर यहां भी चिजों के दाम पे पड जाये…’ ही नेहरूंचीच वाक्ये होती. महागाईवरील काँग्रेसच्या टीकेला उत्तर म्हणून नेहरू ती आपल्यासमोर फेकत होते. पण त्यात आक्षेप घ्यावा असे काय आहे?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

वरवर पाहता, त्यात आक्षेपार्ह, टीकास्पद असे काहीही नाही. पण आपण खोल विचार करणारे असू, तर लक्षात येते की, मोदींच्या भाषणातील नेहरू टीका ही केवळ ‘व्हाट्स अबाऊटरी’ नव्हती. तो लोकानुबोध - पर्सेप्शन - निर्मितीचा खेळ होता. त्याचा परिणाम लागलीच दिसून आला. मोदींनी सुरू केलेल्या त्या खेळात त्यांची भाटचारणांची आणि जल्पकांची सेना तातडीने सहभागी झाली. त्यांनी नेहरूंवर दुगाण्या झाडण्यास सुरुवात केली. त्यांचा सूर असा की, नेहरू जनतेला कसे मूर्ख बनवत होते ते पाहा. कोरियात युद्ध झाले आणि त्याचा परिणाम भारतावर होतो, येथे महागाई वाढते असे सांगून ते हात झटकत होते.

येथे दुहेरी फायदा आहे. नेहरूंवर टीकाही होते आणि याचाच वापर मोदी सरकारवर महागाईवरून काँग्रेसने टीका केलीच, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी करता येईल. या लोकानुबोध निर्मितीसाठी मोदींनी ‘प्रोपगंडा’चे एक तंत्र मोठ्या चलाखीने वापरले आहे. ते म्हणजे - डिस्टॉर्ट म्हणजे विरुपन. ते नेहरूंच्या वाक्यांचे नाही केले त्यांनी. ते केले त्या उद्‌गारांच्या पार्श्वभूमीचे. नेहरूंची विधाने मोदींनी अशा प्रकारे पेश केली की, कोणास वाटावे नेहरू किती बालीश. कोरियातील युद्धाचा भारतातील महागाईशी संबंध जोडतात. हे कोरियन युद्ध, त्याची कारणे, परिणाम याविषयी भारतातील सर्वसामान्यांना फारशी माहिती असण्याचे कारण नाही. आणि त्या अज्ञानावर तर मोदींची भिस्त असते.

हे युद्ध आहे १९५० सालातले. दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४५ साली कोरियाची फाळणी झाली. त्यातील उत्तर कोरिया कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली आले. दक्षिण कोरिया अमेरिकेच्या. २५ जून १९५० रोजी कम्युनिस्ट उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केले. यानंतर दोनच दिवसांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळाने दक्षिण कोरियात फौजा पाठवण्याचा निर्णय घेतला. अमेरिका आणि ब्रिटनच्या फौजा आता कोरियात कम्युनिस्टांच्या पाडावासाठी लढू लागल्या. शीतयुद्धातील ही पहिली लढाई. त्यात अमेरिकी लष्कराने पहिल्याच झटक्यात उत्तर कोरियाच्या सेनेचा धुव्वा उडवला. त्यांना सीमेपार हुसकवून लावले. ३८ अक्षांश ही ती सीमा. तेथवर अमेरिकी फौजा गेल्यानंतर पुढे काय? युद्ध थांबायला हवे होते. पण अमेरिकेचे जनरल डग्लस मॅकार्थी यांनी ठरवले की, आता कम्युनिस्ट कोरियाचा खात्मा करायचा.

