कन्नड भाषा, कर्नाटक यांच्याशी आमचे भांडण नसून आमचे भांडण त्यांच्या नेत्यांशी आहे, त्यांच्या धोरणाशी आहे!
ग्रंथनामा - झलक
नाथ पै
  • ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा सीमावर्ती भागासह आणि नाथ पै
  • Tue , 09 March 2021
  • ग्रंथनामा झलक सीमाप्रश्न बेळगाव-कारवार-निपाणी दीपक पवार Deepak Pawar नाथ पै Nath Pai

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ हे सीमाप्रश्नाबाबतचे पुस्तक नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे संपादन दीपक कमल तानाजी पवार यांनी केले आहे. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिना’पासून दररोज ‘अक्षरनामा’वर क्रमश: प्रकाशित करत आहोत. आज मा. नाथ पै यांच्या भाषणांचा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

मित्रांनो, मी आज तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलणार आहे. भावनात्मकदृष्ट्या मी बेळगावच्या प्रश्नाशी जेवढा निगडीत आहे, तेवढा दुसऱ्या कोणत्याही प्रश्नाशी नाही. बेळगावच्या मातीतच मी वाढलो. तेथील जनतेने मला पोसले, वाढवले, मोठे केले. अनेक वर्षांनंतर मी आपल्याशी बोलत आहे. आपण सीमाप्रश्नाकरता जो लढा दिला, त्याला महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाही. महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी तुम्ही मोठे कार्य केले आहे. एवढे एकच वर्ष तुम्हाला कसोटीचे जाणार आहे. या वेळी तुम्ही साऱ्यांनी आपापसांतील मतभेद विसरून एकदिलाने काम केले पाहिजे. बेळगावमधील ऐक्य, निश्चय, उमेद, तोल टिकून राहिला पाहिजे.

सीमेच्या प्रश्नावर सेनापती बापट यांचे उपोषण चालू होते आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनत चालली होती. शेवटी त्यांना रक्तस्राव होऊ लागला आणि त्यांनी मला बोलावणे पाठवले. मी गेलो. सेनापतींच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. जवळच असलेल्या सहकाऱ्यांकडून सेनापतींनी हार मागवून घेतला आणि माझ्या गळ्यात हार घालून सेनापतींनी आशीर्वाद दिला. ते म्हणाले, “देशसेवेसाठी तुम्हांला उदंड आयुष्य लाभो!" माझ्या आयुष्यातील अत्युत्कट सुंदर असा एखादा क्षण असेल, तर तो हाच! मी या सन्मानापुढे भारतरत्न, पद्मभूषण आदी पदव्या क:पदार्थ मानतो.

महाजन आयोगाला माझा विरोधच होता. तेव्हा लोकांनी मला दूषणे दिली. “नाथ, तू तरुण आहेस. तुझ्या हट्टापायी अनेकांचे प्राण धोक्यात येण्यासारखे आहेत. तू हट्ट सोडून दे. सध्या जे पदरी प्राप्त होण्यासारखे आहे, त्याचा स्वीकार करू या.” माझा विरोध होता तो महाजन आयोगाच्या बिनबुडाच्या स्थापनेसाठी! कालमर्यादा न ठेवता, प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीच तत्त्वे निश्चित न करता आयोग, कमिट्या, मंडळे नेमण्याला माझा विरोध होता, आजही आहे. अशी बिनआधाराची मंडळे जनतेची फसवणूक करणारे, जनतेला अडकवून ठेवणारे सोनेरी पिंजरेच आहेत!

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

लोकसभा विसर्जित केव्हा करायची, याची खात्री सरकारी पक्षाला होती आणि कुमुहूर्त साधून लोकसभेपुढे महाजन अहवाल आला. लोकसभेवर म्हैसुरी प्रतिनिधींचा चौफेर हल्ला चालू होता. लोकसभा आपल्याकडे वळवून घ्यावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. सुंदर नक्षीदार अशा चंदनी चकत्या वाटण्यात आल्या. खुशबूचे वातावरण होते. मी सहज म्हणालो, “सुवासिक चंदनी चकत्यांचा वास घेता-घेता महाजन अहवालाची दुर्गंधी दूर करू या."

बेळगावच्या प्रश्नावर मी अधिक लक्ष देतो, म्हणून मला परावृत्त करण्याचा प्रयत्न होई. ‘तुम्ही अखिल भारतीय नेते. तुम्ही स्थानिक प्रश्नांत गुंतू नये.’ मी म्हणे, ‘बेळगावच्या स्थानिक प्रश्नासाठी मी झगडत नाही, तर स्थानिक प्रश्नाच्या स्वरूपात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झगडत आहे.’ बेळगावसाठी हौतात्म्य पत्करणे याचाच अर्थ अन्यायाविरुद्ध लढता-लढता हौतात्म्य पत्करण्यासारखे आहे. बाबू गेनू, मारुती बेन्नाळकर यांचे हौतात्म्य हे असे अखिल भारतीय स्वरूपात आहे.

