सालुमरद तिम्मक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन : केवळ मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही प्रेरणादायी चरित्रे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
संजीवनी शिंत्रे
  • सालुमरद तिम्मक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन यांच्यावरील पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Fri , 27 September 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस कविता महाजन Kavita Mahajan संजीवनी शिंत्रे Sanjivani Shintre सालुमरद तिम्मक्का Saalumarada Thimmakka पौर्णिमादेवी बर्मन Purnima Devi Burman

मुलं वाचत नाहीत, मुलांसाठी चांगलं साहित्य निर्माण होत नाही असं रडगाणं गात बसण्यापेक्षा आपल्याला जमेल ते आपण करावं अशी कविता महाजन यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी अत्यंत सहेतुकपणे बालसाहित्याचे लेखन केले होते. याच भूमिकेतून त्यांनी ‘इंद्रायणी साहित्य’साठी विविध लोककथांवर आधारित ‘जंगलगोष्टी’ ही मालिका लिहिली होती. मनोरंजक गोष्टींबरोबरच मुलांची जिज्ञासा पूर्ण करेल अशी माहिती, हस्तकलेची हौस भागेल अशी कृती असे या जंगलगोष्टींचे स्वरूप होते.

या गोष्टींच्या प्रकल्पानंतर मुलांसाठी ‘आपले आदर्श’ असे मध्यवर्ती सूत्र ठेवून भारतातल्या विविध क्षेत्रातल्या प्रेरणादायी व्यक्तींवर चरित्रं लिहायची अशी तिची योजना होती.

चरित्र या साहित्यप्रकारातून वाचनाबरोबरच प्रेरणाही मिळेल असा या मालिकेचा हेतू होता. या योजनेतून त्यांनी ३८४ वडाची झाडे लावणारी तिम्मक्का, हारगिला म्हणजेच क्षेत्रबलाकांचे संरक्षण आणि संवर्धन करणारी पौर्णिमादेवी बर्मन आणि कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करणारी के. विजया यांच्यावरील चरित्रं लिहायलाही सुरुवात केली. या चरित्रांपैकी तिम्मक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन ही चरित्रे पूर्ण झाली, परंतु कविता महाजन यांच्या अकाली मृत्यूमुळे के. विजया यांच्यावरचे पुस्तक अपूर्णच राहिले. आता त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त तिम्मक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन ही दोन चरित्रं पुस्तके इंद्रायणी साहित्य प्रकाशित करत आहे.

तिम्मक्का या कर्नाटकातल्या निरक्षर स्त्रीने स्वतःच्या व्यक्तिगत दुःखावर मात करण्यासाठी वडाची झाडे लावली आणि त्यांचे संगोपन केले. हे करत असताना आपण पर्यावरण रक्षणाचे केवढे मोठे काम करतोय याची तिला जाणीवही नव्हती. आज तिला संपूर्ण भारतातच नाही तर जगभरात ज्येष्ठ पर्यावरणवादी स्त्री म्हणून ओळखले जाते. वयाची शंभरी पार केलेल्या या आजीचे चरित्र बालवाचकांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

याच मालिकेतील दुसरे पुस्तक पौर्णिमादेवी बर्मन या आसाममधल्या स्त्रीवर आहे. जैवविविधतेचा अभ्यास करताना हारगिला म्हणजेच क्षेत्रबलाक या विषयावर पीएच.डी. करणाऱ्या पौर्णिमादेवींना असे जाणवले की पीएच.डी.चा पुस्तकी अभ्यास करून पदवी मिळेल, मानमरातब आणि लठ्ठ पगाराची नोकरीही मिळेल, पण तोवर हारगिला पक्षी या जगातून नष्ट झाले असतील. त्यामुळे काळाची गरज ओळखून त्यांनी पीएच.डी.चा अभ्यास तात्पुरता बाजूला ठेवला आणि हारगिला पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आपले करिअरच नाही तर अख्खे आयुष्यच पणाला लावले. आसाममधल्या स्त्रिया आणि मुलांना एकत्र करून वेगवेगळ्या कल्पना लढवत त्यांनी हारगिला आर्मी अशी संघटना बांधली आणि सर्वतोपरीने हारगिला पक्ष्यांना वाचवले. आज पौर्णिमादेवींना स्थानिक पुरस्कारांपासून ग्रीन आँस्करसारख्या जागतिक पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

तिमक्का आणि पौर्णिमादेवी बर्मन या दोन्ही चरित्रांमधली कविता महाजन यांची अर्थपूर्ण रेखाटने वाचकांना वेगळाच आनंद देतील. या चरित्रांमध्ये गोष्टीबरोबरच त्या त्या विषयाशी संबंधित असणारी मनोरंजक  माहितीही वाचकाची जिज्ञासा पूर्ण करणारी आहे.

कविता महाजन यांच्या स्मृतीदिनानिमित्त इंद्रायणी साहित्य ‘कंटाळ्याशी कट्टी’ हे कविता महाजन यांचे बालनाट्यही प्रसिद्ध करत आहे. साध्या साध्या गोष्टींनी सतत बोअर होणाऱ्या बच्चेकंपनीने कंटाळ्याशी कट्टी केली तर कशी मजा येईल याचे दर्शन या नाटकातून घडते. गाणी, नृत्य, नाट्य आणि मुख्य म्हणजे मुलांच्या भावविश्वातला कल्पनाविलास साधणारे हे धम्माल बालनाट्य सर्वच वयोगटातील वाचकांना आवडेल.

कविता महाजन यांची पुस्तके प्रकाशित करुन इंद्रायणी साहित्यने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता या पुस्तकांना उत्तम प्रतिसाद देऊन या लोकप्रिय लेखिकेला मानाचा मुजरा करण्याची जवाबदारी वाचकांवर आहे.

.............................................................................................................................................

पौर्णिमादेवी बर्मन यांच्या चरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5126/Hargila-Baydo

सालुमरद तिम्मक्का यांच्या चरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5127/Salumarad-Timakka

.............................................................................................................................................

लेखिका संजीवनी शिंत्रे व्यवसायाने शिक्षिका व ग्रंथसंपादक आहेत.

 smita1707@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......