ग्रामीण भागातील आजचे वास्तव अनुभवण्यासाठी ‘तहान’ ही मुळातून वाचावी अशी साहित्यकृती आहे!       
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जीवन तळेगावकर
  • ‘तहान’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 04 June 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो तहान Tahaan सदानंद देशमुख Sadanand Deshmukh

कथा-कादंबरीकार सदानंद देशमुख यांची ‘तहान’ ही कादंबरी २२-२३ वर्षांपूर्वीची. तिचं आजच्या दृष्टीकोनातून केलेलं हे वाचन...

..................................................................................................................................................................

प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांची ‘तहान’ ही साधारणतः २०५ पानांची कादंबरी. नावाप्रमाणेच ‘पाण्याचे दुर्भिक्ष्य’ केंद्रस्थानी ठेवणारी ही कथा. एकाच गावच्या छोट्या कॅनव्हासवर उलगडणारी पण सगळ्या रंगांच्या छटा वाचकाच्या मनावर बिंबवणारी. एक अतिशय साध्या ग्रामीण भागातली चौकोनी कुणबी कुटुंबाच्या अवतीभवती फिरणारी ही कथा. यात नात्यांची गुंतवळ नाही, पण विचारांचं द्वंद्व आहे. भरमसाठ व्यक्तिचित्रं नाहीत, मोजकीच आहेत, पण व्यावहारिक आहेत, ती व्यवस्थित वाचकाच्या मनावर ठसतात. कथानक वाचकाला आपल्यात खोल खोल सामावून घेत अपेक्षित वळणं घेऊ लागताच अनपेक्षित वळणावर आणून सोडते. पुढे काय? हा प्रश्न त्याला भेडसावत राहताना कादंबरी संपते.

या अर्थानं ही एक 'अनऑर्थोडॉक्स', अपारंपरिक कादंबरी आहे. पण ती एक प्रश्न मनात ठेवून जाते कदाचित यातच या कादंबरीचं साफल्य आहे. तो प्रश्न असा- कॅनोनायझेशन नेमकं कशाचं? जुन्याचं का नव्याचं, वर्षानुवर्षं तरलेल्या शहाणपणाचं, का हुंदडणाऱ्या अल्लडपणाचं, हे ठरवण्याची ही वेळ, शं नो वरुणः'

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ही कादंबरी वाचून एक किस्सा ताजा होतो. अपारंपरिक पद्धतीने फ्रेंच सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या गोदा (Godard) या प्रसिद्ध डायरेक्टरला एकदा मुलाखतकर्त्यानं विचारलं, ‘बट शुअरली यू अग्री मिस्टर गोदा, दॅट फिल्म्स शुड हॅव अ बिगिनिंग, अ मिडल पार्ट अँड एन एन्ड?’ तर ते म्हणाले, ‘एस, बट नॉट नेसेसरीली इन दॅट ऑर्डर.’

या कादंबरीची भाषा कुठेही आपला ग्रामीण बोली पोत सोडत नाही, हे लेखकाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पूर्ण कथा एकसंध असल्याचं जाणवतं, उगाच वाचकाला एकदा भाषेचं वळण कळल्यावर उड्या माराव्या लागत नाहीत, नाही तर मध्येच जर प्राध्यापकी प्रमाण भाषा वापरली असती, तर हा अस्सलपणा कमी झाला असता.       

एका गावातलं एक कुणबी चौकोनी कुटुंब, प्रमुख राघोजी शेवाळे, बायको रामकोर, मुलगा बबन आणि मुलगी वर्षा. गावातल्या विहिरी आटल्या, दुष्काळ पडला, तसं पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण वाढली. त्यात, बबनला पैसे कमावण्याची संधी दिसली. गावापासून चार किलोमीटरवर गारमाळात विहिरीला भरपूर पाणी होतं, पण त्या आडवळणाला कोणी जायचं नाही कारण पाणी घेऊन वर येताना एकमेव रस्त्यावर लागणारा पिराचा चढ भल्याभल्यांना धापा टाकायला लावत होता, या रस्त्यावर ट्रॅक्टर उलटं झालं होतं, तिथं बैल पाणी घेऊन तो चढून येणं अशक्य होतं, पण बबनचे बैल त्याच्या बापानं निगुतीनं सांभाळले होते. दोन्ही बैल उमदे हत्तीसारखे दिसायचे. त्याने तात्काळ आपली तगडी बैलजोडी याकामी जुंपली, कणा मोडणाऱ्या पिराच्या चढाखालील विहिरीतून पाणी शेंदून आपल्या छबिल्या आणि मुरल्याच्या जीवावर पाण्याचा धंदा सुरू केला.

