टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • गीता गवळी, प्रणव मुखर्जी, गजेंद्र चौहान, जेएनयू आणि नवाजुद्दीन सिद्दीकी
  • Fri , 03 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या गीता गवळी Geeta Gawli गजेंद्र चौहान Gajendra Chauhan प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee जेएनयू JNU नवाजुद्दीन सिद्दीकी Nawazuddin Siddiqui

१. मुंबईचे महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकाएका नगरसेवकाची जमवाजमव करत असताना १० वर्षांपासून शिवसेनेबरोबर असलेल्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांचा पाठिंबा मिळवून भाजपने संख्याबळ ८४ वर नेले आहे. गवळी यांनी पाच वर्षे स्थायी समितीचे सदस्यत्व किंवा आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाची मागणी केल्यामुळे शिवसेनेबरोबरची बोलणी फिसकटली होती. त्यानंतर त्यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेऊन भाजपला समर्थन देण्याची तयारी दर्शवली.

आजकालच्या तरुण बातमीदारांना बातम्याच लिहिता येत नाहीत नीट. ही बातमी अशी हवी होती :- अतिशय संस्कारशील घरात जन्मलेल्या आणि वडिलांकडूनच जनसेवेचं बाळकडू मिळालेल्या गीता गवळी यांना जनसेवेची आंच लागल्यामुळे त्यांनी निव्वळ सेवेच्या भूमिकेतून ही पदं मागितली होती. मात्र, शाहिस्तेखानाची बोटं छाटून विजयी झालेल्या मावळ्यांनाही सेवेची ओढ लागलेली असल्याने त्यांचा हिरमोड झाला. अखेर पारदर्शी, संस्कारी आणि सुस्वच्छ अशा भाजपाने त्यांच्या समर्पित वृत्तीला न्याय दिलेला दिसतो.

............................................................................................

२. ज्यांच्या नियुक्तीविरुद्ध विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ दिवसांचा संप पुकारला आणि केंद्र सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले, त्या गजेंद्र चौहान यांना मुदतवाढ नाकारून पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून नारळ देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पुढील आठवड्यात नव्या मंडळाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

ही नकारात्मक बातमीदारी झाली. सकारात्मक बातमीदार असता तर त्याने लिहिलं असतं की, डाव्या, कम्युनिस्ट, समाजवादी, उदारमतवाद्यांचा बुजबुजाट झालेल्या व्यसनाधीन, बेबंद आणि अराजकवादी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणाऐवजी आंदोलनाची थेरं करत बसलेल्या राष्ट्रद्रोही विद्यार्थ्यांच्या बिनबुडाच्या विरोधाला न जुमानता, देशातल्या बहुतेक सगळ्या चित्रपटकर्मींच्या नाकांवर टिच्चून गजेंद्र चौहान यांनी आपला कार्यकाल दिमाखात पार पाडला आणि ते सन्मानाने पायउतार झाले.

............................................................................................

३. असहिष्णू भारतीयांना भारतात जागा नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रामजस महाविद्यालयातील हिंसक घटनांवर भाष्य केले आहे. विद्यापीठात तर्कसंगत चर्चा आणि वादविवाद व्हावेत. मात्र त्यामुळे अस्वस्थता आणि अशांतता पसरणार नाही, याची काळजी घेतली जावी, असे म्हणत राष्ट्रपतींनी विद्यापीठांमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

राष्ट्रपती अचानक जागे झाले आणि त्यांनी लिहून दिलेल्या भाषणाऐवजी मनानं भाषण केलं, असं काही घडलं आहे का? कदाचित अधूनमधून रुचिपालट म्हणून राष्ट्रपतींना असंच भाषण लिहून दिलं गेलं असण्याचीही शक्यता आहे. ते काहीही बोलले, तरी कोणालाच काही फरक पडत नाही, ही खात्री असल्यानेच हा धोका पत्करला गेला असावा.

............................................................................................

४. आंदोलनं आणि वादांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जेएनयू) सर्वोत्तम विद्यापीठांच्या विभागात यंदाचा ‘व्हिजिटर्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सहा मार्चला राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात येईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनीच याबद्दलची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

अरे देवा, जेएनयूमध्ये मुळात काही शिकवतच नाहीत. तिथे विद्यार्थी आंदोलनं करायलाच येतात. कम्युनिस्ट कार्यकर्ते शिक्षणाच्या नावाखाली होस्टेलच्या सुविधांचा स्वस्तात लाभ घेतात. उच्चशिक्षणाच्या नावाखाली मध्यमवयापर्यंत जेएनयूमध्ये डेरा टाकला जातो. हे सगळं राष्ट्रपतींना माहिती नाही की काय? जिथे कोणी शिकवत नाही आणि काही शिकतही नाही, ते विद्यापीठ देशात सर्वोत्तम ठरवल्याने केवढं अराजक माजेल, याची काही कल्पनाच नाही की काय राष्ट्रपतींना?

............................................................................................

५. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ओम पुरींना श्रद्धांजली वाहिली जाते, मात्र हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांचा विसर पडला, अशा शब्दांत टीका करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने असे उथळ पुरस्कार सोहळे बंदच केले पाहिजेत, असे वक्तव्य केले आहे.

भाई नवाझ, पाण्यात राहून माशाशी वैर करायचं नसतं. आज उथळ पुरस्कार सोहळे बंद करा म्हणतोस. उद्या उथळ सिनेमे काढणंच बंद करा म्हणशील. मग सगळी इंडस्ट्री बेरोजगार होईल आणि उथळ लोक पाहतील काय? हा उथळ लोकांच्या निवडस्वातंत्र्यावरचा घाला नाही का? 

............................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......