अश्रूंच्या बहारदार फसलीवर निसर्गाचं नवं व्याकरण लिहिणारा कवी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
महेंद्र कदम
  • ‘निद्रानाशाची रोजनिशी’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 25 August 2017
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras निद्रानाशाची रोजनिशी Nidranashachi Rojnishi महेश दत्तात्रय लोंढे Mahesh Dattatray Londhe

सार्त्र, काम्यू, काफ्का, किर्केगार्द आदी अस्तित्ववाद्यांनी मानवी अस्तिवाचा अर्थ शोधताना मानवाचं रूपांतर किटकात झालं असल्याचं भान व्यक्त करताना त्याच्या अर्थशून्यतेचा नवा प्रत्यय जगाला आणून दिला. मराठीत मर्ढेकरांनी मानवाचं मुंगीत रूपांतर झाल्याचं भान दिलं; तर नेमाड्यांच्या सांगवीकरनं आपण आपल्याभोवती स्वत:च कोश विणत आपला कोसला झाला असल्याचं जाहीर केलं. तर अलीकडे लेखकाचा मृत्यू जाहीर करून वाचकांना केंद्रस्थानी आणलं आहे. अशा एका मोठ्या टप्प्यावर येऊन थांबलेल्या आणि अर्थशून्य झालेल्या मानवाचं अस्तित्व तरीही चिरंतन आहे. अशा अस्तित्वाचं काय करायचं हा खरा प्रश्न आजच्या कलावंतापुढं आहे. आणि हा प्रश्न महेश लोंढेपुढेही आहे. तो प्रश्न नोंदवताना लिहितो-

आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर 
चालत नाही 
निसर्गाचे कुठलेही घड्याळ 
आपण डोळे झाकल्याने 
कुठेच होत नाही रात्र अन्
उघडल्याने नाही उगवत कुठला दिवस 
शेवटी जेव्हा उडून जातो आपला प्राण 
तेव्हा त्याला कुणीही म्हणणार नाही महानिर्वाण

मानवाच्या या अर्थशून्यतेचेभान महेशला असल्यामुळेच तो ‘निद्रानाशाची रोजनिशी’ लिहायला बसला आहे. मानवाचं एकूण जगणं भयावह, कृत्रिम आणि वेगवान झाल्यामुळं आणि अशा या वेगवान जगण्याला दिशाहीन करणाऱ्या धर्मांध, मूलतत्त्ववादी शक्ती वेगानं डोकं वर काढून सबंध अस्तित्वालाच घेरून टाकू लागल्या आहेत. अशा या काळात आपलं स्वत्व जपणं आणि आपल्या अस्तित्वाला या व्यवस्थेत ओतून ठामपणे उभं राहणं मुश्कील बनत चाललेलं असताना महेशची कविता या अर्थशून्यतेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न करते, हे त्याच्या कवितेचं महत्त्वाचं लक्षण आहे.

अलीकडच्या काळात केवळ आशयावर भिस्त ठेवून आणि प्रचारकी भूमिकेला बळी पडत चाललेल्या कवितेच्या अवकाशात महेशची ही कविता उठून दिसणारी आहे. आशयाच्या पलीकडे जाऊन, भाषेवर ताबा मिळवून, तो आशय रूपामध्ये ट्रान्स्फर करण्याची क्षमता बाळगणारी ही कविता अस्तित्वाच्या अर्थशून्यतेला अर्थपूर्ण बनवू पाहते. ही अर्थपूर्णता नकाराऐवजी सकारात्कतेकडे घेऊन जाणारी आहे. ही सकारात्मकता शोधताना कवी मानवाच्या निसर्गाशी असलेल्या आदिम नात्याचा नवा अन्वयार्थ लावताना लिहितो-

खिडकीकडे पाठ करून पाखरांकडे द्यायचेत वृक्ष 
पाखरं येतील वाळवंट खातील तेव्हा 
कुथल्या तरी कीटकाला भर उन्हात मिळालेला असेल मोक्ष 
खुल्या अंगणात पालथ्याने चांदण्यांकडे ठेवायचेय लक्ष 
झोप लागेल जाग यईल तेव्हा रात्रीचा कदाचित असेल 
भरून आलेला वक्ष

आजच्या संभ्रमित वर्तमानाला शब्दबद्ध करताना महेश भाषेची मोडतोड करतो. भाषेला वाकवून स्वत:ची भाषा तयार करताना दिसतो. त्यासाठी तो निसर्गाची वेगळी भाषा बोलतो. परंपरेचं पुनर्वाचन करतो. तसंच तिचं विरूपीकरण करताना आपल्या अस्तित्वाचे रंग भरत जातो आणि स्वत:चा असा नवा अन्वय त्याला देतो.

एकूणच आपली स्वत:ची वेगळी शैली आणि नवी ओळ्ख निर्माण करणारी ही मराठीतली महत्वाची कविता आहे.


निद्रानाशाची रोजनिशी - महेश दत्तात्रय लोंढे

बारलोणी बुक्स,पाने - ९०, मूल्य - १२० रुपये.

 पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3998

.............................................................................................................................................

लेखक विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

mahendrakadam27@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......