सगळे त्याच्या पाण्यासाठी रांगा धरू लागले, कारण त्या चढाखालून पाणी वाहून आणण्याचं जिगर अन्य कोणाच्या बैलजोडीत नव्हतं. इथंच बाप-लेकात संघर्षाची ठिणगी पडली. औताला ज्या बैलांना जुंपायचं, ज्यांचं चारा पाणी वेळेवर करून काळजी वाहायची त्यांच्या पाठीवरून पाणी वाहण्याचा धंदा त्याला हमाली वाटू लागला आणि बबनला रोज मिळणारा, हाती खेळणारा पैसा हेच सर्वस्व वाटू लागले. त्याच्या पैशावर घरात टीव्ही, सोन्याची पोत, रोजचं चांगलं जेवण येतंय, हे पाहून त्याची आई रामकोर त्याचीच बाजू लावून धरू लागली, बहीण वर्षा पण पाठीशी उभी राहू लागली आणि आपल्या बैलांना पाणी वाहून खंगून जाताना पाहून राघोजी मनाच्या खोल खोल विहिरीचा तळ खंगाळून चुळूकभर उमेद शोधत राहिला. त्याचं सांगणं घरात कोणी मनावर घेतलं नाही, उलट त्यालाच बाजूला सारलं. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

बबनचा धंदा जोरात असताना तो गावातील लोकांच्या डोळ्यात खुपू लागतो, त्याच्यापाठी पाण्यासाठी लागणाऱ्या रत्ना या देखण्या मुलीकडे पाहून लोकांना त्याचा हेवा वाटू लागतो. मग गावातील काही लोक बबनला रत्नासोबत रंगेहाथ पकडतात आणि तिच्या बापाला पण त्यांचं लफडं दाखवतात. काकुळतीला आलेल्या बबनचं हवालदाराकडून आणि बातमीदाराकडून ब्लॅकमेलिंग इथं सुरू होतं. दरम्यान बननने बैलजोडीकडे आणि बापाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं, त्यामुळे ज्यांच्या जीवावर तो पाण्याचा पैसा ओढून आणतो, ते आधीचे उमदे बैलच आता सापळे होऊन जातात. त्याने अधिक ड्रम्स वाहता यावेत म्हणून नव्याने केलेल्या रबरी टायरच्या लोखंडी गाडीला ते खेचू शकत नाहीत. बाजूच्या गावात आग लागते. त्यामुळे मोठे सरकारी अधिकारी आणि राजनेते त्यागावात भेट देऊन परतताना या गावातील लोक ‘पाणी मोर्चा’ काढतात, त्यात हाणामारी होते, राघोजीच्या पायाला जबर मार लागतो, फ्रॅक्चर होते. बबनचा खर्च वाढतो, आमदनी कमी होते कारण मोर्च्याच्या नंतर गावात सरकारी टँकर्स सुरू होतात म्हणून बबनच्या पाण्याची मागणी आटते, आणि त्याचे गिऱ्हाईक तुटते, नवीन टँकरवाले बबन गावात तयार होतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जखमी राघोजी आपल्या मरणासन्न बैलांकडे पाहत डोळे मिटत असता त्याला वाईट स्वप्न दिसते, तहानेने व्याकूळ तो, बायको आणि बैल कोरड्या घशाने कुठेतरी आत खोल खोल पाण्याच्या आशेने खेचले जातात आणि इतक्यात लचावणाऱ्या कावळ्यांचा कावs sकावs s आवाज व्यापून राहतो. अशा संज्ञा-प्रवाहात कादंबरी संपते, पण तोपर्यंत वाचक त्यात पार खोल खोल गेलेला असतो.

पैसा हेच सर्वस्व मानून माणूस नीतिमत्ता विसरत चालला आहे, चंगळवादाच्या मागे लागून साधे जगणे अवघड करून बसला आहे. या उपभोक्तावादाचं वाढतं ओझं आता त्याला पेलवेनासं झालं आहे. त्यात विकासाच्या नावाखाली त्याच्या तोंडाला प्रशासनिक आणि राजकीय यंत्रणांकडून पानं पुसली जाताहेत आणि त्याला भाकरी पुरवणारा जमिनीचा भेगाळलेला तृषार्त तुकडा एका गर्तेसारखा खोल होऊन त्यालाच आपल्यात सामावू पाहात आहे, हे सगळं चित्र ही कादंबरी पुढ्यात ठेवते. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर सत्तरी उलटूनही आजून भयाण वास्तव फेर धरून आहे याची जाणीव गडद होत राहते, ग्रामीण भागातील आजचे हे वास्तव अनुभवण्यासाठी ‘तहान’ ही मुळातून वाचावी अशी साहित्यकृती आहे.       

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......