कुठे कुठे फोटो काढून गड उतरलो. म्हटले, छान निसर्गदर्शन झाले! तसेच दुर्गदर्शनही झाले असते तर भरून पावलो असतो!!
पडघम - सांस्कृतिक
रवि आमले
  • प्रतापगडाची छायाचत्रि - रवि आमले
  • Fri , 19 February 2021
  • पडघम सांस्कृतिक प्रतापगड Pratapgad शिवाजीमहाराज Shivaji Maharaj

प्रतापगडाच्या पायथ्याशी वाहनतळावर गाडी उभी केली. उतरलो. वर पाहिले तो हा उंचच्या उंच बुरूज. त्यावर फडफडणारा भगवा ध्वज.

बुरुजावर तरुण शिवभक्तांचा एक गट घोषणा देत होता. शिवरायांचा आणि हिंदुधर्माचा जयजयकार करत होता. खालपर्यंत त्यांच्या घोषणांचा ध्वनी दुमदुमत होता.

या वाहनतळाच्या जवळच परिसरात शिवरायांनी अफजलखानास मारले. मोठा थरारक प्रसंग तो! अलीकडेच गजानन भास्कर मेहंदळेंच्या ‘श्री राजा शिवछत्रपती’ या बृहत्ग्रंथात त्याविषयी वाचलेले. ते सारे आठवत होते.

महाराजांनी ‘तलवारीचे टोक’ अफजलखानाच्या पोटात खुपसून त्याची आतडी बाहेर काढली. तसा तो ओरडू लागला. ‘शिवभारता’तील हकीकतीनुसार, ते ऐकताच अफजलखानाचा ब्राह्मण सेवक महाराजांवर धावून आला. अफजलखानाचीच पडलेली तलवार उचलून त्याने महाराजांवर वार केला. महाराजांनी तो वार अडवला. अज्ञानदासांचा पोवाडा सांगतो, तेवढ्यात जिवाजी महालदार यांनी त्या ब्राह्मणास बरची फेकून मारली आणि त्यात तो मेला. अफजलखानाच्या त्या ब्राह्मण सेवकाचे नाव होते कृष्णाजी भास्कर.

अफजलखान मारला गेल्याचे पाहून त्याचे दहा अंगरक्षक शिवरायांना मारण्यासाठी धावून आले. त्यात अब्दुल सय्यिद, बडा सय्यिद, अफजलखानाचा पुतण्या रहीमखान, पहिलवानखान आणि इतर चार मुसलमान होते. त्यात पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते हेही होते. हे दोघे हिंदू.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

वर बुरूजावरून घोषणा देणाऱ्या शिवभक्तांना या इतिहासाशी काहीही देणेघेणे नसणार. महाराजांना हिंदूंचा राजा म्हणूनच ते गौरवत होते. चूक त्यांची नाही. इतिहासाकडे थरारपट म्हणून पाहण्याची वर्षानुवर्षांची सामाजिक सवय! हा सारा ‘इतिहास’ समजून घ्यायचा कोठून, तर कादंबऱ्या आणि चित्रपटांतून. हल्ली गावगन्ना शिवशाहीर झालेत. त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलांनाही हजारोंनी अनुयायी असतात. तर हे आपले इतिहास अभ्यासाचे मार्ग. परिणाम हे होणारच. ते होणे हे येथील धर्मवाद्यांच्या फायद्याचे. कोण अडवणार त्यास?

महादरवाजातून आत जाता आपसूकच पावले वळली त्या बुरुजाकडे. गडाच्या एका टोकाकडे जाणारी चिवाळ नागमोडी तटबंदी. आत इतस्ततः पडलेले दगडधोंडे, खडक. त्यातच एके ठिकाणी भलेमोठे दगडी जाते पडलेले. भंगलेले. खाली पसरलेले जावळीचे हिरवेगार खोरे.

कोकणात जाताना आमच्या मालवणी मित्राला गमतीने चिडवत होतो. त्याला कोकणाच्या निसर्गसमृद्धीचा मोठा अभिमान. तर म्हणत होतो - ‘अरे, इथं सगळीकडं झाडं आणि डोंगरच दिसताहेत. तुमचा तो निसर्ग आला की सांग हं.’ गडाच्या तटबंदीवरून दिसत होता तो निसर्ग… डोळ्यांना, मनाला निववणारा, मानवी क्षुद्रत्वाची जाणीव करून देणारा निसर्ग.

