टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सिद्धिविनायक मंदिर, बाबा रामदेव, अमित शहा, उद्धव ठाकरे आणि पांडुरंग फुंडकर
  • Fri , 05 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या सिद्धिविनायक मंदिर SiddhiVinayak Temple बाबा रामदेव Baba Ramdev अमित शहा Amit Shah उद्धव ठाकरे Uddhav Thackeray पांडुरंग फुंडकर Pandurang Phundkar

१. ‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंग जेव्हा परदेश दौऱ्यावर असायचे, त्यावेळी कोणीही त्यांची दखल घ्यायचे नाही,’ अशा शब्दांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मनमोहन सिंग यांना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या तुलनेत कमी परदेश दौरे केल्याचा दावाही अमित शहा यांनी केला.

मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांतल्या दौऱ्यांची संख्या मोदींच्या तीन वर्षांमधल्या दौऱ्यांपेक्षा जास्त आहे, हेही खरं तर मोदींच्या झपाट्याच्या दृष्टीने लाजिरवाणं आहे. बाकी अमेरिकेचा अध्यक्ष एखाद्याला गुरूस्थानी मानतो, तेव्हा ते खांद्यावर हात टाकून एकेरीत हाक मारण्यापेक्षा कमी दखलपात्र असतं, हे शिक्षण तुम्ही पतंजलीच्या गुरूकुलातून घेतलं की, आसारामाच्या भोगविद्या केंद्रातून? अतीव दखलपात्र पंप्रंच्या दोस्तीला ऑस्ट्रेलियापासून तुर्कस्तानापर्यंतच्या देशप्रमुखांनी कसं तोंडघशी पाडलंय, ते दिसतंच आहे म्हणा.

..........................................................................................

२. जीएसटी संदर्भात शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. महापालिकेला लाचार होऊन केंद्र आणि राज्य सरकार दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. महापालिकेची स्वायत्तता कायम राहावी असेही त्यांनी म्हटले आहे.

अहो काहीही काय बोलताय? विचार करणार? तुम्ही? कसला? इतक्या वर्षांनी बिनसवयीचं असं काही करायला गेल्यावर काही आंतरिक मोडतोड झाली तर जबाबदारी कोण घेणार? आपण आपल्याला जे जमतं ते करावं. भावना चेतवणं, दगड, वडापाव, अनेकांनी एकाला घेरून बडवणं वगैरे. विचाराबिचाराच्या फंदात कुठे पडताय? बरं गेली तीन वर्षं त्याच त्याच ताटाखालच्या म्याँव म्याँवला डरकाळ्या तरी किती काळ म्हणणार?

..........................................................................................

३. दहशतवाद्यांकडून एका जवानाचा बळी गेला तर आपण त्यांच्या १००जणांचा शिरच्छेद करण्यास मागेपुढे पाहू नये, असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात नियंत्रण रेषेवर दोन जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव बोलत होते. याबाबतीत भारताने इस्राइलचा आदर्श घेण्याची आवश्यकता असून, एक जवान गेला तर १०० दहशतवाद्यांचा खात्मा करायला हवा.

कोण आहे रे तिकडे? ते संरक्षणमंत्रीपद रिकामं आहे ना? तिथे या बोलबच्चनगुरूंना बसवा तात्काळ. त्यांनी नुकतीच (चमचेगिरीची) अर्हता प्राप्त केली आहेच. बाकी तोंडची फुकाची वाफ दवडण्याची अर्हता पहिल्यापासून आहे. यांना फक्त रणांगणावर पाठवू नका. जिवावर बेतण्याची भीती वाटली तरी वेषांतर करून पळ काढायला शिकवू शकतील हे फारतर सैनिकांना.

..........................................................................................

४. प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचरणी २००९-१०मध्ये दररोज सरासरी १२ लाख २१ हजार रुपयांची देणगी वाहिली गेली होती. गेल्या सात वर्षांमध्ये हा दानाचा आकडा दुपटीने वाढला असून गेल्या नऊ महिन्यांत ७० कोटी ७० लाख रुपये (दररोज सरासरी २५ लाख ७० हजार रुपये) गणरायाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत शिर्डी संस्थानच्या साईबाबा मंदिरात भक्तांनी रोज सरासरी एक कोटी ५२ लाख रुपयांचे दान अर्पण केले आहे. सात वर्षांपूर्वी साईबाबांच्या चरणी दररोज सरासरी ५३ लाख रुपये दान केले गेले होते.

घ्या, देशाच्या आर्थिक विकासाचा आणखी किती पुरावा पाहिजे? बौद्धिक विकासाशी आपल्याला असंही फारसं काही देणं घेणं नव्हतंच कधी. या देवस्थानांच्या बातम्या प्रसिद्ध करून त्यांचं प्रसिद्धीविनायकांत रूपांतर करणाऱ्या प्रसारमाध्यमांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. त्यांनी आपल्या वाचकांची नस अचूक ओळखली आहे.

..........................................................................................

५. राज्याचे कृषिमंत्री आणि १५ आमदार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दोन आठवड्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जातून कसा मार्ग काढला जातो, याचा अभ्यास करण्यासाठी ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्यावरून परतताना कृषिमंत्री आणि आमदार एक दिवस सिंगापूरलाही थांबणार आहेत. या दौऱ्यासाठी प्रत्येकी सहा लाखांचा खर्च येणार असून यामधील निम्मा खर्च सरकार करणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनेही तिथल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत की काय? इतक्या आवर्जून बरोब्बर त्याच देशांमध्ये हे सरकार अभ्यास करायला मंत्री पाठवतंय, म्हणजे तसंच काहीसं असणार. इथे सरकारच्या नावाने कंठशोष करणाऱ्या विरोधी पक्षांनाही या दौऱ्यात आपल्या आमदारांना पाठवण्यात काही गैर वाटलेलं नाही, हे पुरेसं बोलकं आहे. सिंगापूरमध्ये एक दिवसात ते हरळीच्या मुळ्यांवरचा तांबेरा आणि घायपाताच्या शिरांमधल्या खोंडअळीचा अभ्यास करणार आहेत, हे का गुप्त ठेवलं गेलंय?

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......