महाजन अहवाल लोकसभेपुढे आला. दुपारचा एक वाजला होता. एक वाजून पाचच मिनिटांनी अहवालासंबंधी पाठवलेले दोन ठराव चर्चेसाठी घेण्याचे सभापतींनी घोषित केले. म्हैसूरच्या सदस्यांनी आकांडतांडव केले. सरकार व नाथ पै यांचे मेतकूट जमले आहे, असेही ते म्हणाले. मी त्यांना म्हणालो, “मित्रांनो, तुम्हाला लोकसभेचे कामकाज माहीत असते, तर तुम्हालाही अशा प्रकारचे ठराव पाठवता आले असते.” लोकसभेचा मुहूर्त साधावा लागतो, लोकप्रतिनिधींना सतत जागृत राहावे लागते. शरसंधान करावे लागते. खेडे, भाषा, सलगता आणि लोकेच्छा या तत्त्वांच्या आधारावर सीमाप्रश्न सोडवला जावा, असे या लोकसभेला वाटते, अशा स्वरूपाची सूचना मी लोकसभेपुढे मांडली. संघटना काँग्रेस पक्षाखेरीज अन्य साऱ्या पक्षांनी माझ्या सूचनेला अनुमती दर्शवली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

देशाची फाळणी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी बेळगावच्या फाळणीचा बेत आखला. मी कसून विरोध केला. अखेर फाळणीची योजना उडवून लावण्यात आम्ही यशस्वी झालो. पार्लमेंटरी कमिटी नेमण्याचा ‘बूट’ निघाला. त्यालाही विरोध केला, कारण नव्या सापळ्यात सीमाभागातील जनता अडकू नये, असे मला वाटले.

भारताच्या स्वातंत्र्यावर आघात झाला तर तळमळणारा आणि स्वातंत्र्यरक्षणासाठी पुढे होणारा तोच मराठी माणूस होय! या पिढीचा सर्वांत थोर वारसा आहे भारताचे ऐक्य राखण्याचा! या वारशाला तडे जाऊ देता कामा नयेत. कन्नड भाषा, कर्नाटक यांच्याशी आमचे भांडण नसून आमचे भांडण त्यांच्या नेत्यांशी आहे, त्यांच्या धोरणाशी आहे. माझ्याविरुद्ध कोण आहे, याचा मी विचार करत नाही. माझ्या पाठीशी कोण उभे आहेत, किती उभे आहेत याचाच मी विचार करतो; तेच माझे सामर्थ्य आहे!

श्री. हळ्ळीकेरी हे विधानपरिषदेचे अध्यक्ष आहेत. ते एका विद्यापीठाचे उपकलगुरू आहेत. उपकुलगुरू कसा पाहिजे? सुसंस्कृत, सुविद्य, संयमी! आणि श्री हळळीकेरी फुटीर भाषा काढत आहेत. ‘बेळगाव महाराष्ट्रात गेले, तर आम्ही भारतातून फुटून निघू’, अशी भाषा ते करत आहेत. भारतातून फुटून निघण्याची शेख अब्दुल्ला, मिर्झाबेग ही मंडळी अशीच भाषा वापरतात. त्यांच्याचप्रमाणे हळ्ळीकेरींवर कारवाई करा; त्यांना बंदिस्त ठेवा.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सीमाप्रश्नाचा निर्णय लागावा म्हणून गेली १४ वर्षे आपण प्रदीर्घ लढा दिला. साराबंदीचाही आपण प्रयोग केला. साराबंदीचा प्रयोग सहजासहजी वापरता येत नाही. त्याला दीर्घ तयारी लागते, जनाची आणि मनाची. त्यासाठी लोकांनी प्रचंड आंदोलन खडे केले. मीही लढ्यात भाग घेतला. खेड्यात गेलो. आमची जीपच जप्त करण्यात आली. पोलिसांनी खेड्याला वेढा घातला होता. हातात संगिनी होत्या. मला पोलिसांनी अडवले. मी चौकशी केली, तर ‘वरचा हुकूम आहे’ असे मला सांगण्यात आले. मी म्हणालो, “मला भारतमातेचा हुकूम आहे” पोलिसांचे नेतृत्व विदेशी पोलिस अधिकाऱ्यांकडे होते. मी म्हणालो, “लोकांना मारू नका.” त्या वेळी त्याने माझ्यावर काठी उगारली. मी कोण आहे हे मी त्याला सांगितले. “मी खासदार आहे. सौजन्य दाखव. काठी काय उगारतोस?” त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला आवरले. पोलीस बायकामंडळींकडून चहा-पाण्याची सोय करून घेत होते, इतके ते हीन वृत्तीचे होते.

आमची भांडणे जरूर आहेत, म्हणून अधिकाऱ्यांनी भारतीयत्व विसरावयाचे? सीमाप्रश्नाबाबत झगडत असताना राष्ट्रीय दृष्टीकोन कुणीही टाकू नये. कटुता, वैरभाव नको. स्वकीयांवर पोलीस शस्त्रे उगारतात, हे स्वतंत्र भारताला शोभत नाही. लष्कर-पोलीस स्वकीयांविरुद्ध वापरण्यासाठी नसून ते चीन-पाकिस्तान अशा आक्रमकांविरुद्ध वापरण्यासाठीच असायला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या बाबतीत पार्लमेंटचे मत मी महाराष्ट्राच्या बाजूला वळवू शकेन, असा मला विश्वास वाटतो; कारण सीमेचा प्रश्न हा न्यायाचा आहे, नीतीचा आहे, धर्माचा आहे.

अखेर न्याय-नीतीचाच जय होतो, असा इतिहासाचा दाखला आहे. दक्षिण रत्नागिरीत मला केवढाही विरोध झाला, तरी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी विजयी होईन, अशी मला उमेद आहे. मित्रांनो, मी तुम्हाला अभिवादन करतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

‘लोकशाहीची आराधना’ या नाथ पै (संपादक वासू देशपांडे, साधना प्रकाशन, पुणे) यांच्या पुस्तकातून साभार.

..................................................................................................................................................................

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प - संपादक - दीपक कमल तानाजी पवार, महाराष्ट्र सरकार, मुंबई, मूल्य - २०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......