जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

आता सरकारविरुद्ध सुरू केलेल्या कुठल्याही आंदोलनाला इतर जनतेच्याही रोषाला व टीकेला सामोरं जावं लागतं. ‘नागरिक’ विरुद्ध ‘सरकार’ अशी आंदोलनं होणं बंद झालं आणि ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ असं चित्र दिसू लागलंय

सद्यस्थिती अशी आहे की, ‘ते’ आणि ‘आपण’ दोघांपैकी कोणीच रस्त्यावर उतरत नाही. हातातल्या मोबईलवर पोस्ट, कमेंट, शेअर, ट्वीट, रीट्वीट आणि अंगठे दाखवण्यातच धन्यता मानत आहे. देशात दोन निश्चित गट पडले आहेत. देश ‘विश्वगुरू’ होण्याच्या मार्गावर आहे, असं मानणारा एक गट आहे, तर दुसरा गट देश परत मध्ययुगात जात आहे, असं मानणारा आहे. पण या दोघांपैकी कुठेही आंदोलनकर्ता उरलेला दिसत नाही.......