वाचन जागर अभियान : २५० पुस्तके २५ टक्के सवलत : प्रकाशकांचे एक पाऊल पुढे, आता वाचकांनी दोन पावलं पुढे यावे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • वाचन जागर अभियान
  • Fri , 06 November 2020
  • ग्रंथनामा शिफारस वाचन जागर अभियान Vachan Jagar Abhiyan

मार्चपासून सुरू झालेला करोनाकाळ अजूनही पूर्णपणे हटलेला नाही. लॉकडाउन हळूहळू शिथिल होत आता जवळपास नगण्य पातळीवर आला आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरळीत होत आहेत. छोटे-मोठे व्यवसाय टप्प्याटप्प्याने चालू होत आहेत. पुस्तकांची दुकाने सुरू झाली आहेत, नुकतीच वाचनालयेही चालू झाली आहेत.

त्यात पावसाळा संपून हिवाळा वातावरणात भरू लागला आहे. त्यामुळे दिवाळीची मौज सुरू होतेय. मास्क, सुरक्षित अंतर पाळत लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करू लागले आहेत. पण आकाशकंदिल, फराळ, सजावटीचे इतर साहित्य यांची खरेदी चालू झालेली आहे.

महाराष्ट्रात दिवाळीचे एक महत्त्वाचे आकर्षण असते, ते म्हणजे दिवाळी अंक. पण तूर्त तरी खूपच कमी अंक बाजारात आलेले आहेत. पुस्तक दुकानदारांच्या म्हणण्यानुसार रविवारपर्यंत अजून काही दिवाळी अंक विक्रीसाठी उपलब्ध होतील. पण करोनामुळे यंदा दिवाळी अंकांची लगबग बरीच कमी झाली आहे. अनेक अंक यंदा निघणार नाहीत. जे निघताहेत त्यांची पाने बरीच कमी झाली आहेत. त्यामुळे वाचकप्रेमी मराठी माणसांची यंदाची दिवाळी थोडीशी सुनी सुनी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र नेमक्या याच काळात मराठी प्रकाशन व्यवसायात नवनवीन घडामोडी घडत आहेत. राजहंस प्रकाशनाने नुकतेच स्वतंत्र अॅप बाजारात आणले आहे. तर साधना, मेहता, मॅजेस्टिक, मनोविकास, डायमंड, ज्योत्स्ना, पद्मगंधा, रोहन, राजहंस आणि साकेत या मराठीतील १० आघाडीच्या प्रकाशनसंस्थांनी एकत्र येऊन ‘वाचन जागर महोत्सव’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा उपक्रम २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमात या दहा प्रकाशनसंस्थांची प्रत्येकी २५ पुस्तकं २५ टक्के सवलतीत वाचकांना विकत घेता येणार आहेत. म्हणजे तब्बल २५० पुस्तकांवर २५ टक्के सवलत वाचकांना मिळणार आहे. ही पुस्तके वाचकांना त्यांच्या शहरातल्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी कुठलेही जास्तीचे दर आकारले जाणार नाहीत.

थोडक्यात मराठीतल्या आघाडीच्या १० प्रकाशनसंस्थांनी वाचकप्रेमींसाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे.

ही पुस्तके कुठे मिळतील? ही पुस्तके राज्यातल्या २३ शहरांमधल्या ३४ पुस्तकांच्या दुकानांमध्ये मिळणार आहेत.

या योजनेतील पुस्तकांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा –

थोडक्यात, वाचकप्रेमींसाठी मराठी प्रकाशकांनी एक खास योजना आणली आहे, खास दिवाळीनिमित्त. त्याचा वाचकांनी लाभ घ्यावा. वाचनवृद्धीसाठी प्रकाशकांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याला वाचकांनी दोन पावले पुढे टाकून प्रतिसाद द्यायला हवा.

सफ़दर हाश्मी यांची ‘किताबें कुछ कहना चाहती हैं’ या नावाची एक सुंदर कविता आहे –

किताबें करती हैं बातें

बीते ज़मानों की

दुनिया की, इंसानों की

आज की, कल की

एक-एक पल की

ख़ुशियों की, ग़मों की

फूलों की, बमों की

जीत की, हार की

प्यार की, मार की

क्या तुम नहीं सुनोगे

इन किताबों की बातें?

किताबें कुछ कहना चाहती हैं।

तुम्हारे पास रहना चाहती हैं॥

 

किताबों में चिड़िया चहचहाती हैं

किताबों में खेतियाँ लहलहाती हैं

किताबों में झरने गुनगुनाते हैं

परियों के किस्से सुनाते हैं

 

किताबों में राकेट का राज़ है

किताबों में साइंस की आवाज़ है

किताबों में कितना बड़ा संसार है

किताबों में ज्ञान की भरमार है

क्या तुम इस संसार में

नहीं जाना चाहोगे?

 

किताबें कुछ कहना चाहती हैं।

तुम्हारे पास रहना चाहती हैं॥

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Nikkhiel paropate

Sat , 07 November 2020

पुस्तकांची यादी (पुस्तकांची नावे ) कळली तर अधिक मदत होईल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......