टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • स्मृती इराणी, नरेंद्र मोदी, मनमोहनसिंग, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि तैमूर रझा
  • Tue , 13 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या स्मृती इराणी Smriti Irani नरेंद्र मोदी Narendra Modi मनमोहनसिंग Manmohan Singh देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray तैमूर रझा Taimoor Raza

१. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचा वणवा आता गुजरातमध्येही पसरल्याचं दिसतं. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी गुजरातच्या अमरेलीमधील एका कार्यक्रमात भाषण करत असताना केतन कासवाल या तरुणानं त्यांच्या दिशेनं बांगड्या फेकल्या. या घटनेनंतर पोलिसांनी केतनला लगेचच ताब्यात घेतलं. मात्र, या घटनेमुळे एकूणच देशभरात शेतकऱ्यांच्या मोदी सरकारविरोधातील रोष वाढत चालल्याचं चित्र आहे.

शेतकऱ्यांचा रोष आहे वगैरे ठीक आहे... पण, त्यांच्या घरात आईबहिणी नाहीत का? त्या बांगड्या घालतात म्हणजे आपल्यापेक्षा कमी कुवतीच्या, कमी बुद्धीच्या आहेत, अशी त्यांची समजूत आहे का? ज्यात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतरत नाहीत, असं एकतरी क्षेत्र आता उरलं आहे का? मग कर्तबगारीच्या बळावर मंत्रीपदावर पोहोचलेल्या महिलेवर कमकुवतपणाचं प्रतीक म्हणून बांगड्या फेकून आपण आपला मूर्खपणाच सिद्ध करत नाही का?

……………………………………………………………………………………………

२. राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सध्या श्रेयवादाचं राजकारण सुरू झालं आहे. कर्जमाफीनंतर शिवसेनेनं थेट देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधून फडणवीस यांना चिमटा काढला आहे. कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी कुणी देईल काय, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला नाही, याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीत आहोत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. सरकारनं ही कर्जमाफी मोकळ्या मनानं आणि दिलदारीनं दिलेली नाही. सरकारमध्ये राहून रोज या प्रश्नावर शिवसेनेनं लाथा घातल्याचा हा परिणाम आहे, असं ठाकरे म्हणाले.

शिवसेना इतक्या गोष्टी पटत  नसताना सरकारमध्ये राहून करते काय, या प्रश्नाचं उत्तर आता मिळून गेलं. लाथा घालणं हे कोणाशी जोडलं आहे, हे त्यांच्या लक्षात असेलच. खरं तर ही एक राजकीय हुशारीच सुरू आहे भाजप-सेनेची. सत्तेत राहून विरोधी पक्षाचीही स्पेस व्यापायची आणि दोघांनी मलिदा खायचा, अशी ही आयडिया आहे. त्यामुळेच यांना, तुम्ही सरकारमधून बाहेर का पडत नाही, असं विचारण्यात हशील नाही. नाट्यप्रयोगाचे उरलेले अंकही पाहात राहायचे आता.

……………………………………………………………………………………………

३. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाचशे रुपयांची नवी नोट बाजारात आणणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटांवर ए हे इनसेट अक्षर असणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्यावरही पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.

अरे बापरे, पण, पाचशेची नवी नोट जुनी कधी झाली? ती येऊन काही महिने होण्याच्या आत दुसरी नोट. आता पुन्हा घबराट पसरणार. लोक जुनी झालेली पण खरं तर नवीच असलेली आताची पाचशेची नोट घेणार नाहीत, त्यावरून भांडणं होणार. नोटा बदलायला धावणार. नोटा बदलण्यासाठी रांगेत उभं राहण्याचा एक वेगळा भत्ता सुरू होणार बहुतेक आता देशात.

……………………………………………………………………………………………

४. पाकिस्तानातील अल्पसंख्याक शिया समाजाच्या एका व्यक्तीला फेसबुकवर इस्लामची निंदा केल्याने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशा प्रकारची ही पहिलीच शिक्षा आहे. सायबर गुन्ह्याचा विचार केला तरी त्याचं स्वरूप पाहिलं तर ही शिक्षा फारच कठोर मानली जात आहे. ईश्वरनिंदेच्या आरोपावरून अजून पाकिस्तानात कुणाला फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही. पंजाब प्रांतातील बहवालपूर जिल्ह्यातील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश शाबीर अहमद यांनी तीस वर्षे वयाचा आरोपी तैमूर रझा याला शनिवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

हे तथाकथित धार्मिक लोक शुद्ध डोक्यावर पडलेले असतात काय? तुम्ही ईश्वराला मानता तर त्याच्या निंदेची शिक्षा द्यायला तो असमर्थ आहे का? नास्तिक आणि ईश्वर यांच्यातल्या भांडणात तुमची लुडबूड कशाला? आपल्या तथाकथित सर्वशक्तिमान परमेश्वराचं घर असलेल्या प्रार्थनागृहांवर सशस्त्र पहारे बसवणाऱ्या आणि भिंती उभारून कडेकोट बंदोबस्त करणाऱ्यांकडून विवेकबुद्धीची अपेक्षा व्यर्थच आहे म्हणा.

……………………………………………………………………………………………

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर एकही सुट्टी न घेतल्याचं तेही सांगतात आणि त्यांची भक्तमंडळीही याबद्दल कौतुकारती ओवाळत असतात. मग अशात हा प्रश्न पडतो की, त्यांच्याआधी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात किती दिवस सुट्टी घेतली? याआधी इतकं काम करणारे पंतप्रधान जणू देशाला लाभलेच नव्हते, असा त्यांचा आव असतो. मोदी यांच्याआधीचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एकही सुटी घेतलेली नाही. एका कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात पंतप्रधान कार्यालयाकडून, म्हणजे मोदी सरकारकडूनच ही माहिती मिळवली आहे.

असं होण्याचं एक साधं कारण आहे... भारतीय राज्यघटनेत पंतप्रधानांच्या सुट्टीबाबत कोणतीही तरतूदच नाही. पंतप्रधान हे संपूर्ण कार्यकाळात पदावरच असतात, हे गृहीत आहे. मनमोहन सिंगांना इतर अनेक गोष्टींप्रमाणे या गोष्टीचं भांडवल करता आलं नाही; मोदींनी मनमोहन यांच्या अनेक गोष्टींप्रमाणे याही गोष्टीचं भांडवल केलं आणि मोदीभक्तांच्या मते देशाला स्वातंत्र्यच २०१४ साली मिळालेलं असल्याने कसलीच शहानिशा न करता ढोल पिटण्याची त्यांना सवय आहेच.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......