टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शरद पवार, श्री श्री रविशंकर, राजस्थान पाठ्यपुस्तक, लाल दिवा आणि सिनेमागृह
  • Thu , 20 April 2017
  • विनोदनामा टपल्या शरद पवार Sharad Pawar श्री श्री रविशंकर Sri Sri Ravi Shankar राजस्थान पाठ्यपुस्तक Rajasthan Textbook लाल दिवा laal batti सिनेमागृह Movie Theatres

१. शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येणार नाही, असेदेखील राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘सत्ताधारी पक्षाला सहमताने उमेदवार द्यायचा असल्यास आम्ही विचार करू. याबद्दल सत्ताधारी पक्ष विरोधकांशी कशा प्रकारे संवाद साधतात, हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला अद्याप बराच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे विविध पक्ष यावर विचार करू शकतात,’ असे पक्षाचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी म्हटले.

राष्ट्रवादी पक्षाची प्रेस कॉन्फरन्सही कशी शरद पवारांच्या नमुनेदार संभाषणपद्धतीप्रमाणे चालते, हे पाहण्यासारखं आहे... म्हणजे, नेमकं काय म्हणायचंय त्याचा ताकास तूर लागू द्यायचा नाही. एकीकडे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही म्हणायचं, मग सर्वपक्षीय सहमतीचा उमेदवार असेल तर विचार करू म्हणायचं. मध्येच काँग्रेसचं पिल्लू सोडायचं. पवारांना ओळखणाऱ्यांना एवढंच कळलं की, ते राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत व्हेरी मच आहेत.

...................................................................................................................

२. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमामुळे यमुना नदीच्या पात्राचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई केंद्र सरकार, दिल्ली सरकार यांच्याबरोबरच राष्ट्रीय हरित लवादाकडून वसूल करण्यात यावी, असे विधान आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक रविशंकर यांनी केले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात आर्ट ऑफ लिव्हिंगने यमुनेच्या तीरावर जागतिक संस्कृती महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी यमुना नदीच्या पात्रात भराव टाकण्यात आला होता. यामुळे यमुना नदीच्या पात्राचे मोठे नुकसान झाले. हरित लवादानेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जागतिक संस्कृती महोत्सवाला परवानगी दिली होती. यमुना नदी इतकी नाजूक आणि स्वच्छ होती, तर मग जागतिक संस्कृती महोत्सव रोखायला हवा होता,’ असे रविशंकर यांनी म्हटले आहे.

या सद्गृहस्थांनी ‘शोधलेल्या’ सुदर्शनक्रियेचे इतर बरेच फायदे आहेत म्हणे; पण, त्याने उर्मटपणा वाढीस लागतो, हा फायदा कुठे नोंदवलेला नसावा. अर्थात, हे वेगवेगळ्या सरकारांनी पोसून डोक्यावर चढवून ठेवलेले बुवाबापूमहाराज आणि डबलश्री, ट्रिपलश्री आहेत... ते वेळप्रसंगी सरकारवर कशी दुगाणी झाडतात, हेही सगळ्यांना दिसायलाच हवं.

...................................................................................................................

३. उत्तम व्यावसायिक होण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या व्यक्तींनी आता राजस्थानात तरी फेअरनेस क्रीमचा वापर करायला हवा. कारण उत्तम व्यावसायिक होण्यासाठी सुंदर दिसणे आवश्यक आहे, अशी शिकवण राजस्थानच्या माध्यमिक शाळेतील पुस्तकातून विद्यार्थ्यांना देण्यात येते आहे. राजस्थान सरकारने दिलेल्या पाठ्यपुस्तकांत चांगला उद्योजक होण्यासाठी ‘सुंदर दिसणे’ आणि ‘चांगली उंची’ आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उत्तम स्वास्थ्य आणि शालीनता या गुणांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

स्त्रियांना समाजात काही स्थान प्राप्त करायचं असेल, तर नवऱ्यामागे सती जाण्याची तयारी असायला हवी, असंही या राज्यातल्या पाठ्यपुस्तकांमध्ये छापून आलं तर आश्चर्य वाटायला नको. सदरहू पुस्तकाचं नाव ‘समाजोपयोगी योजनाएँ’ असं आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे, हे लक्षात आलं की, उद्योजकतेचे हे निकष कोणत्या विचारधारेत जन्माला आले आहेत, तेही कळून जातं.

...................................................................................................................

४. चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने अपंगांना सूट दिली आहे. यापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रत्येक चित्रपटगृहात राष्ट्रगीत बंधनकारक करण्याचा आणि ते सुरू असताना प्रेक्षकांनी उठून उभे राहणेही बंधनकारक करण्याचा वादग्रस्त आदेश दिला होता.

राष्ट्रगीत सुरू असताना बसून राहिलेली व्यक्ती अपंग आहे, हे ठरवणार कोण? अपंगांनी अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेऊन फिरायचं का सगळीकडे? शिवाय, कोणी अपंग उभा राहिला नाही, तर कसलीही शहानिशा न करता लगेच झुंडीने मारहाण करून आपली उथळ देशभक्ती दाखवत फिरणाऱ्या मंदमती देशभक्तांना आवर कोण घालणार? त्यांच्यावर कोणत्या कलमाखाली खटला भरणार?

...................................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल दिवा संस्कृतीला रामराम केला आहे. त्यामुळे मोदी सरकारसह देशभरातील राज्य सरकारांमधील मंत्र्यांनी वाहनांवरील लाल दिवे उतरवले आहेत. मोदी सरकारच्या या आदेशामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवेदेखील उतरणार आहेत. त्यामुळे यापुढे फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांवरच दिवे दिसतील.

लाल दिवा हा इतरांपेक्षा वेगळे आणि विशेष असण्याचं प्रतीक होता. त्याला रामराम करणं ही चांगली सुरुवात आहे. पण, ती केवळ सर्वसामान्यांना खुपणाऱ्या प्रतीकाला रामराम ठरण्याचीच शक्यता अधिक. कारण, सगळया मंत्र्यासंत्र्यांचा तामझाम काही दूर होणार नाही. त्यांच्याबरोबरचे पोलिस, सायरन वाजवत जाणाऱ्या गाड्या, यांच्यामुळे व्हीआयपींच्या व्हीआयपी मस्तीत काही फरक पडण्याची शक्यता नाही. उलट लाल दिव्यामुळे अडचणीचे ठरणारे काही व्यवहार सोयीचे होऊन जातील.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Girish

Fri , 21 April 2017

क्र 3 वरची तुमची कंमेंट हीन , आणि अक्कलशुन्य दर्जाची आहे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......