टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर आणि सुनीता कौशिक
  • Tue , 11 April 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या चंद्रकांत पाटील Chandrakant Patil प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar सुनीता कौशिक Sunita Kaushik

१. महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊ दे, शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारला बळ दे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारला जे करावे लागेल त्यासाठी बळ दे, असे साकडे महाराष्ट्राचे महसूलमंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्राचा कुलस्वामी  श्री जोतिबाला घातले.

हे सगळे भंपक लोक्स राजीनामे देऊन राज्याचा सगळा कारभार श्री जोतिबाकडे, अंबाबाईकडे, तुळजाभवानीकडे आणि श्री विठुराया आणि श्री खंडेरायांकडे का सोपवत नाहीत? पाऊस पाडणं समजा या सगळ्यांच्या हातात आहे. पण, बाकीचं सगळं करायला तुम्हाला नेमलंय ना? तुम्हाला बळही हेच सगळे देणार असतील, तर तिकडे दिल्लीतले आणि नागपुरातले वरिष्ठ मिळून काय कंचे खेळणार की पतंग उडवणार?

.....................................................................................

२. दिल्ली भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी महापालिका निवडणुकीतील ज्या झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेला- सुनीता कौशिकला- तिकीट दिलं होतं, ती उमेदवार कोट्यधीश असून तिच्याकडे ९० लाख रुपयांचे फक्त सोन्याचे दागिनेच असल्याचे तिने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. या महिलेच्या उमेदवारीला आपने आक्षेप घेतला आहे.

यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे? भाजपच्या साथीने झोपडीवासियांचा सुद्धा किती वेगाने विकास होतो, हेच या महिलेने स्वत:च्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे. यापुढे ज्याला ज्याला आयुष्यात पुढे जायची इच्छा असेल, त्या प्रत्येकाने भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. निव्वळ उमेदवारीने एवढी बरकत, तर निवडून आल्यावर काय होईल!!!

.....................................................................................

३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गोवंश हत्याबंदीच्या विधानामुळे काश्मीर आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अलिप्ततेची भावना वाढण्याची शक्यता असून यामुळे भविष्यात देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

जाऊंद्या ना बाळासाहेब! तुम्ही तर सगळा खेळच उचकटून सांगून टाकता. भाकड जनावरांची किंमत कमी होऊन एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे मांस-व्यवसायावर पोटपाणी असलेला असंघटित मुसलमान असे दोन्ही घटक देशोधडीला लावण्याचीच ही कल्पना आहे. बेकायदा कत्तलखान्यांवरच्या कारवाईआडून बडे हिंदू-जैन मांसनिर्यातदार कसे अलगद सुरक्षित राखले गेले आहेत, ते पाहा ना. तुम्ही भाजपचे मतदार नसाल, भाजपच्या धोरणांचा विरोध कराल, तर तुमच्यासाठी या देशात जिवंत राहणंही अवघड असेल, असा हा इशारा आहे.

.....................................................................................

४. भाजपशासित झारखंडमध्ये महिन्याभरात जवळपास ५३ कुटुंबांची घरवापसी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने झारखंडमधील अरकीमध्ये ‘ख्रिश्चन मुक्त’ ब्लॉक तयार करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत अनेकांचे धर्मांतर केले जात आहे. हिंदू धर्मात परत आलेली सर्व कुटुंबे सिंदरी पंचायतीमधील आहेत. ख्रिस्ती मिशनरींनी मागील १० वर्षांपासून या भागात वर्चस्व प्रस्थापित करून अनेकांचं धर्मांतर केल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. ‘संघाच्या कृतीला धर्मांतर म्हणता येणार नाही. आम्ही फक्त आमच्या बंधू-भगिनींना त्यांच्या धर्मात परत आणत आहोत,’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयोजक लक्ष्मण सिंह मुंडा यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं.

हे सगळे लोक आदिवासी होते की हिंदू? आदिवासी असतील तर हिंदू धर्मात प्रवेश ही ‘घरवापसी’ कशी? त्यांना धर्मात घेतलं ते ठीक आहे, पण, कोणत्या जातीत घेतलं, ते का सांगितलेलं नाही? बाटवले गेलेले सगळे परत येताना चॉइसनुसार ब्राह्मण किंवा क्षत्रिय होऊ शकतात की, शूद्र जातींमध्येच राहतात. तसं होत असेल तर हेही दबावाखाली केलेलं बळजबरीचं धर्मांतरच आहे.

.....................................................................................

५. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ( रालोआ) सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत रालोआतील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर केला. भाजपच्या वागणुकीमुळे नाराज असलेल्या शिवसेनेनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

स्वाभाविक आहे. यांची मर्दुमकी फक्त सर्वसामान्य जनतेतल्या नोकरदारावर हात उचलण्यातून दिसते आणि स्वत:ला मावळे वगैरे संबोधून जाहीर समारंभांमध्ये भेंडी चिरायच्याही योग्यतेच्या नसलेल्या तलवारी उपसण्यातून. मुळात महाराष्ट्रातली जनता बेजार आहे. नंतर शेपूट घालणार ही काळ्या दगडावरची रेघ असताना आधी भयंकर गर्जना करून पोट दुखेपर्यंत हसवू तरी नका लोकांना.

.....................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......