दक्षिण कोरियाचे नेतेही अखंड कोरियाचे स्वप्न पाहत होतेच. यातून ठरले असे की, कोरियाची सीमा चीनला ज्या यालू नदीपाशी भीडते तेथपर्यंत चालून जायचे. हे युद्ध पेटवू नका, हा नेहरूंचा अमेरिकेस सल्ला होता. अमेरिकेने ३८ अक्षांश ओलांडल्यास चीन त्या युद्धात हस्तक्षेप करील, ही गोपनीय माहिती भारताचे राजदूत के. एम. पण्णिकर यांना मिळाली होती. तेही संयुक्त राष्ट्रसंघास नेहरूंनी कळवले होते. पण अमेरिकेचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी युद्ध पुढे रेटले. त्यामुळे चीनच्या फौजा युद्धात उतरल्या आणि त्यांनी अमेरिकेचा अभूतपूर्व असा पराभव केला. ३४ हजार अमेरिकी सैनिक मारले गेले त्यात.  

हे साधेसुधे युद्ध नव्हते. या संघर्षातून तिसरे महायुद्ध पेटते की काय, अशी भयशंका निर्माण झाली होती तेव्हा. रशिया, चीन, अमेरिका, ब्रिटन अशी तेव्हाची महा-राष्ट्रे त्यात होती. तेव्हा आजच्या एवढे जागतिकीकरण नव्हते हे खरे. पण जेव्हा अशी बडी राष्ट्रे युद्धात उतरत असतात, तेव्हा जगाचे अर्थकारण डळमळीत होत असते. महागाई भडकत असते. आता हे समजण्यासाठी ‘एंटायर पोलिटिकल सायन्स’ची पदवी असायला हवी असे नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबतचे सामान्य ज्ञानही त्यासाठी पुरेसे आहे. या युद्धाने अमेरिकेतही महागाईची आग भडकली होती.

हे युद्ध तिकडे सुरू झाले होते, तेव्हा भारताची स्थिती काय होती? देश स्वतंत्र होऊन पुरती तीन वर्षेही झाली नव्हती. ब्रिटिशांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची दुर्दशा केलेली होती. फाळणीच्या जखमा देहावर होत्या. जगाच्या इतिहासातील एक सर्वांत मोठे स्थलांतर झाले होते. त्याचा भार अर्थव्यवस्थेवर होताच, तशात एक युद्ध झाले होते. युद्धात कोणीही जिंको, नुकसान होते ते दोघांचेही. देशात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. देश अन्नधान्याच्या बाबतीत आयातीवर अवलंबून होता. देशाचे दरडोई उत्पन्न २५५ रुपये इतके कमी होते. रोगराई प्रचंड होती.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

.................................................................................................................................................................

१९५१ साली देशात फक्त १८०० पदवीधर डॉक्टर होते. एकंदर त्या काळात भारत अर्थआजारी होता. आणि अशात जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. कोरियन युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेली जागतिक परिस्थिती हा आपल्यासाठी दुष्काळात तेरावा महिनाच. नेहरू लोकांना ते समजावून सांगत होते. भाषणात पुढे ते देशातील लालची साठेबाजांवर टीका करीत होते. लोकांना वस्तुस्थितीची जाणीव करून देत होते. लाल किल्ल्यावरचे पंतप्रधानांचे भाषण त्यासाठी तर असते. यात महागाईपासून हात झटकण्याचा प्रश्न येतोच कुठे?

तुम्ही मोदीभाट वा भक्त असाल, तर उर्मटपणे विचाराल - मग? हे हात झटकणे नाही तर काय आहे? तुम्ही नेहरूंच्या दोषांवर पांघरूण घालता. कारण तुम्ही पुरोगामी आहात, सेक्युलर आहात, काँग्रेसी आहात वगैरे वगैरे… अशा द्वेषभक्तांच्या नेहरूविरोधास सीमा नाही. त्याला अर्थात त्यांचाही इलाज नाही. तर अशा कोणत्याही व्यक्तीपूजकाला ‘मित्रा, लवकर बरा हो’ म्हणण्याखेरीज कोण काय करू शकतो?

द्वेषभक्त नसाल, तर आशा आहे की, इतिहासाकडे वर्तमानाच्या चष्म्यातून न पाहता नेमकेपणे भिडाल. आणि लक्षात घ्याल, की नेहरूंनी कोरियाचे नाव घेत महागाईबाबत हात झटकले हा अपप्रचाराचाच नमुना आहे.

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......