आमच्या पुढेच एक गुजराती कुटुंब चाललेले. मम्मी, पप्पा आणि त्यांच्या दोन मोठ्या मुली आणि धाकटे चिरंजीव. मम्मी त्यांना गुजरातीमिश्रित इंग्रजीतून प्रतापगडाचे महत्त्व सांगत होती. मुली मन लावून ऐकत होत्या, पाहत होत्या. ती गुर्जर भगिनी मध्येच ‘तानाजी’ सिनेमाचे संदर्भ देत होती. इतिहासाची छान सरमिसळ चालली होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

गडावर चढताना एक गाईड मागे लागला होता. गाईड न घेतल्यास तुम्हाला काहीही समजणार नाही, गडावर भरकटाल असे भय घालत होता. पण त्यास स्पष्ट ‘नाही’ म्हणून सांगितले. तरीही तो चिवटपणे मागे मागे येत होता. त्याच्या रोजीरोटीचा तो प्रश्न असणार. त्याशिवाय कोण एवढे अजिजीने वागणार?

वर भवानी मातेच्या मंदिराबाहेर असाच एक मार्गदर्शक दिसला, परप्रांतीय पर्यटकांच्या घोळक्यात. तेथे काही छोट्या तोफा मांडलेल्या आहेत. त्या दाखवून तो हिंदीतून सांगत होता की, या पन्नास पन्नास किलोच्या तोफा खांद्यावर घेऊन शिवाजी राजांचे मावळे तटावरून गस्त घालत असत त्या काळी. म्हणजे बघा, कशी माणसे असतील ती...

ते ऐकून वाटले, बरे झाले आपण त्या मार्गदर्शकास नको म्हणालो. मार्गदर्शक सांगत असलेला थरारपटी इतिहास आणि ती गुर्जर भगिनी सांगत असलेला चित्रपटोत्भव इतिहास यांत केवळ तपशीलाचाच फरक.

सिंधुदुर्गावर तर या गाईडांचा मोठा विचित्र अनुभव आलेला. तेथे असलेला महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा पाहण्याची फार इच्छा होती. आत गेल्यावर मित्राने तेथील एकास विचारले,

ते ठसे कोणत्या बाजूस आहेत हो?

त्याने उलट विचारले, तुम्ही गाईड घेतलाय?

मित्र म्हणाला, नाही.

त्यावर तो उर्मटपणे म्हणाला, मग तुमचे तुम्ही शोधा.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आम्ही शोधले ते. पण तेथे पाहिले, आपली अनेक मराठी माणसे त्या छोटेखानी देवळीजवळून तशीच जात होती. त्यांना पत्ताही नव्हता की, त्यात किती अनमोल खजिना आहे तो.

सिंधुदुर्ग काय किंवा प्रतापगड काय, किंवा असेच अन्य गड काय… सगळीकडे हीच माहितीची आबाळ. पर्यटन खात्याने वा पुरातत्त्व विभागाने लावलेला एखादा फलक सोडला तर कुठे माहिती मिळण्याची व्यवस्थाच नाही.

या गडांवर जागोजागी केवढा इतिहास घडून गेलेला. किती तरी अवशेष पडलेले. पण कुठेही त्यांची माहिती देणारे फलक नाहीत. दिशादर्शक बोर्ड नाहीत.

गड पाहण्यामागे निसर्गदर्शन हा हेतू असतो काय? पायांना व्यायाम व्हावा म्हणून लोक किल्ले चढतात काय? पण होते ते तेवढेच. गडांवरील अवशेषांतून नजरेसमोर तेव्हाचा काळ उभा राहावा, तेथील इतिहासाची ओळख व्हावी, शिवरायांच्या राज्यकारभाराविषयीची, त्यांच्या दूरदृष्टीची, त्यांच्या रणनीतीची थोडीफार माहिती व्हावी, हा हेतू असायला हवा. पण त्याचा आपल्या राज्यकर्त्यांना पत्ताच नाही. गडाची डागडुजी करणे, निगा राखणे वगैरे दूरच, तेथे जागोजागी साधे माहिती फलक लावण्याचेही सुचू नये? प्रतापगड पाहताना मनात वारंवार हेच विचार येत होते.

भवानीमाता मंदिराकडून बालेकिल्ल्याकडे जाताना दिसणारी घरे आणि दुकाने आणि हॉटेले, त्यांची पत्र्यांची छप्परे हे सारे पाहताना वाटले, ऐतिहासिक, हेरिटेज वास्तूंबाबतची आपल्या बकाल आस्थेची प्रतीकेच ती.

कुठे कुठे फोटो काढून गड उतरलो. म्हटले, छान निसर्गदर्शन झाले. तसेच दुर्गदर्शनही झाले असते तर भरून पावलो असतो.

..................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......