सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ : सु.शि. कादंबरी लेखन स्पर्धा
पडघम - साहित्यिक
निवेदन
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 06 July 2022
  • पडघम साहित्यिक सुहास शिरवळकर Suhas Shirvalkar कादंबरी स्पर्धा Novel Competition

‘स्टोरीटेल, इंडिया’तर्फे सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर (सु.शि.) यांच्या स्मरणार्थ, शिरवळकर कुटुंबीयांच्या सहकार्याने ‘मराठी कादंबरी लेखन स्पर्धा २०२१-२२’.

स्पर्धेसाठी आलेल्या प्रतिसादामुळे आणि मागणीमुळे आता कादंबरी पाठवण्याची अंतिम तारीख ११ जुलैऐवजी ११ नोव्हेंबर २०२२ करण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या अटी, नियम व संबंधित सूचना -

- ही स्पर्धा सर्व लेखकांसाठी खुली आहे.

- लेखन मराठी भाषेत करायचे आहे. किमान ४० हजार शब्दांची कादंबरी लिहिणे अपेक्षित आहे. सुरुवातीला एक-दोन पानांत कादंबरीचा सारांश सोबत जोडायचा आहे. (सारांश नसलेले लिखाण स्वीकारले जाणार नाही.)

- कादंबरी यापूर्वी कोठेही व कोणत्याही माध्यमप्रकाराद्वारे प्रकाशित/प्रसिद्ध झालेली नसावी. पूर्णतः नवीन असावी. (ही स्पर्धा अनुवाद/ भाषांतर/रूपांतरासाठी नाही.)

- इतर कोणत्याही प्रकाशित अथवा/अप्रकाशित कादंबरीची कॉपी केली गेल्याचे निदर्शनास आल्यास, लेखक स्पर्धेबाहेर जाईल. कायदेशीरबाबींस सदर लेखक जबाबदार राहील व पारितोषिक/ करार रद्द समजला जाईल, रक्कम परत करावी लागेल. पारितोषिक जाहीर झाल्यानंतर, अशा बाबतीत दुसऱ्या कादंबरीस पारितोषिक जाहीर होईल. त्याचा निर्णय परीक्षक घेतील.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

- कादंबरीचा विषय व लेखन प्रकार कोणताही चालू शकेल. लेखनाचा विचार करताना- विचार, विषय व मांडणीतील नावीन्य, कथन, मांडणी, लिखाण... इत्यादी निकषांचा विचार केला जाईल. सुहास शिरवळकरांच्या वाचकप्रिय/ लोकप्रिय शैलीच्या जवळ असणाऱ्या कादंबऱ्यांचा प्राधान्यक्रमात विचार केला जाईल. 

- टायपिंग ‘मंगल’सारख्या ‘युनिकोड फॉन्ट’मध्ये करायचे आहे. हे टायपिंग वर्ड फाईलमध्ये असावे. (याशिवाय पीडीएफ प्रतही जोडायची आहे.)

- आपले लेखन, दिनांक ११ नोव्हेंबर २०२२पर्यंत पुढील इमेलवर पाठवायचे आहे. सोबत आपला फोटो, संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांकदेखील पाठवायचा आहे. या तारखेनंतर पाठवलेल्या कादंबऱ्या स्वीकारल्या जाणार नाहीत. इमेल आयडी- contact.shirvalkar@gmail.com

- निकालाची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. त्यावर कोणतेही आक्षेप व प्रश्न स्वीकारले जाणार नाहीत.

- निवड झालेल्या विजेत्या कादंबरीच्या लेखकास सन्मानचिन्ह दिले जाईल व १ (एक) लाख रुपयांचा पुस्तक प्रकाशनाचा करार स्टोरीटेल इंडिया बरोबर होईल.

- इतर नियम व अटी लागू.

(* या स्पर्धेत शिरवळकरांच्या नातेवाईकांना सहभागी होता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......