‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’चे मुखपृष्ठ
  • Fri , 08 December 2017
  • ग्रंथनामा Granthnama अभय टिळक Abhay Tilak नोटबंदी Demonetization राम जगताप Ram Jagtap नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक Notabandi - Arthkranti ki Aarthik ghodchuk?

गेल्या वर्षभरात नोटबंदीचा ‘अक्षरनामा’ने सातत्याने पाठपुरावा केला. त्यातील निवडक लेखांचे ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ या नावाने फेब्रुवारी २०१७ मध्ये पुस्तकही प्रकाशित केले. ८ नोव्हेंबर रोजी ‘अक्षरनामा’ने ‘वर्षपूर्ती की वर्षश्राद्ध?’ या नावाने विशेषांक प्रकाशित केला. त्यातील सहा लेखांचा समावेश या सुधारित आवृत्तीमध्ये केला आहे. त्याशिवाय आणखी एक लेखही घेतलेला आहे. शिवार वाचकांच्या सोयीसाठी संपूर्ण पुस्तकाची पुनर्रचना केली आहे. या आवृत्तीच्या निमित्ताने...

.............................................................................................................................................

८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून चलनातून ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बाद केल्या. आणि तेव्हापासूनच कामधाम, झोप, जेवण-खाण सोडून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योजक, नोकरदार वर्ग यांना पुढचे तीनेक महिने बँका आणि एटीएमच्या रांगांमध्ये तिष्ठत उभं राहावं लागलं. त्यात काहींना आपला जीवही गमवावा लागला. मात्र त्याच वेळी ‘मोदी यांच्या कारकिर्दीतला एक ऐतिहासिक निर्णय’ म्हणून या घटनेवर अर्थतज्ज्ञांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत आणि पत्रकारांपासून शेतीतज्ज्ञांपर्यंत अनेकांनी विविध अंगांनी चर्चा केली.

सप्टेंबर २०१७ भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या वार्षिक अहवालात नोटबंदीमुळे जवळपास ९० टक्के जुन्या नोटा परत आल्या असल्याचं नमूद केलं आणि परत नोटबंदीच्या फोलपणाची चर्चा सुरू झाली. भाजप सरकारनं तेव्हा नोटबंदीच्या निमित्तानं केलेले दावे आणि भाजपसमर्थक सध्या करत असलेले दावे, हे पाहून प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदौरी यांच्या एका कवितेची आठवण होते. तिची पहिली ओळ अशी आहे - ‘झुठोंने झुठोंसे कहा, की सच बोलो!’

नोटबंदी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि सरकारमधील इतर मंत्री, खासदार यांनी केलेले दावे आणि नोटबंदीचे समर्थक अर्थतज्ज्ञ यांनी वर्तवलेली भाकितं कोणती होती, या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योजक, नोकरदार वर्ग यांच्यावर नेमका काय परिणाम झाला, याचा ‘अक्षरनामा’नं सातत्यानं पाठपुरावा करून त्यावर वेगवेगळ्या लेखकांचे लेख छापले. त्यातील निवडक लेखांचं ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ या नावानं फेब्रुवारी महिन्यात पुस्तकही प्रकाशित केलं.

कालच्या ८ नोव्हेंबरला नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाले. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी भारतीय चलनातून ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला, तेव्हा ते देशाला सांगत होते की, फक्त ५० दिवस कळ काढा, पुढे सगळे सुरळीत होईल. पण ५० चे १००, १०० चे २०० आणि २०० चे ३६५ दिवस झाले, तरी नोटबंदीचे फायदे काही दिसायला तयार नाहीत. मात्र, मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१७ हा नोटबंदीचा पहिला वाढदिवस ‘अँटी ब्लॅक मनी डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन करून नोटबंदीचे समर्थनच केले.

नोटबंदीने भारतीय अर्थव्यवस्था, उद्योग यांना फटका बसलाच, पण सर्वांत मोठी किंमत मोजावी लागली ती रिझर्व बँकेला. तिची विश्वासार्हता पूर्णपणे धोक्यात आली. केंद्र सरकारने आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी रिझर्व बँकेची विश्वासार्हता पणाला लावली.

