टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अक्षयकुमार, सायना नेहवाल, बिपिन रावत, नरेंद्र मोदी, पिनरई विजयन आणि तेजस एक्सप्रेस
  • Mon , 29 May 2017
  • विनोदनामा टपल्या अक्षयकुमार Akshay Kumar सायना नेहवाल Saina Nehwal बिपिन रावत नरेंद्र मोदी Narendra Modi पिनरई विजयन Pinarayi Vijayan तेजस एक्सप्रेस Tejas Express

१. लष्करप्रमुख बिपीन रावत काश्मिरातील सद्यस्थितीतबाबत म्हणाले, काश्मीर खोऱ्यात सध्या प्रचंड प्रमाणात हिंसक कारवाया होत आहेत. जमाव आमच्यावर दगडफेक करतो. वस्तुत: या लोकांनी आमच्यावर दगडफेक करण्याऐवजी शस्त्रे चालवली तर मला जास्त आनंद होईल. कारण त्यामुळे आम्हाला जे करायचे आहे, ते करता येईल. खोऱ्यातील जनता आमच्या जवानांवर दगडफेक करते, पेट्रोबॉम्बचा वर्षांव करते. अशा वेळी माझ्या जवानांनी काय करू, असे विचारले तर मी त्यांना ‘वाट बघा आणि मरा’ असे सांगू शकत नाही. तुमच्यासाठी शवपेट्या तयार करून ठेवल्या आहेत, त्यात तुमचे मृतदेह फुलांनी सजवून तुमच्या मूळ गावी पाठवेन, असे मी त्यांना सांगू का? लष्करप्रमुख म्हणून मला माझ्या माणसांचे मनोबल उंचवण्यासाठी आवश्यक ते सर्व करणे भागच आहे.

आपण भारतीय लष्कराचे प्रमुख आहोत, गोरक्षक दलाचे नाही आणि आपल्या देशातल्या जनतेचा उद्रेक शमवण्याच्या बाबतीत बोलतो आहोत, शत्रुराष्ट्रातल्या कारवाईबद्दल नाही, याचं किंचितही भान नसलेले हे लष्करप्रमुख निवृत्तीनंतर विद्यमान सरकारमध्येच मंत्रीपदावर किंवा अन्य उच्चपदावर विराजमान होतील, यात शंका नाही. काश्मीरच्या जनतेने शस्त्रांनी हल्ला केला की, ‘आम्हाला जे करायचे ते करता येईल’, ही त्यांची भाषा या सरकारच्या काश्मीरविषयक धोरणाचा गाभा म्हणून स्वीकारायला हरकत नसावी.

……………………………………………………………………………………………

२. सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणारा अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांचा नक्षलवाद्यांनी निषेध केला आहे. नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा निषेध करत आहोत, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे. देशातील प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, खेळाडू आणि सेलिब्रिटींनी क्रांतीच्या आणि गरिबांच्या बाजून उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांनी पोलिसांच्या अत्याचाराचा आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवावा, असंही नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे.

नक्षलवादी नेमके कोणासाठी आणि कोणाविरुद्ध लढतायत? किती शोषक मारले गेले या लढ्यात? जवानांच्या कारवाईत मारला जाणारा नक्षलवादी जसा गरीब आणि शोषित असतो तसाच सीआरपीएफचा जवानही गरीबच असतो की! गरिबांनी एकमेकांना मारायचं आणि शोषक आहेत तिथे, आहेत तसेच राहणार, ही क्रांतीची कल्पना आहे का नक्षलवाद्यांची? मग ते करतात त्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचं आणि अत्याचारांचं काय करायचं?

……………………………………………………………………………………………

३. केरळमधील लोकांच्या खाण्याच्या सवयी अतिशय चांगल्या असून केरळी लोक खाण्याच्या आरोग्यदायी आणि पोषणमूल्ये असणाऱ्या पारंपरिक पद्धती अवलंबतात. दिल्ली आणि नागपूरमधून केरळी लोकांना खाण्याच्या बाबतीतले धडे घेण्याची आवश्यकता नाही, आम्ही काय खावे हे दिल्ली आणि नागपूरकरांनी शिकवू नये, असा तडाखा केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही आठवडी बाजारात होणाऱ्या दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणली आहे. त्यामुळे देशातील अनेकांना खाण्याच्या सवयींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अहो विजयन भाऊ, कोणी खायचं काय हे तर हे राष्ट्रगणंग ठरवणार आहेतच, पण, ताटात कशाच्या शेजारी काय असावं, कशी रांगोळी काढावी, आधी कोणता घास घ्यावा, कोणती बोटं कशासाठी वापरावीत (त्याचा दांडगा अनुभव आहे त्यांना), हेही ते शिकवणार आहेत. ‘वदनी कवळ घेता’ न म्हणता जेवलं तर दंड आणि तुरुंगवास भोगण्याची तयारी ठेवा मिष्टर, आहात कुठे!

……………………………………………………………………………………………

४. मुंबई-गोवा तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्ये ३३७ हेडफोन्स चोरीला गेल्यानंतर आता रेल्वेने तीस रुपयांचे स्वस्त हेडफोन विकत घेतले आहेत. तेजस एक्स्प्रेसमध्ये विमानातल्याप्रमाणे अत्याधुनिक सोयीसुविधांसह मनोरंजनासाठी हेडफोन्स देण्यात आले होते. मात्र बहुतांश हेडफोन्सची चोरी झाल्याने आता साधे हेडफोन्स देण्यात येत आहेत.

थोडक्यात, सार्वजनिक मालमत्तेची चोरी करू नका, हे लोकांच्या गळी उतरवणं शक्य नाही; त्यापेक्षा स्वस्त आणि भिकार वस्तू चोरा, तीच तुमची लायकी, असं रेल्वेने प्रवाशांना सांगितलं आहे.

……………………………………………………………………………………………

५. लोकशाहीत टीका आणि सूचना यांना कायमच महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचा आदर करायलाच हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात म्हटलं आहे. सरकारने जनतेचे म्हणजे ऐकून घ्यायलाच हवे. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत. विधायक टीकेमुळे तर लोकशाहीला बळच मिळते, असे सांगून सरकारवर टीका करणाऱ्यांचे तसेच विविध सूचना करणाऱ्यांचे आपण आभार मानू इच्छितो, असं पंतप्रधान म्हणाले.

मुलांनो, सांगा यातून काय कळतं? यातून इतकंच कळतं की केंद्र सरकारचे समर्थक आणि मोदी यांचे चाहते हे त्यांच्या कितीही प्रेमात असले, तरी त्यांची ‘मन की बात’ ऐकत नाहीत किंवा ऐकत असले तरी मनावर अजिबातच घेत नाहीत.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Navnath Karche

Thu , 01 June 2017

it's not good....


sameer gaikwad

Mon , 29 May 2017

टाळूपर्यंत मुंग्या आणणारया टपल्या मस्त जमल्यात ..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......