राजेरजवाड्यांवरचा अनाठायी खर्च आता कशासाठी करायचा?
पडघम - विदेशनामा
कॉ. भीमराव बनसोड
  • जपानमधील राजघराणं, मलेशियाचा राजा सुलतान मोहम्मद वी, इंग्लंडचा राजपुत्र व त्याची पत्नी आणि मोहम्मद वी व त्यांची रशियन पत्नी
  • Tue , 14 May 2019
  • पडघम विदेशनामा राजघराणे Royal Family राजा King

मागच्या एप्रिल महिन्यात १२६ वा सम्राट म्हणून वंशपरंपरेने राजा नारोहितो जपानच्या राजगादीवर  विराजमान झाले. त्यांना जपानच्या शाही खजिन्याची किल्ली देण्यात आली. मोठ्या थाटात त्यांचा राज्याभिषेक झाला आणि जपानमध्ये नवीन युगाची सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आली.

थायलंड येथील राजाचा चौथा विवाह झाला. मलेशियाचे राजे सुलतान मोहम्मद वी या राजाचे प्रेम मिस रशियावर होते. त्यांना तिच्याशी विवाह करायचा होता. या प्रेमसंबंधाचा बराच बाऊ झाल्याने त्यांनी राजत्याग केला. म्हणून त्यांच्या जागी त्यांचा भाऊ राजपदी विराजमान झाला. त्यांना चारचाकी गाड्यांच्या स्पोर्टचा बराच शौक होता.

इंग्लंडच्या राजघराण्यात एका राजपुत्राचा जन्म झाला.

या सर्व राजविवाहांची व राज्याभिषेकांची रसभरीत वर्णने जगभरच्या प्रसारमाध्यमांनी केली आहेत.

अधूनमधून जगाच्या इतर देशातील राजघराण्यांचे असे प्रकार चालूच असतात.

थायलंडच्या राजाचे प्रेम त्यांच्या महिला अंगरक्षकावर होते. त्यांनी तिच्याशी विवाह केला. यापूर्वी त्यांचे आणखी तीन राण्यांवर प्रेम होते. त्यांच्यापासून त्यांना सात अपत्ये झाली. पण या तिघींशीही प्रेमभंग झाल्याने त्यांना हे चौथे प्रेम व विवाह करावा लागला. ते स्वत: ६६ वर्षांचे असून त्यांची ही चौथी राणी ४४ वर्षांची आहे. तेथील प्रथेनुसार होणाऱ्या राणीला राजमहालाच्या मुख्य दरवाजापासून राजा बसलेल्या सिंहासना (गादी) पर्यंत सापासारखे सरपटत जाऊन त्याच्या पायावर डोके ठेवावे लागते. मग तिला राणीपद मिळते. तसे आता तिला राणीपद मिळाले आहे. राजा तर हा आधीपासून होताच.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4861/Kon-hote-sindhu-loka

.............................................................................................................................................

जगातील पहिली औद्योगिक क्रांती झालेला आणि त्यामुळे लवकरच साम्राज्यवादी स्वरूप घेतलेल्या इंग्लंडमधील भांडवलदार वर्गाने तेथील राजघराण्याशी जुळवून घेतले. इंग्रजांनी फक्त भारतातच व तेही राजेरजवाड्यांनी १८५७ ला बंड केल्यानंतरच जुळवून घेतले, हा आपल्यातील गोड गैरसमज आहे. इंग्लंडसह जगभरच सरंजामशाहीशी, त्याचे आधार असलेल्या राजेरजवाड्यांशी, त्याची मूल्ये असलेल्या धर्मादी संस्थांशी, भारतात जातीव्यवस्थेशी या सत्ताधारी, भांडवलदार वर्गाने आपले मेतकूट चांगलेच जमवले आहे. त्याचा ते स्वत:ची सत्ता कायम टिकवण्यासाठी मोठ्या कौशल्याने वापर करत आहेत.

