सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ : सु.शि. कादंबरी लेखन स्पर्धा
पडघम - साहित्यिक
निवेदन
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 06 July 2022
  • पडघम साहित्यिक सुहास शिरवळकर Suhas Shirvalkar कादंबरी स्पर्धा Novel Competition

‘स्टोरीटेल, इंडिया’तर्फे सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर (सु.शि.) यांच्या स्मरणार्थ, शिरवळकर कुटुंबीयांच्या सहकार्याने ‘मराठी कादंबरी लेखन स्पर्धा २०२१-२२’.

स्पर्धेसाठी आलेल्या प्रतिसादामुळे आणि मागणीमुळे आता कादंबरी पाठवण्याची अंतिम तारीख ११ जुलैऐवजी ११ नोव्हेंबर २०२२ करण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या अटी, नियम व संबंधित सूचना -

- ही स्पर्धा सर्व लेखकांसाठी खुली आहे.

- लेखन मराठी भाषेत करायचे आहे. किमान ४० हजार शब्दांची कादंबरी लिहिणे अपेक्षित आहे. सुरुवातीला एक-दोन पानांत कादंबरीचा सारांश सोबत जोडायचा आहे. (सारांश नसलेले लिखाण स्वीकारले जाणार नाही.)

- कादंबरी यापूर्वी कोठेही व कोणत्याही माध्यमप्रकाराद्वारे प्रकाशित/प्रसिद्ध झालेली नसावी. पूर्णतः नवीन असावी. (ही स्पर्धा अनुवाद/ भाषांतर/रूपांतरासाठी नाही.)

- इतर कोणत्याही प्रकाशित अथवा/अप्रकाशित कादंबरीची कॉपी केली गेल्याचे निदर्शनास आल्यास, लेखक स्पर्धेबाहेर जाईल. कायदेशीरबाबींस सदर लेखक जबाबदार राहील व पारितोषिक/ करार रद्द समजला जाईल, रक्कम परत करावी लागेल. पारितोषिक जाहीर झाल्यानंतर, अशा बाबतीत दुसऱ्या कादंबरीस पारितोषिक जाहीर होईल. त्याचा निर्णय परीक्षक घेतील.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

- कादंबरीचा विषय व लेखन प्रकार कोणताही चालू शकेल. लेखनाचा विचार करताना- विचार, विषय व मांडणीतील नावीन्य, कथन, मांडणी, लिखाण... इत्यादी निकषांचा विचार केला जाईल. सुहास शिरवळकरांच्या वाचकप्रिय/ लोकप्रिय शैलीच्या जवळ असणाऱ्या कादंबऱ्यांचा प्राधान्यक्रमात विचार केला जाईल. 

- टायपिंग ‘मंगल’सारख्या ‘युनिकोड फॉन्ट’मध्ये करायचे आहे. हे टायपिंग वर्ड फाईलमध्ये असावे. (याशिवाय पीडीएफ प्रतही जोडायची आहे.)

- आपले लेखन, दिनांक ११ नोव्हेंबर २०२२पर्यंत पुढील इमेलवर पाठवायचे आहे. सोबत आपला फोटो, संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांकदेखील पाठवायचा आहे. या तारखेनंतर पाठवलेल्या कादंबऱ्या स्वीकारल्या जाणार नाहीत. इमेल आयडी- contact.shirvalkar@gmail.com

- निकालाची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. त्यावर कोणतेही आक्षेप व प्रश्न स्वीकारले जाणार नाहीत.

- निवड झालेल्या विजेत्या कादंबरीच्या लेखकास सन्मानचिन्ह दिले जाईल व १ (एक) लाख रुपयांचा पुस्तक प्रकाशनाचा करार स्टोरीटेल इंडिया बरोबर होईल.

- इतर नियम व अटी लागू.

(* या स्पर्धेत शिरवळकरांच्या नातेवाईकांना सहभागी होता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......