कुठलेच सरकार आपल्या चुका सहजासहजी कबूल करत नसते. मोदी सरकारने नोटबंदीबाबत तेच केले. पण गेल्या वर्षभरात या निर्णयाची चिकित्सा तज्ज्ञांनी आपापल्या परीने केली. ‘अक्षरनामा’ने या विषयाचा सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला. त्यातील निवडक लेखांचे फेब्रुवारी २०१७ मध्ये पुस्तकही प्रकाशित केले. बरोबर ७ नोव्हेंबर २०१७ रोजी या पहिल्या आवृत्तीची शेवटची प्रत विकली गेली. ८ नोव्हेंबर रोजी ‘अक्षरनामा’ने ‘वर्षपूर्ती की वर्षश्राद्ध?’ या नावाने विशेषांक प्रकाशित केला. त्यातील सहा लेखांचा समावेश या सुधारित आवृत्तीमध्ये केला आहे. त्याशिवाय आणखी एक लेखही घेतलेला आहे. शिवाय वाचकांच्या सोयीसाठी संपूर्ण पुस्तकाची पुनर्रचना केली आहे. त्यामुळे नोटबंदीच्या सर्व बाजू सहजपणे समजावून घ्यायला मदत होईल.

या नव्या आवृत्तीचेही वाचक स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

.............................................................................................................................................

अनुक्रम

वृतान्त-निरीक्षणे

कालच्या ‘सर्जिकल स्टाईक’नंतर झोप लागली का? । माधव लहाने

खूप लोक ‘नोटा’कुटीला आले! । राम जगताप

मला असे प्रश्न पडले म्हणजे माझं देशावर प्रेम नाही का? । अमिता दरेकर

चिखलठाण्याची रोकडरहित अर्थव्यवस्था । पी. साईनाथ (अनु. अजित वायकर)

नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थकारण ठप्प, तरी रहा गप्प! । आनंद शितोळे

शेतकऱ्याने जगावं की, मरावं? की आहे तसंच खितपत पडावं? । प्रवीण तोरडमल

नोटबंदीचे भूत । पार्थ एम. एन. (अनु. प्रज्वला तट्टे) 

संसदेत नोटकोंडी आणि सामान्यांचा ‘मनी’कल्लोळ । कलिम अजीम 

कॅशलेस समाज

कॅशलेस होण्यामुळे करचोरी बंद होत नाही । रवीश कुमार (अनु. टीम अक्षरनामा)

भारत करा ‘कॅशलेस’! । महेश सरलष्कर

काळा पैसा, अर्थहीन क्रांती आणि कॅशलेस सोसायटी । आनंद शितोळे

निश्चलनीकरणाचा निर्णय तुघलकी ठरू नये इतकंच! । डॉ. मंदार काळे आणि अ‍ॅड. राज कुलकर्णी

विश्लेषण

पैशांसाठी आम्हां फिरविशी दाही दिशा... । प्रकाश बुरटे

मोदींचा देशांतर्गत ‘सर्जिकल स्ट्राईक’, ८२ ठार! । कॉ. भीमराव बनसोड

पैसा कुठे आणि कसा छापला जातो? । प्रकाश बुरटे

भाष्य

नोटबंदीची महाशोकांतिका । डॉ. मनमोहन सिंग (अनु. अजित वायकर)

मोदी सरकारचा फसलेला साहसवाद । अभय टिळक

मोदींची अर्धीमुर्धी साफसफाई । महेश सरलष्कर

डोंगर पोखरून उंदीर काढणार? । विनोद शिरसाठ

माणसे काय, नोटांच्या रांगेतही मरतात! । राम जगताप

वर्षपूर्ती की वर्षश्राद्ध?

नोटबंदीचा फसलेला ‘महायज्ञ’! । महेश सरलष्कर

नोटबंदी : एका वर्षानंतर । माधव दातार

निश्चलनीकरणाच्या यशापयशाचा लेखाजोखा । विश्वजित कदम

दुर्बल अर्थव्यवस्थेवरील अनावश्यक ‘सर्जिकल स्ट्राईक’! । टी. के. जयरामन आणि भानू प्रकाश (अनु. प्रज्वला तट्टे)   

सुनील आणि अनिल । लोकेश शेवडे

‘राष्ट्रवादाचे प्रयोग’ व्हाया नोटबंदी । महेश सरलष्कर

.............................................................................................................................................

नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप

पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.

ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’विषयी दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये वैभव वझे यांनी लिहिलेले परीक्षण वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - कॅशलेशचे गांभीर्य - वैभव वझे, २१ मे २०१७

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......