टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, मंगलप्रभात लोढा, विक्रम सैनी, अर्णब गोस्वामी आणि हिमांशू कुमार
  • Mon , 27 March 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi मंगलप्रभात लोढा Mangal Prabhat Lodha विक्रम सैनी Vikram Saini अर्णब गोस्वामी Arnab Goswami हिमांशू कुमार Himanshu Kumar

१. भारताच्या परंपरा, रीतीरिवाज आणि संस्कृतीनेच हा देश टिकवून ठेवला आहे. उगाडी म्हणजे तेलुगु नववर्षानिमित्त शुभेच्छा देऊन ते म्हणाले की, भारतीय परंपरा विविधतेने नटलेली आहे आणि त्याच परंपरांनी देशातील सर्वांना एकत्र बांधण्याचे काम केलं आहे. हे वैविध्य आपण जपलं पाहिजे. तसंच दुसऱ्या राज्यातील संस्कृती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय विचार. या देशात विविध धर्म, जाती, पंथ, प्रांतांच्या वेगवेगळ्या खानपान परंपरा आहेत. त्यांचा आदर केला पाहिजे. आपली परंपराच श्रेष्ठ म्हणून इतरांवर लादता कामा नये. आपल्याच धर्मातल्या इतर बांधवांच्या खानपान परंपरांमध्ये खूप वेगळेपणा आहे, हे लक्षात घेऊन त्याचा आदर केला पाहिजे. आपल्या लाडक्या समजुती आपल्यापुरत्याच ठेवल्या पाहिजेत. हे सगळं पंतप्रधान म्हणाले नसले म्हणून काय झालं; त्यांचा भावार्थ तोच आहे.

.......................................................................................................

२. मुंबईतील मलबार हिलमधील जिना हाऊस तोडून त्या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. जिना हाऊसमध्येच फाळणीचा कट आखला गेला असून ही वास्तू पाडलीच पाहिजे, असे लोढा म्हणालेत. शत्रू संपत्ती विधेयक राज्यसभेत नुकतेच मंजूर झाले आहे. शत्रू संपत्तीला वारसा कायदा लागू होणार नाही आणि  त्याचे हस्तांतर ताबेदाराकडून शत्रूकडे किंवा संबंधितांकडे होणार नाही, अशी तरतूद या कायद्यात आहे. या कायद्यानुसार आमदार लोढा यांनी जिना हाऊस पाडण्याची मागणी केली आहे.

आमदार लोढा हे मुंबईतले एक धनदांडगे बिल्डर आहेत, बांधकाम हाच त्यांचा व्यवसाय आहे आणि जिना हाऊस ही त्यांच्या मतदारसंघातली, मुंबईच्या अतिश्रीमंत वस्तीतली एक अतिप्राइम प्रॉपर्टी आहे, हे निव्वळ योगायोग. आपल्या सोयीचाच इतिहास जतन करायचा, इतिहासातल्या आपल्याला कटु वाटणाऱ्या गोष्टींचे संदर्भ नष्ट करायचे, ही बमियान बुद्ध ध्वस्त करणाऱ्यांची परंपरा त्यांनी आत्मसात केली आहे, यातही काही आश्चर्य नाही. जिना पाकिस्तानचे निर्माते असले, तरी या देशाचे, त्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या स्मृतीचा आदर राखल्याने उगाच आपल्यावर समंजस सहिष्णुतेचा डाग लागेल, अशी भीती लोढांना वाटत असणार.

.......................................................................................................

३. उत्तर प्रदेशात अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना भाजप आमदार विक्रम सैनी यांनी नवा वाद निर्माण केला आहे. गोहत्या करणाऱ्यांचे हात-पाय तोडायला लावेन, अशी सैनी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री सुरेश राणा यांच्या सत्कार समारंभातच सैनी यांनी हे चिथावणीखोर विधान केले आहे.

ज्यांची जागा खरं तर गोठ्यातच आहे, त्यांना एकदम वेगळ्या जागी नेलं की, थोडे घोळ होतात. वेळ लागतो अॅडजस्ट व्हायला. जमेल हळूहळू. थोडा वेळ द्या. लवकरच ते शिरच्छेदाची भाषा बोलू लागतील, तेव्हा खरे रुळले म्हणायचे.

.......................................................................................................

४. ‘टाइम्स नाऊ’ सोडण्याच्या दोन दिवस आधीपासून आपल्याला स्टुडिओमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. मला त्या वेळी खूप वाईट वाटलं. अरविंद केजरीवाल यांनी जंतरमंतर इथे नोटाबंदीवर आंदोलन करण्याची नौटंकी बंद करावी, असं मी म्हटलं होतं. त्यानंतर मला स्टुडिओमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मी बनावट माध्यम सोडून दिले आणि माझ्या स्वातंत्र्याची घोषणा केली. : अर्णब गोस्वामी

अतिरंजित, एकांगी मतं खूप लोक मांडतात. त्यांना ‘सत्य’ म्हणून ढोल वाजवून वाजवून खपवण्याची कला एखाददुसऱ्या ‘गोस्वामीं’नाच साधते. अर्णबला आपल्या रोजच्या नौटंकीतून दुसऱ्या कोणाची नौटंकी समजू शकली, हेच फार मोठं आश्चर्य! त्याला आसपासच्या इतर नौटंक्या कधी दिसल्या नाहीत, हे मात्र आश्चर्यकारक नाही. ती कमावलेली दृष्टी आहे.

.......................................................................................................

५. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर राज्यात ‘योगीराज’ सुरू झाले असून, त्यांनी ‘आदेशां’चा धडाका लावला आहे. यानंतर ‘यादव पोलीस कर्मचाऱ्यांना हटवण्याचा घाट’ अशा आशयाचे ट्विट करणारे आयपीएस अधिकारी हिमांशू कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या सत्ताकाळात या हिमांशू कुमारांनी खूप फायदे उपभोगले आहेत, स्वातंत्र्य उपभोगलं आहे. आधीच्या सरकारच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांचे पंख नंतरचं सरकार कापतंच. आपण एकाच्या ताटाखालचं मांजर बनायचं स्वीकारतो, तेव्हा ताट बदलल्यावर उघडे पडू, हेही स्वीकारायला हवं. उगाच ट्विट ट्विटरूपी म्याँव म्याँव कशाला?

.......................................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......