करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!
संकीर्ण - पुनर्वाचन
सुनील तांबे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 29 December 2020
  • संकीर्ण पुनर्वाचन सुनील तांबे Sunil Tambe करोना विषाणू करोना व्हायरस Coronavirus

राजकीय हत्यांच्या मागे षडयंत्र असतं आणि या षडयंत्रांचा कधीही छडा लागत नाही. त्यामुळे या षडयंत्राचं मनोवेधक आणि पटण्याजोगं चित्र रेखाटणं, हा विसाव्या शतकातील सर्वांत मोठा विरंगुळा बनला. विशेषतः अमेरिकेत. प्रसारमाध्यमांनी हा विरंगुळा कमालीचा लोकप्रिय केला आणि २१ व्या शतकात इतर राष्ट्रांमध्येही हे लोण पोचलं. करोना विषाणूच्या उदभवाबाबतही राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विविध राजकारणी करू लागले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाची किनार या वादाला आहे. भारतातील काही प्रसारमाध्यमांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. करोना विषाणूची निर्मिती चीननेच केली, असा आरोप दै. ‘लोकसत्ता’ने केला, तर ‘इकॉनॉमिक टाइम्स’ (ईटी प्राईम) या माध्यमानेही चिनी सरकारने पुरस्कृत केलेल्या फसलेल्या प्रयोगातून करोना हा विषाणू निर्माण झाला आणि त्याचा प्रसार झाला, असं जाहीर केलं.

करोना विषाणूची लागण वाढत गेली आणि व्हॉटसअ‍ॅपवर अनेकांनी मला मॅसेज म्हणजे बातम्यांच्या व व्हिडिओंच्या लिंक्स पाठवून करोना विषाणू हे जैविक युद्धाचं हत्यार म्हणून कसं विकसित करण्यात आलं, यासंबंधातील बातम्या व लेख पाठवले. वुहान शहरातील चीन सरकारच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार करण्यात आला, असं एका बातमीत म्हटलं होतं, तर दुसर्‍या बातमीत कॅनाडातील एका प्रयोगशाळेत काही चिनी वैज्ञानिकांनी या विषाणूची गुप्तपणे निर्मिती केली असा दावा केला. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचा संचालक (माहिती, शिक्षण आणि संवाद) काम करत होतो, त्या वेळी महाराष्ट्रातील एका नामवंत पत्रकाराने एड्सचा विषाणू निर्माण करण्यात अमेरिकेने कळीची भूमिका निभावली, असं छातीठोकपणे सांगितलं होतं.

जीवाणू आणि विषाणू यातला फरक न कळणारे पत्रकार निव्वळ काही घटनांच्या आधारे (त्याला ते परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात!) जैविक युद्धासाठी एड्स, इबोला, सार्स आणि आता करोना विषाणूंची निर्मिती करण्यात आली, असा दावा करत असतात.

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

करोना विषाणूच्या बाबतीत परिस्थिती अधिक चिघळलेली आहे. राजकीय नेते या विषयावर शेरेबाजी करू लागले आहेत. अमेरिकेचे सिनेटर टॉम कॉटन यांनी दावा केला की, करोना विषाणू प्रयोगशाळेत बनवण्यात आला आहे. या विषयावर त्यांनी ट्विटसची मालिकाच चालवली आणि ज्या कोणी जगावर हे संकट लादलं आहे, त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करायला हवं, अशा आशयाची मागणी करणारं ट्विट केलं. ते म्हणाले की, यासंबंधात पारदर्शकता गरजेची आहे. अखेरीस त्यांनी चीनवर आपला रोख असल्याचं स्पष्ट केलं. कॉटन यांच्या दाव्याला उत्तर देताना चीन सरकारने अमेरिकेवर आरोप केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिजान झाओ यांनी दावा केला की, अमेरिकन लष्करानेच करोना हा विषाणू बनवला आणि चीनमधील वुहान शहरात सोडला. करोना विषाणूचा संसर्ग झालेला अमेरिकेतील पहिला रुग्ण कोणता, केव्हा त्याला बाधा झाली, कोणत्या इस्पितळात त्याच्यावर उपचार झाले, हा सर्व डेटा अमेरिकेने जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रा. फ्रान्सिस बॉईल या कायदेतज्ज्ञाचा लेख इंग्लडमधील ‘एक्सप्रेस’ या टॅब्लॉईडने १२ मार्च रोजी छापला. फ्रान्सिस बॉईल हे कायदेतज्ज्ञ जैविक अस्त्रांसंबंधीच्या विधेयकाचा मसुदा करण्यात सहभागी झाले होते. त्यांनी असा आरोप केला की, करोना विषाणू चिनी लष्करानेच निर्माण केला. मात्र ‘एक्सप्रेस’ या टॅब्लॉईडने सदर लेखाला जोडलेल्या दुरुस्तीत असं म्हटलं की, प्रा. बॉईल यांनी ज्या संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे, त्या निबंधात कुठेही करोना विषाणूशी छेडछाड करण्यात आल्याचा उल्लेख नाही. म्हणजे ही दुरुस्ती जोडून ‘एक्सप्रेस’ने आपली मूठ सोडवून घेतली पण षडयंत्राचं पिल्लू सोडून दिलं. इराणचे माजी अध्यक्ष, अहमदिनेजेनाद यांनी तर संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना पत्र लिहून, करोना विषाणू प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला, असा थेट आरोप केला. त्यांचा रोख अर्थातच अमेरिकेवर होता.

