अश्रूंच्या बहारदार फसलीवर निसर्गाचं नवं व्याकरण लिहिणारा कवी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
महेंद्र कदम
  • ‘निद्रानाशाची रोजनिशी’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 25 August 2017
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras निद्रानाशाची रोजनिशी Nidranashachi Rojnishi महेश दत्तात्रय लोंढे Mahesh Dattatray Londhe

सार्त्र, काम्यू, काफ्का, किर्केगार्द आदी अस्तित्ववाद्यांनी मानवी अस्तिवाचा अर्थ शोधताना मानवाचं रूपांतर किटकात झालं असल्याचं भान व्यक्त करताना त्याच्या अर्थशून्यतेचा नवा प्रत्यय जगाला आणून दिला. मराठीत मर्ढेकरांनी मानवाचं मुंगीत रूपांतर झाल्याचं भान दिलं; तर नेमाड्यांच्या सांगवीकरनं आपण आपल्याभोवती स्वत:च कोश विणत आपला कोसला झाला असल्याचं जाहीर केलं. तर अलीकडे लेखकाचा मृत्यू जाहीर करून वाचकांना केंद्रस्थानी आणलं आहे. अशा एका मोठ्या टप्प्यावर येऊन थांबलेल्या आणि अर्थशून्य झालेल्या मानवाचं अस्तित्व तरीही चिरंतन आहे. अशा अस्तित्वाचं काय करायचं हा खरा प्रश्न आजच्या कलावंतापुढं आहे. आणि हा प्रश्न महेश लोंढेपुढेही आहे. तो प्रश्न नोंदवताना लिहितो-

आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर 
चालत नाही 
निसर्गाचे कुठलेही घड्याळ 
आपण डोळे झाकल्याने 
कुठेच होत नाही रात्र अन्
उघडल्याने नाही उगवत कुठला दिवस 
शेवटी जेव्हा उडून जातो आपला प्राण 
तेव्हा त्याला कुणीही म्हणणार नाही महानिर्वाण

मानवाच्या या अर्थशून्यतेचेभान महेशला असल्यामुळेच तो ‘निद्रानाशाची रोजनिशी’ लिहायला बसला आहे. मानवाचं एकूण जगणं भयावह, कृत्रिम आणि वेगवान झाल्यामुळं आणि अशा या वेगवान जगण्याला दिशाहीन करणाऱ्या धर्मांध, मूलतत्त्ववादी शक्ती वेगानं डोकं वर काढून सबंध अस्तित्वालाच घेरून टाकू लागल्या आहेत. अशा या काळात आपलं स्वत्व जपणं आणि आपल्या अस्तित्वाला या व्यवस्थेत ओतून ठामपणे उभं राहणं मुश्कील बनत चाललेलं असताना महेशची कविता या अर्थशून्यतेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न करते, हे त्याच्या कवितेचं महत्त्वाचं लक्षण आहे.

अलीकडच्या काळात केवळ आशयावर भिस्त ठेवून आणि प्रचारकी भूमिकेला बळी पडत चाललेल्या कवितेच्या अवकाशात महेशची ही कविता उठून दिसणारी आहे. आशयाच्या पलीकडे जाऊन, भाषेवर ताबा मिळवून, तो आशय रूपामध्ये ट्रान्स्फर करण्याची क्षमता बाळगणारी ही कविता अस्तित्वाच्या अर्थशून्यतेला अर्थपूर्ण बनवू पाहते. ही अर्थपूर्णता नकाराऐवजी सकारात्कतेकडे घेऊन जाणारी आहे. ही सकारात्मकता शोधताना कवी मानवाच्या निसर्गाशी असलेल्या आदिम नात्याचा नवा अन्वयार्थ लावताना लिहितो-

खिडकीकडे पाठ करून पाखरांकडे द्यायचेत वृक्ष 
पाखरं येतील वाळवंट खातील तेव्हा 
कुथल्या तरी कीटकाला भर उन्हात मिळालेला असेल मोक्ष 
खुल्या अंगणात पालथ्याने चांदण्यांकडे ठेवायचेय लक्ष 
झोप लागेल जाग यईल तेव्हा रात्रीचा कदाचित असेल 
भरून आलेला वक्ष

आजच्या संभ्रमित वर्तमानाला शब्दबद्ध करताना महेश भाषेची मोडतोड करतो. भाषेला वाकवून स्वत:ची भाषा तयार करताना दिसतो. त्यासाठी तो निसर्गाची वेगळी भाषा बोलतो. परंपरेचं पुनर्वाचन करतो. तसंच तिचं विरूपीकरण करताना आपल्या अस्तित्वाचे रंग भरत जातो आणि स्वत:चा असा नवा अन्वय त्याला देतो.

एकूणच आपली स्वत:ची वेगळी शैली आणि नवी ओळ्ख निर्माण करणारी ही मराठीतली महत्वाची कविता आहे.


निद्रानाशाची रोजनिशी - महेश दत्तात्रय लोंढे

बारलोणी बुक्स,पाने - ९०, मूल्य - १२० रुपये.

 पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3998

.............................................................................................................................................

लेखक विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

mahendrakadam27@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......