वाचन जागर महोत्सव : पुस्तकांकडून पुस्तकांकडे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • वाचन जागर महोत्सव - ५ ते १५ ऑगस्ट, पुणे
  • Sun , 13 August 2017
  • ग्रंथनामा Booksnama वाचणारा लिहितो वाचन जागर महोत्सव Vachan Jagar Mahotsav वाचन-संस्कृती Reading Culture वाचक-समाज Reading Class

‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हटले जाते ते सार्थ अभिमानानेच. इतर अनेक गोष्टींप्रमाणे पुणे शहर मराठी पुस्तक प्रकाशनाबाबतही आघाडीवर आहे. केवळ एवढेच नव्हे तर पुणे ही ‘मराठी प्रकाशन व्यवसायाची राजधानी’ आहे, असे सार्थ अभिमानाने म्हणता येईल. त्यामुळे पुस्तकांबाबतच्या जवळपास सर्व अभिनव कल्पनांचा उगमही पुण्यातच होतो, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरू नये. पुण्यातील प्रकाशक, त्यांची पुस्तके, त्यांचे विषय, त्या पुस्तकांच्या जाहिराती, त्याविषयीच्या सवलत योजना, याविषयी रसिक वाचकांना नव्याने सांगण्याची गरज नाही.

अशा या पुण्यनगरीत मराठीमध्ये पहिल्यांदाच आठ प्रकाशक, पुस्तकविक्रेते आणि काही लेखक यांनी एकत्र येऊन ‘वाचन जागर महोत्सव’ ही अभिनव संकल्पना राबवण्याचे ठरवले. ५ ऑगस्टपासून पुण्यातील आठ ग्रंथदालनांमध्ये हा महोत्सव सुरू आहे. त्याला रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. रोज वेगवेगळ्या लेखकांशी संवाद, गप्पा यांमुळे या महोत्सवातली गंमत दिवसेंदिवस वाढते आहे. शिवाय राजहंस, मॅजेस्टिक, रोहन, मनोविकास, डायमंड, समकालीन, साधना आणि ज्योत्स्ना या आठ प्रकाशनांची विविध पुस्तके तब्बल २५ टक्के सवलतीत विकत घेता येतात. याशिवाय भाग्यवान वाचक योजना ही आकर्षक स्पर्धाही ठेवलेली आहे.

वाचक रसिकांसाठी या महोत्सवात तीन प्रमुख आकर्षणे आहेत -

हा वाचन महोत्सव पुण्यात कुठे कुठे सुरू आहे, त्याचा हा तपशील. या महोत्सवाचे उदघाटन ज्या मान्यवरांच्या हस्ते झाले, त्याची माहिती. या ठिकाणी रोज संध्याकाळी तुम्हाला नव्या लेखकाला भेटण्याची संधी मिळते आहे -

तुम्हाला अधिक याशिवाय तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तुम्हाला हवी असलेली पुस्तके तुमच्या जवळच्या ठिकाणी उपलब्ध आहेत ना, याची खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही पुढील ठिकाणे आणि दूरध्वनी क्रमांक यांच्यावर संपर्क साधू शकता -

हा महोत्सव १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

हल्ली ‘वाचन-संस्कृती’ (Reading Culture) बरंच काही काळजीयुक्त स्वरात बोललं जातं. या वाचन-संस्कृतीचं भवितव्य समाजाच्या धारणेवर अवलंबून असतं. जो समाज आपल्या भौतिक-सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नयनासाठी ज्ञानाचा मार्ग अनुसरतो, त्या समाजातील वाचन-संस्कृतीचं भवितव्य उज्ज्वल राहतं. जो समाज भौतिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ज्ञानाशिवायचे मार्ग अवलंबतो, त्या समाजातील वाचन-संस्कृती ही अस्तंगत होऊ लागते. आणि अशी वाचन-संस्कृती अस्तंगत होऊ घातलेला समाज ज्ञाननिर्मिती, तिचा आदर करेनासा होता. परिणामी त्याची भौतिक प्रगती होत राहते, पण तो सांस्कृतिक-बौद्धिकदृष्ट्या कुपोषित होऊ लागतो.

‘वाचन-संस्कृती’ म्हणजे काय?

‘जो समाज सांस्कृतिक सक्षमता आणि आर्थिक यशासाठी पुस्तक-वाचनाची क्षमता आणि सराव ही अनिवार्य गरज मानतो, तो ‘वाचन-संस्कृती’ असलेला समाज म्हणून ओळखला जातो,’ अशी एक व्याख्या प्रा. वेंडी ग्रिसवोल्ड यांनी केली आहे. त्या पुढे असेही म्हणतात की-‘वाचन-संस्कृती प्रस्थापित होण्यासाठी ढोबळ पण थेट सबंध असतो तो नोकरीतील प्रतिष्ठा आणि त्यासाठी आवश्यक असलेले वाचन यांचा.’

इथं हे लक्षात घ्यायला हवं की, केवळ बुद्धिजीवी वर्गाच्या नोकरीतील प्रतिष्ठा आणि त्यासाठी त्यांना करावं लागणारं वाचन, ग्रिसवोल्ड यांना अभिप्रेत नाही. एकंदर समाजातील सर्व घटकांमधील व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नोकरीसाठी अत्यावश्यक असणारं वाचन अभिप्रेत आहे.

“सुसंस्कृत, सुशिक्षित समाजात साहित्य, संगीत, ललितकला आणि वैचारिक व वैज्ञानिक शास्त्रे याविषयी विचार करून, इतरांना विचार करायला लावणारी संस्कृती म्हणजे ‘वाचन-संस्कृती’ होय” अशीही एक व्याख्या प्राध्यापक-समीक्षक राजशेखर शिंदे करतात. ते म्हणतात की- “वाचन व्यक्तिगत पातळीवरून गटपातळीवर, गटपातळीवरून समाजपातळीवर, समाजपातळीवरून सांस्कृतिक परंपरेत सामील होत असेल तर त्याला ‘वाचन-संस्कृती’ म्हणता येईल.” संस्कृती ही समान रीतीरिवाजांच्या समूहात घडत असते. ती घडते तेव्हा मानवी समूहाचं उत्थान झालेलं असतं. वाचन-संस्कृतीमुळे समाजमनाचं उन्नयन होतं.

‘वाचन जागर महोत्सव’ हा उन्नयनाचाच एक भाग आहे.

त्यामुळे त्वरा करा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही या महोत्सवाला हजेरी लावू शकता. तेथील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता. आणि तुम्हाला आवडलेली पुस्तकेही भरपूर सवलतीमध्ये विकत घेऊ शकता.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......