‘मिरांडा हाऊस’ : रोमांचित करणारा सिनेमा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘मिरांडा हाऊस’ची पोस्टर्स
  • Mon , 22 April 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie मिरांडा हाऊस Miranda House राजेंद्र तलक Rajendra Talak

‘रोमांचित करणारा सिनेमा’ असं विशेषण मोजक्या सिनेमांना लावता येतं. त्याची कारणं साधी आणि सरळ असतात. एक म्हणजे, असा सिनेमा असंख्य शक्यतांची मोठी इमारत उभी करतो. ती करत असताना त्यात कुठेही नीरसपणा नसतो. त्याचबरोबर पुढे काय होईल याचा प्रेक्षकांना अंदाज बांधता यायला नको, याची काळजी दिग्दर्शकानं घ्यायला हवी. ‘रोमांचक कथा’ हा मूळ गाभा असेल तर दिग्दर्शकाच्या कल्पनाविश्वातील भराऱ्यांना कुठल्याही सीमा नसतात. मात्र अशा वेळी दिग्दर्शक आणि पटकथालेखकाची खरी कसोटी लागते. निव्वळ अकाल्पनिक गोष्टींचा भडिमार केला तर सिनेमा आपटल्याशिवाय राहत नाही.

मात्र प्रेक्षकांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज घेऊन निर्माण केलेली कलाकृती त्यांच्या मनात अलगद घर करून जाते. अगदी असाच प्रयत्न दिग्दर्शक राजेंद्र तलक यांनी ‘मिरांडा हाऊस’ या सिनेमाच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी दीर्घ कालावधीनंतर सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचं पटकथालेखनही त्यांनीच केलं आहे.

सिनेमा एका छोट्या वर्तुळात फिरत राहतो आणि कथा संथगतीनं परिघाकडून केंद्राकडे जाते. त्यात येणारे चढउतार संयमी पद्धतीनं हाताळले आहेत. कथेचा एकएक धागा उकलत असताना त्यातली उत्सुकता टिकून ठेवण्याचं काम दिग्दर्शकानं बखूबी पार पाडलं आहे.

या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त दोन व्यक्तिरेखांवर उभा राहिला आहे. शेवटपर्यंत या दोन्ही व्यक्तिरेखा कथेवरची पकड सैल होऊ देत नाहीत. त्यापैकी विक्रम एका प्रसिद्ध चित्रकाराचा मुलगा, तर प्रिया ग्राफिक डिझानर असते. दोघांच्या आयुष्यात काही धक्कादायक गोष्टी घडतात. आयुष्याच्या एका वळणावर त्यांची भेट होते आणि तिथून पुढे सुरू होतो कथेच्या केंद्राकडे जाण्याचा रोमांचित प्रवास. कथा अगदी साध्या विषयाभोवती गुंफलेली आहे. मात्र त्यातलं निखळ मनोरंजन आनंद देऊन जातं. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4782/Lakshaniya-51

.............................................................................................................................................

कथा संथगतीनं पुढे जात असली तरी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांत विस्कळीतपणा नाही. मुख्य म्हणजे कथा आपली लय सोडत नाही. थोड्याफार उणिवा आहेत नाही असं नाही. संथ चालणारी कथा शेवटी अचानक गती पकडते. दिग्दर्शकानं कथेवर घेतलेली मेहनत दिसून येते.

सिनेमा संवाद, पार्श्वसंगीत, अभिनय यावर थोडा तोल गमावतो. अभिनय फार प्रभावी नसला तरी कथेला पुढे घेऊन जातो. साईंकीत कामत आणि पल्लवी शिरके या जोडीनं अभिनयाचा चांगला प्रयत्न केला आहे. मिलिंद गुणाजी मात्र काहीसा अपेक्षाभंग करतात. शेवटी आणि तीही अवघी पाच मिनिटं त्यांची व्यक्तिरेखा पडद्यावर दिसते. त्यामुळे त्यांचा विशेष असा प्रभाव पडत नाही. संवाद फार प्रभावी नाहीत. संवादातल्या ‘गॅप’ आणि ‘रिपीट’ होणारे संवाद यांचा बहुतांश वेळा ताळमेळ बसत नाही. तांत्रिक बाजूचा वापर आवश्यक तिथं योग्य पद्धतीनं करण्यात आला आहे.

सिनेमा केवळ दीड तासाचा असल्यानं ‘हा सिनेमा आहे की लघुपट?’ असा प्रश्न पडतो. मात्र कथा व दिग्दर्शकाच्या मेहनतीमुळे सिनेमा चढ-उतारासहित चांगल्या पद्धतीनं गुंफला गेला आहे. थोडक्यात मनोरंजनाचा ‘धमाका’ म्हणून सिनेमा ठीक आहे. मात्र त्यातल्या छोट्या छोट्या उणिवा दुर्लक्षित कराव्या लागतात. अन्यथा सिनेमा नीरस वाटू शकतो. 

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध)

जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते.......