शुद्धीकरण कृतीत उतरत नाही, तोवर वाचिक कळवळ्यास अर्थ नाही!
पडघम - राज्यकारण
देवेंद्र शिरुरकर
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे
  • Tue , 23 October 2018
  • पडघम राज्यकारण देवेंद्र फडणवीस Davendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शिवसेना Shiv Sena भाजप BJP

इथे अख्खा समुद्रच शुष्क पडलाय नीतिमत्तेने अन् काहीजण राजकीय गंगा स्वच्छतेचा आग्रह धरताना दिसत आहेत. राजकीय गंगा शुद्ध होईल तेव्हा होवो, पण किमान राज्यातील राजकीय प्रवाह मात्र येत्या काळात अधिक गढूळ होऊ नयेत, ही अपेक्षा आहे.

शिवसेनेच्या शाही दसऱ्यानंतर भाजपच्या शहांनी युती करण्याचा प्रस्ताव सेनेला दिला आहे. स्वबळ आणि शतप्रतिशतची खुमखुमी थांबवून लवकरच युतीचा निर्णय झाल्याच्या बातम्या यायला लागतील. तोवर काही हास्यास्पद विधाने ऐकण्याची तयारी दाखवायला हरकत नाही.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध सर्व विरोधकांची संभाव्य आघाडी असे चित्र अद्याप डोळ्यासमोर उभे राहत नसले तरी यथावकाश ते चित्र आकारास येईल. विरोधकांची ही आघाडी काँग्रेसप्रणीत असेल की, आणखी कोणाच्या नेपथ्याखाली असेल हे येणारा काळ  सांगेल. तोवर प्रत्येक आघाडीचा प्रमुख पक्ष आपापले संभाव्य सवंगडी आपल्यापासून दूर जाणार नाहीत, याची खात्री करून घेत आहेत.

सेनेसोबतची युतीची बोलणी उरकून घेण्याची भाजपची घाई या पार्श्वभूमीवर लक्षात घ्यायला हवी. तसे पहायला गेले तर राज्यात शिवसेनेची अवस्था त्यातल्या त्यात समाधानकारक मानावी लागेल. भाजपसोबत सत्तेची फळे चाखत असतानाही राज्यातील रिक्त असणारी विरोधी पक्षाची जागा भरून काढण्याचे सेनेचे प्रयत्न अगदीच व्यर्थ गेलेले नाहीत. केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जाहीरनाम्यातील मुद्यांचे स्मरण करून देण्याचा खटाटोप निरुपद्रवी  मानता येत नाही. 

आता युतीची बोलणी करण्याचे आवतन आलेले आहे, ती होईलसुद्धा. पण त्यानंतर सेनेला तिकिट वाटपापूर्वीचा आढावा मात्र भाजपच्या चिंतनाएवढाच गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. गंगा शुद्धीकरणाची चिंता वाहण्यापेक्षा पक्षांतर्गत कारभाराचे अंत:प्रवाह तपासण्यावर भर द्यावा लागणार आहे. कारण सेनेच्या मंत्र्यांची गत चार वर्षांतली कामगिरी म्हणावी व मानावी तशी दमदार राहिलेली नाही.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

‘तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना’ हे सोंग वठवण्यात सेना अव्वल ठरली असली तरी जनतेने पैकीच्या पैकी मार्क द्यावेत अशी भूमिका त्यांना वठवता आलेली नाही. उलट या पक्षाच्या मंत्र्यांनी आपापल्या खात्यांची केलेली हाताळणी पाहता हे रिपोर्ट कार्ड मायनसमध्येच जाते आहे. त्यातल्या त्यात समाधानकारक अशी ही अवस्था आहे. बाकी भाजपच्या अन्य मंत्र्यांना अंत:स्थ पाठबळ मिळूनसुद्धा कर्तृत्वाचा प्रकाशझोत स्वत:वर ठेवण्यात मुख्यमंत्री कमालीचे यशस्वी ठरले आहेत. त्यांनाही ‘कामगिरी दमदार’ करता आलेली नाहीच. पण अन्यांच्या तुलनेत निश्चित अशी मजल मारण्यात फडणवीस सहज पास झालेले आहेत. इतर भाजपशासित राज्यांच्या प्रमुखांच्या तुलनेत आपल्या देवेंद्रराजांचा कारभार नक्कीच उजवा आहे. या उजवेपणानंतरही त्यांना जर ‘पुढचा मुख्यमंत्री मीच’ असे सांगावे लागते, हे मात्र पारदर्शकतेचा आग्रह धरणाऱ्या भाजपसाठी भूषणावह नाही.

अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना तोंड देत तर कधी असे हल्ले परतवून लावत विकास प्रकल्प मार्गी लावण्याचे देवेंद्रभाऊंचे प्रयत्न आहेत. दुर्दैवाने यंदा राज्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झालेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याचा प्रसंग सरकारच्या नशिबी आला आहे. ऐन निवडणूकपूर्व काळात दुष्काळ व दुष्काळसंलग्न प्रश्न हाताळताना त्यांचा कस लागणार आहे.

फडणवीस हे प्रश्नही कुशलतेने हाताळतील; पण त्यांच्या ताई-भाऊंना हाताळण्यासाठी आपले कसब पणाला लावावे लागेल. पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले आणि शेतीमालाचे रसातळाला गेलेले भाव, दुष्काळजन्य परिस्थिती हाताळणीत सरकारला आलेले अपयश असे मुद्दे असतानाही जनतेच्या असंतोषाचे प्रकटीकरण व्हायला हवे त्या प्रमाणात होताना दिसत नाही.

राज्यात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरले जात नाही, हे वास्तव आहे, पर्याय नसल्यामुळे एखादा पर्याय निवडावा लागतो आहे, ही भावना सार्वत्रिक आहे. राज्यात काय वा देशपातळीवर मतदारांसमोर सध्या हेच चित्र आहे. सत्ता देऊनही त्याचा प्रभावी वापर न करता येणे हा जसा भाजपसाठी चिंतेचा विषय आहे, तसाच आपण निवडलेला पर्याय फारसा चांगला ठरला नसल्याचे उमजूनसुद्धा जनता आपल्यावर विश्वास ठेवू इच्छित नाही, हा विरोधकांसाठी चिंतनाचा विषय आहे. कारण आजवर अनेक प्रश्नांवर रस्त्यावर उतरलेल्या विरोधकांच्या विविध आंदोलनांना जनसामान्यांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

सत्तेत आहे म्हणावे तर एस.टी महामंडळाचे बारा वाजवण्यात सेनेचे मंत्री कुठलीच कसर सोडत नसल्याचे दिसत आहेत अन् विरोधात आहेत म्हणावे तर भाजप यांच्या विरोधास अजिबात भाव देत नाही अशी सेनेची अवस्था आहे. तेव्हा राज्याच्या व्यापक पटलावरील घाण साफ व्हायला हवी असेल तर प्रत्येक राजकीय पक्षाने आपापली अंगणे सारवून ठेवायला हवी आहेत. राज्याच्या राजकीय प्रक्रियेच्या प्रवाहात गढूळता आली तरी ती घाण साफ करण्याची जबाबदारी सामूहिक असते, त्यात आपलाही सहभाग असतोच की!  त्यामुळे हे शुद्धीकरण जोवर कृतीत उतरत नाही तोवर या वाचिक कळवळ्यास काहीच अर्थ उरत नाही.

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......