काँग्रेसचे प्रवक्ते आणि खासदार, मनिष तिवारी यांनी कोणतीही शहानिशा न करता ‘लंडनच्या एक्सप्रेस’मधील प्रा. बॉईल यांचा लेख ट्विट करून प्रसारित केला. आपल्या ट्विटमध्ये मनिष तिवारी म्हणतात, करोना विषाणू हे जैविक अस्त्राने हाताबाहेर जाऊन धुमाकूळ घालावा अशीच योजना होती. हे दहशतवादी कृत्य आहे असा निर्वाळाही त्यांनी दिला. जैविक अस्त्रांचा नायनाट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यासंबंधात कसून चौकशी करायला हवी, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

शेखर गुप्ता हे भारतातले नामवंत पत्रकार. ‘द इंडियन एक्सप्रेस’चे ते प्रमुख संपादक होते. सध्या ‘द प्रिंट’ नावाचं वेबपोर्टल ते पाहतात. ते लेख लिहितात, कॅमेर्‍यासमोर उभं राहून बडबड करतात, प्रणव रॉय यांच्यासोबत निवडणूक सर्वेक्षणात सहभागी होतात. मात्र त्यांनी कधीही सार्वजनिक आरोग्य या विषयावर वृत्तांकन केलेलं नाही. परंतु करोना विषाणूच्या वादात पडलो नाही, तर पत्रकार म्हणून कसं मिरवणार असा प्रश्न त्यांना छळत असावा. त्यांनी असा दावा केला की, चिनी लोकांना जंगली पशुंचं मांस खायला आवडतं. त्यातून करोना विषाणूचा फैलाव झाला.

करोना विषाणू जंगली पशूंमधून संक्रमित झाला का, या विषयावर संशोधन सुरू आहे. परंतु हे संशोधन अद्याप अपूर्ण आहे. या संबंधात ‘नेचर’ या विज्ञानविषयक नियतकालिकात एक लेख आला होता. सदर लेखात खवले मांजर (पँगोलिन) चीनमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याच्या मांसातून या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता तपासली जात आहे असं म्हटलं होतं. माहितीच्या महाजालाच्या नळावर पाणी भरून शेखर गुप्तांनी घरात चुळा मारायला सुरुवात केली! वस्तुतः संशोधन पूर्ण झाल्याशिवाय, निष्कर्ष हाताशी आल्याशिवाय या प्रकारची शेरेबाजी करायची नसते, हा पत्रकारितेचा मूलभूत नियमही शेखर गुप्तांनी पाळला नाही. पत्रकारांची प्रसिद्धीची असोशी राजकारण्यांपेक्षा कमी नसते!

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जैविक अस्त्रं नाहीतच का? आहेत. अमेरिका, इराक, रशिया यांनी जैविक अस्त्रं बनवली होती. त्यांचा साठा केला होता, ती वापरलीही होती. या जैविक अस्त्रांना प्रत्युत्तर देणार्‍या संशोधन संस्थाही स्थापन करण्यात आल्या. सेंटर फॉर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, युएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्विसेस, द नॅशनल बायोडिफेन्स अ‍ॅनालिसिस आणि काऊंटरमेजर्स सेंटर, यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, अशा अनेक अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय संस्था जैविक अस्त्रांचा धोका, त्यावरील उपाययोजना यांवर संशोधन करत असतात. जागतिक आरोग्य संघटनाही त्यावर लक्ष ठेवून असते. यापैकी एकाही जबाबदार व मान्यवर संस्थेनं करोना विषाणू प्रयोगशाळेत निर्माण करण्यात आला, या दाव्याला कोणताही आधार दिलेला नाही.

करोना विषाणूच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडत आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा काळात या संकटाला कोणीतरी जबाबदार असणारच, त्यामागे षडयंत्र असणारच ही जनभावना आहे. कारण ‘परमेश्वर मेल्याचं’ नित्शेनं जाहीर करून अनेक वर्षं लोटली आहेत. परमेश्वर मेला असेल तर या सर्व उत्पाताला माणूसच जबाबदार असणार, कोणीतरी षडयंत्र रचलेलं असणार, असा विश्वास आपल्याला वाटू लागतो. माणूस सर्वशक्तिमान आहे, या धारणेतून ही भावना आणि घबराट निर्माण होते. राजकारणी आणि पत्रकार ही घबराट फक्त प्रक्षेपित करतात. सामान्य जनांएवढेच तेही अज्ञानी असतात!

प्रथम प्रसिद्धी - १६ मार्च २०२०

..................................................................................................................................................................

लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत. 

suniltambe07@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......