टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शिवसेना, डोनाल्ड ट्रम्प, सी.एस. कर्णन, युजीसी आणि मथुरेतील मुली
  • Tue , 02 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या शिवसेना डोनाल्ड ट्रम्प Donald Trump सी.एस. कर्णन C.S. Karnan युजीसी UGC मथुरेतील मुली Mathura's girls

१. तूरडाळीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यात ४०० कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ४०० कोटींचा घोटाळा होईपर्यंत पारदर्शक सरकार झोपले होते काय, असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे. हा डाळ घोटाळा ७०० ते ८०० कोटींचा असल्याचा आरोप करत तूरडाळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर माती खायची वेळ आली असल्याची खंत सेनेने व्यक्त केली आहे.

आधी यांना कोणीतरी पांघरुणातून बाहेर ओढा, दीडदोन घागरी यांच्या डोक्यावर ओता, एक कडक चहा द्या आणि हे जागे झाले की सांगा, त्या तथाकथित पारदर्शक सरकारचाच भाकरतुकडा खाताय तुम्ही रोजच्या रोज. तुम्हीही भाग आहात त्याच्यातले. ते झोपले असतील, तर तुम्ही बहुधा बेशुद्धच पडलेले दिसताय की, सोयीस्कर कोमात गेलेले आहात?

.......................................................................................

२. देशातील जनतेला ‘आहारनीती’चे धडे देण्याच्या ‘राजकीय स्पर्धे’त विद्यापीठ अनुदान आयोगानेही उडी घेतली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काय खाऊ नये, हे ठरविणारी एक ‘आहारसंहिता’ आयोगाने तयार केली असून महाविद्यालयांच्या उपाहारगृहांतून ‘जंकफूड’ हद्दपार करण्याचा फतवा जारी केला आहे. महाराष्ट्रातील महाविद्यालयांनी मात्र हा फतवा शीतपेटीत बंद करून ठेवला असून राज्य सरकारनेही याबाबत मूग गिळून गप्प राहणे पसंत केल्याने राज्यातील एक संभाव्य वाद जन्माआधीच शमला आहे. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या उपाहारगृहांमधून पिझ्झा, बर्गरसारख्या खाद्यपदार्थाची विक्री केली जाऊ नये, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने सुमारे सहा महिन्यांपूर्वी जारी केले आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याकडे हा फतवा अंमलबजावणीसाठी रवाना करण्यात आला.

विद्यापीठ अनुदान आयोगाचं काम काय, तुम्ही करताय काय? तुम्ही विद्यापीठांना अनुदान देता फक्त त्यांची पात्रता पाहून. विद्यार्थ्यांना पोसत नाही. जे त्यांना पोसतात, त्यांचा सगळा खर्च उचलतात, ते आई-वडीलही मुलांना काय खावं-प्यावं या विषयावर फार सल्ले देऊ शकत नाहीत. जिथे १८ वर्षांवरचा तरूण मतदान करून सरकार निवडतो, तिथे त्याने काय खायचं हे यूजीसी ठरवणार? सकाळ-संध्याकाळ गोमूत्र ढोसायला लागले की, काय इथलेही पदाधिकारी?

.......................................................................................

३. बेताल वक्तव्ये आणि आढय़ताखोर वर्तणुकीमुळे देशाची न्यायव्यवस्था ढवळून काढणारे  कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस. कर्णन  यांची कोलकात्यातील एखाद्या शासकीय रुग्णालयाने स्थापन केलेल्या डॉक्टरांच्या चमूकरवी चार मे रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. न्या.कर्णन यांची वैद्यकीय तपासणी पार पाडण्यात वैद्यकीय मंडळाला मदत करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करावे, असाही आदेश सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांच्या पीठाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना दिला.

उगाच भलते पायंडे पाडू नका... काळ मोठा कठीण आहे. इथे दिल्लीपासून गल्लीपर्यंत रोज कोणीतरी एक लोकप्रतिनिधी, अधिकारी, बुवा, बाबा, महाराज, योगी, गुरू, मौलवी, सेलिब्रिटी उठून काहीतरी वेडपटासारखं बकतो. एकाची वैद्यकीय तपासणी केली तर सगळ्यांची करावी लागेल आणि त्या भानगडीत सामान्य माणसाला साध्या सर्दीपडशावरच्या गोळ्या द्यायलाही देशात डॉक्टर शिल्लक राहायचा नाही.

.......................................................................................

४. मथुरेजवळच्या गोवर्धनमधील मडोरा गावात गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पंचायती समितीच्या पंचांनी अनोखा फतवा काढला आहे. एखादी मुलगी रस्त्यात फोनवर बोलताना आढळली तर तिला तब्बल २१ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. आर्थिक फसवणूक, जुगार, मद्यपान यांच्यासाठी ११ हजार रुपयांपासून दोन लाखांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.

आता लगेहाथ वेगळा ध्वज शिवायला टाका गावाचा आणि सीमेवर गावचं स्वतंत्र सैन्यही उभं करा लाठ्याकाठ्या घेऊन. मडोरामध्ये थोडी दुरुस्ती करून मॅडोरा नाव करून घ्या आपल्या या स्वतंत्र राष्ट्राचं, नाहीतर बिनडोकीस्तान नावाचं आताच बुकिंग करून घ्या. सध्या फार मागणी आहे या नावाला देशात, नंतर मिळायचं नाही.

.......................................................................................

५. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस कराराच्या निमित्ताने भारत, रशिया आणि चीन यांच्यावर खरपूस टीका केली आहे. पेनसिल्वेनियामध्ये आयोजित मेळाव्यात ट्रम्प म्हणाले की, पॅरिस करारासाठी अमेरिका ट्रिलियन डॉलर खर्च करत आहे. मात्र रशिया, चीन आणि भारतासारखे प्रदूषण करणारे देश काहीच देत नाहीत. येत्या दोन आठवड्यात पॅरिस करारावर मोठा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ट्रम्पतात्या, या करारासाठी इतर कोणत्याही देशाने छदामही देण्याची गरज नाही. सगळ्यात जास्त वैचारिक, बौद्धिक आणि असह्य ध्वनिप्रदूषण तर अमेरिकेनेच निर्माण केलेलं आहे तुमच्यासारख्या अर्धवटरावाला अध्यक्षपदावर निवडून देऊन. आता पुढची चार वर्षं जगातला सर्वांत मोठा प्रदूषणकारी देश म्हणून भोगा आपल्या कर्माची फळं.

............................................................................................

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......