गुंतवणूकदारांसाठी संत कबीर आणि संत रहीम यांच्या जादूमय शैलीतले दोहे
ग्रंथनामा - झलक
विनायक सप्रे
  • ‘दोहानॉमिक्स’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 08 February 2019
  • ग्रंथनामा झलक दोहानॉमिक्स Dohanomics विनायक सप्रे Vinayak Sapre

गुंतवणूक कशी करावी, कधी करावी, गुंतवणूक करतान काय काळजी घ्यावी, अशा विविध प्रश्नांची उत्तरं संत कबीर आणि संत रहीम यांच्या विचारातून देत गुंतवणूकदारांसाठी चिरंतन कानमंत्र देणारं ‘दोहानॉमिक्स’ हे गुंतवणूक सल्लागार विनायक सप्रे यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. सीनएनबीसी टीव्ही 18 यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला लेखकानं लिहिलेल्या मनोगताचा हा सुधारित, संपादित अंश...

.............................................................................................................................................

भारतीय अर्थव्यवस्था खुली झाल्यावर आपल्या देशात अनेक बदल झाले. या २५-२७ वर्षांत समाजाच्या वर्तणुकीत डोंगराएवडे बदल जाणवले. त्यातील अनेक बदल नकळतपणे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले. ते अंतर्भूत झाल्याचे फारसे कोणाला कळले नाही. या काळात एका पिढीच्या विचारपद्धतीत झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे.

सर्वांत मोठ्या बदलांमधील एक म्हणजे समाजाची खर्च करण्याची पद्धत. सण आणि लग्नसराई सोडल्यास भारतीय लोक हात राखूनच खर्च करतात, तसेच गुंतवणुकीचे प्रमाणही कमीच. मागील २७ वर्षांत आमूलाग्र बदल खर्च करण्याच्या पद्धतींमध्ये दिसून आले आहेत. ऐशोरामाच्या वस्तूंचे रातोरात गरजांमध्ये परिवर्तन झाले. पहिल्या १५-१६ वर्षांत भरपूर प्रमाणात पगारवाढ झाली. ज्यामुळे खर्च करण्याची ताकद वाढली. त्याच वेळी व्याजदर कमी झाले आणि गाड्या, घरांपासून प्रवासाच्या तिकिटांपर्यंत सर्व काही कर्जावर मिळायला लागले. आज कपडेही मासिक हप्त्यांवर मिळतात.

‘आज विकत घ्या, उद्या पैसे द्या’ ही विचारसरणी तरुण पिढीच्या मनात पटकन झिरपली. उच्च पगार आणि कमी व्याजदर यांनी आगीत इंधन ओतले. तथापि, हे सगळे घडत असताना, अजून एक मोठा बदल घडला. तो म्हणजे या झगमगाटीत त्या पिढीवरचे आप्तेष्टांकडून येणारे दबाव. प्रतेयक क्षेत्रात आव्हाने कैकपटीने वाढली. दिलेले कर्तव्य पूर्ण करा किंवा मरा हा मंत्र सर्वांच्या मुखी होता, ज्यामुळे तणाव वाढले. विभक्त कुटुंबातील आणि छंद जोपासण्यातील वेळेच्या अभावामुळे लोकांनी खरेदी हाच उपचार, याचा शोध लावला.

हे सर्व खर्चांच्या बाजूला बदल होत असताना गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेमध्ये फारसे बदल दिसत नव्हते. आर्थिक साक्षरतेबाबत कोणीच फारशी पावले उचलताना दिसले नाही. नियामक मंडळांच्या स्थापना झाल्या, पण वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वेगवेगळे नियम असल्याकारणाने गुंतवणूकदार अधिक गोंधळून गेले.

म्युच्युअल फंड लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्दैवाने पहिल्या २० वर्षांत त्यापैकी बहुतेक त्यांची गुणवत्ता दाखवण्यात मग्न होते. ज्यामुळे उत्पादनाच्या खऱ्या लाभापेक्षा त्यातील लोभाची विक्री जास्त झाली. गेल्या पाच वर्षांत त्यांना हे जाणवले आहे की, बाजारात वेगळेपण सिद्ध करण्यासाठी म्युच्युअल फंड हे काहीतरी मिळवण्यासाठीचे उपाय असलेले उत्पादन आहे, असे सांगण्याची, पटवून देण्याची गरज आहे.

संकल्पना म्हणून म्युच्युअल फंडची जन्मभूमी ही सातासमुद्रापारची असल्याने त्यातील अनुभवाचे बोल हे वैश्विक स्वरूपाचे आहेत. म्हणजेच सर्व उदाहरणे, म्हणी या परदेशी आहेत. ज्या आपल्या देशातील गुंतवणूकदार आणि सल्लागार यांच्याशी फारशी काही आपुलकी बाळगत नाहीत. त्यामुळेच २७ वर्षांनंतरही म्युच्युअल फंडाकडे अनोखे उत्पादन म्हणून पाहिले जाते. अत्याधुनिक गुंतवणूकदारांसाठीचे वैश्विक स्वरूपाचे उत्पादन म्हणून त्याची ओळख केली जाते.

त्यामुळे मला या सगळ्याला भारतीय अवतार देण्याचे सुचले. म्युच्युअल फंडाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यातील संदर्भ आणि दळणवळण मातीशी जोडलेले असावे असे जाणवले. ज्या देशावर अनेक संत-महात्म्यांनी संस्कार केले, त्यात दोन संत हेरणे अवघड नव्हते, ज्यांना सर्व जाती-धर्म आणि विचारवंतांमध्ये मान असेल. हे दोन ज्ञानी म्हणजे संत कबीर आणि संत रहीम. दोघेही विशेषत: संत कबीर, उत्तम निरीक्षक होते. त्यांनी संपूर्ण उत्तर भारताचे भ्रमण केले. त्यांचे दोहे शिखांच्या आदी ‘ग्रंथसाहिब’मध्येही नमूद केलेले आहेत. हलाखीच्या दिवसात वाढलेले असतानाही संत कबीर यांना समाजाच्या विचारसरणींना आव्हान देता आले.

उत्पन्नावरील परताव्यांपेक्षा (रिटर्न्स), जे गुंतवणुकीच्या यशात मोठी कामगिरी बजावतात, गुंतवणूकदारांची पैशांच्या बाबतीतील वर्तणुकीमुळे कसे फरक पडतात हा संदेश मी देऊ इच्छितो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे जरी म्युच्युअल फंड नि उच्च परतावे दिले असतील तरी बोटांवर मोजता येतील एवढ्याच गुंतवणूकदारांनी अनुषंगिक पैसा कमवला. आणि हाच संदेश पोचवण्यासाठी संत कबीर आणि संत रहीम यांनी आपल्या जादूमय शैलीत दोहे लिहून माझे काम खूप सोपे केले.

.............................................................................................................................................

'दोहानॉमिक्स' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4721/Dohanomics

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......