मसूद अजहर ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित, भारताच्या प्रयत्नांना अखेर १० वर्षांनी यश
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सुधीर अग्रवाल
  • मसूद अजहर
  • Sat , 04 May 2019
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जैश-ए-मोहम्मद Jaish-e-Mohammed मसूद अजहर Masood Azhar

भारतासह जगातील अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला अखेर ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यात आलं आहे. १ मे रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अजहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यासाठी कोणत्याही एका हल्ल्याचा संदर्भ न घेता सर्व पुराव्यांची माहिती देण्यात आल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं याविषयी सांगितलं की, आम्ही अजहरनं केलेल्या दहशतवादी कारवायांचा बायोडेटा तयार करत नव्हतो. आमचा उद्देश त्याला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करण्याचा होता आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. संयुक्त राष्ट्रमधील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना सांगितलं की, भारतानं कुटनीतीसह सर्व मार्गांचा वापर केला होता, ज्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आम्ही २००९ पासून यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर आम्हाला यश आलं. फ्रान्ससह जागतिक समुदायानं संयुक्त राष्ट्रांच्या या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे.

चीननं गेल्या आठवड्यातच मसूद अझहर प्रकरणी सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. भारताचे परराष्ट्रसचिव विजय गोखले हे चीन दौऱ्यावर गेले होते. त्यांनी चीनला ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी कारवायांचे अधिक पुरावे दिले होते. त्यामुळे चीन नरमला, असं मानलं जातं. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

मात्र हेही तितकंच खरं आहे की, गेल्या १० वर्षांपासून भारताकडून अजहरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू होते. भारतानं पुराव्यांसाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती. मसूदला दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव यापूर्वी दोनदा संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्यात आला होता. मात्र, भारतावर राजकीय कुरघोडी करण्यासाठी व पाकिस्तानला चुचकारण्यासाठी चीननं दोन्ही वेळा नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव हाणून पाडला होता. चीनच्या या भूमिकेनंतरही भारतानं प्रयत्न सुरूच ठेवले होते. अनेक मार्गांनी चीनवर दबाव वाढवण्यात येत होता. अमेरिका, फ्रान्स व ब्रिटननंही चीनवर दबाव वाढवला होता. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतानं पाकिस्तानला बालकोटमध्ये दिलेलं प्रत्युत्तर, या घटनानंतर अनेक देशांनी भारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे चीन एकाकी पडला होता. त्यातच श्रीलंकेतील आत्मघाती स्फोटांनंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आणि चीनला नमतं घेणं भाग पडलं. वाढत्या दबावामुळे चीननं या प्रस्तावातील तांत्रिक अडचण दूर करत मसूदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्याचा मार्ग मोकळा केला असं मानलं जातं.

मसूद अझरवरील भारताला बंदीसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अजहरचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तान प्रायोजित दाहशवादी हल्ले आणि कारवाया यांमुळे त्रस्त आहे. भारतानं जागतिक स्तरावर हा मुद्दा जोरकसपणे मांडत पाकिस्तानला एकाकी पाडलं. या निर्णयामुळे पाकिस्तानचा अस्सल दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. संयुक्त राष्ट्रांनं मसूद अजहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केल्यामुळे आता पाकिस्तानची पळापळ सुरू झाली असून मसूदला भूमिगत करण्याची योजना आखली जात असल्याचं कळतं.

पुलवामामध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या घटनेचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. पुलवामामध्ये रक्तपात झाल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं मसूदच्या नाड्या आवळण्यासाठी प्रस्ताव दिला होता. या उल्लेखावर चीननं नेहमीप्रमाणे आक्षेप घेत पुन्हा एकदा खोडा घातला होता. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्या. या चर्चेनंतर प्रस्तावामधील पुलवामा संदर्भ बाजूला केल्यानंतर चीननं आपला व्हेटो मागे घेतला.

मसूदला घोषित केल्यामुळे काय होईल?

आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे आता मसूद अझरला देश सोडता येणार नाही. त्याचे आर्थिक स्त्रोत बंद केले जातील. मसूद व त्याच्याशी संबंधित  संस्था, संघटना आणि कंपन्यांची बँक खाती सील केली जातील. संयुक्त राष्ट्राचा सदस्य असलेला कुठलाही देश त्याला व्हिसा देणार नाही. अर्थात तो ज्या देशात आहे, त्याच देशात त्याला राहावं लागेल. मसूदला कुठल्याही देशाकडून किंवा देशात शस्त्रास्त्र खरेदी करता येणार नाही. तसंच आता त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे.

दरम्यान, पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी अजहरवर तत्काळ प्रतिबंध लागू करणार असल्याचं सांगितलं आहे. पण त्यांनी हा भारताच्या कुटनीतीचा विजय असल्याचं मानण्यास स्पष्ट नकार दिला. या घटनेशी निगडीत असणाऱ्या जाणकारांनुसार भारतासाठी हा मोठा विजय असला, तरी चीनची भूमिका बदलण्याचं श्रेय अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनाही आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुधीर अग्रवाल प्राध्यापक आहेत.

drsudhiragrawal239@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......