मसूद अजहर ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित, भारताच्या प्रयत्नांना अखेर १० वर्षांनी यश
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सुधीर अग्रवाल
  • मसूद अजहर
  • Sat , 04 May 2019
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जैश-ए-मोहम्मद Jaish-e-Mohammed मसूद अजहर Masood Azhar

भारतासह जगातील अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला अखेर ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यात आलं आहे. १ मे रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अजहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यासाठी कोणत्याही एका हल्ल्याचा संदर्भ न घेता सर्व पुराव्यांची माहिती देण्यात आल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं याविषयी सांगितलं की, आम्ही अजहरनं केलेल्या दहशतवादी कारवायांचा बायोडेटा तयार करत नव्हतो. आमचा उद्देश त्याला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करण्याचा होता आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. संयुक्त राष्ट्रमधील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना सांगितलं की, भारतानं कुटनीतीसह सर्व मार्गांचा वापर केला होता, ज्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आम्ही २००९ पासून यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर आम्हाला यश आलं. फ्रान्ससह जागतिक समुदायानं संयुक्त राष्ट्रांच्या या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे.

चीननं गेल्या आठवड्यातच मसूद अझहर प्रकरणी सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. भारताचे परराष्ट्रसचिव विजय गोखले हे चीन दौऱ्यावर गेले होते. त्यांनी चीनला ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी कारवायांचे अधिक पुरावे दिले होते. त्यामुळे चीन नरमला, असं मानलं जातं. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

मात्र हेही तितकंच खरं आहे की, गेल्या १० वर्षांपासून भारताकडून अजहरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू होते. भारतानं पुराव्यांसाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती. मसूदला दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव यापूर्वी दोनदा संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्यात आला होता. मात्र, भारतावर राजकीय कुरघोडी करण्यासाठी व पाकिस्तानला चुचकारण्यासाठी चीननं दोन्ही वेळा नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव हाणून पाडला होता. चीनच्या या भूमिकेनंतरही भारतानं प्रयत्न सुरूच ठेवले होते. अनेक मार्गांनी चीनवर दबाव वाढवण्यात येत होता. अमेरिका, फ्रान्स व ब्रिटननंही चीनवर दबाव वाढवला होता. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतानं पाकिस्तानला बालकोटमध्ये दिलेलं प्रत्युत्तर, या घटनानंतर अनेक देशांनी भारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे चीन एकाकी पडला होता. त्यातच श्रीलंकेतील आत्मघाती स्फोटांनंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आणि चीनला नमतं घेणं भाग पडलं. वाढत्या दबावामुळे चीननं या प्रस्तावातील तांत्रिक अडचण दूर करत मसूदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्याचा मार्ग मोकळा केला असं मानलं जातं.

मसूद अझरवरील भारताला बंदीसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अजहरचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तान प्रायोजित दाहशवादी हल्ले आणि कारवाया यांमुळे त्रस्त आहे. भारतानं जागतिक स्तरावर हा मुद्दा जोरकसपणे मांडत पाकिस्तानला एकाकी पाडलं. या निर्णयामुळे पाकिस्तानचा अस्सल दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. संयुक्त राष्ट्रांनं मसूद अजहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केल्यामुळे आता पाकिस्तानची पळापळ सुरू झाली असून मसूदला भूमिगत करण्याची योजना आखली जात असल्याचं कळतं.

पुलवामामध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या घटनेचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. पुलवामामध्ये रक्तपात झाल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं मसूदच्या नाड्या आवळण्यासाठी प्रस्ताव दिला होता. या उल्लेखावर चीननं नेहमीप्रमाणे आक्षेप घेत पुन्हा एकदा खोडा घातला होता. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्या. या चर्चेनंतर प्रस्तावामधील पुलवामा संदर्भ बाजूला केल्यानंतर चीननं आपला व्हेटो मागे घेतला.

मसूदला घोषित केल्यामुळे काय होईल?

आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे आता मसूद अझरला देश सोडता येणार नाही. त्याचे आर्थिक स्त्रोत बंद केले जातील. मसूद व त्याच्याशी संबंधित  संस्था, संघटना आणि कंपन्यांची बँक खाती सील केली जातील. संयुक्त राष्ट्राचा सदस्य असलेला कुठलाही देश त्याला व्हिसा देणार नाही. अर्थात तो ज्या देशात आहे, त्याच देशात त्याला राहावं लागेल. मसूदला कुठल्याही देशाकडून किंवा देशात शस्त्रास्त्र खरेदी करता येणार नाही. तसंच आता त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे.

दरम्यान, पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी अजहरवर तत्काळ प्रतिबंध लागू करणार असल्याचं सांगितलं आहे. पण त्यांनी हा भारताच्या कुटनीतीचा विजय असल्याचं मानण्यास स्पष्ट नकार दिला. या घटनेशी निगडीत असणाऱ्या जाणकारांनुसार भारतासाठी हा मोठा विजय असला, तरी चीनची भूमिका बदलण्याचं श्रेय अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनाही आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुधीर अग्रवाल प्राध्यापक आहेत.

drsudhiragrawal239@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......