इतक्या आघाडीच्या कवीचा सुमारे ४१ वर्षे संग्रह निघू नये आणि त्याविषयी कुणाला साधी खंतही वाटू नये, हे आपल्या साहित्यिक-संस्कृतीच्या हलकेपणाचंच लक्षण आहे
ग्रंथनामा - झलक
चंद्रकान्त पाटील
  • वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या ‘कोलाहल’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 11 September 2021
  • ग्रंथनामा झलक वसंत दत्तात्रेय गुर्जर Vasant Dattatreya Gurjar कोलाहल Kolahal वाचा प्रकाशन Vacha Prakashan तुला प्रकाशन Tula Prakashan अशोक शहाणे Ashok Shahane दिलीप पुरुषोत्तम चित्रे Dilp Purushottam Chitre

कवितासंग्रह प्रकाशित करणं आता सहजसाध्य आणि किरकोळ बाब झाली आहे. साठच्या दशकात हे घडणं फार कठीण होतं. ही कोंडी फोडण्याचं धाडसी काम ‘वाचा प्रकाशना’नं औरंगाबादसारख्या त्या काळच्या अविकसित शहरातून केलं होतं. नंतरच प्रस्थापित प्रकाशनांनी आपली कठोर आणि बंदिस्त व्यवस्था सैल करायला सुरुवात केली. शिवाय कवींना आणि कवीमित्रपरिवारांनाही स्वतंत्रपणे संग्रह प्रकाशित करायला बळ मिळालं. यातून समाजाच्या सर्व थरांतून कविता समोर येऊ लागली आणि काही लक्षणीय कवी-कवयित्री समोर आल्या. मात्र हळूहळू कवितासंग्रहांची संख्या बेसुमार वाढली. दुष्काळानंतर पूर यावा तशी अवस्था झाली. बहुसंख्य कवींच्या सोप्या आणि बाळबोध समजुतीमुळे चांगल्या-वाईटाचा मूल्यनिर्णयच हरवला गेला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

साठच्या दशकानंतर तीन-चार दशकं उलटून गेल्यावरही यात फारसा फरक पडला नाही. गर्दीपासून दूर राहणाऱ्या आणि आपलं स्वत्व जपणाऱ्या कवी-कवयित्रींचे संग्रह निघणंही आधीसारखंच कठीण झालं होतं. सबब मी २००५ मध्ये फक्त कवितेसाठीच असणारं ‘तुला प्रकाशन’ काढायचं ठरवलं. ‘वाचा प्रकाशन’ हा व्यवस्थेच्या विरोधात असणाऱ्या समविचारी मित्रांचा सांघिक प्रकल्प होता. त्या वेळी त्यातल्या माझ्यासकट सगळ्यांचीच आर्थिक स्थिती जेमतेमच होती. ‘तुला प्रकाशना’च्या वेळी मात्र मी एकटाच होतो. माझी आर्थिक स्थिती बरी होती. हाती निवृत्त झाल्यानंतरचा पैसा होता, मला भविष्याची काळजी नव्हती. श्री. अण्णा लाटकरांचं आणि त्यांच्या ‘कल्पना मुद्रणालया’चं प्रेम पाठीशी होतं. त्या वेळी मी श्रीधर नांदेडकर यांचा पहिला कवितासंग्रह ‘सूफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावर’, अनुराधा पाटील यांचा ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ हा चौथा संग्रह आणि कविता महाजन यांचाही पहिलाच संग्रह ‘तत्पुरुष’, हे तीन संग्रह प्रकाशित केले होते. फक्त कवितासंग्रहांसाठीच असलेलं ‘तुला प्रकाशन’ अव्यावसायिक होतं. त्यातून आर्थिक लाभाची मुळीच अपेक्षा नव्हती. पुस्तक निर्मितीच्या दृष्टीनं देखणं असावं एवढीच अपेक्षा होती. म्हणूनच आधी काढलेल्या प्रतीचा कागद जरासा हलका होता, म्हणून तिन्ही संग्रहांच्या प्रत्येकी सहाशे प्रती रद्द करून तेवढ्याच प्रती पुन्हा नव्यानं छापून घेतल्या होत्या. हा इतिहास बऱ्याच जणांना माहीत आहे. त्या तिन्ही पुस्तकांची पहिली आवृत्ती लवकरच संपली, आणि काही अपरिहार्य कारणांमुळे मी ‘तुला प्रकाशन’ही बंद केलं. नंतर माझं औरंगाबादही सुटलं.

