वाचलीच पाहिजेत अशी काही पुस्तकं - भाग १
ग्रंथनामा - झलक
टीम अक्षरनामा
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 01 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक

‘अक्षरनामा’वर दर शुक्रवारी मराठी पुस्तकांची परीक्षणे, त्यातील काही भाग किंवा संबंधित लेखकांच्या मुलाखती प्रकाशित होतात. जानेवारी २०१८ या महिन्यात ‘अक्षरनामा’वर आलेल्या पुस्तकांविषयी...

.............................................................................................................................................

1) तोपर्यंत साने गुरुजी नव्या पिढीच्या पालक आणि शिक्षकांना हाकारत राहतीलचहेरंब कुलकर्णी

आज काळ तंत्रज्ञानाचा आहे. मग साने गुरुजी या पिढीला आपले वाटतील का? असं अनेक जण विचारतात. शाळा डिजिटल होताहेत. पण तरीही ‘मुलांवर प्रेम करण्याचं’ कोणतंही सॉफ्टवेअर येत नाही व ‘करुणा’ हे मूल्य अजूनही कोणत्याही वेबसाइटवरून डाउनलोड करता येत नाही. तोपर्यंत साने गुरुजी नव्या पिढीच्या पालक आणि शिक्षकांना हाकारत राहतीलच.......

शिक्षकांसाठी साने गुरुजी​ - हेरंब कुलकर्णी, ​मनोविकास प्रकाशन​, पुणे​, मूल्य​ -​ १६० रुपये​.​

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4341

.............................................................................................................................................

2) सुधारकांची परंपरा टिकवून ठेवण्याचं कार्य करणाऱ्या महात्म्याचं दर्शनप्रा. लतिका जाधव

शिंदे अखेरपर्यंत ब्राह्मोसमाज व सत्यशोधक समाज यांच्या तत्त्वांना महत्त्व देत होते. त्यांच्या रूपानं व्रतस्थ जीवन जगणाऱ्या विचारवंत व सुधारकांची परंपरा टिकवून ठेवण्याचं कार्य करणाऱ्या महात्म्याचं दर्शन हा लेखसंग्रह घडवतो. या पुस्तकाच्या वाचनातून तत्कालीन सुधारणावादी, धार्मिक व राजकीय घटनांचं स्पष्टीकरण होतं. या पुस्तकाची परिशिष्टं अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करताना दिसतात.......

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग २) - रा. ना. चव्हाण, संपादक व प्रकाशक - रमेश चव्हाण, पुणे, मूल्य – ४५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4340

.............................................................................................................................................

3) महेशच्या कविता पोस्टमॉडर्न आहेत, तर प्रसादच्या गोष्टी अस्स्ल देशी वाणाच्या गावठी दारूसारख्या - जयंत पवार

महेशच्या कविता उत्तरआधुनिक किंवा पोस्टमॉडर्न आहेत, तर प्रसादच्या गोष्टी या अस्स्ल देशी वाणाच्या गावठी दारूसारख्या आहेत. 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या प्रसाद कुमठेकरच्या बारक्या गोष्टींचा पैस एका लघुकादंबरीचं अस्तित्व धारण करतो, असं माझं निरीक्षण आहे. आजच्या काळाचे गुंते मांडण्यासाठी नव्या भाषेच्या शोधात असलेल्या कवींपैकी महेश लीला पंडित हा एक आहे, हे तुम्हाला 'चष्मांतरे' वाचताना जाणवल्यावाचून राहात नाह.......

'चष्मांतरे' - महेशलीलापंडित, पार प्रकाशन, मुंबई, मूल्य - १६० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4338

.......

'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' - प्रसाद कुमठेकर, पार प्रकाशन, मुंबई, मूल्य - १८० रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा - 

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4339

.............................................................................................................................................

4) ‘बोरीभडकच्या चिकनमातीने वास्तवाचे भान आणले !’ – कल्पना दुधाळ

‘सिझर’च्या वेळी कविता नेमकी का असते, हे मला फार माहीत नव्हतं. परंतु ‘धग’च वेळी आपण कविता लिहितो, याची पुरेपूर जाणीव मला होती. टेंभुर्णीतल्या दगडाधोंड्यातल्या पायवाटांवरची चिकनमाती पुण्यातल्या रस्त्यांवर गळून पडली आणि पुन्हा बोरीभडकच्या चिकनमातीने चटके देत वास्तवाचे भान आणले. कवितेतला प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ याला काहीतरी अर्थ आहे.......

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4328

.............................................................................................................................................

5) ‘कहाणी पाचगावची’ ही फक्त एका गावाची गोष्ट नाही... - मिलिंद बोकील

‘कहाणी पाचगावची’ हे आधुनिक राज्यशास्त्र आहे. ‘स्वराज्य’ ही काही जुनाट संकल्पना नाही. ती खरे तर अति-आधुनिक संकल्पना आहे. शहरातले मध्यमवर्गीय लोक या संकल्पनेला पूर्ण पारखे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व कळत नाही. खरं तर ७३व्या आणि ७४व्या घटनादुरुस्तीचा हाच उद्देश आहे, पण आपण तो प्रत्यक्षात आणलेला नाही. प्रतिनिधींच्या हातात सत्ता सोपवून आपण लोकशाहीचे विडंबन हताशपणे बघत बसलेलो आहोत.......

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4345

.............................................................................................................................................

6) अँडरसनची विलक्षण दृष्टी साध्यासुध्या गोष्टींमध्ये साहस आणि अचाटपण शोधते - चैताली भोगले

अँडरसनला उथळपणाचा त्याला भारी राग. अशा गोष्टींना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्यांची तो आपल्या गोष्टींमधून पदोपदी खिल्ली उडवताना दिसला. मग ती गोष्ट धर्माची असो, कलेची किंवा हुशारीची. नायटिंगेलच्या गोष्टीमध्ये राजाचा उत्तराधिकारी बुलबुलच्या शोधात निघतो, तेव्हा गायीच्या हंबरण्याला आणि बेडकाच्या डराव डराव करण्यालाच तो बुलबुलचा आवाज समजतो.......

‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Nilesh Pashte

Thu , 02 August 2018

test


Sourabh suryawanshi

Tue , 05 June 2018

यात "च" कशासाठी? वाचली पाहिजेत अशी असती तर आवडलं असतं! उगीच नको तेथे हेकेकोर पणा करायचा. सर्व प्रकारच्या विचारधारेचे पुस्तकं वाचून जे मानवतेला पूरक आहेत ते विचार निवडण्याचे स्वातंत्र्य असुदे की वाचकांना!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......