वर उल्लेख केलेल्या देशातील राजघराण्यांच्या विवाहादी सोहळे हे त्याचेच द्योतक आहेत. यातही काळानुरूप त्यांनी किंचितसा बदल केला आहे. उदा. नेदरलँड (१९८३), थायलंड (१९७४), इंग्लंड (२०११) सालात बदल केला. त्यापूर्वी केवळ पुरुषांनाच राजगादीवर बसण्याचा हक्क होता. तो या देशातून वर दिलेल्या साली कायद्यात दुरुस्ती करून महिलांनाही राजगादीवर बसण्याचा अधिकार देण्यात आला. पण मोरोक्को, ओमान, सौदी अरबिया व जपानमध्ये फक्त पुरुषच राजगादीवर हक्क सांगू शकतो. तेथे अशा बदलाची तरतूद अजूनही करण्यात आलेली नाही. असो.

मार्च अखेर व एप्रिलच्या सुरुवातीला मी सिंगापूर, मलेशिया व थायलंडला गेलो होतो. आपल्या देशातील विविध शहरांत ज्याप्रमाणे राजकीय पुढाऱ्यांची छायाचित्रं असलेले मोठमोठे फ्लेक्स ठिकठिकाणी दिसतात, तसे मला या देशांतील कोणत्याही शहरांतून दिसले नाहीत. पण मलेशिया व थायलंडमध्ये मात्र चौकाचौकांत फ्रेम केलेली छायाचित्रं दिसायची. गाईडला त्याबद्दल विचारले असता, ते आमचे राजे आहेत असे तिने सांगितले. मलेशियातील गाईडचे नाव कनघा होते. तिने सांगितले की, या राजाची निवड देशातील ९ प्रांतातील ९ रॉयल फॅमिली त्यांच्यामधूनच कोणातरी एकाला राजा म्हणून निवडत असतात. या राजघराण्यांचा संपूर्ण खर्च सरकार करते. त्यांचा राजप्रासाद आम्ही बाहेरूनच पाहिला, कारण तो आतून पाहण्यास बंदी आहे. वर्षातून एकदाच रमजान ईदच्या दिवशी तो इतरांना पाहण्यास मोकळीक असते. राजप्रासादाच्या बाहेर लाल आणि हिरवा दिवा लावलेला असतो. त्यावरून राजा राजप्रासादात आहे की नाही हे समजते.

येथे प्रश्न असा आहे की, कालबाह्य झालेली अशी राजघराणी टिकवून ठेवण्याची गरज काय? त्यांना त्या देशातील राजकारणात फारसे संवैधानिक अधिकार नाहीत. ते देऊन नाहक बला ओढवून घेण्याचीही गरज नाही. ते केवळ नामधारी वा शोभेच्या बाबी आहेत. समाजविकासात अथवा देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे काही योगदान नाही. अशा परिस्थितीत तेथील राजपुत्र, राजकन्यांचे विवाह सोहळे, राज्याभिषेक, राजपुत्र-राजकन्यांचा जन्म, वेगवेगळ्या ॠतूंतील त्यांच्या वेगवेगळ्या महालांची देखभाल व दुरुस्ती, त्यांचे जगभरचे दौरे, शाही भोजनावळी इत्यादींचा भरमसाठ खर्च कोण करते? तर ज्या त्या देशातील सरकार यांच्या खर्चाची तरतूद करते. सरकार हा खर्च करते म्हणजे सर्वसामान्य जनतेने दिलेल्या करातूनच हा खर्च केला जातो.

हा अनाठायी खर्च आता कशासाठी करायचा? सर्वसामान्य जनतेवर यांच्या खर्चाचा बोजा का म्हणून टाकायचा? सरंजामी काळात समाजाला लागलेल्या या जळवा आजच्या भांडवली काळातही तशाच चालू ठेवणे समाजहिताचे नाही. म्हणूनच भारतातील तमाम राजेरजवाड्यांचे स्वातंत्र्यकाळात बांधून दिलेले तनखे १९७४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बंद करून टाकले. हा त्यांचा एक क्रांतिकारी निर्णय होता. असाच निर्णय राजेशाहीच्या गमजा चालू असलेल्या देशांनी घेण्याची गरज आहे.

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी २५-३० वर्षे ट्रेड युनियनमध्ये काम केले आहे.

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Vivek Date

Wed , 15 May 2019

who are we to comment on the choice of other nations/societies to maintain their royalties and spend THEIR money on that account. What Indira Gandhi did by abolition privy purses was plain wrong. It was a kind of contract of the sovereign nation of India with the royalties in return for their merging with republic of India.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......