टोकियो ऑलिम्पिक २०२१मधील नीरज चोप्राचं सुवर्णपदक नव चैतन्य निर्माण करणारं ठरलं, ठरवलं तर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ अजून फलदायी ठरेल…
पडघम - क्रीडानामा
अनिकेत वाणी
  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करणारे भारतीय खेळाडू आणि २०२१ व २४च्या ऑलिम्पिकची बोधचिन्हे
  • Wed , 11 August 2021
  • पडघम क्रीडानामा ऑलिम्पिक Olympic

२०१८मधील २१वी राष्ट्रकुल स्पर्धा (क्वीन्सलँड गोल्ड-कोस्ट) आणि १८वी एशियाड स्पर्धा (जकार्ता पालेमबंग) पाहत असतानाच भारताला टोकियो ऑलिम्पिक २०२१मध्ये नक्कीच उत्तम प्रकारे यश मिळेल, याची खात्री होती. ते काही प्रमाणात मिळाले असे म्हणावे लागेल. जवळपास गेल्या दीड वर्षांपूर्वी आलेल्या करोना महामारीमुळे सगळे जग ठप्प झाले होते. लॉकडाउन सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांना घराबाहेर पडणे अवघड होते. खेळाडूंना त्यांचा सराव करणेदेखील कठीण होऊन बसले. जगभर उद्भवलेल्या या अभूतपूर्व परिस्थितीमुळे ऑलिम्पिकचे आयोजन होणे शक्यच नव्हते. त्यामुळे २०२०चे टोकियो ऑलिम्पिक होऊ शकले नाही. त्यात ऑलिम्पिकला सर्व खेळांचा ‘कुंभमेळा’ म्हटले जाते. मात्र जपानने हिंमत न हरता या वर्षी ऑलिम्पिकचे आयोजन केले.

या ऑलिम्पिकसाठी भारताचे आजवरचे सर्वांत मोठे म्हणजे तब्बल १२७ खेळाडूंचे पथक टोकियो येथे पोहोचले. अनेक खेळाडूंना लॉकडाऊनमुळे पात्रता फेरीत सहभागी होता आले नाही, तर काही खेळाडू अगदी शेवटच्या क्षणी सहभागी होऊन पात्र ठरले. उदाहरण द्यायचे झाल्यास महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या राही सरनोबतला करोना काळात सरावासाठी वेळच मिळाला नाही. महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची टाळेबंदी होती. त्यामुळे अ‍ॅकॅडमी पूर्णपणे बंद होत्या. तिने महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली, पण तिला कुठलाच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तिचे पथ्यपाणी, सरावासाठी तिने कोल्हापूरचे शाहू राजे यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी त्यांच्या परीने काही प्रमाणात मदत केली. शेवटी स्वत:च्या बळावर ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या ऑलिम्पिकमधली भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही हॉकी संघाची कामगिरी हॉकीला फिनिक्स भरारी देणारी ठरली आहे. या ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या तक्त्यावर पहिली नावे ‘सावित्रीच्या लेकीं’नी उमटवली. मीराबाई चानु हे नाव दुर्लक्षित पूर्वोत्तर राज्यातलं. याच भागातल्या लवलिनानेदेखील ‘आम्ही दुर्लक्षित असून खेळात पुढे आहोत’ हे दाखवून दिलं. मेरी कोमने सर्व पूर्वोत्तर राज्यांना दिशा दाखवली. आजवर बायचुंग भूतीया, कुंजुराणी देवी या पूर्वात्तर खेळाडूंनी जागतिक पातळीवर आपलं नाव कोरलं आहे.

केंद्र सरकारची सातपैकी तीन स्पोर्टस् सेंटर पूर्वोत्तर राज्यांमध्ये आहेत. यावरूनच कळतं की, खेळातील पदके तिथून का येतात ते... तिथं उद्योगक्षेत्र अगदीच अत्यल्प. त्यामुळे नोकऱ्या फार कमी. परिणामी खेळातल्या करिअरचं आकर्षण वाढलं. अलीकडच्या काळात खेळातली अधिकतर गुंतवणूक या भागातूनच येताना दिसत आहे. थोडक्यात काय तर, संकटातून मार्ग काढत पूर्वोत्तर भागातल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या खेळात भारताचे सामने होते. हेच मोठे यश आहे. भारत या वेळेस प्रथमच तलवारबाजी या खेळात सहभागी झाला. भवानी देवीने पहिली पात्रता फेरी जिंकलीसुद्धा होती. दुसऱ्या फेरीत मात्र तिचा पराभव झाला. २०००नंतर भारताला घोडेस्वारी या प्रकारात ‘फवाद मिर्झा’च्या रूपाने हिरा मिळाला आहे. त्याने आपला झेंडा शेवटच्या फेरीपर्यंत फडकावत ठेवला. मात्र त्याला २४व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी टीमने मिळवलेले कांस्य पदक, पहिल्यांदाच विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासारख्या संघाला हरवत महिला संघाने उपांत्य फेरीत मारलेली धडक, माना पटेलच्या रूपात मिळालेली महिला जलतरणपटू, जलतरणपटू साजन प्रकाश, थाळीफेकमधील सर्वोत्तम कामगिरी करणारी कमलप्रीत कौर आणि गोल्फ या खेळाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी देणारी अदिती अशोक हे खेळाडू भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले.