दरम्यान विख्यात हिंदी कवी गजानन माधव मुक्तिबोध यांची जन्मशताब्दी २०१७मध्ये होती. तेव्हा मुक्तिबोधांची दीर्घ कविता ‘अंधरे में’चा ३० वर्षांपूर्वी मी केलेला मराठी अनुवाद, त्या कवितेवरचं माझं भाष्य आणि मुक्तिबोधांचा परिचय अशी एक ८० पानांची निशुल्क पुस्तिका मी प्रकाशित केली; तिच्यावर प्रकाशनाचं नाव ‘तुला प्रकाशना’ऐवजी ‘अव्यावसायिक प्रकाशन’ असं छापलं होतं.

आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा ‘तुला प्रकाशना’तर्फे वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा ‘कोलाहल’ हा संग्रह प्रकाशित करण्यामागे एक निश्चित भूमिका आहे. वसंत गुर्जर हे साठोत्तरी पिढीतील एक महत्त्वाचे (avant-grade) कवी आहेत. त्यांचा पहिला संग्रह ‘गोदी’ १९६७मध्ये, दुसरा संग्रह ‘अरण्य’ १९७२मध्ये आणि तिसरा संग्रह ‘समुद्र’ १९७९मध्ये निघाला होता. त्यानंतर ४१ वर्षं झाली तरी त्यांचा एकही संग्रह आला नाही. इतक्या आघाडीच्या कवीचा सुमारे ४१ वर्षं संग्रह निघू नये आणि त्याविषयी कुणाला साधी खंतही वाटू नये, हे आपल्या साहित्यिक-संस्कृतीच्या हलकेपणाचंच लक्षण आहे. कवितेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना आठवत असेल की, बा. सी. मर्ढेकरांनंतर विसाव्या शतकातील मराठी कवितेचं वळणच बदलून टाकणारे एक महत्त्वाचे कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा पहिलाच संग्रह १९६०मध्ये प्रकाशित झाल्यानंतर सुमारे १८ वर्षं दुसरा संग्रह निघाला नव्हता, आणि निघाला तोही ‘वाचा प्रकाशना’कडूनच (‘कवितेनंतरच्या कविता’)!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

दरम्यानच्या काळात वसंत गुर्जर यांच्या संबंधात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या : पहिली घटना म्हणजे अशोक शहाणे यांनी ‘प्रास प्रकाशना’तर्फे गुर्जर यांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता १९८३ साली पोस्टर कविता म्हणून छापली आणि ती बरीच गाजली, वादग्रस्त झाली. थोड्याच काळात दुर्मीळही झाली. या कवितेवर अश्लीलतेचा खटला झाला, तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि देशभर गाजला. नंतर दुसरं म्हणजे ‘खेळ’ या नियतकालिकाचा २०वा अंक वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्यावर केंद्रित केला गेला होता. तो २०११मध्ये म्हणजे सुमारे १० वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता.

गुर्जर यांच्या ‘कोलाहल’मध्ये सुमारे ११६ कविता आहेत आणि चार-पाच कवितांचा अपवाद वगळता सर्व कविता वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या आहेत. एखाद्या कवीच्या एकूण काव्यगत व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यासाठी नियतकालिकांतून आलेल्या कविता फारशा उपयुक्त नसतात; त्या सर्व कविता एकत्र संकलित होऊन समोर येणं आवश्यक असतं. आता या संग्रहामुळे गुर्जर यांच्या एकूण कवितेचं पुनर्मूल्यांकन होऊन त्यांचं मराठी काव्यपरंपरेतलं स्थान निश्चित करता येईल.

एक विलक्षण योगायोग म्हणजे ‘तुला प्रकाशना’च्या आधीच्या तिन्ही संग्रहांचं प्रकाशन २००५मध्ये मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद इथं वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या हस्तेच झालं होतं.

हा संग्रह प्रकाशित होण्यासाठी ज्यांची मदत झाली, त्यांत निशिकांत ठकार, श्रीधर नांदेडकर, वसंत आबाजी डहाके, नितीन दादरावाला, अरुण खोपकर, दिलीप वि. चव्हाण (पुणे), प्रफुल्ल शिलेदार आणि ‘तुला प्रकाशना’च्या पहिल्या संग्रहापासून ऋणानुबंधित श्रीमती हेमा बेहेरे यांचे आभार मानणं निव्वळ यांत्रिक आणि औपचारिक होईल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

अखेरीस हा संग्रह काढण्यासाठी वसंत दत्तात्रेय गुर्जर तयार झाले हे महत्त्वाचं आहेच. त्यांचे आभार अनिवार्य आहेत. या प्रसंगी मला राजा ढाले, तुळशी परब आणि सतीश काळसेकर यांची तीव्र आठवण होते आहे, हेही नमूद करतो.

एवढंच या प्रसंगी.

‘कोलाहल’ – वसंत दत्तात्रेय गुर्जर,

तुला प्रकाशन, औरंगाबाद,

पाने – १८४ (मोठा आकार),

मूल्य – ३०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......