खेळाडूला मिळणारा पुरस्कार कौतुकास्पद असला तरी या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळणे अतिशय गरजेचे आहे. मुळात एखाद्या खेळाडूने पदक मिळवल्यानंतरच त्याला सोयीसुविधा मिळणे, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या साताऱ्याच्या पी.आर. जाधवला सोयीसुविधांअभावी त्याचे गाव सोडून जावे लागत असेल तर ही बाब खूप दुर्दैवी आहे, असेच म्हणावे लागेल.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तमिळनाडूमधील ज्या मोजक्या तरुण खेळाडूंकडे भविष्यातल्या चांगल्या कामगिरीसाठी पाहिलं जातं, त्यामध्ये धनलक्ष्मीचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणं हे अधिक महत्त्वाचं असल्याने आईने तिला तिच्या बहिणीच्या मृत्यूची माहिती दिली नाही. धनलक्ष्मी गरीब घरातील असून वयाच्या १५व्या वर्षीच तिचं पितृछत्र हरवलं. अशा परिस्थितीतदेखील तिने १०० मीटर ट्रॅक प्रकारात पाचव्या क्रमांकाचं यश मिळवलं.

राष्ट्रीय बॉक्सिंगपटू रितूची कहाणीही फार वेगळी नाही. वडिलांच्या उपचारासाठी तिला बॉक्सिंग सोडून पार्किंग सहाय्यक म्हणून काम करावं लागलं. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हॉकी टीमला दिलेलं प्रायोजकत्व सोडल्यास कोणत्याही राज्यानं फारसे प्रयत्न केल्याचं दिसत नाही. पुरस्कारांची, वास्तूंची नावं बदलून काही होतं का? खेळाडूंना खराखुरा पाठिंबा, मदत हवी.

आपल्याकडे क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांना मिळणारं महत्त्व अगदीच नगण्य आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने इतर खेळाडूंना पुढे आणण्यासाठी आपल्या बजेटमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. मात्र ती वाढ करण्याऐवजी २३० कोटी रुपयांची कपातच केली गेली. पण करोना काळात घसरलेल्या अर्थव्यवस्थेमुळे या वेळी ते क्षम्य मानलं,  तरी इतर वेळेचं काय?

नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’, ‘क्रीडा विद्यापीठ’ उभं करताना जातीपातीचं राजकारण आड येणार नाही, याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. प्रत्येक आदिवासी पाड्यावर, गाव-खेड्यात पात्रता सामने आयोजित केले गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी खेळाकडे फक्त जास्तीचे गुण म्हणून न बघता करिअर म्हणून बघणं गरजेचं आहे.

प्रत्येक क्रीडा स्पर्धेत उत्तर, इशान्ये आणि दक्षिणेकडील खेळाडू सर्वांत जास्त का असतात? इतर राज्यं खेळाकडे गांभीर्यानं का पाहत नाहीत? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि काही प्रमाणात महाराष्ट्रासुद्धा खेळांबाबत इतके उदासीन का आहेत?

उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी पुढाकार घ्यावा, धोरण ठरवावं, विविध खेळांत क्रीडापटू तयार करावेत. कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग वगळता उर्वरित महाराष्ट्र खेळाच्या बाबतीत फार अनभिज्ञ आहे.

असो.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ‘मीराबाई रचिला पाया, नीरज झालासे कळस’, असे म्हणत रुपेरी सुरुवातीची सोनेरी सांगता झाली! भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी या वेळी केली. १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य असे एकूण ७ पदके मिळवली. लंडन ऑलिम्पिकचा ६ पदकांचा विक्रम मोडला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंना पदकानं हुलकावणी दिल्यामुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

मात्र हीच एक नवी सुरुवात समजत खऱ्या अर्थानं प्रयत्न केल्यास पुढील ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी चमकदार होऊ शकते! मोठी स्वप्नं न पाहणं हा दोष नाही. छोटी स्वप्न पाहणं आणि अल्पसंतुष्ट राहणे, हा खरं तर दोष आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

सॅन मॅरिनोसारखा केवळ ३५००० लोकसंख्या असणारा देश टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५ खेळाडूंचा सहभाग नोंदवत ३ पदके मिळवू शकतो, तर भारतासारख्या बलाढ्य देशाला काय कठीण आहे? सॅन मॅरिनोकडून आपण शिकण्यासारखं आहे. ‘स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ आणि क्रीडा मंत्रालयाने सर्व फेडरेशनसोबत अधिक जोमानं काम करणं गरजेचं आहे.

टोकियो ऑलिम्पिक २०२१मधील नीरज चोप्राचं सुवर्णपदक नव चैतन्य निर्माण करणारं ठरलं आहे. येत्या राष्ट्रकुल आणि एशियाड स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करण्यावर अधिक भर दिला, तर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ अजून फलदायी ठरेल, यात शंका नाही!  

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

ऑलिम्पिक स्पर्धा, चिमुकले देश आणि आपला बलाढ्य भारत… एक चमत्कारिक वास्तवसत्य!

२०२१चे टोकियो ऑलिम्पिक झाले; महाराष्ट्रासाठी पुढे काय?

..................................................................................................................................................................

लेखक अनिकेत वाणी स्पोर्टस पीआर आणि एमआर कन्सल्टंट आहेत.

anumyself01@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......